विवाहाचे वाढते वय..!
दोन मनं,दोन वंश
नवीन सुरुवात जीवनाची
आनंदी जीवन जगण्याची !!खरंच विवाह म्हणजे पवित्र बंधन अतूट नातं साता जन्माचा तसे बघितले तर विवाहाचे कायदेशीर वय मुलांसाठी 21 वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे असेच निश्चित केलेले आहे. कारण या वयात मुलं-मुली मध्ये परिपक्वता आलेली असते पण ही पद्धत हळूहळू बदलत चाललेली आहेत. त्यातल्या त्यात कुटुंब नियोजन त्यामुळे बदलती सामाजिक परिस्थिती आणि शिक्षणाचे वाढते प्रमाण बघता प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत आहे. त्यामुळे विवाहाचे वय वाढत चाललेले आहे याचा परिणाम विवाह संस्थांवर देखील झालेला दिसतो, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शहरातील परिस्थिती यात बराच फरक बघायला मिळतो. याचबरोबर विवाहाच्या कल्पना आणि विवाहाची पद्धत सुद्धा बदलत चाललेली आहे काही ग्रामीण क्षेत्रात अजूनही बालविवाहाची प्रथा सुरूच आहे. उदाहरणार्थ राजस्थान मध्य प्रदेश आसाम याउलट शहरात आहे म...