Sunday, June 14

Article

जाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदे; रोजच्या आहारात मधाचा समावेश का करावा?
Article

जाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदे; रोजच्या आहारात मधाचा समावेश का करावा?

जाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदे; रोजच्या आहारात मधाचा समावेश का करावा?जाणून घ्या मधाचे आरोग्यदायी फायदेनिसर्गाने मानवाला दिलेल्या अमूल्य देणग्यांपैकी मध ही एक महत्त्वाची देणगी मानली जाते. हजारो वर्षांपासून आयुर्वेदात आणि पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये मधाचा वापर केला जात आहे. स्वादिष्ट आणि पौष्टिक असलेल्या मधामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे तो केवळ गोडवा वाढवणारा पदार्थ नसून आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतो.1. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदतमधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे गुणधर्म शरीराला विविध संसर्गांपासून संरक्षण देण्यास मदत करतात. नियमित प्रमाणात मधाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते.2. घशातील खवखव आणि खोकल्यावर उपयुक्तहवामानातील बदलामुळे ह...
रात्रभर जागरणाचे परिणाम : तरुणांच्या आरोग्यावर वाढता धोका, पालकांची चिंता कायम
Article

रात्रभर जागरणाचे परिणाम : तरुणांच्या आरोग्यावर वाढता धोका, पालकांची चिंता कायम

डिजिटल युगातील बदलती दिनचर्या चिंतेचा विषयआजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाइन मनोरंजन आणि गेमिंगमुळे अनेक तरुणांची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. रात्री उशिरापर्यंत जागरणे आणि सकाळी उशिरा उठणे ही अनेक युवक-युवतींची सवय बनत चालली आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.झोपेच्या कमतरतेचा आरोग्यावर परिणामतज्ज्ञांच्या मते, नियमित आणि पुरेशी झोप ही शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सतत अपुरी झोप घेतल्यास एकाग्रता कमी होणे, चिडचिड वाढणे, मानसिक ताण निर्माण होणे तसेच कार्यक्षमता घटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.मोबाईल आणि स्क्रीनचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. तसेच रात्रीच्या वेळी निळ्या प्रकाशाच्या (Blue Light) संपर्कामुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रावरही परिणाम होतो.पालकांची वाढती चिंताअनेक पाल...
तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!
Article

तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!

तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!माय पायटीच सयपाक खोलीत चुलीवर गंजात गरम पाण्याचं आंदन घेऊन न्याहरीच्या ज्वारी,उडीद भरड धान्य मिसवून चक्की वरून दवून आणलेल्या ज्वारीच्या पिठाच्या हातावर मस्त मिसयच्या भाकरी थापायची. ताव्यावर हिरव्या मिरच्या भाजून गडव्यानं त्या कुस्करून बारीक करायची म्हणजे ठेचायची. म्हणूनच कदाचित त्याचं नाव ठेचा पडलेलं असावं. त्या मंद पहाटेच्या प्रहरी चुलीतल्या त्या लाकडाच्या उजेडात आईचा चेहरा चमचम चमकायचा.आमचं घर म्हणजे समोर छोटीशी माडी धाब्याची खोली, त्याच्या मागं कौलारू सपरी म्हणजे ओसरी.ओसरीत एका कोपऱ्यात सातऱ्या,वाकया ठेवायची लाकडाची घडोसी. धान्याची,मातेऱ्याची पोतीच पोती.त्याच्याच समोर आठ बाय चारची कुडाची व शेणा-मातीचा गीलावा दिलेली सयपाकखोली.तीच्या भिंतीवर शेतातुन आणलेल्या तुऱ्याटया, पऱ्हाटयाईच्या छावन्या टाकलेल्या. ज्या पावस...
रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!
Article

रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!

रायतं : कैरीच्या लोणच्यापासून शेतकऱ्यांच्या कष्टांपर्यंत… हरवलेल्या ग्रामीण जीवनाचा सुगंधी प्रवास.!पहिलं वळवाचं पाणी पडलं म्हणजे शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीसाठी धावपय सुरू व्हायची. आई भल्या पहाटे चुलीवर दोन जाडजूड मिसयच्या भाकरी, व पापडाचा चुरा व कैरीच्या फोडी,एखादा कांदा फडक्यात शिदोरी बांधून द्यायची. आम्ही बैलगाडीत बसून सरळ शेतात यायचो. झाडाखाली बैलगाडी सोडून सावलीत न्याहरी करायचो.बाबा वखर जूतून पऱ्हाटया पाडायचे. तर आम्ही धसकटं पेटवायचो. भर उन्हात काम करतांना साजरी खातर निंघायची.अशातच पऱ्हाटयाईचा कवटा जमा करतांना एखाद्या काट्याईची फांजर बोटात धसायची. तो रक्तबंबाळ हात साऱ्या दिवसभर साजराच ठणकायचा.एवढा की भाकर खाणं मुश्किल होऊन जायची.शेतकऱ्याचं जीवन खुपच कष्ट व हालअपेष्टांनी भरलेलं.हे मी अगदी शेतकरी कुटुंबातील असल्यानं जवळून अनुभवलं. एका दिवसी तर कचऱ्याच्या गंजाखाली लपवुन ठेवले...
प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा ‘किनारे सरकत आहेत’ गझलसंग्रह |
Article

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा ‘किनारे सरकत आहेत’ गझलसंग्रह |

प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा "किनारे सरकत आहेत"गझलसंग्रहअनंत काळापासून दारिद्र्यात खितपत पडून जीवन कंठणारा आणि प्रस्थापितांकडून सातत्याने अंगावर येणाऱ्या मानसिक यातना,व्यथा, वेदना, अपमान पुर्वापार सहन करीत आलेल्या पुर्वाश्रमीच्या दलित, वंचित समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसात आणून बसविले, त्यांच्यात स्वाभिमान पेरण्यासोबतच दिशाहीन असलेल्या वंचितांना सुयोग्य दिशा देऊन त्यांच्या अंधाऱ्या काळ्याकुट्ट जीवनात प्रकाश निर्माण केला आणि त्यातून त्यांचे जीवनमान हळूहळू सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले आणि मिळालेल्या संधीचे सोने करत वंचितांनी आपली वाटचाल केली व करीत आहेत.ज्याप्रमाणे निसर्ग नियमानुसार बदल हा अभिप्रेत असून त्याअनुषंगाने कोणतीही वस्तू मूळ स्वरूपात स्थावर राहत नाही.परंतु कालांतराने सततच्या उन,पाऊस, थंडी आणि वारा इत्यादींच्या भडीमाराने तीचे मूळ स्...
वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा
Article

वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा

वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा'जेवणार पाटी' हा वऱ्हाडातील लग्नसमारंभातील एक पारंपरिक विधी होय, पूर्वी वऱ्हाडाला सोन्याची कऱ्हाड असे म्हणत असत. लग्नसमारंभ म्हटला म्हणजे लगनघरी दणदणाट रहायचा. वेगवेगळ्या पाच झाडाच्या फांद्या आणून हिरवागार ताटव दरवाज्याच्या वरच्या बाजूला बांधून शुभ कार्याची मंगलमय सुरुवात करतात. आंब्याची पाने बांधून त्यावर नैवेद्य व पाणी शिंपडून कुलदैवतेची आराधना करतात. यामध्ये मामाचा सहभाग महत्वाचा असतो. हा ताटव मंगलतेचं प्रतिक समजला जातो. लगनघरी बंबाट मज्जा पावणे रावणे कुरोळीणा नटून थटून धमाल उडवून देतात. पूर्वीच्या काळी आठ आठ दिवस पावणे रावणे अगोदरच लगनघरी यायचे.एकमेकांना धान्य निवडण्यापासून तर लग्न वारासार होईपर्यंत मदत करू लागायचे. प्रसंगी आजूबाजूच्या घरून कोटया मागवून त्या पाण्याने स्वच्छ धुवून धोतर...
‘कोलाहलाची क्षणचित्रे’ : एक आत्मीय कोलाहलाचा गेय लेखाजोखा
Article

‘कोलाहलाची क्षणचित्रे’ : एक आत्मीय कोलाहलाचा गेय लेखाजोखा

‘कोलाहलाची क्षणचित्रे’ : एक आत्मीय कोलाहलाचा गेय लेखाजोखा‘कोलाहलाची क्षणचित्रे’ हा लवकुमार मुळे यांचा मराठी कवितासंग्रह संगत प्रकाशन, नांदेड येथून २ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित झाला. कै. चंद्रकांत देशमुखे (बाबजी) यांना समर्पित हा काव्यसंग्रह वाचताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक विलक्षण तरलता, जिव्हाळा आणि त्याचबरोबर दुःखाची दाहकता अतरंगाला अस्वस्थ करते. ख्यातनाम गीतकार आणि निसर्गकवी बाबासाहेब सौदागर यांनी म्हटल्याप्रमाणे, या कविता अतिशय गेय, चित्रमय आणि प्रादेशिक बोलीच्या लहेजाने समृद्ध आहेत.संग्रहाच्या नावातील ‘कोलाहल’ ही संकल्पना केवळ मनातील गोंधळ नाही, तर आयुष्याच्या सर्व थरांवर पसरलेला, रान-शिवार, गाव-निसर्ग, शेती-दुष्काळ, घर-नाती, आत्म-भान आणि तळमळ या साऱ्यांचा एकत्रित मुखर स्वर आहे. ‘क्षणचित्रे’ म्हणजेच या कोलाहलाचे अनेक हालचाल करणारे स्नॅपशॉट्स – टपोरे, तापलेले, कधी मायेचे, कध...
अशी पाखरे येती.!
Article

अशी पाखरे येती.!

अशी पाखरे येती! | प्रतिक्रिया vs प्रतिसाद | सकारात्मक विचारांची प्रेरणादायी कथासायंकाळी टेरेसवर असेच स्वतःसोबत व थोडे निसर्गाशीही हितगुज करताना माझ्यातील विद्यार्थी जागा झाला. समोर झाडावर काही पक्षी दाटीवाटीने आपापसात काहीतरी बोलत होते. त्यातला एक पक्षी मात्र उदास होऊन काहीतरी दुःख चघळत उगाचच फांदीवर हेलकावे खात होता. मला कळेना त्याला नेमके कसले दुःख असावे! इतर पक्षी मात्र भरभरून जगणे अनुभवत होते. त्या दुःखी पक्ष्याचे काय बिनसले होते हे जाणून घ्यावे वाटले.खरेतर मी त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते नाहीतर एव्हाना विचारलेही असते. फक्त शांतपणे निरीक्षण करण्याखेरीज पर्याय नव्हता.काही वेळाने लक्षात आले की त्या एकट्या पक्ष्याजवळ हे इतर पक्षी जाऊ लागले, त्याला आपल्यात घेऊ लागले की तो चिडल्यासारखा करायचा. त्याला त्यांच्या स्वच्छंदी जगण्याचा जणू त्रास होत असावा. एकतर तो स्वतःही त्यांच्यात म...
गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी
Article

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणीआमच्या भल्या मोठ्या अंगणात शेतीचं सामानसुमान, अडगळ,फाटा,वरवंटा,उखळ,जातं तुरीच्या कनोराची पोती काही धान्याच्या मातेराची पोती पडलेली असायची. त्यात विशेष भर म्हणजे या बाजांची असायची. ‌बाज हा प्रकार सर्रास अजूनही खेड्यात बघायला मिळतो. आमचं एकत्र मोठं कुटुंब असल्याने व सभासद संख्या जास्त असल्याने झोपायची चांगलीच पंचाईत होती. पावसाळयात आम्ही माडीवर सातऱ्या वाकया घेऊन निजायला जायचो. एकत्र कुटुंबात तीन आत्या,आबा,आजी दोन काका त्यांच्या बायका लेकरं,बाकरं, भरपूर ढोरंवासरं असं खंडीभर कुटुंब नक्कीच होतं. प्रत्येकाची कामं वाटून देलेली होती. त्यामुळे कुरबुरीला जागा नव्हती. कोणी भांडे घासायचं तर कोणी इंधनफाटा आणायचं तर कोणी जनावरांचा शेणपवटा,झाडझूड करायचं. कोणी बाजारहाट करून ढोरं चारायचं. तर कोणी खटल्यात हप्त्यावारी कामाला...
“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”
Article

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”संतुलित मानवी जीवनासाठी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगिकारुयागौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे दुःखमुक्ती, समता, करुणा आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर आधारित आहे. मानवी जीवनातील दुःखाचेमुळ कारण तृष्णा असल्याचे सांगून बुद्धांनी चार आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गा द्वारे निर्वाण (सर्वोच्च सुख / मुक्ती ) मिळवण्याचा मार्ग दाखविला आहे. हे तत्त्वज्ञान तर्कशुद्ध आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. चार आर्य सत्य-1) दुःख : जगात दुःख आहे (जन्म, मरण, आजार शोक )2) दुःख समुदाय : दुःखाचे कारण तृष्णा किंवा इच्छा आहे3) दुःख निरोध : तृष्णा नष्ट केल्यास दुःख दूर होऊ शकते (निर्वाण)4) दुःख निरोध गामिनी प्रतिपदा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहेअष्टांगिक मार्ग1) सम्यक दृष्टी : सत्य काय आहे ते समजणे2) सम्यक संकल्प : वा...