Thursday, June 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा ‘किनारे सरकत आहेत’ गझलसंग्रह |
Article

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा ‘किनारे सरकत आहेत’ गझलसंग्रह |

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा "किनारे सरकत आहेत"गझलसंग्रहअनंत काळापासून दारिद्र्यात खितपत पडून जीवन कंठणारा आणि प्रस्थापितांकडून सातत्याने अंगावर येणाऱ्या मानसिक यातना,व्यथा, वेदना, अपमान पुर्वापार सहन करीत आलेल्या पुर्वाश्रमीच्या दलित, वंचित समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसात आणून बसविले, त्यांच्यात स्वाभिमान पेरण्यासोबतच दिशाहीन असलेल्या वंचितांना सुयोग्य दिशा देऊन त्यांच्या अंधाऱ्या काळ्याकुट्ट जीवनात प्रकाश निर्माण केला आणि त्यातून त्यांचे जीवनमान हळूहळू सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले आणि मिळालेल्या संधीचे सोने करत वंचितांनी आपली वाटचाल केली व करीत आहेत.ज्याप्रमाणे निसर्ग नियमानुसार बदल हा अभिप्रेत असून त्याअनुषंगाने कोणतीही वस्तू मूळ स्वरूपात स्थावर राहत नाही.परंतु कालांतराने सततच्या उन,पाऊस, थंडी आणि वारा इत्यादींच्या भडीमाराने तीचे मूळ स्...
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटक
News

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटक

गौरव प्रकाशन येवला (प्रतिनिधी ) : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्ष, प्रा. दादासाहेब कोते उद्घाटकशिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची, तर उद्घाटकपदी ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ आणि सचिव राजेश वाघ यांनी पत्राद्वारे दिली.येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे दि. ४ जून २०२६ रोजी हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील कवी, लेखक आणि कथाकार यांच्या उत्कृष्ट साहित्य कलाकृतींना देण्यात येणारे पुरस्कार यापूर्वी १ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले होते. निवड झालेल्या साहित्यि...
देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर
News

देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर

देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीरगौरव प्रकाशन न्यूज अमरावती | प्रतिनिधी : अमरावतीतील प्रसिद्ध गझलकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते देवीलाल रौराळे यांना विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार येत्या २ जून रोजी पुणे येथील एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नविपेठ येथे आयोजित भव्य विश्वबंधुता कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.देवीलाल रौराळे हे अमरावतीचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते राईटवे फाउंडेशनचे अध्यक्ष असून सामाजिक, साहित्यिक तसेच व्यसनमुक्ती चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. गझल लेखनासोबतच उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ‘देवी...
वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा
Article

वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा

वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा'जेवणार पाटी' हा वऱ्हाडातील लग्नसमारंभातील एक पारंपरिक विधी होय, पूर्वी वऱ्हाडाला सोन्याची कऱ्हाड असे म्हणत असत. लग्नसमारंभ म्हटला म्हणजे लगनघरी दणदणाट रहायचा. वेगवेगळ्या पाच झाडाच्या फांद्या आणून हिरवागार ताटव दरवाज्याच्या वरच्या बाजूला बांधून शुभ कार्याची मंगलमय सुरुवात करतात. आंब्याची पाने बांधून त्यावर नैवेद्य व पाणी शिंपडून कुलदैवतेची आराधना करतात. यामध्ये मामाचा सहभाग महत्वाचा असतो. हा ताटव मंगलतेचं प्रतिक समजला जातो. लगनघरी बंबाट मज्जा पावणे रावणे कुरोळीणा नटून थटून धमाल उडवून देतात. पूर्वीच्या काळी आठ आठ दिवस पावणे रावणे अगोदरच लगनघरी यायचे.एकमेकांना धान्य निवडण्यापासून तर लग्न वारासार होईपर्यंत मदत करू लागायचे. प्रसंगी आजूबाजूच्या घरून कोटया मागवून त्या पाण्याने स्वच्छ धुवून धोतर...
तिवसा येथे पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
News

तिवसा येथे पुरस्कार वितरण समारंभ व 21 आंबेडकरी गायकांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम

विविध मान्यवरांसह 21 आंबेडकरी गायकांची उपस्थिती ; निमंत्रक सागर भवते यांची माहितीगौरव प्रकाशन तिवसा प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांचे स्मृतिदिनाचे निमित्ताने प्रकाशदीप बहुउद्देशीय संस्था वरखेडचे वतीने शुक्रवार दिनांक 15 मे रोजी तिवसा येथील महालक्षी सभागृह येथे पुरस्कार वितरण समारंभ तथा सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा निमंत्रक सागर भवते यांनी दिली आहे.शुक्रवार दिनांक 15 मे रोजी महालक्ष्मी सभागृह तिवसा येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित पुरस्कार वितरण समारंभ तथा सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक सुदाम सोनुले राहणार असून समारंभाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर करणार आहे. उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदा...
अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन | गझल मुशायरा व कवीसंमेलन
News

अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन | गझल मुशायरा व कवीसंमेलन

अमरावतीत १७ मे रोजी चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन; गझल मुशायरा, परिसंवाद आणि कवीसंमेलनाची मेजवानीअमरावती : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृतिदिन, क्रांतिवीर सुखदेवराव तिडके स्मृतिदिन आणि सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त शब्दास्त्र विचार मंच व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १७ मे २०२६ रोजी चौथ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होणार असून साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.संमेलनाध्यक्ष म्हणून आंबेडकरी अभ्यासक प्रा. डॉ. अनंता सूर उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून आंबेडकरी साहित्यिका सुषमा पाखरे भूमिका मांडतील. स्वागताध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम भूषवणा...
स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याच.!
News

स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याच.!

स्वच्छतेच्या नावाखाली एसटी प्रवाशांवर आर्थिक भार; सुविधा मात्र अद्याप अपुऱ्याचगणेशराव देशकरीदारव्हा तालुका | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नुकतीच प्रत्येक तिकीटामागे दोन रुपयांची वाढ करून “स्वच्छता कर” आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या अतिरिक्त वसुलीनंतरही बसस्थानकांवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.दररोज राज्यभरातून लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात. ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी चार रुपये अतिरिक्त आकारले जात असून, या माध्यमातून महामंडळाला दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अनेक बसस्थानकांवर अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अपुरी स्वच्छतागृहे यामुळे प्रवाशांना मोठा त...
‘कोलाहलाची क्षणचित्रे’ : एक आत्मीय कोलाहलाचा गेय लेखाजोखा
Article

‘कोलाहलाची क्षणचित्रे’ : एक आत्मीय कोलाहलाचा गेय लेखाजोखा

‘कोलाहलाची क्षणचित्रे’ : एक आत्मीय कोलाहलाचा गेय लेखाजोखा‘कोलाहलाची क्षणचित्रे’ हा लवकुमार मुळे यांचा मराठी कवितासंग्रह संगत प्रकाशन, नांदेड येथून २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित झाला. कै. चंद्रकांत देशमुखे (बाबजी) यांना समर्पित हा काव्यसंग्रह वाचताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक विलक्षण तरलता, जिव्हाळा आणि त्याचबरोबर दुःखाची दाहकता अतरंगाला अस्वस्थ करते. ख्यातनाम गीतकार आणि निसर्गकवी बाबासाहेब सौदागर यांनी म्हटल्याप्रमाणे, या कविता अतिशय गेय, चित्रमय आणि प्रादेशिक बोलीच्या लहेजाने समृद्ध आहेत.संग्रहाच्या नावातील ‘कोलाहल’ ही संकल्पना केवळ मनातील गोंधळ नाही, तर आयुष्याच्या सर्व थरांवर पसरलेला, रान-शिवार, गाव-निसर्ग, शेती-दुष्काळ, घर-नाती, आत्म-भान आणि तळमळ या साऱ्यांचा एकत्रित मुखर स्वर आहे. ‘क्षणचित्रे’ म्हणजेच या कोलाहलाचे अनेक हालचाल करणारे स्नॅपशॉट्स – टपोरे, तापलेले, कधी मायेचे, कध...
अशी पाखरे येती.!
Article

अशी पाखरे येती.!

अशी पाखरे येती! | प्रतिक्रिया vs प्रतिसाद | सकारात्मक विचारांची प्रेरणादायी कथासायंकाळी टेरेसवर असेच स्वतःसोबत व थोडे निसर्गाशीही हितगुज करताना माझ्यातील विद्यार्थी जागा झाला. समोर झाडावर काही पक्षी दाटीवाटीने आपापसात काहीतरी बोलत होते. त्यातला एक पक्षी मात्र उदास होऊन काहीतरी दुःख चघळत उगाचच फांदीवर हेलकावे खात होता. मला कळेना त्याला नेमके कसले दुःख असावे! इतर पक्षी मात्र भरभरून जगणे अनुभवत होते. त्या दुःखी पक्ष्याचे काय बिनसले होते हे जाणून घ्यावे वाटले.खरेतर मी त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते नाहीतर एव्हाना विचारलेही असते. फक्त शांतपणे निरीक्षण करण्याखेरीज पर्याय नव्हता.काही वेळाने लक्षात आले की त्या एकट्या पक्ष्याजवळ हे इतर पक्षी जाऊ लागले, त्याला आपल्यात घेऊ लागले की तो चिडल्यासारखा करायचा. त्याला त्यांच्या स्वच्छंदी जगण्याचा जणू त्रास होत असावा. एकतर तो स्वतःही त्यांच्यात म...
“पीक विम्यापासून यवतमाळ वंचित; शेतकऱ्यांच्या हाती आश्वासनाचे ‘गाजर’?”
News

“पीक विम्यापासून यवतमाळ वंचित; शेतकऱ्यांच्या हाती आश्वासनाचे ‘गाजर’?”

“पीक विम्यापासून यवतमाळ वंचित; शेतकऱ्यांच्या हाती आश्वासनाचे ‘गाजर’?”गणेश देशकरीदारव्हा (जि. यवतमाळ) | तालुका प्रतिनिधी : खरीप हंगाम 2025 साठी काढलेल्या पीक विम्याचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. शासनाने एक रुपयात मिळणारी विमा योजना बंद करून शेतकऱ्यांकडून स्वतःचा हिस्सा भरून विमा काढण्यास भाग पाडले. आर्थिक अडचणीत असतानाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसणवार करून विमा भरला; मात्र आजपर्यंत विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमा कंपन्या आणि प्रशासन संगनमत करून जाचक अटी व निकष लादत आहेत. पीककापणी प्रयोग, सरासरी उत्पादन, मागील वर्षांचा डेटा अशा क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामान्य शेतकरी अडकतो आणि त्यातून विमा कंपन्या मोठा फायदा करून घेतात. प्रत्यक्षात नुकसान होऊनही शेतकऱ्य...