Friday, April 24

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

नकोशी लव घालवण्यासाठी…

शरीरावर बारीक लव असते. पण ही लव दाट अथवा उठून दिसणारी असेल तर सौंदर्यात बाधा उत्पन्न होते. विशेषत महिलांच्या ओठांवरील लव विचित्र दिसते. त्यामुळेच ती हटवण्यासाठी नियमित वॅक्सिंग अथवा थ्रेडिंगचा पर्याय निवडावा लागतो. पण काही उपायाने हा त्रास कायमस्वरुपी नाहिसा होऊ शकतो. डाळीच्या पिठात डेड स्किन दूर करणारी तत्त्व असतात. म्हणूनच याच्या वापराने ओठांवरील लव दूर करता येते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजत्यासाठी चमचाभर डाळीच्या पिठात चमुटभर हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावून सुकेपर्यंत ठेवा. सुकल्यावर स्क्रब करुन चेहरा धुवा. सलग दोन आठवडे हा उपाय केल्यास लव कमी झालेली दिसेल. बाऊलमध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, चमचाभर साखर आणि एका अंड्याचा पांढरा बलक हे साहित्य एकत्र करा. हे मिर्शण १५-२0 मिनिटांसाठी ओठांवर लावून ठेवा आणि नंतर धुवा. या उपायानेही ओठांवरील लव नाहिशी होते. नको...
Gerenal

डोक्याला मार लागलाय?

घसरून पडल्याने, अपघात झाल्यास किंवा आपटल्यास डोक्याला मार लागतो. अनेकदा हा मार साधा असतो तर अनेकदा तो जीवघेणाही ठरतो. या आघाताने मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डोक्याला मार लागल्याने मेंदू किंवा कवटीला इजा होण्याची शक्यता असते. अनेकदा डोक्याच्या आतल्या भागाला जखम होण्याचीही शक्यता असते. ही जखम उघड्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तातडीने काही चाचण्या करण्याची गरज असते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजअनेकदा एखादी वस्तू डोक्यात आरपार गेल्याने गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते. रस्ते अपघात, घरी किंवा कामाच्या ठिकाणी झालेला अपघात, भांडण, पडणं, खेळताना होणारी इजा यामुळे डोक्याला मार बसतो. बेशुद्ध पडणं, रक्तस्राव, उलट्या, नाकातून रक्त किंवा पाणी येणं, अचानक ऐकू न येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चव, वास यांची जाणीव न होणं, बोलताना त्रास होणं, हृदयाचे अनिय...
Gerenal

विवाह मानक-यांची किंमत कमी होत चालली आहे

आज विवाह मोठे थाटामाटात होतांना आपल्याला दिसतात. पुर्वीही होत होते. त्यावेळच्या परिस्थीतीनुसार थाटामाटातच व्हायचे. मग गरीब असो की श्रीमंत.आज विवाहसोहळ्याची पद्धतच बदलली. आजचेह विवाहसोहळे हे कर्ज काढून थाटामाटात होत होत असतात. पुर्वी एवढ्या थाटात विवाहसोहळे होत नव्हते. तसेच त्या विवाहसोहळ्यात परंपरा राबविण्याला जास्त महत्व होते. त्याचप्रमाणे मानक-यालाही महत्व होते. मानकरी अर्थात मधला माणूस.कोणताही सौदा जर करायचा असेल तर ज्याप्रमामे मधला माणूस हवा असतो. ज्याला दलाल म्हणतात. असाच मधला माणूस विवाह जोडणी करतांनाही हवा असतो. ज्याला मानकरी संबोधतात. हा मानकरी पुर्वीही असायचा. आजही आहे.मानकरी हा विवाह जोडण्याचं काम करायचा. त्यानं विवाह जोडला की त्याला वधू आणि वर........तो मानकरी ज्याचा असेल, ती मंडळी विवाहात त्याला एक शालजोडी घ्यायचे. अर्थात कपडे घ्यायचे. त्याला काही धान्यही द्यायचे. त्यातच काही...
Gerenal

केक कापताय?.. सावधान.!

वाढदिवस म्हटला की केक हा आलाच. फक्त वाढदिवशीच नाही तर लग्नाचा वाढदिवस आणि आनंदाच्या इतर प्रसंगातही केक कापण्याचं प्रमाण वाढलं आहे. केकवर लावलेल्या मेणबत्त्या फुंकर मारून विझवल्या जातात. मात्र या कृतीमुळे तुम्ही आजारी पडू शकता, असं कोणी सांगितलं तर आपला विश्‍वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अशाप्रकारे मेणबत्त्या विझवल्यामुळे केकच्या पृष्ठभागावर जंतू पसरण्याचा धोका तब्बल १५ हजार पटींनी वाढतो. अमेरिकेत केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली.दक्षिण कॅरोलिना प्रांतातल्या क्लेंम्सन विद्यापीठातल्या संशोधनून काही धक्कादायक बाबी समोर आल्या. कोणत्याही उष्ण घटकामुळे एअरोसोलची निर्मिती होते आणि हेच एअरोसोल बॅक्टेरियांच्या वाढीला कारणीभूत ठरतं, असं संशोधनकांचं म्हणणं आहे. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी आयसिंग असलेल्या केकच्या एका तुकड्यावर काही पेटवलेल्या मेणबत्त्या लावल्या.त्या विझवल्यानंतर साधारण प...
Gerenal

संधिवातावरील उपचार

संधिवात खूपच त्रासदायक ठरतो. या व्याधीवर आधुनक वैद्यकशास्त्राऐवजी आयुर्वेदिक उपचार घेण्यावर अनेकांचा भर असतो. शारीरिक वेदनांना वातदोष कारणीभूत असतो, असं आयुर्वेद सांगतं. संधिवात हा वातविकार असल्याने उपचारांच्या माध्यमातून शरीरातल्या वाताचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यावर आयुर्वेद भर देतं. पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींमुळे शरीरात आम हा विषारी घटक तयार होतो. आमामुळे शरीरातल्या वातनिर्मितीचा वेग वाढतो. हा आम संपूर्ण शरीरात पसरतो आणि शेवटी सांध्यांमध्ये स्थिरावतो. या आमामुळे प्रभावित झालेल्या सांध्यांमध्ये संधिवाताची समस्या निर्माण होते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया त्रासावर शिल्लक आणि गुग्गुळ या औषधी घटकांचं सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात. या घटकांनी युक्त कॅप्सुल्समुळे रुग्णाला आराम मिळतो. या कॅप्सुल्स दिवसातून तीन वेळा घेतल्याने वेदनांचं प्रमाण कमी होतं. या औषधी वनस्पतींच्या सेवन...
Gerenal

या उद्देशाने टाल्कम पावडर लावली जाते…

आता उन्हाचा कहार वाढतो आहे. पुढचे दोन महिने वाढत्या उष्म्याला सामोरं जाण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे या काळात शरीराला येणारा घामाच्या दुर्गंधीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय योजायला हवे. याकामी टाल्कम पावडर उपयुक्त ठरु शकते. याखेरीज अन्य कामांसाठीही ती उपयुक्त ठरते. केस तेलकट असतील तर चांगला श्ॉम्पू यावरील उपाय ठरु शकतो. मात्र केस अति तेलकट असतील तर अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी केसांच्या मुळांपाशी टाल्कम पावडर भुरभुरा आणि हलक्या हाताने स्क्रब करा.मस्कारा लावण्यापूर्वी पापण्यांवर टाल्कम पावडर भुरभरावी. यामुळे मस्कारा एकसारखा पसरतो. लिपस्टिक सेट करण्यासाठी आणि लाँग लास्टिंग इफेक्ट मिळवण्यासाठी टाल्कम पावडरचा उपयोग होतो. लिपस्टिक लावून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर थोडी पावडर घ्या आणि हा पेपर ओठांवर दाबून धरा. आता परत लिपस्टिकचा हलका कोट द्या. यामुळे लप कलर अधिक काळ टिकतो. वॅक्सिंग करण्यापूर्वी त...
Gerenal

कार्य मूत्रपिंडाचे….

शरीरयंत्रणेतील गुंतागुंत आणि त्यात विस्कळीतपणा आल्यास होणारे परिणाम अभ्यासण्याजोगे असतात. आपल्या शरीरात अनेक जीवरासायनिक क्रिया सतत सुरू असतात. अशा प्रत्येक क्रियेदरम्यान काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ते साचून राहणं घातक ठरतं. त्यामुळे त्यांचा नियमित निचरा होण्याची गरज असते. त्याशिवाय आपण कळत-नकळत शरीरावर अत्याचारही करत असतो. अबरचबर खात असतो. त्यांच्या पचनातून शरीराला घातक अशी उच्छष्ट उरतात. त्यांचाही नचरा होणं आवश्यक असतं.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजयापैकी टाकाऊ पदार्थ रक्तात उतरतात आणि ते त्यातून काढून रक्त शुद्ध करण्याची जबाबदारी मूत्रपिंडावर असते. रक्त गाळून त्यातले टाकाऊ पदार्थ विरघळवून शरीराबाहेर टाकण्याचं कामही मूत्रपिंडाद्वारे होतं. शिवाय शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्याचं कामही मूत्रपिंडांना करावं लागतं. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातल्या पाण्याचा निच...
Gerenal

पिळदार शरीरयष्टीसाठी..

दोस्तांनो, शरीर पळदार बनण्यासाठी वर्षाेनवर्ष कष्ट घ्यावे लागतात. एकदा मनासारखं शरीर घडलं की ते टिकवण्यासाठीदेखील व्यायामाला पर्याय नाही. यासाठी तुम्हाला सतत व्यायामाचं पथ्य पाळावं लागेल. या प्रयत्नात असणार्‍यांसाठी उपयुक्त टिप्स. शरीर कमावण्याच्या प्रयत्नात असाल तर प्रथम शरीराची योग्य तपासणी करून घ्या. डॉक्टरांकडून शरीराची नेमक स्थिती आणि त्यानुसार उपयुक्त व्यायाम प्रकारांची माहिती घ्या. चांगला प्रशिक्षक मिळाला, जीममधील वातावरण चांगलं असलं आणि लोकेशन सुंदर असलं तर तुमचं हे काम अधिक सोपं होऊन जाईल.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजट्रेनिंग पार्टनरसवे व्यायाम करणं हा शरीर कमावण्याचा एक चांगला उपाय आहे. एकमेकांच्या जोडीनं व्यायाम चांगला होतोच त्याचप्रमाणे सतत तुलना आण चढाओढ बघायला मिळाल्यामुळे कसोशीनं प्रयत्न केले जातात. शरीर कमावण्याच्या प्रयत्नात शरीरात कोणताही फरक दिसू लागला अथवा त्रास जाणवू ...
Gerenal

जाणा टीबीच्या गंभीर आजाराविषयी..

क्षय अथवा टीबी हा अतिशय गंभीर आजार असून भारतात दर दिवशी ४0 हजारांपेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग होतो हे वास्तव भयावह आहे. यापैकी पाच हजारांहून अधिक लोकांनी क्षयाची लागण होते असं एका आकडेवारीवरुन दिसून येतं. क्षयाने मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण दर दीड मिनिटाला एक रूग्ण असं आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या अंदाजानुसार २0२0 मध्ये जगातील अंदाजे एक अब्ज जनसंख्या क्षयरोगाने ग्रस्त असेल. १९९२ मध्ये शासनस्तरावर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून २00५ पर्यंत हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजक्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. १८८२ मध्ये डॉ. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जवाणूंचा शोध लावला. जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत या संबंधीचा प्रबंध मांडला आणि २४ मार्च रोजी त्...
Gerenal

तरुण वयात ठेवा बचतीचे लक्ष्य

लहान वयापासून बचतीची सवय लागली तर आर्थिक शिस्त लागतेच शिवाय भविष्यकाळ अधिक सुरक्षित होतो. नोकरीला नुकतीच सुरूवात केलेल्या तरूणांवर जबाबदार्‍याही कमी असतात. त्यामुळे ३0 टक्के बचतीचं लक्ष्य ठेवता येतं.सर्वप्रथम गुंतवणुकीचे योग्य मार्ग शोधा. गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडला नाही तर भविष्यात महागाईचा दर वाढल्यावर आपल्या पैशांचं मूल्यही कमी होतं. त्यामुळे अशा गुंतवणुकीला काहीच अर्थ उरत नाही. फारसे धोके पत्करायचे नसतील तर पोस्ट ऑफिसमधल्या योजना, एनएससी, सुकन्या अशा योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमधल्या योजनांवर चांगलं व्याज मिळू शकेल.गुंतवणुकीत थोडे धोके पत्करायचे असतील तर शेअर बाजार, म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करा. नुकतीच नोकरी सुरू केली असेल तर तुम्ही काही धोके पत्करू शकता. फारशा जबाबदार्‍या नसल्यामुळे हे शक्य होतं. गाव किंवा शहराच्या लगतच्या प्लॉटमध्ये पैसे गुंत...