Thursday, May 28

Article

Article

मराठी शब्दांचे महत्त्व…

आज दि.२७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या " मराठी भाषा गौरव दिना" निमित्त "मराठी शब्दांचे महत्त्व" हा कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -संपादक     आज दि. २७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना" विनम्र अभिवादन " आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना "हार्दिक शुभेच्छा !" मराठी शब्दांचे महत्त्व अनेक संतांनी सांगितलेले आहे. शब्दांमध्ये जे सामर्थ्य आहे ते कशातच नाही असेही म्हटले जाते कारण शब्द जसे शास्त्रज्ञान सांगून जीवन आनंदित करू शकतात तसेच हेच शब्द शस्त्रांचेही कार्य करू शकतात. संत कबीर शब्दांचा परिणाम वर्णन करताना म्हणतात की,   शब्द शब्द सब को ये काहे । शब्द के हात न पाँव । एक शब्द औषध करे ॥ एक शब्द करे घाव ॥ संत शिरोमणी तुकाराम महाराज शब्दांची पूजा करायला सांगताना म्हणतात की,   आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांच...
Article

माय मराठी…

"माझा मराठीची बोलू कौतुकें। परी अम्रुतातेही पैजा जिंके। ऐसीं अक्षरे रसिकें मिळविन।" आज २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन. महाराष्ट्र व गोवा ही दोन्ही राज्ये आज ह्या मराठी भाषेचा दिवस साजरा करतात. २७ फेब्रुवारी हा अजरामर कविवर्य कुसुमाग्रज ह्यांचा जन्म दिवस. नाशिक मध्ये जन्मलेले विष्णू वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर) हे अग्रगण्य कवी, ज्ञानपीठ विजेते,(१९८७) महान नाटककार, कथाकार. असा महान पुरुष अनंत काल स्मरणात रहावा म्हणून त्यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून शासनाने जाहीर केला. कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता बरंच काही शिकवण देते.   "ओळखलंत का सर मला" "पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा" अशा अजरामर काव्य रचना केलेल्या थोर कविचे शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे ही सदिच्छा. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" सुरेश भटांची कविता. खरंच एकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, मी मराठी. आजचा ...
Article

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज

महिलांच्या वाढत्या अत्याचाराचे प्रमाण बघता महिलांच्या संरक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने विशेष महिला धोरण आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करताना देशातील महागाईचा विचार करण्यासह शालेय शिक्षणव्यवस्था त्यात होणारी मुलींची कुचंबना,ग्रामीण महिला, त्यांचे आरोग्य ,कामगार महिला,बांधकाम मजूर महिला,स्त्रियांचा होणारा मृत्यदर आणि त्यांच्या समस्यांवर वेळीच न मिळालेला तोडगा याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.    आजची सुशिक्षित स्त्री चूल व मूल या चाकोरीत न अडकता नोकरी आणि व्यवसायासाठी पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडत आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. तरीही महिलांवरील अत्याचारांविरुद्ध सक्षम कायदा बनत नाही. महिलांवरील अत्याचार बंद का होत नाहीत? आज घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षित नाही. नोकरदार म...
Article

कोशिश करने वालों की कभी हार नही होती..!

पन्नास मुलाखतीच्या अपयशानंतर यशाचं शिखर हस्तगत स्वप्न तर सगळेच बघतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये असते. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी दररोज लाखो लोक मुलाखती देतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. तर काही जणांना खस्ता खाव्या लागतात. पण जर ध्येय निश्चित असेल आणि ते प्राप्त करण्याची जिद्द असेल तर काहीच कठिण नाही. ध्येय गाठताना तुम्ही कितीदा अडकलात? आणि तुमच्या पदरी अपयश आले, तरी त्याने काहीच फरक पडत नाही. पण हार न मानता सतत ध्येयाचा पाठपुरावा केला तर स्वप्न नक्कीच साकार होतात. मेहनत घेतल्यावर यश पदरी पडते. हे बिहारच्या पाटणा शहरातील एका 24 वर्षीय संप्रिती यादव या तरुणीच्या प्रवासावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ती म्हणाली, प्रत्येक प्रयत्न हा पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने करावा. तसेच मुलाखतीमध्ये अपयश येणे देखील महत्त्वाचे आहे. कारण अपयश हे व्यक्तीला अधिक मेहनत करण...
Article

शिवबा तुम्ही आजही हवे होते..!

आज महाराष्ट्रातील तमाम जनता व संपूर्ण देश शिवजयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा करत आहे.. उर आनंदाने भरून आलाय. तुमच्या बद्दल असलेला जिव्हाळा थोरांपासून लहान पोरांमध्ये ही आढळतो. खूप खूप बरे वाटते. पण शिवबा तुम्हाला जाऊन तीनशे वर्षाहुन अधिक काळ लोटला. त्याकाळची जनता (तुमची रयत) व आजची जनता ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राजे तुम्ही 'जाणते राजे' होता. स्वतः सर्व कायदे पाळत होता व त्याच प्रमाणे जनतेला ही तसे वागण्यास लावत होता.शिवबा आता फारच बदल झालाय. राजेशाही गेली व नेतागिरी आली. आज जनता नेत्याच्या आश्वासनाला बळी पडून नेता निवडतात. पण त्या नेत्याला तुमच्या नखाची सुध्दा सर नसते. सर्व स्वार्थापोटी मतदाराला भूल देतात व सामान्य जनता फसते. स्वतः नेताच काळे धंदे व भ्रष्टाचाराने माखलेला असतो. (अपवाद सोडून) तो जनतेचे हित न पाहता स्वतःचाच उत्कर्ष व अफाट पैसा कमावण्याच्या फंदात पडतो. तुमच्या काळासा...
Article

व्हँलेंटाईनचा नाद सोडा;संस्कृती जोपासा..!

आज तरुणाई अगदी भटकल्यासारखी दिसते.त्यांना दिशा माहीत नसल्याने ती मंडळी या तरुणाईत तरुणाईला सर्वस्व मानुन हवी तशी वागत असते.त्यामुळे तरुणाईत ही मंडळी नेहमीच फसतात.पुर्वी हँलेंटाईनचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून लोकं साजरा करायचे.भारतात ही प्रथा नव्हती.ती इंग्रजांपासून आली.हा दिवस साजरा करतांना तरुण तरुणीला लाल गुलाब बक्षीस द्यायचा.त्यानंतर तीही राग न मानता तो गुलाब स्विकार करायची आणि आपल्या केसात माळायची.प्रेमाचा इजहार करण्याचा तो प्रकार.....हँलेंटाईन डे म्हणुन प्रसिद्ध झाला.   आज व्हँलेंटाईन डे लोकांच्या मनामनात शिरला आहे.लहानगी मुलेही व्हँलेंटाईन डेला आपल्या लहानशा प्रेयसीला फुल देतात.हसतात.ती हसली की समजायचं तिनं प्रेमाचा स्विकार केला.असा हा डे सर्वानाच प्रिय ठरत आहे.पण व्हँलेंटाईन साजरा करतांना थोडा विचार नक्कीच करावा. व्हँलेंटाईन हा सैनिक होता.तो रोमला राहात होता.तसेच त्यावेळी तिथे...
Article

त्याग मुर्ति रमाई

लहाणपणी कुणाचे मायबाप मरू नयेत ,मायेचा किनारा लाभला नाही तर मुले रानोमाळ होतात ,अनाथ होतात ,सैरभैर होतात रमा नावाच्या एका मुलीचे आई बाबा लहानपणी मरून जातात ,लहाणसान असलेला शंकर ,आणि गौरा रमाच्या पंखाखाली आले !पण रमा ही मुलगीच सहा सात वर्षाची असताना तिने कसे संभाळावे ?कसे संभाळले असतील तीने आपले भावडं....लहाणपणापासूनच तिच्यापुढे प्रश्नांच काहूर वादळासारखे येऊन तिला कच्याट्यात घेऊ लागले होते..आधी माय गेली नंतर काही दिवसातच बाप गेला आपल्या भावडांना घेऊन रमा बापाला पाहत होती सारे लोक जमा झाले रडू लागले .रमाच्या कडे बघून म्हणू लागले...बाया बापड्या डोळ्यांला पदर लावत होती ..व म्हणत होती "आता तुच आहेस ग..बाई यांची माय अन बाप.."ति.एवढीशी रमा सार सार समजून घेत होती..   सारे प्रश्न तिच्या पुढे उभे होते तिची अवस्था एखाद्या पतंगासारखी झाली होती ,जीवनाची निर्दयी परिक्षा आता सुरू झाली होती ,अपार दुःखे त...
Article

तरुणाईचा उद्रेक

वर्तमानाचे कालचक्र अत्यंत वेगाने बदलत आहे. जग एक ग्लोबल खेडे बनू पाहत असताना तरुणाईचा भारत देश तरुणाला उध्वस्त करत आहे. तरुणाईच्या क्रांतीने देशाने अभूतपूर्व अशी क्रांती केली आहे. त्या तरुणाला धार्मिक व जातीय वातावरणात मशगूल ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आज दिसत आहे. तरुण हा देशाचा कर्णधार असतो. तरुणाच्या ओठावरील गीतांमधून देशाचे भविष्य उमलत असते.पण हाच तरुण आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काही तरुण हे धर्माधिष्ठित व जातीधिष्ठित दिसत असले, तरी अनेक तरुण हे भारताचे खरे शिलेदार आहेत. आपल्या ज्ञानक्रांतीतून ते देशाला शिखरावर घेऊन जात आहेत. मात्र आज शिक्षण घेणारे अनेक तरुण बेरोजगार आहेत . त्यांना योग्य रोजगार सरकार उपलब्ध देऊ शकत नाही.सरकारी सेवा क्षेत्रात अघोषित नोकरीबंदी करून त्यांच्या जीवन मेटाकुटीला आणले आहे. एखादी जाहिरात निघाली तर तिचा निकाल योग्यप्रकारे लागत नाही. अनेक परीक्षांम...
Article

भारत विद्वानांचा देश ; परंतू दखल शुन्य..!

* डिसलेसारखे बरेच गुणवंत भारतात; मात्र कदर नाहीच सध्या जिल्हा परीषद शाळेत शिक्षक असलेले डिसले हे शिक्षणविभागात चर्चेचा विषय झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील संशोधन. त्यांना ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळाला. त्यामुळं ते चर्चेत आले. त्याहूनही चर्चेत आले ते अमेरिकेतील मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळं. अमेरिकेने त्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यांनी ही शिष्यवृत्ती देण्यामागे म्हणणं मांडलं की डिसलेंनी संशोधन करण्यासाठी अाणखी शिकावं. जेणेकरुन आणखी ब-याच मोठ्या प्रमाणात संशोधन करता येईल. परंतू या अमेरिकेत जाण्याला सोलापूर येथील शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांचा विरोध होता. तो सध्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामुळे मावळला आहे.   डिसले हे सोलापूरमध्ये जिल्हा परीषदेच्या शाळेत लागलेले जिल्हा परीषद शिक्षक आहेत. ते संशोधन करीत होते. त्यातच त्यांच्या संशोधनाची विदेशी लोका...
Article

संवेदनशील भावनांची शब्दरूपी साठवण :पिवशी

कवयित्री शितल राऊत यांच्या नुकताच 'पिवशी' हा पहिला काव्यसंग्रह गौरव प्रकाशन, अमरावती द्वारा प्रकाशित झाला. मुळात 'पिवशी' हे शीर्षक वाचताक्षणी डोळ्यांपुढे बालपणीचा काळ तरळतो. प्रत्येकाच्या आजीच्या कमरेला मोठ्या दिमाखात विराजमान झालेली ती पिवशी आठवते. त्या पिवशीमध्ये ठेवलेल्या वस्तूचे जसे प्रचंड आकर्षण प्रत्येकाला होते अगदी तसेच या कविता संग्रहातील प्रत्येक कविता वाचतांना वैविध्यपूर्ण विषयाच्या आशयघन कविता वाचकाच्या अंतर्मनाला सुखाणाऱ्या आहेत.   महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा युवा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांची लाभलेली प्रस्तावना व राठोड सरांनी तयार केलेले सुबक व सुंदर मुखपृष्ठाने पिवशीला सोन्याची झालर चढविण्याचे काम केले आहे.   कवयित्री शितल राऊत ह्या व्यवसायाने शिक्षक आहेत. गेले दहा वर्ष त्या आपल्या पेशा सांभाळून साहित्यक्षेत्राची निष्ठेने सेवा करत आहेत. अगदी याच...