Monday, May 4

Article

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी
Article

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणीआमच्या भल्या मोठ्या अंगणात शेतीचं सामानसुमान, अडगळ,फाटा,वरवंटा,उखळ,जातं तुरीच्या कनोराची पोती काही धान्याच्या मातेराची पोती पडलेली असायची. त्यात विशेष भर म्हणजे या बाजांची असायची. ‌बाज हा प्रकार सर्रास अजूनही खेड्यात बघायला मिळतो. आमचं एकत्र मोठं कुटुंब असल्याने व सभासद संख्या जास्त असल्याने झोपायची चांगलीच पंचाईत होती. पावसाळयात आम्ही माडीवर सातऱ्या वाकया घेऊन निजायला जायचो. एकत्र कुटुंबात तीन आत्या,आबा,आजी दोन काका त्यांच्या बायका लेकरं,बाकरं, भरपूर ढोरंवासरं असं खंडीभर कुटुंब नक्कीच होतं. प्रत्येकाची कामं वाटून देलेली होती. त्यामुळे कुरबुरीला जागा नव्हती. कोणी भांडे घासायचं तर कोणी इंधनफाटा आणायचं तर कोणी जनावरांचा शेणपवटा,झाडझूड करायचं. कोणी बाजारहाट करून ढोरं चारायचं. तर कोणी खटल्यात हप्त्यावारी कामाला...
“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”
Article

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”संतुलित मानवी जीवनासाठी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगिकारुयागौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे दुःखमुक्ती, समता, करुणा आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर आधारित आहे. मानवी जीवनातील दुःखाचेमुळ कारण तृष्णा असल्याचे सांगून बुद्धांनी चार आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गा द्वारे निर्वाण (सर्वोच्च सुख / मुक्ती ) मिळवण्याचा मार्ग दाखविला आहे. हे तत्त्वज्ञान तर्कशुद्ध आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. चार आर्य सत्य-1) दुःख : जगात दुःख आहे (जन्म, मरण, आजार शोक )2) दुःख समुदाय : दुःखाचे कारण तृष्णा किंवा इच्छा आहे3) दुःख निरोध : तृष्णा नष्ट केल्यास दुःख दूर होऊ शकते (निर्वाण)4) दुःख निरोध गामिनी प्रतिपदा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहेअष्टांगिक मार्ग1) सम्यक दृष्टी : सत्य काय आहे ते समजणे2) सम्यक संकल्प : वा...
वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे.!
Article

वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे.!

वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे! प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या सल्ल्याची गरज असणे हे मानसिकदृष्ट्या स्वतःचे खच्चीकरण करण्याचाच एक भाग म्हणता येईल. स्वतःवर विश्वास असल्यावर ही केविलवाणी वेळ येत नाही. पण बऱ्याचदा आपणच स्वतःला तसे बनवत आलेलो असतो. एखादे काम करण्यापूर्वी इतरांच्या मेंदूने काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावात नकळतपणे बांडगुळवृत्ती वाढीस लागते.https://youtube.com/shorts/kD3oMP9Gs8k?si=IjBnDZOVtbJwjld0स्वतःचे असणारे मोल आपण कमी करत करतो आणि स्वतः केलेल्या कोणत्याही कामाला इतर लोक काय म्हणतील? त्यांना आवडेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याच्या नादात आत्मविश्वास कमी करतो. बरं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच लोकांकडून मिळवायची असतात ज्यांना आपल्या कर्तृत्वाची कदर नसते. आपल्यातील उमेद कमी करण्यासाठी जे नेहमी सक्रिय असतात अशा माणसांकडूनच चांगुलपणाचे प्रमाणपत्र मिळविण्य...
“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”
Article

“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”

"गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास"गावच्या मारोतीच्या पाराजोळ पिंपळाच्या व वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीत गावचा आठवडी बाजार भरायचा. पंचक्रोशीतील बाहेरगावची बेपारी मंडळी सायकलीवर कोणी मीनीडोर ऑटोवर कोणी गाढवावर तर कोणी घोड्यावर आपापलं दुकान,भाजीपाला, सामानसुमान लादून बाजाराला आवर्जून हजेरी लावायची. सोनखेड,भुईखेडचे भोई आपली पूर्णा नदीच्या पात्रातील पिकवलेले खरबूज टरबूज विकाले आणायची. चारदोन भाजीपाल्याचीआलू,कांद्याची व दोन तीन पान तंबाखू,गरम मसाल्याचे बेपारी,गावातला चपला शिवणाऱ्या जगदेव चांभार व घाण्याचं पिवर पिवळधम मद्रास तेलाचे पिपे घेऊन एक दोन तेल्यांची दुकाने, बाजुच्या खेड्यातला दाढी कटींगा करणारा शालीकराम म्हाली असायचा. त्याच्या दुकानात बंबाट गर्दी असायची.पैसे कमी म्हालपंचायतीच ज्यादा चालायच्या.बजाराच्या दिवशी आम्ही झोपेतून उठलेले वंग...
विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढली
Article

विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढली

विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढलीप्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते. त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची 'मे' महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच अनेकजन विदर्भात येण्याची हिम्मत करत नाही.विदर्भातील तीव्र उष्णता आणि तापमानातील सततची वाढ (४४°C-४६°C च्या वर) ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. अकोला, वर्धा आणि नागपूरसारखी शहरे देशातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी आहेत, ज्यामुळे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने दुपारच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पारा ४३°C ते ४६.९°C पर्यंत पोहोचला आहे, जो सामान्य तापमानापेक्षा ४-८ अंशांनी जास्त आहे. हवामान विभागाने ऑरेंज अ...
गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर…!
Article

गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर…!

गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर...!धो धो पाऊस कोसळला कि आमच्या जांब नदीचा पूर पाहून डोळ्यांचं पारणं फिटायचं.खरं तर माझ्या गावची जांब नदी जेव्हा दुथडी भरून व्हायची तेव्हा तिचं रूप काही औरच असायचं.पुराचं पाणी खाली मऱ्हळकडे वाहत जायचं.पुराचं पाणी म्हणजे जणू चहाच्या किटल्याच नदीत आणून ओतल्या आहेत असं वाटायचं नि विस्तीर्ण अशी ती जलक्रीडा बघायला खूप आनंद मिळायचा.त्या आनंदाला पारावार राहायचा नाही.पूर बघयाला जाणं ही माझ्यासाठी नाही तर गावातल्या सर्वांनाच एक मोठी पर्वणी असायची.' पूर आलाय रे ….' अशी एकदा का आरोळी घुमली कि गावातले शौकीन अर्थात माझ्यासारखे ,सर्वच नदीचा पूर बघायला छत्र्या, घोंगड्या घेऊन जमायचे.किती पाणी आलंय, कोणत्या पट्ट्यात जादा पाऊस झालाय,आणखी हे पाणी खाली कुठपर्यंत जाणार याबद्दलचे अनेक अंदाज जमलेले लोक बांधत. तंबाखू मळता मळता लोकांच्या गप्पा पुराच्या पाण्याच्या आवाजात मिसळून जा...
आमची शक्ती-आमचा ग्रह
Article

आमची शक्ती-आमचा ग्रह

आमची शक्ती-आमचा ग्रह जागतिक वसुंधरा दिन: प्लास्टिक प्रदूषणाचा धोका आणि वृक्षारोपणाची गरज | Earth Day Specialआपण ज्या ग्रहावर जन्म घेतला तोच आपला ग्रह, आणि तो ग्रह म्हणजे पृथ्वी.म्हणजे पृथ्वी हा ग्रहच आपले निवासस्थान आहे असे आपण हक्काने म्हणू शकतो.आपण ज्या घरी राहतो ते घर आपण जर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे सूज्ञास सांगणे न लगे. तदवतच आपण ज्या जागेवर घर करुन राहतो त्यालगतचेही घर स्वच्छ टापटीप असावे नव्हे तर संपूर्ण परिसरच टापटीप म्हणजे स्वच्छ असावा,अगदी प्रदुषणमुक्त असावा असे प्रत्येकास वाटावयास पाहिजे. आपल्या घराभोवताल हिरवळ असावी जेणेकरुन स्वच्छ प्राणवायु आपल्या नासिकेत प्रवेश करु शकेल. झाडे किंवा वनस्पतीच्या प्रत्येक प्रजाती ह्या जैवसाखळीकरिता आवश्यक घटक आहेत.त्या तर आपण जपल्याच पाहिजेत. ते आपले प्रथम कर्तव्यच ठरते.पर्यावरणाचा समतोल साधण्यास वृक्षारोपनाशिवा...
स्त्री मुक्तीदाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

स्त्री मुक्तीदाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय समाजरचनेत स्त्रियांची स्थिती अनेक शतकांपासून दुय्यम राहिली आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये स्त्रियांना समान अधिकार मिळण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. या महान समाजसुधारकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. त्यांनी केवळ अस्पृश्यता निर्मूलनासाठीच नव्हे तर स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठीही क्रांतिकारी कार्य केले. त्यांच्या विचारांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा दृढ आग्रह दिसून येतो. डॉ. आंबेडकरांचे मत होते की, “समाजाच्या प्रगतीचे मोजमाप स्त्रियांच्या प्रगतीवरून करता येते.” या विचारातूनच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी फारच कमी होती. समाजात स्त्रियांना घरापुरते मर्यादित ठेवले जात होते. अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांना शिक्षणाचे ...
श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर
Article

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेकविध पैलू आहेत.विषमतावादी भारतीय समाजरचनेत डॉ.आंबेडकर सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने लढलेत.भारतीय समाज त्यांच्या राजकीय,सामाजिक आणि धार्मिक विचाराबाबतीत जितका अवगत आहे तितका आर्थिक विचाराबाबत अवगत नाही. डॉ.आंबेडकरांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण अनं अतुलनीय आहे. डॉ.आंबेडकरांनी कृषी विकास,औद्योगीकरण, रोजगार निर्धारण, मजूर संघ, लोकसंख्या समस्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, बँकिंग, विमाक्षेत्र, वित्तीय आणि मौद्रिक धोरण, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इत्यादी बाबतीत सखोल असा अभ्यास व त्या अनुषंगाने वेळोवेळी अभ्यासपूर्ण केलेली मांडणी त्यांना जागतिक अर्थशास्त्रज्ञाच्या यादीत समाविष्ट करणारे आहेत.विकसनशील भारतीय अर्थव्यवस्था आणि विषमतावादी समाजरचनेत ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…
Article

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या...बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज,काल ,आणि ऊद्या कसे तारणारे आहेत..या विषयी सांगायचे झाल्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून आणि त्यांचे कार्य एका विशिष्ट समुदायापुरते किंवा वर्गापुरते नसून वैश्विक पातळीवर वाखाणण्यासारखे आहेत आहेत. अखिल विश्वाला तारणारे आहेत ..काल विषमतेच्या अंधारातून बाहेर काढणारा प्रकाश भूतकाळात, जेव्हा भारतीय समाज जातिव्यवस्थेच्या आणि विषमतेच्या बेड्यांत अडकला होता, तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे मुक्तीचे साधन ठरले.चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी माणसाला त्याच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली. त्यांनी दलित आणि बहुजन समाजाला हे पटवून दिले की, शिक्षण हे वाघिणीचे 'दूध' आहे आणि ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार ...