शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी
शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटीयुवा अकादमी फेसाटीकार 'नवनाथ गोरे' यांची 'बंधाटी' ही दुसरी कादंबरी. 'नवनाथ गोरे' यांची लेखणी समकालातील सामाजिक प्रश्न घेऊन उठाव करते. जे जगणे भोगले सामाजिक वास्तव अनुभवले, तेच त्यांच्या लेखणीचे विषय होऊन काळजाच्या काकऱ्यात दबलेले अंकुर शब्द रूपाने तरारून येताना दिसतात. ग्रामीण जगणे हे समूहाचे जगणे असते. त्यामुळे 'बंधाटी' कादंबरीचा एकच नायक अथवा नायिका नसून यामध्ये अनेक पात्र वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतात. शेताच्या बांधावरून पेटणारा संघर्ष जमिनीची मोजणी करूनही संपत नाही. हा बांधवरंब्याचा संघर्ष एकमेकांच्या रक्ताचा टिळा लावूनही न संपणारा व पिढ्यानपिढ्या चालणारा आहे. हे प्रखर सामाजिक वास्तव ही कादंबरी मांडते. या संघर्षा बरोबरच ग्रामीण जीवनाला घट्ट वेढून असणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा वेध ही कादंबरी घेते. गाव म्...









