तूच आमचा भाग्यविधाता
संविधानासारखी अनमोल ठेव समस्त भारतीयांसाठी ठेवून सर्वांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद निर्माण करून देणाऱ्या महान सूर्याचा अस्त 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. आणि भारताला नवी दिशा देणारा तेजस्वी युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. 5 डिसेंबरच्या रात्री 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाच्या दोन प्रकरणाच्या प्रती सोबत घेऊन त्याची तपासणी केली व दुसऱ्याच दिवशी डॉ आंबेडकरांचे निधन झाले. म्हणजेच मरणाच्या शेवटच्या दारात असताना सुद्धा ज्या मानवाने आपले लक्ष हे विचलित न होऊ देता फक्त आणि फक्त जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्च केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो पण त्यांची ओळख नुसती संविधानाचे शिल्पकार नसून, एक महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ, महान तत्वज्ञ, अशी सुद्धा आहे. न्याय मंत्री म्हणून त्यांनी आयुष्यभर मागासलेल्याचा, दलितांच्या अन्यायाविरुद...

