Friday, April 24

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

निसर्गाच्या परोपकाराची परतफेड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया.!

निसर्गाने मानवाला भरभरून खूप दिले. एवढेच नाही तर हे सर्व पवित्र व गुणवत्तापूर्वक सुद्धा होते. ह्यामध्ये मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू, सूर्यप्रकाश, पाणी, खनिज संपत्ती, पक्षी, प्राणी  व वनस्पती आहे. ते सुद्धा विनामूल्य व कुठलेही अपेक्षा न ठेवता जणू मानवावर निसर्गाने परोपकाराचं केले. जणू काही निसर्गाचा जन्मो जन्मीचा  दृढसंबंध असलेले नाते होते. जणू काही निसर्ग मानवावर अतोनात प्रेम करतो. जसे काही निसर्गाने मानवाचे पालकत्व घेतले व त्याप्रमाणे तो मानवाचे पालन पोषण करतो आहे.मानवाची निसर्गही हा खूप काळजी घेतो. त्याची तहान भागली पाहिजे, त्याला प्राणवायू मिळाला पाहिजे. त्याला सूर्यप्रकाशातुन डी जीवनसत्व मिळाले पाहिजे. वनस्पती पासून औषधी मिळाल्या पाहिजे. खाणींमधून खनिजे व समुद्रातून नैसर्गिक साठा मिळाला पाहिजे.मानवाने निसर्गा पासून आता पर्यंत घेण्याचेच काम केले आहे व ही प्रक्रिया अजूनही सुरूच...
Article

बुद्ध लेणींचे नामकरण…!

महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले आहे.! काहींचे "नामकरण" ही झाले आहे..! भारतीय लोककथेमध्ये 'पांडव' व त्यांच्याशी जोडलेल्या अनेक लोकप्रिय कथा आहेत.! अनेक बुद्ध लेणींचे नामकरण ही याच नावाने झालेले आहे याचा आढावा घेणारा अतुल मुरलीधर भोसेकर यांचा लेख खास वाचकांकरीता देत आहोत.....इतिहासाचा शोध आणि त्याचे पुनर्लेखन का गरजेचे आहे हे लक्षात येईल..!- संपादकज्ञान हे प्रवाही असले पाहिजे, नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असते. नवनवे संशोधन जसे पुढे येत जाते, तसे जुने ज्ञान किंवा विचार बदलणे अपेक्षित असते. प्रत्येक ज्ञानशाखेत असे प्रवाह निर्माण होत असतात. इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र या शाखेत अविरत संशोधन चालू आहे. मात्र तरीही काही इतिहासप्रेमी, तज्ञ अथवा पुरातत्वविद हे जुन्या शब्दांना किंवा कंसेप्ट्स यांना बदलायला तयार नसतात. मग भले तुमचे संशोधन कितीही ताकदीचे, ...
Gerenal

बाबासाहेब लिहितात….✍️

"पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही. -पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे. सध्या मुरंबा लावलेला पाव _त्या पावाचे दोन चार तुकडे करून उदरनिर्वाह करतो. ग्रंथालयात खाण्यावर बंदी आहे. -पण वेळ मिळताच मी कोणाच लक्ष नसताना ते खातोय. सकाळ झाली की "ग्रंथालयात केव्हा संध्याकाळ उलटते कळत नाही. काही पुस्तकांची पाने वाचायची राहिले की ती रुखरुख जीवाला लागते. मी पान क्र लक्षात घेऊन पुनश्च उद्या सकाळी ते पुस्तक वाचायला घेतो. -खूप जबाबदारी आहे. माझा शैक्षणिक उद्देश हा एकमात्र आहे. तो म्हणजे प्रचंड ज्ञानसाधना. पुस्तकात रमल्यानंतर कशाचं भान उरत नाही. पुस्तकांची पाने चाळताना मला कसलाच बाहेरचा गोंगाट ऐकू येत नाही. भूक सतावत नाही. तहान ही फारशी लागत नाही. संध्याकाळी एकवेळच जेवण घेतो. "जेवण फार मोजक असत. अगदी जगण्यासाठी लागेल इतकंच. "भाकरीची फार आठवण येते. -पावाचा तुकडा खाताना ग...
Article

महात्मा बसवेश्वर दलित व शोषितांचे मसीहा

संत हरळ्याच्या एकाकीपणामुळे त्यांचे मन गावात रमत नव्हते.त्याचे वडील ज्यांच्याकडे काम करीत असत,त्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळत असे. माहीत नसतांनाही वडीलांच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे पादत्राणे बनविण्याचा धंदा हरळ्या करु लागला. एक दया म्हणून लोकं हरळ्याची पादत्राणे घेत असत. अशाच अनुभवातून हरळ्याची  पादत्राणे कलाकुसर पद्धतीने तयार होवू लागली. आज त्यांच्यात कौशल्य निर्माण झाले होते. एकटेपणामुळे लवकरच लवकरच त्यानं आपला विवाह कल्याणी नावाच्या मुलींशी केला होता. लहानाचा हरळ्या संसार सांभाळता सांभाळता मोठा होवू लागला. कल्याणीपासून त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव शिलवंत ठेवण्यात आलं होतं.          बसवेश्वराने याच काळात जन्म घेतला होता. आपल्या लहानपणापासूनच बसवेश्वराने दलित आणि स्रियांवरील अत्याचार अगदी जवळून पाहिले होते. जन्माच्या वेळीच या बसवेश्वराने मुंज नाकारुन प्रथेला सुरुंग ...
Article

अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं..!

अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे.       या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे         या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास  प्रारंभ केली....
Article

वऱ्हाडाचा कुबेर राघोजी महार

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसाहत करून असणारा आजचा *बौद्ध  व पूर्वीचा महार* गेली कित्येक हजार वर्षापासून दारिद्र्यात जीवन जगत होता. आधुनिक भारताच्या इतिहासात महारांच्या कहाण्या आपण ऐकले आहेत.पण विदर्भातील वाशिम जवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर असणारे तोरणाळा गावचा* काही वेगळाच इतिहास आहे.या गावी  राघोजी नावाचा सावकार होऊन गेला ज्याच्या गोष्टी आजही लोकांच्या तोंडी एकाला मिळतात राघो महार यांचा जन्म 1839 मध्ये झाला राघो स्वभावाने जिद्दी आणि मेहनती होता. असे सांगतात की एकदा काम करत असताना त्याला सोन्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून त्याने मोह विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आपल्या मेहनतीने व चिकाटीने तो मोहविक्रेता म्हणून प्रसिद्ध झाला.  ज्याच्या हजारो पिढया गरीबीच्या अंधारात खितपत पडल्या होत्या त्या समाजात सावकार म्हणून त्याची ख्याती व्हायला वेळ लागला नव्हता. लोकांना आलेल्या छोट्या छोट्या आर्थिक ...
Article

कुटे गुरुजी…एक निरपेक्षवृत्तीचा -उपक्रमशील शिक्षक

नारायणराव गोविंदराव कुटे गुरुजी यांचा जन्म २६ जुलै १९४१ साली वरुडखेड येथे झाला. कुटे गुरूजी म्हटले की, चांगले साडे पाच फुटांपेक्षा उंच तसेच अंगापिंडाने भरलेले गौरवर्णी, थोडा लांब चेहरा, पांढरा शुभ्र पायजमा, त्यावर प्रेसचे शर्ट असे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व त्यांचॆ होते. ते स्वभावाने जरी कडक असले तरी तितकेच मनमिळावू होते. तसेच सद्वर्तनी आणि निष्कलंक चारित्र्याचे होते.मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डीएड केले आणि १७ जुलै १९६३ ला ते यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये माळेगाव येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. सेवारत असताना अचलपूर येथे इंग्रजी विषयाचा कोर्स पूर्ण केला, नंतर पांढुर्णा आणि करजगाव येथे १९६७ ला रूजू होऊन १९९७ पर्यंत करजगांवला ३० वर्ष कार्यरत होते, असा त्यांच्या सेवेचा प्रवास झाला.करजगावी असताना त्यांना सदाशिव गोविंदराव भोयर, सालपे गुरूजी, भालेराव गुरूजी, गायकवाड गुरूजी इत्याद...
Gerenal

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे !

“मुंबईत राहून राजगृह पाहिलं नाही तू...? चल मी घेऊन जाते“ असं म्हणून संगीता मला दादरला घेऊन गेली. राजगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचताच एरव्ही सर्वसामान्यांसाठी खुले असलेले सभागृह त्यादिवशी बंद होते. राजगुहाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी कुणालाही प्रवेश नव्हता. दोघीही निराश झालो. परतीचा विचार सुरु केला. असं म्हणतात, “विश्वास दृढ झाला की, निष्ठा येते. निष्ठा दृढ झाली कि श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की, भक्ती आणि भक्तीही दृढ झाली की समर्पिता.” याच समर्पित दृढ भावनेनं संगीता एकटीच राजगृहाच्या वरच्या मजल्यावर जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परपोतीला घेऊन खाली आली. त्यादिवशी मी केवळ संगीतामुळे राजगृहापर्यंत पोहचले पण राजगृह पाहण्याची ईच्छा मात्र अपुर्णच राहिली.2014 साली आम्ही 11 जण एकाचवेळी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झालो. त्यानंतर अनेक सहकारी बदलीमुळे वेगवेगळ्या जिल्ह्या...
Gerenal

सम्राट अशोक : एक श्रेष्ठ तम सम्राट

       इतिहासाच्या पानापानांवर परिच्छेदा च्या परिच्छेदांवर गर्दी करून असणाऱ्या लक्षावछधी राजांच्या नावामध्ये, सम्राट अशोकाचे एकट्याचेच नाव एखाद्या तळपत्या तार् यासारखे चकाचक राहते, अशोकाचे हे वेगळेपण असामान्य आहे, अलैकिक आहे. हेच आपण नेमके समजावून घेतले पाहिजे, कलिंगच्या लढाईनंतर त्याच्या व्यक्ती मत्वात झालेल्या अमूलाग्र बदल हेच त्यांच्या वेगळेपणाचे गमक आहे, शत्रुपक्षाची प्राणहानी, वित्तहानी पाहून सामान्यतः पराक्रमी राजे आपली पाठ थोपटून घेतात, यशाने उन्मत्त होतात, सम्राट अशोक राजा असा सामान्य राजासारखा उन्मत्त झाला नाही, त्याने शांतपणे विचार केला, प्राणहानीने, वित्तहानीने तो व्यथित झाला आणि हिंसेचा मार्ग अवलंबल्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला. त्याने हिंसेचा मार्ग सोडला असे हे राजाने वागणे. हेच त्यांच्या असामान्य पणाचे अलैकिक करुणामय होणे होय. म्हणजे मानवी मनाला स्पर्श करून त्यांचे दुख स्वत...
Gerenal

महिला सक्षमीकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची विविध पैलू आहेत.एक महान समाज क्रांतिकारक,शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ,परराष्ट्र नितीतज्ञ म्हणून भारताच्या जडणघडणीत त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान आहे.विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणासाठी ही तितकेच महत्वपूर्ण असे योगदान आहे.शोषित,पीडित,वंचित घटकाच्या उद्धाराबरोबरच महिलाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,त्यांच्या हक्कासाठी पोटतिडकीने लढलेत,झटलेत, झिजलेत.सर्वधर्मीय महिलांना त्यांच्या अधिकार व हक्काची जाणीव करून दिली.अधिकार व हक्काच्या लढाईसाठी प्रेरित केले. सर्वांगीण विकासाची वाट मोकळी करून दिली.डॉ.आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजच्या समस्त महिला वर्गाच्या आयुष्यात सोनियाचा दिवस उगवला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य कुणीच नाकारणार नाही. भारतातील वर्णव्यवस्था...