मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा; अभंग सरीता
मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा, दर्जेदार सामाजिक अविष्काराचा अनुभव संग्रह म्हणजे...'अभंग सरीता'यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील तरनोळी सारख्या छोट्या गावातील माझे मित्र अजय चव्हाण. सह्याद्री कवी एकसंघ यांनी माझ्या कविमित्राला "शब्दसखा" पदवीने सन्मानित केलेले आहे.'अजय चव्हाण' यांचा "अभंग सरीता" हा अभंग संग्रह नुकताच वाचण्यात आला. त्यासाठी हा लेखनप्रपंच!एकुण ऐंशी अभंग रचना समाविष्ट असलेल्या संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यासाठी माझ्या मित्रांचे प्रथम अभिनंदन नि कौतुक!● हे वाचा - भूक छळते तेव्हा... एक संघर्ष गाथामागिल काही काळात काही साहित्यिक ग्रूप मधून मी अजयचे अभंग सातत्याने वाचत आलो आहे. आशयाच्या अगदी खोलात जाऊन संस्कारांची पेरणी करणे,हे अजयच्या लेखणीचे वैशिष्ट्ये. विविध वृत्तपत्रात मासिकात अजय लिहितो....









