Friday, May 1

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
गुड फ्रायडे…
Article

गुड फ्रायडे…

गुड फ्रायडे...   गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिश्चन धर्मातील समजूतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले होते. याची आठवण ठेवून ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस मानला जातो. या दिवसाला गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काही ख्रिश्चन बांधव उपवास ठेवतात, ख्रिश्चनांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ म्हणजे लेंट सिझन दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद असतो.   या काळात मांस खाल्ले जात नाही, परंतु फळे, भाज्या, मासे, दूध, अंडी आणि गहू यांचे सेवन केले जाते.  जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार, प्रचार करत होते. ख्रि...
Article

शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर

  शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर    शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी या दुधापासून पनीर तयार केले आहे. शेळीच्या दुधामध्ये असलेल्या औषधी, पोषणमूल्य, जैविक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पूरक गुणधर्मामुळे लोकांमध्ये मागणी वाढत आहे, अनेक दुर्धर आजारावरही शेळीचे दूध फायदेशीर ठरते. मात्र शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात. वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक आणि डॉ. प्रवीण सावळे यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. डॉ. प्रशांत वासनिक आणि प्रवीण सावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ...
श्री हनुमान मारूती जन्माचा इतिहास
Gerenal

श्री हनुमान मारूती जन्माचा इतिहास

राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.हनुमान रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो रामाचा महान भक्त, दास, दूत मानला...
पत्त्यांची गंम्मत..! 
Article

पत्त्यांची गंम्मत..! 

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ. पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. *बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.*1) 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे *2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. * प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे. *3) या सर्व पत्त्याची बेरीज 364 *4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष. *5)*2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष. *6)*52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने *7) लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ *1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश *2) तिर्री म्हणजे ब...
Article

जगातील पहिला मोबाईल कॉल…!

३ एप्रिल १९७३ रोजी जगातील पहिला मोबाईल फोनवरून कॉल केला गेला. पोर्टेबल फोन या संकल्पनेची सुरूवात १९४६ मध्ये अमेरिकेत झाली होती. बेल सिस्टीम्सच्या मोबाईल टेलिफोन सर्विसने मिसुरी मधल्या सेंट लुईस या शहरात कार टेलिफोन सेवा देण्यास १७ जुन १९४६ रोजी सुरूवात केली. त्या पाठोपाठ इलिनॉईस बेल टेलिफोन कंपनीने हीच सेवा शिकागो शहरात २ ऑक्टोबर १९४६ पासून सुरू केली.   तत्कालीन मोबाईल फोन्स आताच्या फोन्सच्या तुलनेत अजस्त्र म्हणता येतील इतके मोठे आणि वजनाला अंदाजे ८० पाऊंड (३६ किलो) होते. सुरूवातीला या फोन्सवर फक्त ३ चॅनल्सच्या माध्यमातून संवाद साधता येत असे. ही सेवा १९७०-७२ पर्यंत केवळ कार्ससाठीच मर्यादित होती. पण १९७३ मध्ये मोटोरोला च्या पोर्टेबल कम्युनिकेशन प्रॉडक्टस चे चीफ जॉन एफ. मिशेल यांनी छोटेखानी मोबाईल डेव्हलप करण्यात मोलाची भुमिका बजावली.   ३ एप्रिल १९७३ रोजी जॉन एफ. मिशेल यांचे साथीदार मार्टिन ...
जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!
Article

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

* आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते. * सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. * लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात. * ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. * शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते. * लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते. * ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी ...
उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?
Article

उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?

उन्हाळा सुरु झाला की, शरीराची लाहीलाही होते. शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण थंड पदार्थ किंवा थंड पेयाचे सेवन करतो. आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ यासह पाण्याच्या बाटल्या ठेवतो. गर्मी वाढली की, आपण फ्रिजमधील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतो. पण फ्रिजमधील थंड पाणी पिणं आरोग्यासाठी हितावाह नाही. त्याऐवजी आपण मडक्यातील पाणी पिऊ शकता.आयुर्वेदानुसार, मडक्यातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड असते, त्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच असे अनेक घटक मातीत असतात, ज्यात रोगांशी लढण्याची क्षमता असते. उन्हाळ्यात मडक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात(Clay Pot Vs Refrigerator, Which Water Is Healthy? ).* उष्णतेपासून संरक्षण... उन्हाळ्यात मडक्यातील थंड पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. वास्तविक, मडक्यातील पाणी शरीरातील खनिजे आणि ग्लुकोजच...
Article

हमारी अधुरी कहाणी !

ज्या गोष्टींना कुणीही नाकारू शकत नाही, त्या गोष्टींना युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे शाश्वत सत्य असे म्हणतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पहाटेचं स्वप्न...असं म्हटलं जातं की, पहाटेला बघितलेलं स्वप्न खरं ठरत असतं. तर असेल बहुतेक...एकदा अशाच एका पहाटेला गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला टेक अप करून मी स्वप्नांच्या आटपाट नगरीत जावून लँड झालो. आणि... पुढे बघतो तर काय?   तिच्या प्रशस्त घराच्या उंबरठ्यावर ती उभी असताना माझी नजर तिच्यावर पडताच क्षणी तिचा तो निरागस चेहरा, तिचं स्मितहास्य, तिचा शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे माझ्या ह्रदयरुपी कॅमे-याने तिची प्रतिमा टिपून माझ्या मनपटलावर चित्रित केली. तेव्हापासून माझं तिच्यावर प्रेम बसलं आणि स्वप्न माझं फुलणार, असं वाटायला लागलं. माझ्या आयुष्यातील तो एक अनमोल ठेवा आहे. पण हे स्वप्न सत्यात उतरणार काय? याची अनामिक भीती मनात साचलेली. आपलं पहिलं प्रेम कसं...
Article

समतेची क्रांती – महाड सत्याग्रह

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला.त्यानंतर अनेक वर्षे हा दिवस ' समता दिन ' म्हणून साजरा केला जातो.आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली.परंतु समतेसाठी ' जलक्रांती ' आंदोलन करणारे होते समतेचे खंदे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर.इ.सन.१९२६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले.इ.स.१९२७ च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.महाड येथील चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.देशातील दलितांना उच्चवर्णीयांकडुन खुप अपमानास्पद वागणूक मिळत होती. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास किंवा पिण्यास साधा अधिकार देखील नव्हता. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी.के.बोले यांनी मुंबई प्रांतांच्या विधिमंडळा...
Article

गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ?

* स्त्री चेआरोग्य सांभाळतो गजरा.गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?...गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत.'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ?आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला...