Thursday, March 5

News

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम
News

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रमगौरव प्रकाशन ठाणे, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिमेन्स वर्कर्स युनियनतर्फे एक विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिमेन्स वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष मनोज बोडके, उपाध्यक्ष जयंतीलाल गुप्ता, सहचिटणीस भास्कर कोतवाल, सेक्रेटरी महादेव गेजगे, सांस्कृतिक विंगचे अध्यक्ष राकेश मांजरेकर, युनिट सेक्रेटरी शिनोज नायर, विश्वनाथ शिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ठाणे विभागाचे प्रमुख नितीन पाटील, उल्हासनगर केंद्र प्रमुख वीणा तरेकर, शहाड केंद्र संचालक गजेंद्र आहेर, वर्तक नगर (ठाणे) केंद्र प्रमुख प्रवीण सकट, पनवेल केंद्र प्रमुख दयानंद कदम आणि गुणवंत कामगार अरविंद मोरे हेही उपस्थित होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
News

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीरगौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) – पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार २०२५ चे निकाल कामगार दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी ही माहिती दिली.या चौथ्या वर्षीच्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यभरातून साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १४३ साहित्य कलाकृती स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये कवितासंग्रह – ७८, कथासंग्रह – २२, कादंबरी – १६, ललित लेखसंग्रह – २२ तसेच इतर ५ प्रकारांचा समावेश होता. परीक्षकांच्या परीक्षणानंतर प्रत्येक प्रकारातील एक उत्कृष्ट कलाकृती निवडून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा
News

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 25 एप्रिल 2025 जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मलेरिया विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मलेरिया हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तसेच त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिबंधासाठी "गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा" तसेच "क्लोरोकिनची गोळी, करी हिवतापाची होळी" अशी आकर्षक घोषवाक्य फलकांवर लावण्यात आली.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!यावर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य होते — “चला हिवताप संपवूया - पुनर्विचार करा, योगदान द्या, पुन्हा सक्रिय व्हा.”कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅड...
जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!
News

जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!

गौरव प्रकाशन खंडाळा (जि. यवतमाळ) : खंडाळा येथे झालेल्या एका सामाजिक जागृती कार्यक्रमात सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी जिल्हा परिषद शाळांचे संरक्षण, शिक्षणातील बाजारीकरण आणि गावगाड्याच्या शैक्षणिक शोषणाविरोधात परखड मत व्यक्त केले.गावातच शिक्षण देणं म्हणजे संस्कार टिकवणं - ढाले"शेठजी, भटजी, बनिया यांनी शिक्षणाचा बाजार मांडणं समजून घेता येईल, पण ज्या शिक्षकांची संपूर्ण कारकीर्द जिल्हा परिषद शाळांमुळे घडली, त्यांनीच निवृत्तीनंतर कॉन्व्हेंट शाळा सुरू करून शिक्षणावर व्यापार करणं, हे दुर्दैवी आहे," असे ढाले यांनी ठासून सांगितले.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशासकीय शाळा बंद करण्यामागे पद्धतशीर षड्यंत्रढाले यांनी आरोप केला की, शाळा दत्तक योजना, शाळा समायोजन धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या तथाकथित सुधारणा या गावातील शासकीय शिक्षण नष्ट करण्याचे...
साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे
News

साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे

साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रेगौरव प्रकाशन हिवरा बु. (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सहाव्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी साहित्याचे समाजघडणीतले महत्त्व अधोरेखित केले.ते म्हणाले, "साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि साहित्यिक हे विकसनशील समाजाचे आधारस्तंभ असतात. साहित्याचे जतन आणि सृजन केल्याशिवाय कोणताही समाज विकसित होऊ शकत नाही." त्यांनी साहित्याची प्रगल्भता काळानुसार वाढण्याची गरजही व्यक्त केली.क्रांती आणि साहित्याचा संबंधइतिहासातील विविध क्रांतींमध्ये साहित्याचा मोलाचा वाटा राहिल्याचे सांगत त्यांनी व्हॉल्टेअर, रुसो, मार्क्स, गॉर्की यांसारख्या लेखकांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी बौद्ध साहित्य, ...
शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन
News

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधनगौरव प्रकाशन मुर्तिजापूर (प्रतिनिधी): चिखली कादवी मुर्तिजापूर येथील येथील प्रतिष्ठित नागरिक शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रकलाबाई, मुलगा पवन, स्नुषा सौ.जयश्री, नातवंडं असा आप्त परिवार आहे.काल स्थानिक स्मशानभूमी येथे त्यांचेवर प्रा. नारायण राऊत, राजू तायडे, व मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....
‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
News

‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

'कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितगौरव प्रकाशन नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे उदयोन्मुख गीतकार व कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहास ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’ तर्फे दिला जाणारा प्रा. वामन सुदामा निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.कोरोना महामारीच्या भयावह काळातील वास्तवाचे भाष्य करणारा हा कवितासंग्रह एक साहित्यिक दस्तऐवज म्हणून ओळखला जात आहे. महामंडळाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा प्रदान करण्यात आला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया सोहळ्याला उद्घाटक म्हणून महामंडळाचे सरचिटणीस व त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्...
मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न 
News

मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न 

मंगरूळ दस्तगीर येथे रासेयो शिबिर संपन्न कुऱ्हा (नितीन पवार)      श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार, प्राचार्य डॉ.सुभाष मुरे यांचे मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश शं. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिरादरम्यान,ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरण, पर्यावरण जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, डिजिटल साक्षरता, युवा रोजगार व उद्योजकता,आत्मनिर्भर युवा भारत, कृषी, विकसित भारत सशक्त भारत, भारतीय संविधान इत्यादी विषयाच्या जनजागृतीवर भर दिला आणि श्रमदानातून शेततळे आणि स्मशानभूमीची साफसफाई केली.तसेच सेंद्रिय शेती काळाची गरज, गाव गाव संविधान, घर घर...
भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे
News

भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे

 भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळेगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच समता सैनिक दल जिल्हा वर्धा द्वारा आयोजित जागर संविधानाचा अमृत महोत्सव प्रजास्तताकाचा उपक्रमांतर्गत जिल्हा कार्यकर्ता शिबिराचे आयोजन मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कूल रमाई नगर पुलगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात समता सैनिक दलाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.कार्यक्रचे सूत्र संचालन आयु. मधुरंद नांदेकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शशिकांत थुल सर यांनी केले.मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. धम्मा कांबळे (समन्वयक कोअर कमेटी समता सैनिक दल भारत) यांनी दलाची भूमिका विस्तृत रूपात मांडताना वर्तमान परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या सन्मानावर होत असलेल्या आक्रमणातून सोडवणूक करून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा भेदभावापासून स्वतः मुक्त होत देश विभागणाऱ्या विघातक श...
34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा
News

34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा

34 वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावासुनील गुंदैय्यागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमला विश्वेश्वर जिल्हा अमरावती येथील सन 1990 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 34 वर्षानंतर आपल्या शाळेत एका आगळ्यावेगळ्या मेळाव्याचे आयोजन केले. 9 मार्चला मोठ्या उत्साहात मेळावा पार पडला. या निमित्ताने पुन्हा एकदा विद्यार्थी एकत्र आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी प्राचार्य श्री. एम. जे. नेरकर सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक श्री.दीपकराव खेरडे सर, मालधुरे सर, पाटील सर, बहातकर सर, गोपाल यावले सर,देवळे सर आणि वडनेरकर सर होते. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे विद्यार्थी प्रमोद घाटोळ, प्रशांत पोहरकर, प्रमोद भगत या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा संमेलनातून जिव्हाळा जपला जातोअसे संमेलने होत ...