Thursday, May 7

Article

Article

तूच आमचा भाग्यविधाता

संविधानासारखी अनमोल ठेव समस्त भारतीयांसाठी ठेवून सर्वांना सन्मानाने जगण्याची नवी उमेद निर्माण करून देणाऱ्या महान सूर्याचा अस्त 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. आणि भारताला नवी दिशा देणारा तेजस्वी युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. 5 डिसेंबरच्या रात्री 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या ग्रंथाच्या दोन प्रकरणाच्या प्रती सोबत घेऊन त्याची तपासणी केली व दुसऱ्याच दिवशी डॉ आंबेडकरांचे निधन झाले. म्हणजेच मरणाच्या शेवटच्या दारात असताना सुद्धा ज्या मानवाने आपले लक्ष हे विचलित न होऊ देता फक्त आणि फक्त जनकल्याणासाठी आपले आयुष्य खर्च केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो पण त्यांची ओळख नुसती संविधानाचे शिल्पकार नसून, एक महान समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,राजनीतिज्ञ, महान तत्वज्ञ, अशी सुद्धा आहे. न्याय मंत्री म्हणून त्यांनी आयुष्यभर मागासलेल्याचा, दलितांच्या अन्यायाविरुद...
Article

बाबासाहेब तुम्ही होतात म्हणून..

हक्क कर्तव्याचे भान बाबासाहेब, तुम्ही आम्हाला दिलं. खरं सांगू बाबासाहेब, तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने माणूसपण दिलं.आजवरच्या इतिहासात आत्तापर्यंत कित्येक महात्मे जन्माला आले आणि आपल्या अनमोल कार्याने अजरामर झाले. एका कनिष्ठ जातीत जन्माला येऊनही खऱ्या अर्थाने विश्वरत्न म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. असं एकमेव व्यक्तिमव कि ज्यांचे पूर्ण विश्वात पुतळे उभारले गेले आहेत. माणसाला कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार नसला तरी मिळालेल्या जन्माचे आपल्या कार्याने सोने करणे महत्त्वाचे असते. सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून आजही पूर्ण जगात भारताची राज्यघटना आदराने संबोधिली दिली जाते. आत्ता दीप भव या बुद्धांच्या शिकवणी प्रमाणे बाबासाहेब स्वतःच स्वतःचा प्रकाश झाले आणि आपल्या अनुयायांनाही त्यांनी अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर निघण्याचा ...
Article

शिक्षणाचे महत्त्व

दलित समाजातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकारांना परमपूज्य मानतात. त्या समाजाला डॉ भिमराव यांनी वाचा दिली. स्वाभिमान दिला, देवाचे असे वर्णन करतात की परमेश्वर मुक्या माणसाला वाचा देतो बोलायला शिकवतो व पंगु माणसाला ओलांडण्याची शक्ति देतो. शतकानुशतके भारतीयांना क्षुद्र समाजाला वाचा नव्हती, अन्याय सहन करावे लागत, चीड़ व्यक्त करता येत नव्हती, लाखोच्या या मूक समाजाला बोलके केले ते मूकनायक ठरले. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मधे महू येथे झाला. त्यांना आधुनिक मनु म्हणून ओळखले जाते कनिष्ठ जातीचे प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रभावी ओळख प्रख्यात कायदेपंडीत, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जातात. त्यानी विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या विचारप्रणालीत लोकशाही विचाराला स्थान दिले त्यांच्या कार्याचा गौरव आजही संपूर्ण जगाला एक प्रकारची च...
Article

जगातील पहिला ऐतिहासिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ

--------------------------------- विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.६ डिसेंबर २०२२ ला असलेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कवी-लेखक-समीक्षक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा "जगातील पहिला ऐतिहासिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ" हा लेख प्रकाशित करीत आहोत. -संपादक गौरव प्रकाशन ---------------------------------महाकाव्य ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये :१) जगातील पहिला ऐतिहासिक महाकाव्यग्रंथ २) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील २०२१ कवींच्या २०२१ कविता ३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर या एकाच महामानवाच्या जीवन कार्यावरील २०२१ कविता ४) ११ कुलगुरू व २५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३६ जिल्ह्यात एकाच वेळी प्रकाशन ५) महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील ५२ विचारवंतांचे या महाकाव्यग्रंथावरील अभिप्राय ६) महाकाव्यग्रंथाची पृष्ठसंख्या-२१८४न्यायपंडित सर्व शास्त्रात दिग्विजयी ठरलेले,सर्वविद्...
Article

एक ध्येयवेडा समाजसुधारक- महात्मा फुले

विद्ये विना मती गेली मतीविना नीती गेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना रुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केलेअशी आपल्या काव्यातून बहुजन समाजाची विदारक परिस्थिती मांडणारे, एक उत्कृष्ट लेखक विचारवंत महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. ज्या व्यक्तीने शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाज, स्त्री शिक्षणासाठी आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली त्या व्यक्तीला आदरांजली वाहण्याचा दिवस आहे. 'सत्यशोधक समाज' नावाची संस्था स्थापन करून समाजाला नवी दिशा देण्याचे काम महात्मा फुलेंनी गेले. आपल्या मुलाचा महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह फुलेंनी आपल्या पत्नीच्या सहकार्याने लावला. कारण दत्तक पुत्र यशवंत हा विधवेचा मुलगा असल्याने समाज त्या मुलाला डावलून मुलगी देत नव्हता, पण फुले दांपत्याने दत्तक मुलाला न्याय मिळवून दिला. व समाजापुढे सर्वधर्मसमानतेचा आदर्श निर्माण केला.ज...
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
Article

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा विद्येविना मति गेली |मतिविना निती गेली ||नितिविना गति गेली |गतिविना वित्त गेले ||वित्ताविना शुद्र खचले |इतके अनर्थ एका अविद्येने केले || या भुतलावर जन्मलेल्या माणसाजवळ जर शिक्षण नसेल, तर माणसाची काय अवस्था होते. याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा ज्योतीबांचा ध्यास होता.आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.महात्मा फुलेंचा हा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देऊन जात आहे. भारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालविलेल्या शाळा या काळात अस्तित्वात होत्या.पण बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करावी हे ध्येय मात्र त्यांचे नव्ह...
Article

संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव

2 वर्ष 11 महिने 17 दिवसाच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या भारतीय संविधानाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी विधी मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटना सादर केली व भारताच्या नव्या प्रकाशमय युगाला सुरुवात झाली. भारतातील लोकांच्या भावभावना, आशा, आकांक्षा पल्लवीत झाल्या. हाच तो दिवस म्हणजे संविधान दिवस होय. भारतात लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये संविधान सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण संविधानातील सर्वमान्य कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. त्यामुळे भारतीय संविधान आपले श्रेष्ठत्व दर्शविते. भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहे. यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक अधिकार, धार्मिक ...
Article

Satyamev Jayate : सत्यमेव जयते

भारतीय राजकारणात हे फक्त स्वार्थी आणि ढोंगी नेत्यांचं मायाजाल झालं असून त्यांना भारतीय संविधानिक व्यवस्थिचं काही देणं घेणं नाही. आपली खुर्ची सांभाळणे व पक्षांच्या नेत्याचे पाय चाटणे अशीच वृत्ती सध्याच्या राजकारणात दिसून येत आहे महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यमेव जयते नावाचा जयजयकार करून," सत्य सर्वांचे आदी घर,। सर्व धर्माचे माहेर ।।" असे ठणकावून सांगितले असताना आमचे नेते असत्यमेव जयतेचा जयघोष करीत आहेत.काही नेत्यांचे इतके झटके यायला लागले आहेत की, ते काय बोलतात हे त्यांना समजत नाही .तसेच काही मंत्री हे तर उंटावरून शेळ्या हाकलणारे राखणदारच आहेत. कारण त्यांच्या वक्तव्यातून देशातील वातावरण दूषित होत असताना देशाचे चालक काहीच म्हणत नाहीत. त्यांना जाणून-बुजून तसे बोलण्याची ट्रेनिंगच दिलेली आहे काय असं वाटते.आज कोण धोक्यात आहेत हे माहीत आहे. पण बहुसंख्य समाजाला धर्माच्या ,जातीच्या नावाची गो...
एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!
Article

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका…!

एसटी महामंडळाला सवलत योजनेतून लाखोंचा फटका...!  एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, अनेक सवलती दिल्या जातात.एसटी महामंडळामार्फत समाजातील अनेक लोकांना विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, अंध-अपंग, महिलांसाठी महामंडळ २९ प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात.मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून स्मार्ट कार्ड तयार सवलत घेण्यात येत असल्याने केले जात असून एस टी महामंडळाला लाखो रुपयांचा फ्टका. बसत असल्याचे समोर आले आहे. ● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ........ एस टी महामंडळाला सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे बसत आहे. बोगस कागदपत्रे सादर करून स्मार्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. कागदपत्रांची तपासणी न करता महामंडळ अनेकांना या योजनेचा लाभ मिळवून देत आहे. सवलतीचा लाभ मिळत असल्याने ज्येष्ठ नागरिक देखील बिनधास्...
Article

Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

कारंजा हे आटपाट नगर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांच्या ठिकाणापासून ६० ते ७० किलोमीटरच्या “सुरक्षीत” अंतरावर वसलेलं शहर आहे. कुठही उभं राहून ब्रम्हांडाकडे बघीतलं तर ते जसं सारखचं दिसतं (संदर्भासाठी गरजूंनी स्टीफन हॉकींग्ज वैगेरेंची भारी भारी पुस्तक चाळावीत!), तसच कुठूनही बघा कारंजा नगरी सारखीच दिसते. उपरोक्त चारही शहरांशी कारंजा नेहमीच "रोमांस" च्या मुड मध्ये असते पण "सिरीयस अफेअर" कोणाही सोबत ठेवत नाही. आम्ही अमरावतीत शिक्षण घेतो, अकोला शहरावर आमचे सगळे हेल्थ इश्युज सोडतो, वाशिम मध्ये फक्त कार्यालयीन कामासाठी जातो आणि यवतमाळसोबत आमचं नातं काय आहे या बाबतीत आम्ही नेहमीच "कनफ्युजन" मध्ये असतो. बर या चारही मोठ्या शहरांना आपण जर ग्रहांची उपमा दिली तर कारंजावरुन या ग्रहांकडे जातांना अर्ध्या अंतरावर काही उपग्रह सुद्धा लागतात. उदा. अकोला जाताना मुर्तिजापुर नावाचा उपग्रह लागतो,...