भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा

१ एप्रिल, १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ नुसार झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने रचना आणि दृष्टिकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ” दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अँड इट्स सोलुशन ” या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. ह्या बँकेची संस्थापना १९२६ च्या रॉयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये आणि भूमिका भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोठी भूमिका बजावतात. तिच्या काही भूमिकांमध्ये नोटांच्या समस्यांचे नियमन करणे, आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आणि देशाचे चलन आणि त्याची पत व्यवस्था चालवणे समाविष्ट आहे.


भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा कणा आहे. जनतेने आणि सरकारने बाजारात पैशाच्या प्रवाहाचे नियंत्रण, देखरेख आणि प्रोत्साहन देण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली आहे. देशाची आर्थिक स्थिरता राखण्यासाठी आणि देशाला विकासाकडे नेण्यासाठी नियोजन आणि विकासासाठी ती भाग घेते. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ मध्ये झाली आणि तेव्हा पासून ती देशातील भारतीय रुपयाच्या प्रवाहाचे नियमन करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध धोरणे आणि दिशा निर्देशांद्वारे इतर व्यावसायिक बँकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देखील बँकेवर आहे.


देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असल्याने तिचे विविध उद्दिष्टे आहेत. त्यात बँक नोटांच्या समस्येवर लक्ष्य देते, देशात आर्थिक स्थिरता राखणे, देशातील पत व्यवस्था आणि चलन स्वतःच्या फायद्यासाठी चालणे. ह्यात राजकीय प्रभावापासून स्वतंत्र राहणे हा पण आहे. आर्थिक स्थिरता राखण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने कोणत्याही राजकीय दबावापासून मुक्त राहावे आणि भ्रष्ट कारवायांपासून दूर राहावे. एक केंद्रीय प्राधिकरण म्हणून काम करणे तसेच इतर सर्व सार्वजनिक बँकांची बँक व नोटा जरी करण्याचा अधिकार भारत सरकारची बँक तिचे काम आहे. तसेच बँकेने किंमत स्थिरता राखण्यासोबतच तशा धोरणांची रचना करावी जी आर्थिक वाढीला चालना देतील. देशासाठी तयार केलेल्या चलन विषयक धोरणांचे नियोजन आणि देखरेख बँक करते. यातील उद्देश असा आहे की प्रत्येक धोरण वाढीचा विचार लक्षात घेऊन तयार केले जावे आणि त्याच वेळी किंमत स्थिरता देखील राखली गेली पाहिजे.

● हे वाचा – सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?


देशातील सर्व बँकांनी कोणत्या पॅरामीटर्स अंतर्गत काम करावे हे ते डिझाईन करते. ह्यातील मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशाच्या वित्तीय व्यवस्थेवर सामान्य जनतेचं विश्वास राखणे आणि त्या किफायतशीर सेवा प्रदान करणे. देशातील सर्व विदेशी चलन विनिमय भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे राखले जाते आणि त्याची काळजी घेतली जाते. हे असे केले जाते जेणेकरून परकीय व्यापार सुलभ आणि सुरळीत होऊ शकेल आणि परकीय बाजारपेठ देखील राखली जाईल. भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था आहे जी नोटा जारी करते. जुन्या नोटा नष्ट करते आणि लोकांमध्ये कोणते चलन चलनात आणण्यासाठी योग्य आहे हे ठरवते.


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्या मध्ये व्यावसायिक बँकांना परवाने देणे, इतर बँकांची तपासणी करणे, ठेव विमा योजना राबविणे, बिगर-बँकिंग वित्तीय संस्थानांवर नियंत्रण ठेवणे. भारतीय रिझर्व्ह बँकचे एक क्रेडिट धोरण आहे. या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट किंमत स्थिरता नियंत्रण ठेऊन विकास सुनिश्चित करणे आहे. विकासाला चालना देणे म्हणजे भारतात अधिक वस्तूंचे उत्पादन होते आणि देशात अधिक सेवा पुरवल्या जातात. त्यामुळे जी.डी.पी. वाढण्यास मदत होते आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर एकूण सकारात्मक परिणाम होतो. दुसरीकडे, किंमत स्थिरता म्हणजे वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही असा नाही तर त्याचा अर्थ फक्त महागाई नियंत्रित करावी असा आहे. औद्योगिक आणि कृषी विकासाला चालना देणे हे देखील भारतीय रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे.

● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र   


भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल आपण अधून मधून ऐकत असतो ते म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकचे पत धोरण व त्यावर अर्थतज्ञ आपले विचार मांडत असतात. नंतर आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल ऐकायला येत ते म्हणजे रेपो रेट कमी झाला किंवा वाढला. रेपो रेट कमी झाला म्हणजे सामान्य जनतेला विशेष करून गृह कर्जावर ई.एम.आय. कमी होणार साधारणतः आपला हा सामान्यांचा संबंध येतो.


मध्यंतरी अर्थ विश्वात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीबद्दल बरीच चर्चा झाली. त्याचे काय परिणाम बँकेवर व देशावर होतील ? राजकीय हस्तक्षेप योग्य की अयोग्य ? १ एप्रिलला भारतीय रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे झाले. आतापर्यंत आपल्या देशाचा कणा मजबूत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. येत्या दिवसात ही बँक नक्कीच दणदणीत शतक झळकावेल व सर्व जगाच लक्ष वेधून घेईल व आपल्या देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा करूया ! नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

  • अरविंद मोरे
    नवीन पनवेल (पूर्व)
    मो. ९४२३१२५२५१

Leave a comment