भारतीय संविधानातील धर्म स्वातंत्र्याचा अर्थ एक मिमांसा
भारत देश हा एक विविधतेने नटलेला, विविध जाती धर्म समुदायाला घेवून चालणारा आणि धार्मिकतेला विशेष प्राधान्य़ देऊन जीवन कंठणारा देश आहे. तरी पण विश्वात तो एक मोठा लोकशाहीवादी देश म्हणून त्याची ओळख सर्वश्रूतच आहे. विशेषत: बुध्द़ भुमी म्हणून भारताची विशेष ओळख आहे. भारत हा एक संघ एक समातेने वाट चाल करणाऱ्या पैकी आहे हा देश विविध संप्रदायाने पंथाने,धर्माने खुपच समृध्द़शाली झाला आहे. आणि हा देश प्रगती प्रथावर नेण्याच काम आपण जर पाहिल तर सम्राट अशोक काळा पासून या देशाने तत्कालीन राज्य़कर्ते सुध्दा पाहिले आहे. या भारतात युगानुयुगे चालत आलेल्या परंपरा या देशाला खुपच दुरवर नेऊन ठेवतात हाही मोठा प्रश्ऩ आहे या संस्कृतीने युगानुयुगे फक्त़ विषमतेचे संवर्धन करुन एक समृद्ध अशी धार्मिक चळवळ केली आहे पुरातन काळापासून अद्ययापर्यत त्यामध्ये परिवर्तन होतांना आढळत नाही. आणि परिवर्तन झाले तरी म्हणाल असा त्या परिवर...
