Friday, April 24

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

लहान मुलांना ज्युस देताना काळजी घ्या

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, १२ महिने म्हणजे एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्युस अजिबात देऊ नये. कारण याचा त्यांना काहीच फायदा होत नाही.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजएक वषार्नंतर मुलांना हळूहळू ज्युस देणं सुरू करावं. मात्र रेडिमेड ज्युस देऊ नये, तर घरच्या घरी फळांचा ज्युस तयार करून द्यावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!दिवसाला ६0 से १२0 मि.लीपेक्षा जास्त ज्युस देऊ नये. एफडीएच्या मते, मुलांना ज्युस उकळून देऊ नका, यामुळे त्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा नाश होतो. लहान आहेत म्हणून मुलांना दुधाप्रमाणे बॉटलमधून ज्युस देऊ नका. तुम्ही त्यांना चमच्याने ज्युस पाजा किंवा कपातून ज्युस द्या.फळांपेक्षा भाज्यांचा रस द्या कारण फळं गोड असतात. रात्री झोपण्यापूर्वी मुलांना फ्रुट ज्युस बिलकुल देऊ नका. यामुळे पोट फुगणं, गॅस, अपचन अशा समस्या उद्भवू लहान मुलांन...
Gerenal

आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ व्हा

बदलत्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा विषय महत्त्वपूर्ण सिद्ध होत आहे. त्यामुळे पर्यावरणशास्त्राचा थोडासा प्रगत अभ्यास आणि आपत्ती व्यवस्थापनाचा प्राथमिक अभ्यास गरजेचा ठरत आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे जीवनामध्ये येणार्‍या अडचणींचं व्यवस्थापन. या अडचणी नैसर्गिक असोत की मानवनिर्मित, त्या सोडवण्याचं कौशल्य प्रत्येकाकडे असलंच पाहिजे. त्याशिवाय तो चांगल्या प्रकारे जगू शकणार नाही.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!यापूर्वी काही विद्यापीठांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होते. परंतु हा विषय असा न शिकवता सर्व पदव्यांच्या वर्गांना आवश्यक म्हणून शिकवावा असे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे हा अभ्यासक्रम व्यापक प्रमाणात उपलब्ध होणं शक्य झालं.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजतापमानवाढ तसंच हवामानातील बदल यामुळे पुढील काळात नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आ...
Gerenal

चाळशीनंतरची काळजी

वयाच्या चाळशीनंतर आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं ठरतं. मात्र, अनेक महिला या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देत नाहीत. वास्तविक चाळशीनंतर महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. चयापचय क्रिया मंदावते आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून या वयातील महिलांनी योग्य आहाराकडे लक्ष द्यावं.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजयाबाबतच्या टीप्स.. तशीनंतरच टप्याटप्यानं चयापचय क्रिया मंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हट ब्रेड किंवा ओट्स खावेत. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!सॅलेड, कोशिंबीरी हा फायबरचा चांगला स्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी यांचं सेवन महत्त्वाचं ठरतं. यातून ...
Gerenal

सावधान, धोका आहे येथे..!

चिकनप्रेमींची संख्या बरीच मोठी आहे. ती वाढतंही आहे. मात्र चिकन खरेदी करताना काही दक्षता घ्यायला हवी. जास्त मांस मिळवण्याच्या लालसेपोटी कोंबड्यांना रसायनयुक्त औषधं आणि काही इंजेक्शनचा डोस दिला जातो. ही औषधं त्यांच्या मांसाच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकतात. म्हणून बॉयलर चिकनपेक्षा देशी अधिक सुरक्षित असते असे तज्ज्ञ सांगतात.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!बॉयलर कोंबड्यांच्या कच्च्या मांसात बरेच किटाणू आणि जीवाणू असतात. त्यांना संसर्गाचा मोठा धोका असतो. मांस धुतलं जातं त्यावेळीही जंतूसंसर्ग संभवतो. मांसावाटे आपल्यावरही या संसर्गाचा प्रभाव जाणवतो. मोठय़ा संख्येने पक्षी कापले जात असताना कोंबड्यांबरोबर काही अन्य पक्ष्यांची कटाई होत असते.त्यावेळी त्या पक्ष्यांमधील बॅक्टेरिया कोंबड्यांच्या शरीरात संसर्ग उत्पन्न करु शकतात. कमीत कमी देखभालीत कोंबड्यांची वाढ व्हावी, त्यांच्या शरीरातील रोगप्रतिरोधशक्ती ...
Gerenal

बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे वाढते महत्त्व

रोगाचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी जैववैद्यकीय अभियांत्रिकी (बायोमेडिकल इंजिनिअरिंग)चे तंत्र महत्त्वाचे मानले जाते. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी वापरण्यात येणार्‍या वैद्यकीय उपकरण हाताळण्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात औषध आणि शास्त्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा एक चांगला पर्याय म्हणून उभा राहत आहे. विशेष म्हणजे कृत्रिम अवयवाची निर्मिती करताना बायोमेडिकलचे तंत्र आणि शास्त्राचा आधार घेतला जातो. कृत्रिम अवयव हे गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत असून बायोमेडिकलशिवाय शक्य नाही.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजबायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिरिंग क्षेत्रातील तंत्र आणि रचनेचा उपयोग हा वैद्यकीय उपचारासाठी आणि साधनासाठी करणे होय...
Gerenal

गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावे स्नान..?

काही जणांना अंघोळीसाठी गरम पाणी लागतं, तर काही जणांना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडतं. थंड की गरम कोणत्या पाण्याने अंघोळ करावी हे प्रत्येकाची आवड आणि सवयीवर अवलंबून तर आहेच. मात्र पाण्याचं तापमान आणि आरोग्याचा विचार करता गरम किंवा थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे वेगवेगळे फायदे आहेत.गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे थंड पाण्यामुळे झोप उडते, ताजंतवानं वाटतं, एक वेगळीच ऊर्जा मिळते. रक्तप्रवाहावर परिणाम होतो, शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. यामुळे तुमची झोप उडते. व्यायाम केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतो, थकवा दूर होतो. त्वचेला खाज येत असेल तर थंड पाण्याने अंघोळ केल्याने या खाजेपासून मुक्ती मिळते.गरम पाण्याने अंघोळकरण्याचे फायदे वाहतं नाक, डोकं जड होणं अशी फ्लूसारखी लक्षणं असल्यास त्यापासून आराम मिळतो.गरम पाण्यामुळे त्वचेवरील रंध्र...
Gerenal

दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम निवडताना..!

जर आपल्याला एखाद्या कारणावरून कॉलेजमध्ये जाता येत नसेल तर डिस्टन्स एज्युकेशन (दूरस्थ शिक्षण) हा एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. देशात आजघडीला ५0 लाखाहून अधिक विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. देशभरात ८00 हून सरकारी आणि अभिमत विद्यापीठ आहेत. यावरून दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व आणि व्याप्ती लक्षात येते. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली पदवी नियमित पदवीप्रमाणेच असते. या पदवीचा उपयोग करिअरचा ग्राफ उंचावण्यासाठी करू शकतो. भारतातील अनेक भागात आजही जिलच्या ठिकाणी कॉलेज किंवा विद्यापीठ नाहीत. तेथे दूरस्थ शिक्षण उपयुक्त ठरत आहे. हे एक शिक्षणाचे लवचिक माध्यम मानले जाते. हा अभ्यासक्रम करताना विद्यार्थी आपले छंदही जोपासू शकतो किंवा जबाबदार्‍या व्यवस्थित पार पडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरस्थ शिक्षण हे नोकरदार आणि व्यापार करणार्‍या मंडळींना, युवकांना उच्च शिक्षणाची ...
Gerenal

म्हातारपणाला दूर सारण्यासाठी..

धकाधकीच्या आयुष्यात लोक वेळेआधीच थकलेले फिल करू लागले आहेत. अशी तर याचे अनेक कारणे असू शकतात पण खरं कारण आहे ते म्हणजे तुमची जीवनशैली व सवयी. विज्ञानाच्या अनुसार रोजच्या जीवनातील काही सवयी आहेत ज्यामुळे तुमचे वय वेळेआधीच वाढते आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा बर्‍याच सवयी असतात ज्या आपल्या त्वचेवर सर्वात प्रथम परिणाम करतात. आपण अनुवांशिकदृष्ट्या आपल्यात असलेल्या गोष्टी बदलू शकत नाही पण तरूण आणि एनर्जेटिक दिसण्यात मदत करणार्‍या घटकांना नियंत्रित नक्कीच करू शकता.आठ वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की सिगारेट ओढल्यामुळे आपले वय जास्त दिसून येते. र्जनल ऑफ प्लॅस्टिक अँड रिकंस्ट्रक्टिव सर्जरीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात, हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी ७२ जुळ्या मुलांना समाविष्ट केले. धूम्रपान करणार्‍या मुलांच्या चेहर्‍यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली. धूम्रपान करणा...
Gerenal

व्यायाम करा घरच्या घरी

व्यायामाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यात सातत्य असावं लागतं. अनेकांना जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याचा कंटाळा असतो. असं असेल तर घरच्या घरी करता येण्याजोग्या व्यायामावर भर द्यायला हवा. याविषयी.. स्ट्रेचिंग- घरी वर्क आउट करत असाल तर स्ट्रेचिंग हा सर्वोत्तम प्रकार आहे. व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंगने करावी. यामुळे शरीर लवचिक बनून वर्क आउटसाठी तयार होते. पुश अप्स- पोटावर झोपा. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवा. हात आणि पंजे यांच्या सहाय्याने शरीर वर उचला आणि खाली आणा. पुश अप्समुळे खांद्यांना मजबुती मिळते. फ्री स्क्वेट्स- सरळ उभं राहून दोन्ही हात समोर ठेवावेत.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजगुडघ्यांवर थोडासा भार देऊन शरीराला खुर्चीवर बसतानाच्या स्थितीत आणा. कंबर सरळ ठेवा. काही काळ या स्थितीत राहून पूर्वपदावर या. हँड स्टँड- याला अधोमुख वक्रासन म्हणतात. रक्तदाबाचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी हा प्र...
Article

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक.…

०६जून १६७४ रोजीचा दिन हा हिंदवी स्वराज्यासाठी सुवर्ण दिन म्हणून ओळखल्या जातो कारण याच दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करून "शिवराज्याभिषेक सोहळा" आयोजित केला होता.शिवराय हे परमपराक्रमी तर होतेच शिवाय त्यांची दूरदृष्टी सुद्धा अतिशय तिक्ष्ण होती.त्यांना माहीत होते की,आपण आपल्या स्वराज्यनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे आपले हिंदवी स्वराज्य जरी निर्माण केले असले तरीपण आपण आजही मोघलांचे मांडलिक म्हणूनच राहणार आहोत.आपल्याला स्वतःचे चलन,राज्यकारभार,न्यायव्यवस्था,करप्रणाली ई.धोरणे ठरविण्याचा स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार नाही स्वराज्य असून सुद्धा जर आपण प्रजाहित धोरण ठरवू शकत नसलो तर आपल्या हिंदवी स्वराज्याचा काहीच उपयोग होणार नाही.म्हणूनच त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्वतःची एक ओळख निर्माण होईल आणि आपल्या प्रजेला...