Wednesday, April 22

News

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश
News

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराशकटरा (जम्मू काश्मीर): श्री माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा सलग सातव्या दिवशीही स्थगित राहिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे.जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भूस्खलन व पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेचा मार्ग धोकादायक झाल्याने प्रशासनाने तात्पुरती यात्रा थांबवली.● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!हजारो भक्त कटरा, त्रिकुटा डोंगर परिसरात अडकलेले आहेत. हॉटेल्स, धर्मशाळा येथे गर्दी वाढली आहे.रोपवे, हेलिकॉप्टर, बैटरी कार यांसह सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धालूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.हवामान सामान्य झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल....
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा
News

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवामुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटविण्यात यावे. तसेच मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई वेशीबाहेरच रोखून परत पाठवावे, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!न्या. रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की आंदोलकांनी दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. केवळ आझाद मैदानापुरती मर्यादित राहणारी परवानगी असूनही मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, हुतात्मा चौक परिसरात जम...
मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक
News

मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक

मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमकमुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला महाराष्ट्रभरातून भक्कम पाठिंबा मिळत आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातील दानशूरांनी उपोषणकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!मात्र, ही जेवण घेऊन जाणारी वाहने मुंबईतील अटल सेतूवर पोलिसांनी थांबवली. यावर माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक पवित्र्यात आले व पोलिसांना थेट जाब विचारला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वादानंतर पोलिसांनी वाहने सोडली.यानंतर विक्रम सावंत आझाद मैदानावर दाखल झाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला.• नम्र निवेदन"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहका...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद
News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंदमुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता त्यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जाहीर केले की, “आजपर्यंत मी पाणी घेतले पण उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. म्हणजेच उपोषण आणखी कडक स्वरूप धारण करेल.”राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला 70 वर्षांपासून आरक्षण मिळालेले नाही. गोरगरीब मराठा समाजाची वेदना मोठी आहे. ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी गाड्या मैदानात लावा आणि रेल्वेने आझाद मैदानावर या, तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील.”सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्यापासून आमरण उपोषण आणखी तीव्र होणार असल...
नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले- डॉ. प्रकाश खरात
News

नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले- डॉ. प्रकाश खरात

नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले - डॉ. प्रकाश खरातगौरव प्रकाशन नागपूर (प्रतिनिधी ) : "नाईक साहेब हे धोरणी राजकारणी होते. लोकशाही मूल्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांच्या राजकारणात सांविधानिक मूल्येच केंद्रस्थानी होती. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तब्बल एका तपाच्या कार्यकाळात महाराष्ट्रावर अनेक दुर्धर संकटे आली असतानाही त्यांनी महाराष्ट्राची नौका सुखरूपपणे पैलतिरी नेली" असे प्रतिपादन डॉ. प्रकाश खरात यांनी केले. ते अ. भा. तांडा सुधार समिती द्वारा आयोजित महानायक वसंतराव नाईक स्मृतिदिन आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या जयंतिप्रीत्यर्थ 'नाईक साहेबांच्या ध्येयातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे वर्तमान' या विषयावरील व्याख्यानात वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड यांनी "महानायक वसंतराव नाईक आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत हे पुरोगामी ...
कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!
News

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!

कुमारी गौरी खापरकर हिचे जलतरण स्पर्धेमध्ये उज्वल यश!(पिंपळखुटा/स्वाती इंगळे)डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील गुणवंत विद्यार्थिनी कुमारी गौरी खापरकर हिने आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.ही जलतरण स्पर्धा श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गौरीने ५० मीटर फ्री स्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक गटात आपली सरस कामगिरी सादर करत प्रथम क्रमांक पटकावला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदागौरीच्या या यशामागे प्रा. मनीषा लांडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेचे उद्घाटन मा. दिलीप इंगळे, प्राचार्य डॉ. सी.एम. प्रा. देशमुख, डॉ. शशांक देशमुख, श्री ...
‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन
News

‘किनारे सरकत आहे’ : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशन

'किनारे सरकत आहे' : आंबेडकरी गझल संग्रहाचे अमरावतीत प्रकाशनगौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान व डीऑन पब्लिशिंग हाऊस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "किनारे सरकत आहे" या आंबेडकरी गझल संग्रहाचे प्रकाशन सोहळा १० ऑगस्ट २०२५, रविवारी दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी परिसर, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.गझलकार नंदकिशोर दामोदरे 'नंदा' यांनी लिहिलेल्या या संग्रहात सामाजिक वास्तव, तळागाळातील वेदना आणि परिवर्तनाची आंबेडकरी प्रेरणा उमटलेली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय घरडे असून, प्रमुख अतिथी म्हणून अरुण भी विघ्ने, डॉ. मनोज सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये करणार आहेत.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदादुपारी दोन वाजता "आंबेडकरी गझलप्रज्ञा...
पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकार
News

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकार

पारनेरचा चिट्ठीवाला झाला कांदबरीकारगौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी) : पारनेरच्या मातीत जन्म घेऊन.पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक लोक मुंबईत जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावली आहेत .अनेकांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे. त्यात अजून एक भर पडली आहे.गटेवाडी गावचे रहिवासी असणारे अशोक पवार हे साईनाथ क्लीअरिंग एजन्सी नवी मुंबई येथे काम करत असताना त्यांचा लेखन हा प्रांत नसून देखील त्यांनी , … आणी रामा कलेकटर झाला ही ३०० पांनी कादंबरी लिहली आहे.रविवार १३ जुलै रोजी खासदार निलेश लंके आणि सह आयुक्त विष्णू औटी यांच्याउपस्थितीत लेखकाच्या आई वडिलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कादंबरीचे प्रकाशन झाले आहे. हमाल ते कलेकटर अस कथानक असणारी कादंबरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुण वर्गा साठी मार्गदर्शक ठरेल ,असे गौरव उदगार विष्णू औटी यांनी प्रकाशन सोहळ्यात बोलताना काढले. अशोक पवार यांनी आपल्या लेखनातून अस्सल पारनेरी ...
लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन
News

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहन

लग्नातील अंधश्रद्धांना छेद! आकाश-मेनकाचे विचारशील पाऊल — डॉ. रविंद्र मुन्द्रे यांचे आवाहनगौरव प्रकाशन अमरावती | १6 जून २०२५नाशिक येथे १५ जून २०२५२०२५ रोजी पार पडलेला आकाश गायगवळी (जळका, शहापूर – अमरावती) आणि मेनका वाघ (नाशिक) यांचा विवाह समाजातील पारंपरिक रूढी व अंधश्रद्धांना छेद देणारा ठरला. लग्नानंतर १६ जून रोजी शहापूर तालुक्यातील जळका गावात आयोजित स्वागत समारंभात डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी या विवाहाचे कौतुक करत स्पष्टपणे आवाहन केले – "लग्नातील अनिष्ट परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करा!"या विवाहात पारंपरिक ‘हळदी समारंभ’ घेण्यात आला नाही. विवाहपत्रिकेतच याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, वधू मेनका वाघ यांनी परंपरेतील काळे मणी नसलेले मंगळसूत्र परिधान करत सामाजिक संकेतांना आव्हान दिले.डॉ. मुन्द्रे म्हणाले, "काळे मणी न घालता देखील मंगळसूत्र पूर्ण असू शकते, हे या दोघा...
‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!
News

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!पुणे, १४ जून: निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी भेट ठरलेले पुस्तक — ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ — नुकतेच पुण्यातील वनभवन येथे प्रकाशित करण्यात आले. सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचा उद्देश स्पष्ट आहे – वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती आणि प्रेरणा!"रामदास स्वामींनी जसे ‘मनाचे श्लोक’ दिले, तसेच हे ‘वनांचे श्लोक’ वाचकांना पर्यावरण जपण्याची साद घालतात,” असे स्पष्ट उद्गार डॉ. शेषराव पाटील (सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक) यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर. प्रविण होते. त्यांनी या पुस्तकातील घोषवाक्यांची सादर केलेली शैली, त्यांची परिणामकारकता आणि समाजात पोहोचण्याच...