Friday, May 1

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?
Article

‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?

'विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का? जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशी सज्जन आणि सभ्य लोकांची अस्वस्थता वाढतांना दिसते आहे. तिकडे मंबाजीच्या हालचालीही वाढत आहेत. मंबाजीची पिलावळ सर्वशक्तीनिशी कामाला लागली आहे. त्यांची भिस्त त्यांच्या स्वतःच्या कुटीलपणावर आहे. देशाच्या लुटीतून गोळा केलेल्या पैशावर आहे. द्वेष हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. चन्द्रभागेच्या पाण्यात विष मिसळण्याची धडपड ते जिवाच्या आकांताने करताना दिसत आहेत. पंढरीचे पावित्र्य अबाधित राखण्याची जशी शेवटची संधी वारकऱ्यांसाठी आहे, तशीच मंबाजीच्या पिलांसाठी देखील, पंढरपूर आणि संपूर्ण चंद्रभागा ताब्यात घेण्याची ती शेवटची संधी आहे. दोन्ही बाजुंनी ’करा अथवा मरा’ अशीच २०२४ची लढाई आहे. विमान विकलं, रेल्वे विकली, एलआयसी विकली, जंगलं विकली, समुद्र विकला, तसे पंढरपूर आणि चंद्रभागा अडाणी-अंबानीच्या नावाने करण्याच्या हालचाली स...
Article

प्रत्येकाची आई महान, तेवढीच महत्वाची.!

आई म्हटलं तर आई या शब्दातच महान अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आधार देणारी व ई म्हणजे ईमानदारी शिकविणारी. आ चा अर्थ आधार देणे असा लावल्यास खरंच आई आधार देते का? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होय असंच आहे. आई ही आपल्या बाळाला बापापेक्षा जास्त प्रमाणात आधार देत असते. ती सर्वप्रथम आपल्या बाळाला स्वगर्भात नऊ महिने ठेवते. अन्न पाणी पुरवते. त्याचं नवही महिने संरक्षण करते. त्याला त्रास होवू देत नाही. चांगलं संगोपन करते. त्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भातून बाहेर पडतं. तेव्हा मात्र तिच आई उन्हातून सावलीत नेल्यागत त्याचं गर्भाबाहेरही संगोपन करते. अगदी त्याचा विवाह होईपर्यंत. एवढंच नाही तर विवाह झाल्यानंतरही ती जेव्हापर्यंत आपले डोळे मिटत नाही. तेव्हापर्यंत आपली आई आपल्याला सांभाळून घेत असते. मग आपल्या कितीही मोठ्या चुका असल्या तरी आपली आई त्या पदरात घेवून आपल्याला माफ करते. हा झाला आधाराचा विषय. आता ई चा वि...
Article

मंतरलेले दिवस.!

रात्रीच्या गर्भातून नव्या सूर्याचा उदय होत होता.सकाळची उषःकाल नव्या नवलाईने नटून येत होती .विसाव्याला आलेली खग किलबिलाट करून मनसोक्तपणे अवकाशात विहार करीत होती. कामाच्या थकव्याने मला थोडा आराम हवा असं वाटत होतं. तरी पण माझे ध्येय गाठण्यासाठी मला आराम करून चालणार नव्हते. माझे जीवन निरंतर चालत राहणारे असावे असा चंग मी माझ्या मनात बानला होता.दाहीदिशांनी संकटाचे वारे झेपावत होते .डहाळीला आलेले कोमल फुल वावटळीच्या झोताने गळून पडणार का..? अशी भीती मला वाटत होती. जीवनाचा नवा पथ पादाक्रांत करण्याची जिद्द मनाला नवी उभारी देत होती. नव्या जीवनाला सुरुवात करत असताना येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद माझ्यात निर्माण होत होती.डि एड.चं शिक्षण संपलं होतं. शासनाने भरतीवर अघोषित बंदी लावली होती. माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आर्थिकतेचा निर्माण झालेला होता. नागपूरच्या गगनचूंबी शहरात स्वतःच अस्तित्व शो...
Article

शहरांची नावे बदलण्यामागचे राजकारण.!

उस्मानाबादचे धाराशीव आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी जल्लोषात स्वागत केलं आहे. मात्र, एमआयएमने या नामांतराला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या या निर्णयावर एमआयएमचे नेते असदुद्दीन औवैसीही प्रचंड भडकले आहेत. ओवैसी यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही तर हुकूमशाही आहे, अशी टीकाच ओवैसी यांनी केली आहे.एखाद्या शहराचं नाव बदलण्यामागे 'ध्रुवीकरणाचा हेतू' असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत काही विश्लेषक व्यक्त करत आहेत.तरी देखील नामांतराचे समर्थन व विरोध करण्यामागे व्होट बँकेचे राजकारणच कारणीभूत आहे.२०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरक...
Article

प्रेम म्हणजे नेमकं काय..?

प्रेमाची संकल्पनाच खूप व्यापक आहे. ती कुठल्याच मापदंडात मोजता येत नाही.आपण कुणावर किती प्रेम करतो हे कुठल्याच तराजूत तोलता येत नाही.. प्रेम हा शब्द बोलून प्रेमाचा सुगधं दरवळत नाही, प्रेम हा शब्द हृदयात साठवून मुक्त हस्ते निखळ भावनेने, खळखळणाऱ्या झऱ्याप्रमाणे, शुभ्र फेसाळ धबधब्याप्रमाणे निस्वार्थ कोसळणारा असावा. प्रेम हे शीतल गारव्यासारखे वणव्यात ही मनाचा दाह कमी करणारे असावे! ठेच लागलेल्या पायाला सावरणारे असावे, चिघळलेल्या जखमांवर हळुवार आधाराची फुंकर घालणारे डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी धडपडणारे असावे... प्रेम हे जगायला शिकवते; पण त्यासाठी अपेक्षा विरहित प्रेम असावे! म्हणजे जगता आणि जागविता दोन्ही गोष्टी साध्य होतात. आपण निस्वार्थ भावनेने प्रेमाचे रंग आपल्या हृदयात भरले आणि त्या स्नेहमयी रंगाने कुणाच्या तरी आयुष्याचे चित्र आनंदाने रंगवता आले तर नक्कीच प्रेम या शब्दाचा अर्थ कळेल...आणि नैराश...
Article

विवाहाचे वाढते वय..!

दोन मनं,दोन वंश नवीन सुरुवात जीवनाची आनंदी जीवन जगण्याची !!खरंच विवाह म्हणजे पवित्र बंधन अतूट नातं साता जन्माचा तसे बघितले तर विवाहाचे कायदेशीर वय मुलांसाठी 21 वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे असेच निश्चित केलेले आहे. कारण या वयात मुलं-मुली मध्ये परिपक्वता आलेली असते पण ही पद्धत हळूहळू बदलत चाललेली आहेत. त्यातल्या त्यात कुटुंब नियोजन त्यामुळे बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण बघता प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत चाललेले आहे याचा परिणाम विवाह संस्थांवर देखील झालेला दिसतो, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती यात बराच फरक बघायला मिळतो. याचबरोबर विवाहाच्या कल्पना आणि विवाहाची पद्धत सुद्धा बदलत चाललेली आहे काही ग्रामीण क्षेत्रात अजूनही बालविवाहाची प्रथा सुरूच आहे. उदाहरणार्थ राजस्थान मध्य प्रदेश आसाम याउलट शहरात आहे म...
Article

प्रेम म्हणजे न मांगता देणं

माणूस हा भावनिक नात्यांची विण गुंफणारा सहोदर आहे. आपल्याला जर जग जिंकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेम ह्या शब्दांनीच जिंकता येतं. प्रेमाशिवाय जीवन म्हणजे मृत्यूतत्त्वांचा नुसता अंधारकल्लोळच असतो .आई-बाबा, भाऊ-बहीण, नाते-गोते,मित्र-मैत्रिणी असे विविध नाते प्रेमाने मोहरून येतात. त्याचा सुवास सदोदित दरवळत असतो. पण त्या प्रेमाला माणुसकीची किनार असावी लागते. भावनिकतेचा ओलावा असावा लागतो .मातृत्वाची किनार असावी लागते. आपल्या मनात जोपर्यंत निखळ व स्वच्छ भावगर्भ निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण खरच प्रेम करतो काय..? हा यक्षप्रश्न माझ्या मनाला पडत असतो .संत कबीर आपल्या एका दोह्यात लिहितात की,   पोथी पढि-पढि जग मुआ पंडित भया न कोय। ढाई आखर प्रेम का पढै सौ पंडित होय ।। आपण कितीही ग्रंथाचे पारायण केले पण जर लोकांशी प्रेमाने वागलो नाही तर त्या पारायणाला काहीच अर्थ उरत नाही.   प्रेम ही एक अनमोल अशी देण...
Article

भरडधान्यांचे महत्व आणि कृषी महोत्सव

खाद्यसंस्कृती प्रदेशाची रचना, भौगोलिक स्थिती, हवामान, पाणी, पीकपद्धती यातून आकाराला येते. प्रदेशात, परिसरात पिकणारी अन्नधान्ये हीच त्या भागातील नागरिकांच्या आहाराचा मुख्य भाग असतात. महाराष्ट्रात पीकपद्धतीत वैविध्य आढळते. त्यानुसार भात आणि भाकरी किंवा पोळी खाल्ली जाते. त्यातही पूर्वी ज्वारीच्या भाकरी हा आपल्या आहाराचा प्रमुख घटक होता. नंतर त्याची जागा गव्हाच्या पोळीने घेतली. पूर्वी प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार ज्वारी, बाजरी, तांदुळाची किंवा नाचणीची भाकरी आवडीने खाल्ली जात असे.कष्टकरी माणसांचा भाकरी हा हक्काचा आहार होता. नंतर गव्हाचा समावेश झाला. त्यात बेकरी पदार्थ वाढले. केबल टीव्हीवरील जाहिरातींच्या माध्यमातून निरनिराळ्या पदार्थांचा आहारात समावेश झाला. चायनीजच्या गाड्या खेडोपाडीही सुरू झाल्या. जंक फूडच्या चटकेपोटी आरोग्य बिघडत असल्याचे दिसू लागले. हे असे असताना पुन्हा एकदा भरडधान...
Article

आज ही शिवाजी महाराज हवे हवेसे का वाटतात ?

खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाज रचना आहे. शिवाजी राजे हे सुध्दा सरंजामी राजे होते. आपण राजेशाही नाकारली आणि त्या जागी लोकशाही स्वीकारली शिवाजी महाराजा नंतर जे राजे महाराजे आपण बघितले राजे राजवाडे बघितले त्यांच्या अन्यायकारक आणि जुलमी राजवटीला आपण कंटाळलो. म्हणूनच ती समाजव्यवस्था आपण नाकारली. भांडवशाही ब्रिटिशाविरुद्ध भारतातील सरंजामशाही राज्ये तग धरू शकली नाही. या वरून सरंजामशाही व राजेशाही समाजव्यवस्था टाकाऊ होती हे सिद्ध होते. आपण लोकशाही स्वीकारली आणि ती स्वीकारल्यानंतर सुध्दा सरंजामशाही व राजेशाहीतला राजा आपल्या चेतना आणि स्पूर्ती का देतोय? का आपण त्यांचा जय जयकार का करतो? शिवाजी महाराज यांच्या आधीही आणि नंतर ही अनेक राजे महाराजे होऊन गेले तरी फक्त शिवाजी महाराज यांचीच जयंती साजरी का करतात? त्यांचेच स्मरण त्यांचीच जयंतीला आपल्याला एवढं स्पूर्तिदाई का वाट...
Article

स्वातंत्र्यलढ्यांचा प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज

'दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना प्रेरणादायी ठरतो आहे, आज शिवछत्रपती हे दमनकारी साम्राज्यशाहीविरुद्धच्या राष्ट्रवादी लढ्याचे प्रतीक ठरले आहेत,’ हे उद्गार आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे. एकदा नोबेल पारितोषिक प्राप्त थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांना जपानी लोकांनी विचारले की, ‘तुमच्या भारताची खरी ओळख काय?’ तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी व्यवस्था ही भारताची खरी ओळख आहे.बंगालच्या फाळणीनंतर वंगभंगाची चळवळ उभी राहिली. या चळवळीची प्रेरणा होते छत्रपती शिवाजी महाराज. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेली 'शिवाजी उत्सव'. ही कविता वंगभंग चळवळीचे स्फूर्तीगान ठरली. आपल्या या कवितेत रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘या भारत देशात स्वराज्य धर्म जागृती होणार, या तुझ्या महावचनाला आम्ही बनवू आ...