Thursday, April 30

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी
Article

शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी

शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटीयुवा अकादमी फेसाटीकार 'नवनाथ गोरे' यांची 'बंधाटी' ही दुसरी कादंबरी. 'नवनाथ गोरे' यांची लेखणी समकालातील सामाजिक प्रश्न घेऊन उठाव करते. जे जगणे भोगले सामाजिक वास्तव अनुभवले, तेच त्यांच्या लेखणीचे विषय होऊन काळजाच्या काकऱ्यात दबलेले अंकुर शब्द रूपाने तरारून येताना दिसतात.  ग्रामीण जगणे हे समूहाचे जगणे असते. त्यामुळे 'बंधाटी' कादंबरीचा एकच नायक अथवा नायिका नसून यामध्ये अनेक पात्र वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतात. शेताच्या बांधावरून पेटणारा संघर्ष जमिनीची मोजणी करूनही संपत नाही. हा बांधवरंब्याचा संघर्ष एकमेकांच्या रक्ताचा टिळा लावूनही न संपणारा व पिढ्यानपिढ्या चालणारा आहे. हे प्रखर सामाजिक वास्तव ही कादंबरी मांडते. या संघर्षा बरोबरच ग्रामीण जीवनाला घट्ट वेढून असणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा वेध ही कादंबरी घेते.    गाव म्...
‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
News

‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

'कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितगौरव प्रकाशन नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे उदयोन्मुख गीतकार व कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहास ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’ तर्फे दिला जाणारा प्रा. वामन सुदामा निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.कोरोना महामारीच्या भयावह काळातील वास्तवाचे भाष्य करणारा हा कवितासंग्रह एक साहित्यिक दस्तऐवज म्हणून ओळखला जात आहे. महामंडळाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा प्रदान करण्यात आला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया सोहळ्याला उद्घाटक म्हणून महामंडळाचे सरचिटणीस व त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्...
 शेतकऱ्याची बैलजोडी.! 
Story

 शेतकऱ्याची बैलजोडी.! 

 शेतकऱ्याची बैलजोडी.! चैत्राची गुढी उभारली होती‌.गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा झाला होता.आता कास्तकाराचा सण म्हणजे पिका, पाण्या अभावी साधासुधाच, म्हणजे काजयानं डोया साजरा करावा तशीच बुराट गोठ होती.पण शंकऱ्याचं मन कशातच लागत नव्हत. विषयही तसाच गंभीर होता. या बैलजोडीच्या पायी तर त्यानं लगन पाणी,मरणं,धरणं, सगेसोयरे,नातेवाईक सारंच सोडून देलं होतं.शेपाचशे रूपयाची गोठ असती तर वाली गोठ होती. पण इथे तर पन्नासक हजाराचा साजरा झटका होता. कोणता  सोयरा,धायरा ही त्याले मदत करण्या इतपत धनसेठ नव्हता. हे आलेलं अस्मानी संकट त्यालेच एकल्याले निस्तारा लागत होतं.ऐन दुष्काळात म्हणजे तेराव्या महिन्यात एवढा मोठ्ठा गड्डा भरणं मोठं जिकरीचंच होतं. बैलजोडी पाई पुरा पागल झालेल्या शंकऱ्यानं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सारी गावं खंगाळून काहाढली होती. रातची त्याची झोप मुश्किल झाली होती. त्याची जोडीही तशी...
थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’
Article

थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’

थरारक संघर्षाची दमदार कहाणी 'जयभीम पँथर''जयभीम पँथर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. माणूस हा संघटीत होऊन त्यातून एक समाज निर्माण करतो, कारण तो समाजशील प्राणी आहे, पण आजच्या बिघडलेल्या किंवा अस्थिर अश्या सामाजिक परिस्थितीत माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, किंवा त्यांच्या मनात एक प्रकारचा गोंधळ मुद्दाम काही ठराविक गटाकडून-समूहाकडून निर्माण करण्यात आलेला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे.आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवतो किंवा ते कार्य करायचा प्रयत्न करतो, तेंव्हा संघटना अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, जगातल्या कोणत्याही समाजात संघटना ही अनन्य साधारण कार्य करण्यासाठी निर्माण होते, केली जाते...
दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी
Article

दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी

दारिद्र्याच्या घामाने शिजून 'वचपा' काढणारी कादंबरीबर्‍याच दिवसापासून आदरणीय मोतीरामजी राठोड सर, मला (डाॅ.वसंत भा.राठोड,किनवट) नांदेडला घरी बोलावत होते. तो योग आला १९ मार्च २०२५ रोजी कला महोत्सवाच्या निमित्ताने. संपूर्ण लेंगी मंडळच त्यांच्या घरी उतरविले. सोबत प्रा. डाॅ. राजीव राठोड होते. राठोड घराणे आणि चाळीतील सर्वांनीच गोबंजारा लेंगीनृत्याचा स्वानंद घेतला. सरांच्या अख्ख्या परिवारानेच आमचे सहर्षवदन स्वागत केले. याप्रसंगी मला त्यांचे आत्मचरित्र, आठवणीचं गाठोडं आणि वचपा ही कादंबरी भेट दिली. मी संपूर्ण कादंबरी वाचली आहे. अतिशय वाचनीय व तेवढीच संवेदनशील आहे. अतिशय जबाबदारीने राठोड सरांनी शब्दछटा वापरल्या आहेत.            वाङ्मयाच्या क्षेत्रात ग्रामीण, नागरी, आदिवासी, दलित, कामगार, महिला, बाल इत्यादी वाङ्मयीन साहित्य पूर्वीपासूनच नावारूपास आलेले आहेत. नव्वद...
परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडी
Story

परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडी

परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडीचैत्रातलं उन्ह साजरंच कयकत होतं.उन्हानं रस्त्यावरचा फफुळ्ळा चांगलाच गरम झाला होता. झाडाझुडपाचा पालापाचोळा साऱ्या रस्त्यावर पसरला होता. कास्तकाराचा वावारातला दायदाना सुखरूप घरी आला होता.ज्याले लयच गरज होती त्यानं तालुक्यातील धान्य बाजारात मिळेल त्या भावात आपला शेतमाल इकटाक केला होता.शंकऱ्यानं डोक्शाले मयकट टावेलचं फडकं गुंडाळून  गावाशेजारीच घरामांग असलेल्या आखरात निंबाच्या झाडाखाली सावलीत बांधलेल्या बैलाईले कडब्याची पेंडी टाकून तरंतरं घरी आला. उभ्या उभ्याच त्यानं न्हाणीत जाऊन नांदीतलं तमरेटानं थंड पाणी आंगावर घेतलं.खापरानं आंग घासून,टावेलानं साजरं निपक आंग पुसलं. तोपर्यंत त्याच्या बायकोनं गरम भाकर व ताकातलं तिखटवखट चून तयार केलं होतंच.हातापायाले खोबरेल तेलाचा हात लावून कनोडयातल्या वर भिंतीच्या खोबनीत फसवलेल्या फुटलेल्या आरशात पा...
भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा
Article

भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा

भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा१ एप्रिल, १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ नुसार झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने रचना आणि दृष्टिकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या " दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोलुशन " या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. ह्या बँकेची संस्थापना १९२६ च्या रॉयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये आणि भूमिका भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोठी भूमिका बजावतात. तिच्या काही भूमिकांमध्ये नोटांच्या समस्यांचे नियमन करणे, आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि देशाचे चलन आणि त्याची पत व्यवस्था चालवणे समाविष्ट आहे.भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा कणा आहे. जनतेने आणि सरकारने बाजारात पैशाच्या प्रवाहाचे नियंत्रण, देखरेख आणि प्रोत्साहन देण्याची जबाब...
इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचय
Article

इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचय

इस्लामच्या पाच स्तंभाची माहिती देणारी कलाकृती – इस्लाम परिचयउद्या सोमवारी जगातील मुस्लिम समाजात साजरा केला जाणारा सण म्हणजे रमजान ईद.  गेल्या एक महिन्यापासून जगभरात रमजान या पवित्र सणाच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांचे उपवास चालू आहेत. अतिशय खडतर असणाऱ्या या उपवासाची सुरुवात  ज्या दिवशी चंद्राची कोर दिसेल त्यादिवसापासून पहिला दिवस सुरु होतो यालाच चांदरात म्हणतात. रमजानचा चंद्र दिसला की "(रोजे) उपवास ठेवायला मुस्लिम लोक सुरुवात करतात.. या रमजानच्या पवित्र मुहूर्तावर लेखक मौलाना वहीदुद्दीन खान यांनी लिहलेली इस्लाम परिचय नावाची मराठी भाषेतील कलाकृती वाचनात आली. अतिशय अर्थपूर्ण असलेल्या या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील संदर्भ मला खूपच भावले.इस्लाम परिचय या कालाकृतीच्या मुखपृष्ठावर वाळवंटातील निरव शांतता, अंतहीन वाळू आणि वर आकाश,विस्तीर्ण माळरानातून दोन पदरी रस्ता क्षितिजाकडे चढत्य...
फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था !
Article

फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था !

फक्त १ रुपयात प्रशिक्षण व निवासी व्यवस्था !गुजरातला माझे एक मित्र आहेत .श्री रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची त्यांची  उलाढाल आहे .ते मला नेहमी म्हणायचे .काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो .केवल एक रुपये मे बच्चो को आय ए एस का ट्रेनिंग दिया जाता है .मला उत्सुकता होती .त्यामुळे मुंबईतील माजी शालेय शिक्षण मंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थेट अहमदाबादला निघालो. अहमदाबादला उमिया माता संस्थान आहे .येथे देखील आय ए एस चे प्रशिक्षण चालते . अजून तेथे मंदिर तयार व्हायचे आहे .पण IAS सेंटर मात्र तयार झाले, वसतिगृह तयार झाले.या आयएएस ट्रेनिंग सेंटर मधील उमेद वारांना प्रशिक्षण दे ण्यासाठी आयपीएस ऑफिसर नेमले गेले .मंदिर नंतर पण आयएएस सेंटर अगोदर .खरा हा गुजरातचा पॅटर्न मला खूप आवडला. त्या प्रशि...
सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!
Article

सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!

सायबर गुन्हेगारी व त्यावर उपाय.!बऱ्याच दिवसांपासून आपल्या मोबाईलवर फोन डायल केल्यावर रिंग टोन वाजते ती ही की " आपल्याला बनावट ई.डी., पोलीस यंत्रणेवरून कॉल्स येत असतील तर त्याला बळी पडू नका. म्हणजे काय तर ह्या चोरटयांनी पोलीस यंत्रणेला सुद्धा सोडले नाही, असो.सायबर गुन्हेगारांनी आपल्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. त्यांना माहित आहे आपले नागरिक हे लवकरच भाऊक होतात, लगेच विश्वास ठेवतात. त्यांना भावनिक ब्लॅकमेल केले की ते लगेच त्यांच्या जाळ्यात अडकतात. आता इथे थोडे आपल्याला लगेच विश्वास ठेऊन चालणार नाही तर आपण लगेच सतर्क झाले पाहिजे.मोफत ह्या अफूच्या गोळीवर आपण नियंत्रण ठेवले पाहिजे. आपल्याला मोफत म्हटले की तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि ह्या मोफतच्या जाळ्यात आपण लगेच अडकतो आणि आपली सायबर शिकार होते. ह्या जगात मोफत काही मिळत नाही ह्यावर आपण ठाम असले पाहिजे.हे सायबर गुन्हेगार...