Thursday, May 28

Article

Article

जयभीम च्या निमित्ताने…

तब्बल साडे पाच वर्षांनी आज चित्रपट बघितला. गेली दहा वर्ष झालीत माझे टी.व्ही.चे खूळ सुटून, मालिका अन सिनेमे तर कब के बहुत पिछेछुट चुके है! नाही म्हणायला टॉकीजला जाऊन ‘नटसम्राट’ अन त्यानंतर मे २०१६ ला ‘सैराट’ हा शेवटचा बघितलेला चित्रपट. भूल पाडू शकेल वा ‘हा चित्रपट बघितलाच पाहिजे!’ अशी अलीकडे पार आतून उत्कंठा ,आकर्षण, जिज्ञासा वगैरे अजिबात वाटत नाही किंवा एका ठिकाणी बसून २-३ तास द्यावे हेही बरेचदा बहुअंगी व्यापामुळे परवडण्यासारखे नसते पण ‘जयभीम’ पाहायचाच आणि सहकुटुंब पाहायचा! हे समाजमाध्यमातील ‘जयभीम’ वरील अभिप्राय, प्रतिक्रिया यामुळे प्रकर्षाने वाटत होते. शिवाय आज सकाळीच साम टीव्हीच्या फेसबुक पेजवर प्रसन्ना जोशी यांच्या ‘लक्ष असतं माझं’ मध्ये ‘बॉलिवूडला जयभीम करणं का जमत नाही?’ हे लाईव्ह ऐकून सारी कामं बाजूस सारून आज दुपारी दोन्ही मुलं आणि आम्ही नवराबायको अशा चौघांनी ‘जयभीम’ बघितला.   अफाट,...
Article

‘झोळी’ : शोषित आणि दबलेल्या समाजातील दुःखाचे दर्शन देणारी साहित्यकृती..!

डॉ. कालिदास शिंदे यांची 'झोळी' हे आत्मकथन अलीकडेच (मे २०२१) प्रसिद्ध झाले आहे. यात भटक्या 'डवरी गोसावी' (नाथपंथी) जमातीचा कुलवृत्तांत विस्तृतपणे आला आहे.   शोषित आणि दबलेल्या समाजातील दुःखाचे दर्शन देणारी साहित्यकृती ही प्रस्थापित साहित्यासमोर नेहमीच आव्हान/आव्हाने उपस्थित करणारी असते. ती प्रस्थापित साहित्याचे भाषिक, राजकीय आणि सांस्कृतिक आयाम विरचित (deconstruct) करते. साहित्याचे आणि साहित्यव्यवहारांचे आरोग्य सशक्त होण्यासाठी हे आवश्यक असते. दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड (काही उल्लेखनीय पुरुष आत्मकथने) तसेच बेबी कांबळे, उर्मिला पवार (स्त्री आत्मकथने) यांनी ही भूमिका बजावली आहे. 'झोळी' हे पुरुषआत्मकथन आणि सुनिता भोसले यांचे 'विंचवाचं तेल' (पारधी समाजातील स्त्रीचे आत्मकथन) ही अलीकडची यासंदर्भातील दोन महत्त्वाची उदाहरणे आहेत.   'काळी' आणि 'पांढरी' अशा दोन संज्ञा कृषीसंस्कृतीच्या सं...
Article

डॉ.कालिदास शिंदे यांचे ‘झोळी’ आत्मकथन प्रातिनिधिक विमुक्त व भटक्या जमातींच्या आत्मसन्मानाचा निखारा

भारतामध्ये अठरापगड जाती जमातीचे लोक राहतात. यामध्ये अनुसूचित जाती ,जमाती, भटके, विमुक्त ,ग्रामीण ,आदिवासी, इत्यादी जाती-जमाती दलित वर्गामध्ये मोडतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ,शूद्र या चार वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र हे दलित, पददलित म्हणून ओळखले जातात .या जातीय उतरंडीमध्ये शूद्र हलके, कमी प्रतीचे व्यवसाय करत राहिले ,म्हणजेच वरील तीन वर्गांची सेवा करत राहिले .या दलित पददलित वर्गावर अन्याय अत्याचार होताना दिसतात. ओबीसी ,एससी या वर्गातील जाती स्थायिक स्वरुपाच्या आढळून येतात .तर भटके-विमुक्त जमाती स्थानिक स्वरूपाच्या नसतात .नाथपंथी डवरी गोसावी त्यापैकीच एक जमात आहे .दलित साहित्यामध्ये अनेक आत्मचरित्रे गाजली नाथपंथी डवरी गोसावी जमातीतील डॉ.कालिदास शिंदे यांनी लिहिलेले आत्मचरित्र झोळी नुकतेच माझ्या वाचनात आले.    डॉ.कालिदास शिंदे लिखित झोळी आत्मकथन समिक्षा पब्लिकेशन प्रकाशक श्री.प्रवीण अनिलराव भाक...
Article

चौकातले सुरमा भूपाली…!

सत्तरच्या दशकात 1975 मध्ये शोले चित्रपट आला होता.हा चित्रपट 70 एम.एम.च्या पडद्यासाठी बनवला गेला होता .त्या अगोदर 35 एम.एम.चे पडदे असायचे. या चित्रपटात,खूपच रंजक गोष्टी होत्या.यात,मैत्री होती, प्रेम होते,संघर्ष होता,गाणे होते, मनोरंजन होते,दरोडे होते असूया होती,नौटंकी होती.अशा अनेक गोष्टी एकच चित्रपटात बघायला मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे याचे डायलॉग खूप छान होते, डायलॉग त्या काळातल्या प्रेक्षकांना मुखोद्गत होते,प्रेक्षकांचे एकदा चित्रपट बघून मन भरत नव्हते ,प्रेक्षकांनी अनेकदा चित्रपट पाहिला,आजही पाहतात.मुंबईतील मिनर्वा टॉकीज इथे साधारणपणे पाच वर्षे हा चित्रपट रोज मॅटीनी शो ला होता तरीही प्रेक्षक मिळायचे.एकदा पाहून कोणाचे समाधान होत नव्हते, वारंवार पाहिला जायचा.इतके गारुड या चित्रपटाचे प्रेक्षकांवर होते. आजही आहे.या चित्रपटाने अमिताभ बच्चनला,धर्मेंद्र ला महानायक बनवले.तर गब्बरच्या भूमिकेत अ...
Article

विश्वशांती साठी बुध्द तत्वज्ञानाची गरज

बुध्द पुष्प मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प अपरिमित वर्षानंतर एकदाच जन्माला येते पण जेव्हा उमलते तेव्हा या संपूर्ण जगाला प्रज्ञा,आणि करूणेचा मधुर रस देऊन जाते.धम्मचक्र परीवर्तन बुध्दाने केले भुतो न भविष्य असे तत्त्वज्ञान या सृष्टीतील सम्यक ज्ञान जगाला दिले तो दिवस म्हणजे धम्म चक्रपरिवर्तन म्हणून प्रसिद्ध पावला ..माणसाने माणसासोबत माणुसकीने वागावे हाच बुध्द जीवनाचा पाया आहे.जगाला बुध्दाच्या विचाराची अत्यंत गरज आहे.जेवढी गरज माणसाला भाकरीची आहे त्या पेक्षा अधिक माणसाला बुध्दाची गरज आहे..असे डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुध्द म्हणजे सर्वज्ञ ह्याचा अर्थ सृष्टीतील सर्व चराचर गोष्टीचे सम्यक ज्ञान ,जे जगातील सर्व विषयासमधी प्राप्त झालेले ज्ञान असते त्याला सम्यक समंबुध्द असे म्हणतात. बुध्द म्हणजे क्रांतिकारक लढा,अन्यायकारक गोष्टीचा ,अन दुःखाचा मुळापासून शोध घेणे म्हणजे बुध्द होय ऋषिपतनाच्या मृ...
बौद्ध संस्कृती आणि संस्कार
Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार

बौद्ध संस्कृती आणि संस्कार बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्‍याऐंशी हजार स्तूप निर्माण करून...
Article

‘घालीन लोटांगण’ या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?

घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ? कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये : १. प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. २. ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. ३. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. ४. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते. ५. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. ६. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे ...
Article

धम्मचक्र प्रवर्तन व आम्ही !

तथागत भगवान बुद्धाद्वारे दिलेले प्रथम प्रवचन हे पाली साहित्यामध्ये 'धम्मचक्कपवत्तन सुत्त' या नावाने आम्ही पाहतो. हा उपदेश भगवान बुद्धाने प्रथमत: पंचवर्गीय भिक्खुंना दिला. 'धम्म' शब्दाचा अर्थ सत्य, सदाचरण, शिलाचरण असा होतो. मुळात मानव शांतताप्रिय आहे हे बुद्ध जाणून होते. त्यांनी पंचवर्गीय भिंक्खूना प्रथमत: वार्तालाभ करुन काही प्रश्न विचारले की, शुद्ध आचरण करणे, मानवास मानवता प्राप्त करण्यास आवश्यक नाही का? शुद्ध व्यवहाराकरिता शुद्धचित्त होणे गरजेचे नाही का? त्याकरिता पंचशिल हे काया, वाचा, मनाने पाळणे आवश्यक नाही का? यावर पंचवर्गीय भिक्खूंचे उत्तर होकारार्थी आल्यावर त्यांनी त्यांना विशुद्धी मार्गावर प्रवचन दिले. विशुद्धी मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक होय. जो शील, समाधी, प्रज्ञामध्ये विभक्त आहे. 'शील' या संकल्पनेला बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये उच्च व महत्वाचे स्थान दिले आहे. व्यक्तीचे व्यक्तीमत्...
Article

धम्म म्हणजे माणुसकीची महाऊर्जा

"मानवता के इतिहास मे राष्ट्रीयता एक बहुत बडी शक्ती रही है।यह एकत्व की भावना है ,। किसी वर्ग- विशेष के संबंधित होना नही ।"- डॉ.बाबासाहेब आंबेडकरमानवाला नव्या प्रगतीपथावर जाण्यासाठी फक्त अर्थार्जनाची आवश्यकता नाही तर त्याला माणुसकीच्या ऊर्जेची गरज आहे. ही माणुसकीची महाऊर्जा म्हणजे धम्म होय. धम्म हा जगातील सर्व मानवांना समानतेने वागवणारा महाऊर्जावान स्तोत्र आहे. जगातील अनेक धर्मात रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यांची सांगड झालेली दिसते . पण बुद्ध धम्मामध्ये प्रतित्यसमुत्पाद या विज्ञानवादी दृष्टिकोनातून मानवी जीवनाकडे पाहाले गेले आहे.प्रत्येक माणसाला स्वातंत्र असले पाहिजे. तो जसा शरीराने स्वतंत्र असतो तसाच तो मनाने स्वतंत्र असला पाहिजे. स्व:हित कल्याणा बरोबर, प्राणिमात्रांच्या कल्याणाची स्वप्ने त्यांना पडली पाहिजेत. माणसातील भेदाभेद ,विषमता, गुलामी ,अन्याय,अत्याचार,शोषण विटंबना या पा...
Article

गारुडी…!

जमुरे ताली बजा.. वाह वाह जमुरे इस जूनीबस्ती को नमस्कार करके ताली बजा... ताली बजा.. वो सब के नाम से जो ये गारूडी का खेल देखने थोडा रूक गया ताली बजा उनके नाम से जो ये सामने आके बैठ गया ताली बजा उनके नाम से जो बच्चे ईस्कूल मे जाते जाते इदर रूक गये ताली बजा ये बावाजी के नाम से जो ईसटेशन जाते जाते सामने आके बैठ गया.. ... ... गेम पायाची असंन तं येथी ठीकठाक बसा लागंन. ...ओ पोट्ट्या ठीक बस नं बे .आयकू नाई येत का ?काऊन थ्या पोथळीत वाकू वाकू पाऊन रायला तं ? काळू काय भोरांग्या? मंग पयशीन नं बाबू ? चूपच्याप बस नं.अन गम्मत पाय. .. तो, जमूरे ताली बजा ताली बजा सबके नाम डुगू डुगू डुगू डुगू.. डुगू डुगू... जमूरे अब हम खेल दिखाएगा...सब को दिखाएगा ? दिखाएगा.. डुगू डुगू डुगू डुगू....ढुगू ढुगू ढुगू....ढुगू ?? ढुगू ढुगू...? डमरू क्यूं नई बज रहा बराबर आज ? डुगू डुगू ..ढुगू ढुगू.. पायवं पोट्टे त्या डमरू ले काय झाल...