Thursday, June 18

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
भावाबहीणीचं नातं..!
Poem

भावाबहीणीचं नातं..!

भावाबहीणीचं नातं..!ओवाळणीच्या ताटातनोटा टाकून झाल्यावर……..त्याने तो कागद पुढे केलाआणि लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…ताई इथं तुझी सही हवीय फक्त…तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवलापदराने डोळे पुसत हसत म्हणाली,आण तो कागददादा सही करतेफक्त एक वचन देऊन जावर्षभर आला नाहीस तरी चालेलदर भाऊबिजेला न चुकता येत जा..माय बाप गेलंआत्ता माहेरही रुसलं आहे..मातीतल्या नात्याचंनावही पुसलं आहे..मुलांना चांदोमामाची तीरोज गोष्ट सांगते..मुलं झोपी जातात तेव्हा..तिच्या डोळ्यात जत्रामाहेरची पांगते..सुखी ठेव देवा भाऊराया माझानवस रोज मागते..किती किती आणि कितीतरीभावाचं कौतुक सांगते सासरी..अन तिच्या माहेरात फक्त तिचीवाट पाहते ओसरी…-नितीन चंदनशिवे● हे वाचा –Dr Sujay Patil : ...
गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा
Article

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसा

गोधन पूजा : बंजारा तांडा संस्कृतीचा जिवंत वारसादिवाळी हा भारतीय संस्कृतीत समृद्धी, आनंद आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. मात्र गोरबंजारा समाजातील ‘दवाळी’ ही फक्त एक सण म्हणून नव्हे तर सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. या सणाचे संदर्भ विधी, लोकगीते आणि परंपरा, समाजाच्या भटक्या इतिहासाशी, निसर्गाशी आणि सामूहिक जीवनाशी घट्ट जोडले गेलेले आहेत.गोरबंजारांची ‘दवाळी’ दोन दिवसांची असली तरी तिचा आशय शतकानुशतकांचा सांस्कृतिक वारसा सांगतो. पहिल्या दिवशी कुमारिका मुली परंपरेनुसार घराघरांत जाऊन दिवा घेऊन ‘मेऱा’ च्या रुपाने थोरामोठ्यांचे शुभचिंतन करतात आणि पारंपरिक गीतांद्वारे समृद्धीचे आशीर्वचन मागतात. या विधीत समाजातील स्त्रीशक्ती आणि एकात्मतेची जाणीव स्पष्ट दिसते. दुसऱ्या दिवशी पार पडणारी ‘गोधन पूजा’ पशुधन आणि निसर्गाबद्दल गोरबंजारांचा कृतज्ञतेचा उत्सव ठरतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी होणारी ह...
‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ
Story

‘ताई कितीला दिला हा फडा?’ ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ

'ताई कितीला दिला हा फडा?' ; श्रमाच्या किंमतीचा हृदयस्पर्शी अर्थ"ताई कितीला दिला हा फडा?" " भाऊ हा ५० आणि हा ६० रुपायाला" त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी परत प्रश्न केला "दोन्ही तर सारखेच दिसताहेत फरक काय ?" " भाऊ पानोळ्या,वजन सारखेच आहे फरक फक्त बांधण्यात असतो.दोरी गच्च कमी अधीक होते भाऊ म्हणून" मी दोनही फडे हातात घेवून बघत होतो.अगदी दोनही बाजूने. त्या मायमाऊलीचे हृदय खालीवर होत होते.एखाद्याने मोठ्या श्रमाने हताला घाव सहन करुन एखादी सुंदर कलाकृती बनवावी आणि माझ्या सारख्याने क्षणात तिच्या उनीवा काढुन नावे ठेवून निघून जावे काय वाटत असेल त्या पोटासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या जीवाला. रस्त्यावर संपूर्ण अंधार झालेला आहे. आणि तिला एवढा माल खपवून घरी जायचेय.फक्त दोनच फडे उरलेले आहेत.आणि ते ही मी बघत आहे. " भाऊ दहाविस कमी द्या,एवढे काय पहायले" "अहो ताई मी किंमत कमी करनार नाही " त्या रखुमाईल...
अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश
Article

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेश

अंधारातील प्रकाशाचा किरण: दिवाळीचा खरा अर्थ आणि संदेशदिवाळीत केवळ भौतिक दिवे न लावता प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात प्रेम, करुणा आणि सौहार्दाची ज्योत पटवण्याचा हा सण आहे.दिवाळीचे खरे महत्त्व फक्त दिवे लावणे किंवा मिठाई खाणे एवढेच मर्यादित नाही. हा सण आपल्या जीवनात ज्ञान, सकारात्मकता आणि समृद्धी आणण्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये दिवाळीचे वर्णन अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा त्रिपक्षीय विजय म्हणून केले आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या मानसिक आणि सामाजिक जीवनात संतुलन आणि प्रेरणा आणणारा सण आहे. दिवाळीच्या वेळी आपल्या घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये दिसणारा तेज आणि उत्साह केवळ शारीरिक प्रकाश नसून आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक प्रकाश पसरवण्याचे प्रतीक आहे.या दिवाळीत "मानवतेची ज्योत पटवण्याचा" संकल्प करू या.हा स...
घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून
Article

घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर – वंशावळीच्या प्राचीन सरीतून

घरंदाज हुंदक्यांचे आर्त स्वर - वंशावळीच्या प्राचीन सरीतूनबाईपणाचा हिरवा गर्भ ठेवणाऱ्या ओसाड पुरुषी माळरानाला अन् काळाच्या पाठीवर अख्खा जन्म सहनशीलतेने सारवून – लिंपून जगण्याचा पापुद्रा धरून आलेल्या बाई कुळाला… अशा गर्भित अर्थाने अर्पण केलेली “वंशावळीच्या प्राचीन सरीतून…” ही नांदगाव जि नाशिक येथील कवयित्री प्रतिभा खैरनार यांची साहित्य काव्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. स्त्री जीवनाची वास्तवता मांडणारी ही कलाकृती साहित्य जगतात स्त्रीवादी लेखनातील मैलाचा दगड ठरावी इतकी दर्जेदार निर्मिती झाली आहे. या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर स्त्रीचा अर्धा पदराने झाकलेला चेहरा, माथ्यावर चोचीत गवताच्या काड्या घेऊन बसलेली चिमणी, हा संदर्भ पाहूनच स्त्रीच्या शालीनतेचे, सोशिकतेचे, सहनशीलतेचे, कुटुंबवत्सलपणाचे, स्त्रीसंस्कृतीचे दर्शन घडते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी साकारलेल्या मुक्त...
गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य
Article

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्यनवरात्रं पार पडलं की दसरा दणदण करत यायचा.दसऱ्याच्या दिवसी घराला आंब्याच्या पानांची तोरणं दोऱ्यात ओवून बांधायची‌. चार,पाच झेंडूच्या फुलांईचा हार करायचा.आपटयाची पाने तोडायले जाऊन ती घरी आणायची.व संध्याकाळी जेवणं झाली म्हणजे घरातली म्हातारी माणसं प्रशस्त आंगनात सुताचा तडव आथरून दसऱ्याच्या सोनं देण्याची वाट बघायची. बाजूला पानपुळा सुपारी अडकित्ता असायचा.येणाऱ्या, जाणाऱ्यांची ख्यालीखुशाली ईचारून पानसुपारी खाण्याचा आग्रह करायची.किती दिलदार लोकं होती ही.दसरा पार पडला म्हणजे पंधरा दिवसावर दिवाई रोरो करत यायची.आमच्या गावाकडच्या दिवाईत मस्त व आगळीवेगळी मजा होती राजेहो. घरातल्या सगळ्या सातऱ्या वाकया,गोधडया धान्य, मिरच्या साजऱ्या उन्हात वाऊचिऊ घालायचं काम चालायचं.महिन्याभरा पूर्वीच गवंडयाच कुटार गारा करून त्यात तुडवून,कालवून साजरू मूरू द...
बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र
Article

बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र

बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्रआपल्या महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या मध्य ते उत्तरार्धादरम्यान पिढ्यानं पिढ्या चालत आलेली बारा बलुतेदार ही वस्तूविनिमय पद्धतीवर आधारलेली पद्धत ग्रामीण जीवनाचा अविभाज्य अंग होती.त्यात मुख्यत: वस्तू किंवा कामाच्या मोबदल्यात धान्याची देवाणघेवाण होत असे.कुंभार, लोहार, सुतार, चांभार, न्हावी, धोबी, महार, माळी, तेली, गुरव, कोळी, मातंग…असे ते बारा बलुतेदार होत.त्यांच्या व्यवसायानुरुप ही नावे पडलेली दिसतात. ज्यांनी मागील शतकात ग्रामीण जीवन अनुभवले आहे त्यांना ही पद्धत माहित आहे. ह्या व्यतिरिक्त ग्रामीण जीवनाचा भाग बनलेली काही व्यवसायिके होती.ती मात्र आपण लक्षात घेत नाही.त्याचाच आढावा घेणारा हा लेख.बेलदारबेलदार समाजातील ही मंडळी कुटुंबकबिल्यासह भटकंती करीत गावोगावी मातीची घरे बांधण्याची कामे करीत होती. मा...
भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!
Article

भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!

भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे कारण ते ज्ञान आणि माहितीचे केंद्र आहेत.मराठी भाषेची समृद्धता आणि संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका फार मोलाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वाचनामुळे लेखन कौशल्य मुलांना अवगत होते. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्‍या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते. ग्रंथालय चळवळ समृद्ध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.भाषा संवर्धन आणि ग्रंथालये यांचा घनिष्ठ संबंध आहे, कारण ग्रंथालये भाषेचे जतन आणि विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रंथालये माहिती आणि साहित्याचा संग्रह करून भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात, तसेच भाषेच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवतात. यामध्ये सा...
१० रुपयांत दिवाळीचा फराळ!
News

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!अंबरनाथ : दिवाळीचा सण लोकांसाठी आनंद आणि गोडी घेऊन येतो. मात्र महागाईमुळे फराळाचे साहित्य अनेक कुटुंबांसाठी परवडणं कठीण झालं आहे. अशा पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिवसेनेने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे — फक्त १० रुपयांत दिवाळी फराळाचे साहित्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५ ते ६ हजार कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे. फराळ साहित्यामध्ये चिवडा, शेव, लाडू, करंजी यांसारखी पारंपारिक दिवाळीची गोडीची वस्त्रे होती.हा उपक्रम माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “सणाच्या आनंदात गोडी आणणारा” असं शिवसेनेच्या प्रयत्नाचं वर्णन केलं.स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, “आजच्या काळात फक्त १० ...
न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी  तिसऱ्या मजल्यावरून उडी!
News

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!पुणे : “तारीख पे तारीख…” गेली २७ वर्षे कोर्टात न्यायाची वाट पाहणाऱ्या पक्षकाराने शेवटी मृत्यूचीच निवड केली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेने न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव गेल्या २७ वर्षांपासून जमीन व्यवहाराशी संबंधित एका वादग्रस्त प्रकरणात न्याय मिळण्याची वाट पाहत होते. प्रत्येक सुनावणीला केवळ “तारीख” मिळत होती, निकाल नव्हता. या सततच्या विलंबामुळे ते नैराश्यात गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. म...