विधानसभेत कौतुकाची थाप… अन् काही तासांतच तुकाराम मुंढेंची मोठ्या जबाबदारीतून मुक्तता.!

On: June 24, 2026 12:07 PM
आम्हाला फॉलो करा
तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदावरून मुक्त केल्याची बातमी दर्शविणारे छायाचित्र

मुंबई : राज्याच्या विधानसभा अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची जोरदार चर्चा रंगली असतानाच शासनाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी कठोर मोहीम राबवणारे तुकाराम मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंढे यांनी राज्यभरातील दूध, खवा, खाद्यपदार्थ आणि औषधांमधील भेसळीविरोधात मोठी मोहीम सुरू केली. अनेक ठिकाणी अचानक धाडी टाकून कारवाई करण्यात आली. त्यामुळे भेसळमाफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदावर आता ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी फेब्रुवारी २०२६ पासून होती.

प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पालक सचिव पद प्रामुख्याने मंत्रालयातील कार्यरत सचिवांकडे दिले जाते. सध्या मुंढे हे मंत्रालयातील सचिव नसून एफडीए आयुक्त म्हणून कार्यरत असल्याने तांत्रिक कारणास्तव त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, विधानसभा सभागृहात त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर काही तासांतच हा निर्णय आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. काहींच्या मते हा केवळ प्रशासकीय बदल असून, एफडीएमधील वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांना पूर्णवेळ काम करण्याची संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असावा.

तुकाराम मुंढे यांच्या नावाभोवती कायमच चर्चेचे वलय राहिले आहे. त्यामुळे या नव्या निर्णयानंतरही राज्यभरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून आगामी काळात एफडीएमधील त्यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

मुंबईतील मुसळधार पावसामुळे जलमय झालेला रस्ता आणि वाहतुकीची कोंडी

मुंबई पाण्याखाली! पावसाने जनजीवन ठप्प.!

प्रा. दादासाहेब कोते यांची फुलपाखरू कविता इयत्ता चौथीच्या दोस्ती करूया मराठीशी पाठ्यपुस्तकात समाविष्ट

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात प्रा. दादासाहेब कोते यांची ‘फुलपाखरू’ कविता; सलग चार इयत्तांच्या पुस्तकांत स्थान मिळविण्याचा दुर्मिळ मान

परिवर्तन, धम्म आणि मानवतेचा संदेश देणारा ‘काव्यमुदिता’ काव्यसंग्रह प्रकाशित

निपेऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळा सिन्नर वारकरी भवन येथे वृक्षमित्र विष्णू वाघ व मान्यवर उपस्थित

ग्रामीण मातीचा गंध जपणाऱ्या ‘निपेऱ्या’चे दिमाखदार प्रकाशन; वृक्षप्रेमाचा संदेश देणारी साहित्यकृती ठरतेय चर्चेचा विषय

NEET परीक्षा केंद्राबाहेर मुलीला प्रवेश मिळावा म्हणून सुरक्षा रक्षकांच्या पाया पडून विनवणी करणारी आई – Viral Video

NEET गेट बंद, आईची हंबरडा फोडणारी धडपड! मुलीच्या भवितव्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या पाया पडली; व्हिडिओने देशाला हेलावले.!

पनवेल साहित्य महोत्सवात पुस्तक प्रकाशन आणि साहित्यिकांचा सत्कार सोहळा

पनवेलमध्ये रंगला भव्य साहित्य महोत्सव | लेखक-कवींच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन व सत्कार सोहळा