भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळे
भारत राष्ट्रासाठी आग्रही असले पाहिजे-धम्मा कांबळेगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच समता सैनिक दल जिल्हा वर्धा द्वारा आयोजित जागर संविधानाचा अमृत महोत्सव प्रजास्तताकाचा उपक्रमांतर्गत जिल्हा कार्यकर्ता शिबिराचे आयोजन मातोश्री इंग्लिश मिडीयम स्कूल रमाई नगर पुलगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमांची सुरुवात समता सैनिक दलाचा ध्वजारोहन करून करण्यात आली.कार्यक्रचे सूत्र संचालन आयु. मधुरंद नांदेकर सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. शशिकांत थुल सर यांनी केले.मुख्य मार्गदर्शक म्हणून आयु. धम्मा कांबळे (समन्वयक कोअर कमेटी समता सैनिक दल भारत) यांनी दलाची भूमिका विस्तृत रूपात मांडताना वर्तमान परिस्थितीत प्रत्येक भारतीयांच्या सन्मानावर होत असलेल्या आक्रमणातून सोडवणूक करून घेण्यासाठी जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा भेदभावापासून स्वतः मुक्त होत देश विभागणाऱ्या विघातक श...









