Thursday, May 28

Article

Article

अण्णाभाऊ साठे; एक थोर व्यक्तीमत्व

अण्णाभाऊ साठे हे एक अलौकिक व्यक्तीमत्वाचे धनी होते. ते कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावीत झाले होते. त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं होतं.अण्णाभाऊ साठेचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होतं. त्यांचा जन्म १ आगष्ट १९२० रोजी झाला होता. त्यांचा जन्म सांगलीचा. ते समाजसुधारक, लोककवी व लेखकही होते. त्यांनी लिहिलेली फकीरा ही कादंबरी आजही जगतात गाजत आहे.अण्णा हे आंबेडकरवादी व मार्क्सवादी विचारसरणीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला व नंतर ते आंबेडकरवादी झाले. ते शिक्षण शिकले नाही. अर्थात कोणत्याच शाळेत गेले नाही. तरीही ते शाहिर, कादंबरीकार व कथाकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या आईचे नाव वालबाई होतं. तर पत्नीचे नाव जयवंता. त्यांच्या पत्नीला कोंडाबाई देखील म्हणत असत.अण्णा हे मातंग समाजाचे असून त्या काळी होत असलेल्या भेदभावाचे चटके ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांना बसले. तसेच ते अण...
Article

प्लास्टिक आणि पॉलिमर… भविष्यातील नवीनतम संधी

विसाव्या शतकाच्या सुरवातीला रसायन शास्त्रामध्ये झालेल्या पाच प्रमुख शोधांमधील पदार्थ म्हणजे प्लास्टिक (काळ 1909 ते 1972). त्या काळचे इतर प्रमुख शोध म्हणजे 'अमोनिया' ची निर्मिती, पेनिसिलीन, गर्भनिरोधक गोळ्या आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (LCD). रसायन शास्त्रामध्ये झालेल्या या पाच प्रमुख शोधामुळे आपण आधुनिक जगाची कल्पना करू शकलो.मुळात प्लास्टिक हे पॉलिमर पासून बनविले जाते. पॉलिमरवर यांत्रिक प्रक्रिया (moulding) करून जे उत्पादन बनविले जाते त्याला 'प्लास्टिक' म्हणतात. पॉलिमर हे असंख्य अश्या कार्बन आणि हायड्रोजन रेणू पासून बनलेले असतात. कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) शुद्धीकरण प्रक्रियेत जे घटक बाहेर पडतात त्यापासून पॉलिमर बनविले जाते. प्लास्टिक हे अल्पावधीतच सर्व क्षेत्रांमध्ये वापरले जाऊ लागले. कारण की त्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे. प्लास्टिक हे हलके, टिकाऊ, मजबूत, विद्युतरोधक आणि पुनर्वापर य...
Article

मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची काव्यसंपदा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि. 29/07/2021 ला असलेल्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे त्यांच्याच कवितेतून काव्यमय दर्शन घडविणारा ”मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची "काव्यसंपदा” हा प्रा. अरुण बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.- संपादकराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार आचरणात आणणारे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष, विद्वत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारे लोकमहर्षी, राष्ट्रसंताचे व संत गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान-विचारसारणी आंमलात आणणारे कीर्तनकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात डोळसपण...
Article

समाजसुधारक फातिमा शेख

“फातिमा शेख या आधुनिक भारताच्या समाज सुधारक होत्या” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी होत्या. त्यांनी सावित्रीबाई बरोबर शिक्षण घेतले होते. त्यांनी पुणे येथे अध्यापकीय शिक्षण घेतले होते.त्यामुळे त्या भारतातील मुस्लीम समाज्याच्या पहिल्या शिक्षिका म्हणून अग्रेसर होत्या. महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरु केली त्या शाळेत फातिमा शेख सावित्रीमाई फुले बरोबर शिकविण्याचे कार्य करीत होत्या त्या शाळेत प्रवेश घेतलेल्या ६ मुली होत्या काही लोकांच्या मते फातिमा शेख या त्या पैकी एक होत्या, असा समज आहे असे नसून महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या बरोबरीने काम करणारी धाडसी महिला होती यासाठी फातिमा शेख यांचा भाऊ उस्मान शेख यांनीही सहकार्य केले आहे. खरे तर इंग्रज सरकारच्या काळात आणि सनातनी जातीयवादी ब्राह्मण यांच्या विरो...
Article

जिद्द व परिश्रमाचे दुसरे नाव उत्तम सोनकांबळे

उभ्या आयुष्याला संघर्षमय खाचखळगे लाभले असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून परिश्रमाच्या जोरावर उत्तम कांबळे ह्यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळविले. आता ते औरंगाबादला सहसंचालक (कोषागार विभाग) पदावर कार्यरत आहेत. आयुष्याला उजेडवाट मिळाली आहे. मात्र ह्या वाटेवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास कुणालाही चकित करुण टाकणारा 'आश्वासक' असाच आहे. जाणून घेऊ या त्यांच्या प्रवासाविषयी ...दोन वेळच्या भाकरीच्या शोधात त्यांच्या वडीलांनी मुखेड तालुक्यातील शिकारा हे गांव गाठलं. शिकारा गावची त्यावेळेची वस्ती फारतर एक हजार लोकांची. गावात घर नव्हतं, शेती नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं. तरीही मुलांना त्यांनी शाळेत घातलं. खेड्यापाड्यातील आंबे, पपई, फळे, भाजीपाला ठोकभावाने विकत घ्यायचा व गावापासून ८, १० किलोमिटर अंतरावर मुखेडला नेवुन, बाजारात दिवसभर विकायचा. अंधार पडण्याच्या आत ज्वारी-बाजरी विकतघ्यायची ती ति...
Article

प्रगल्भ जाणिवेतून साकारलेली डॉ. विशाल इंगोले यांची कविता ; ‘माझा हयातीचा दाखला’

कवी व्यासंगाच्या उद्यानात विचारांची फुले वेचून मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे करीत असतो. अगदी याचप्रमाणे कवीची कविता कागदावर उतरत असते. कविता हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही, तर वास्तवाला स्पर्श करुन मानवी भावभावनांचा कल्लोळ आपल्या काळजापर्यंत पोहोचवण्याचे एक सकस आणि सशक्त माध्यम असते. कविता समाजदृष्ट्या प्रभावी तेव्हाच होते जेव्हा तिला वैचारिकतिचे तात्त्विक अधिष्ठान लाभते. कवीच्या वाट्याला आलेले संघर्षमय आयुष्य जेव्हा एखादा कवी नेमक्या, मार्मिक, भाषाशैली द्वारे मांडतो तेव्हा ती कविता सामाजिक उद्रेक घेऊन जन्माला येते. सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारते. याच प्रगल्भ जाणिवेतून डॉ विशाल इंगोले यांचा *माझा हयातीचा दाखला* हा कवितासंग्रह आकारास आला आहे.प्रस्तुत काव्यसंग्रहाच्या समीक्षा लेखनास विलंबच झाला कारण शब्दसृष्टीतील नेमकी कोणती शब्दफुले संग्रहास अर्पण करावीत या प्रश्नाच्या आवर्तात माझी सा...
Article

यशवंत अन् स्मशानातलं जेवण..!

नेहमीच हसत राहणारा यशवंत माझा फारच जवळचा नातेवाईक होता. त्याची आई आणि माझे बाबा सख्खे मावस-बहीण भाऊ होते. नातेवाईक, शेजारी, आणि समवयस्क असल्याने आमचं बालपण सोबतच गेलं.तसं पाहिलं तर १९५६ च्या दरम्यान तुळसाबाईचे लग्न धानोरा ताथोड तालुका कारंजा येथील किसन गडलिंग यांच्याशी झाले होते. किसन सुद्धा मूळचा धानोर्याचा नव्हताच, कारण त्याचे सर्व नातलग अमरावती जिल्ह्यातील होते. त्यांचे मामा धानोर्याचे होते. मामाच्या आधाराने ते धानोर्याला आले होते. आणि लग्नानंतर किसन गडलिंग आपली सासू शेवंताबाई धवणेकडे राहायला आले होते. शेवंताबाई म्हणजे किसन वानखडेची सख्खी आत्या व माझ्या वडिलांची मावशी होती. सुरुवातीला माझ्या घराला लागूनच त्यांचं झोपडं होतं. परंतु १९७० च्या दरम्यान ते चौधरीच्या निंबावाल्या आवारात राहायला गेले, नंतर चिंचेखालच्या चौधरी यांच्या आवारात राहायला आला. (हनुमान मंदिरासमोरच्या) तेथेच शेवंताबुडी आण...
Article

‘स्त्री मनाची घुसमट : काल आणि आज’

'आई' हा शब्दच् मुलांसाठी सर्वांग सुंदर असतो. त्या शब्दाला कशाचीच् उपमा देऊ शकत नाही. मुले ही आई या शब्दातच संपूर्ण विश्व बघत असतात. तिच्या मायेत, तिच्या वात्सल्य छायेत ते वाढत असतात. तिचा प्रत्येक शब्द मुलांचे बालपण घडवत असतात. बालमनावर संस्कार करणारी 'ती' माऊली जगाच्या जडण-घडणीचा पाया असते. आई हीच् मुलांची प्रथम गुरू मानली जाते.योग्य संस्कार देऊन ती मुलांचे भविष्य घडवीत असते. संस्कार हा शब्दचं असा आहे की,  तो माणसाला योग्य मार्ग दाखवित असतो. तिथे दूर दूर पर्यंत विकृतीला मनात थारा नसतो. मनावर झालेले संस्कार आयुष्यभराची शिदोरी म्हणून माणसाला प्रत्येक मार्गावर सोबत असते. आज काळ बदलला, विचार बदलले ; त्याचबरोबर आई पण आधुनिक विचार सरणीची झाली.परंतु कधीकाळी तिच्यातील अबला म्हणून वावरणारी स्त्री आज बदलली असली तरी, तिच्यातील संस्कारी आई अजूनही बदललेली नाही. तिला सुद्धा वाटते की, मी फक्त माझ्या...
Article

हाताला काम द्या ; पोटाला अन्न द्या..!

"धैर्य समस्त शक्तियों और आनंद का मूल है।धैर्यवान व्यक्ती कभी भी नाकामयाबी से निराश नही होता।बल्कि हर असफलता उसे और अधिक प्रेरित करती है।अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए इतिहास में एेसे कोई उदाहरण नही है ।जब आदमी के धैर्यपूर्ण प्रयत्न कभी असफल हुए हो । उतावलापण और कामयाबी एक दुसरे के प्रतिककुल भाव है।सफलता जल्दबाजी में नही मिलती और जल्दबाजी में मिली सफलता कभी स्थायी नही होती।"     -जान रस्कीन    आज कोरोनाच्या महामारीने सारे क्षेत्र उध्दवस्त झाले आहेत.जे माणसे कामावर होते त्यांना कामावरून कमी केले आहे.छोटे उद्याेगधंदे लयास जात आहे.शिक्षण घेतलेली मुले जीवनाविषयी बैचन आहेत.सरकारी नौकरी बंद आहे.खाजगी कंपण्यात रोजगार नाही . माणसाचे जीवन भयग्रस्त झाले आहे.त्यात शासनाने जे आदेश काढले त्यांनी त्यांचे कंबरडेच मोडून गेले आहे.शिक्षणाच्या वाटा बंदिस्त होऊन गेल्या आहेत.अशा वातावरणात राजकिय खेळी सुरू...
Article

बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी प्रा. रमेश वरघट सर

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात डोंगराळ भागातील करजगाव अत्यंत गरीब कुटुंबात प्रा. रमेश वरघट सरांचा जन्म झाला. आई बाबा दोघेही निरक्षर होते. पण आपला मुलगा शिकावा, चांगला मोठा व्हावा. असं राधा-कृष्ण या जोडप्याला मनातून वाटे. म्हणून राबराब राबून त्यांनी मुलाला शाळेत घातलं. त्यांचं सातवीपर्यंतचे शिक्षण अत्यंत हलाखीत गावातच झालं. हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल दारव्हा येथे पूर्ण केले. त्यावेळी ते कोरे वसतिगृहात राहायचे. नववी पास झाल्यानंतर काही काळ त्यांच्या शिक्षणात खंड सुद्धा पडला होता. पण श्री एन. के. निमकर सर तसेच त्यांचा बालमित्र विष्णू तवकार यांच्यामुळे पुन्हा त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि ते मॅट्रिक द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झालं .महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अनेकदा त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. घरची गरिबी व अत्यल्...