Thursday, June 18

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!
News

भारताच्या विश्वविजेत्या वीरांगना: बीसीसीआयचा ५१ कोटींचा मानाचा मुजरा!

मुंबई : नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने अभूतपूर्व पराक्रम साधला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी पराभूत करत महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे केला. भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवरच कोसळला. या विजयानंतर देशभरातून महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, बीसीसीआयनेही ऐतिहासिक निर्णय घेत ५१ कोटी रुपयांचं भव्य बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितलं की, या पुरस्कारात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल. त्यांनी या विजयाचं श्रेय आयसीसी चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीला दिलं. शाह यांच्या प्रयत्नांमुळे महिला क्रिकेटमधील पुरस्कार रक्कमेत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढ करण्य...
अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत
Article

अमर्त्य सेन : भारतरत्न व नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, मानवी विकासाचे जागतिक विचारवंत

अमर्त्य सेन हे जागतिक कीर्तीचे मानवतावादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेत.त्यांचा जन्म सन : १९३३ सालातील नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला झाला. आज दि.३ नोव्हेंबर २०२५ ला असलेल्या त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्ठचिंतन॥नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'अमर्त्य' अर्थात अमर हे नाव दिले होते. अमर्त्य सेन यांचे माध्यमिक शिक्षण ढाक्का येथील सेंट ग्रेगरी हायस्कूलमध्ये झाले आणि नंतर त्यांनी विश्वभारती आणि कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून शिक्षण घेतले.सन : १९५३ मध्ये त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी.ए. पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमधून सन : १९५९ मध्ये त्यांनी एम.ए.आणि पी.एच.डी. पदव्या प्राप्त केल्या.अवघ्या २३ व्या वर्षी सेन जादवप...
आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!
Article

आंदोलनादरम्यान होणारी वाहतूक कोंडी चिंताजनक!

आंदोलना  दरम्यान "रस्ता रोको" (नाकाबंदी) आंदोलन चुकीचे आहे की नाही हे एखाद्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. काहींचा असा विश्वास आहे की यामुळे सामान्य लोकांना गैरसोय आणि त्रास होतो, तर काहींचा असा युक्तिवाद आहे की ते एखाद्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक आवश्यक आणि प्रभावी माध्यम आहे. आंदोलनादरम्यान हिंसा  होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी  रस्ता रोको आंदोलने करू नये.अनेक आंदोलनाला हिंसेचे स्वरूप मिळाले.रस्ता रोको मुळे अनेकांचे प्राण गेले. आंदोलन कोणत्याही प्रकारचे का असेना  त्या आंदोलकांना रस्त्याची नाकाबंदी करू देऊ नये.सुरक्षित प्रवास हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे.रस्तावर जनतेची कोंडी होत असेल तर हा प्रकार मानवी अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे.आपल्या मागण्या प्रभावीपणे  शासनापर्यंत  मांडण्यासाठी वापरली आंदोलक  रस्ता रोको आंदोलन करत...
ह्यांच्यामुळे…
Poem

ह्यांच्यामुळे…

ह्यांच्यामुळे ...       देवा तुझे किती       सुंदर आकाश       झोपड्या भकास                   पृथ्वीवर....      येशू तूझा किती        दयाळू प्रकाश       प्राण्यांचा आक्रोश                 उत्सवाला ....      खुदा तुझी दुनिया      आबादी आबाद       माणूस बरबाद           ...
पंढरी.!
Poem

पंढरी.!

पंढरीआलो पंढरीसी।विठूच्या गावाशी।चंद्रभागेपाशी।स्थिरावलो।।पुंडरिका भेटी।परब्रह्म आले।अठ्ठावीस झाले।युगे धरा।।वाळवंटी दिसे।वैष्णवांची दाटी।एकमेका भेटी।प्रेमभावे।।तीर्थांचे माहेर।विठूची पंढरी।आमुची वैखरी।विठू नामें।।सर्व भक्तांसाठी‌।सम आचरण।समदृष्टी जाण‌। विठोबाची।।भाव जैसा जैसा।तैसा पावे हरि।कृपा सर्वावरी।करीतसे।।-आबासाहेब कडूकार्तिक एकादशी(२-११-२०२५)सर्वांना कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा● हे वाचा –आमची लक्ष्मी.!पंढरी पंढरी - संत तुकाराम अभंग......
मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!
News

मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!

अमरावती : जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट भागात दरवर्षी दिवाळीनंतर एक अनोखा बाजार भरतो. हा बाजार केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नाही, तर प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत मेळा आहे. स्थानिक गोंड आणि आदिवासी समाज या बाजाराला प्रेमानं “घुंगरू बाजार” किंवा “थाट्या बाजार” म्हणून ओळखतात.दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडी बुधवारी हरिसाल, धारणी, सेमाडोह, कोल्हा आदी भागांमध्ये हा बाजार भरतो. पांढरा सदरा, धोतर, कवड्यांची माळ, आणि डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांनी सजविलेली पगडी परिधान केलेली गोंड मंडळी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादात नाचत बाजारात फिरतात. बांबूपासून तयार केलेल्या बासऱ्यांचे सूर आणि म्हशीच्या शिंगापासून तयार केलेल्या फुंक्यांचे आवाज संपूर्ण बाजारभर घुमत राहतात. या नादात मिसळलेली रंगीबेरंगी माणसं मेळघाटाच्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतात.या दिवशी लोक वर्षभरातील शेतीमाल विक्रीतून मिळालेल्य...
ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!
News

ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा हल्लाबोल!

तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर परिसर आज दणाणून गेला, कारण हजारो शेतकरी, महिला व युवकांनी माजी आमदार मा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात दोन तासांचा ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केला. “सरकार जागे व्हा!”, “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी जाहीर करा!” अशा घोषणांनी औरंगाबाद रोडवर जनआक्रोशाचा लोंढा उसळला.काँग्रेसचा सरकारला इशारामाजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आंदोलनादरम्यान सांगितले,“शेतकरी आत्महत्येच्या टोकावर आहे. कर्जमाफी ही त्याची मागणी नाही, ती त्याची गरज आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतं, पण शेतकऱ्याला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही शांत बसणार नाही — काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार!” ते पुढे म्हणाले,“शेतकऱ्यांचा घाम सोन्यासारखा मौल्यवान आहे. जर सरकारने त्यांच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर जनता ...
पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?
News

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?

पती-पत्नी दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये; मुलं कोणाकडे?देहराडून (उत्तराखंड) : प्रेमाला ना वयाचं बंधन, ना नात्याचं! पण या “प्रेमकहाणी”नं मात्र नात्यांचे सगळे अर्थ बदलून टाकले आहेत. उत्तराखंडातील देहराडूनमध्ये घडलेली ही घटना ऐकून कुणीही थक्क होईल कारण इथे फक्त पत्नीच नव्हे, तर पतीदेखील आपल्या जोडीदाराला सोडून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये गेले आहेत!एका विवाहित महिलेने आपल्या पतीला आणि तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक तिच्या पतीलाही दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जाताना पाहून लोकांचं डोकं फिरलं. आता प्रश्न एकच मुलांचं काय?महिला आयोगाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल झाली आहे. पत्नीचं म्हणणं “माझ्या पतीला एका महिलेनं फसवलं!” तर पतीचं म्हणणं “माझ्या पत्नीची दिशाभूल करण्यात आली!” आता नेमका बळी कोण आणि दोषी कोण हे ठरवणं आय...
रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!
Article

रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!

रीलचा प्राणघातक खेळ: प्रसिद्धीच्या नादात जीव धोक्यात!३० सेकंदांच्या छोट्या व्हिडिओंना शॉर्ट्स म्हणतात. तथापि, काही व्हिडिओ २ मिनिटांपर्यंतचे असतात. रील्स हा देखील एक प्रकारचा लघु व्हिडिओ आहे. रील्स बनवण्याची क्रेझ टिकटॉक अॅपपासून सुरू झाली. भारतात टिकटॉकवर बंदी घालताच लोकांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्व प्रकारचे रील्स अपलोड करण्यास सुरुवात केली. मजेदार, माहितीपूर्ण, भावनिक, सर्व प्रकारचे व्हिडिओ रील्सवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणूनच लोक त्याचे व्यसन करत आहेत. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण या रील्स बनवत आहेत, परंतु मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये त्याची जास्त क्रेझ दिसून येत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी  काही जण जीवाची पर्वा न  करता वाटेल त्या प्रकारचे रील्स बनवत आहे.तरुण लोक रीलसाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. मध्यप्रदेश मध्ये  एका त...
घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव
Article

घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तव

घटस्फोट : गुन्हा की यल्गार? आधुनिक वैवाहिक वास्तवआज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. काही घटस्फोटातून आहेत व वाटायला लागलं आहे की घटस्फोट हा गुन्हा आहे की यल्गार? खरं तर घटस्फोट व्हायला हवेत. पती पत्नीचं जर एकमेकांशी पटत नसेल तर..... परंतु कधीकधी घटस्फोट हे वेगळ्याच कारणानं होतात. जेव्हा कधीकधी विवाहाचा वापर हा खावटी म्हणून पैसा कमवून ऐषआरामात जीवन जगण्यासाठी केल्या जातो. काही वेळेस विवाह हे खावटी मिळवून ऐषआरामाचं आयुष्य जगण्यासाठी केले जात असल्याचं निदर्शनास येतं. अशाच कारणातून कधीकधी आत्महत्या वा खुनासारखे कृत्य घडून येतात. ज्यातून स्वतः जन्मास घातलेली मुलंही सुटत नाहीत. आज बर्‍याच आत्महत्या होत आहेत. कधी शेती पिकली नाही म्हणून. कधी परीक्षेत नापास झाले म्हणून. कधी प्रेमभंग झाला म्हणून तर कधी कोणी कोणाला छळलं म्हणून. परंतु पती पत्नी वितुष्टातून आत्महत्या झालेल्या जास्त करुन कोणी ऐ...