Friday, November 14

Article

प्रिय सखी…!
Article

प्रिय सखी…!

प्रिय सखी..    तुला विटाळ म्हणुन हिणवणाऱ्याच्या पाच दहा द्याव्या वाटतात.. मी तुझ्याशी रोजच बोलते.. तुझ्यावर पुस्तकात लिहीलय.. तुझ्यावर अनेकदा व्हीडीओतुन बोललेय.अनेकदा लेखातुन व्यक्त झालेय..   मुळची मी कोकणातील असल्याने ४ दिवस बाहेर बसायला लागायचं त्यामागे काय कारणं होती माहीत नाही पण स्त्रीला विश्रांती मिळावं हे कारण जरी धरलं तरीही आम्हाला शेतात काम करायला लागायचं त्यामुळे विश्रांती नाहीच पण लहानपणापासून शेतात काम केल्याने शरीराला कामाची आणि व्यायामाची लागलेली सवय आजही तशीच आहे त्यामुळेच तुही सखी न चुकता २७ व्या दिवशी येतेस..   जग इकडचं तिकडे होइल पण तुझी वेळ तु चुकवत नाहीस.. तु माझी प्रिय सखी आहेस आणि मी शरीरावर , खाण्यावर ,वेळा पाळण्यावर झोपण्यावर कुठलेही  अत्याचार होवु देत नाही.. मला मी लावुन घेतलेली शिस्त आहे म्हणुन तुही दरमहिन्याला न चुकता तुझ्या वेळेत मला कुठलाही त्रास न देता मला भेट...
…. शास्त्र जाणुन घ्या.!
Article

…. शास्त्र जाणुन घ्या.!

.... शास्त्र जाणुन घ्या..!      प्रत्येक माणूस आपल्याला सोयीनुसार जात , धर्म आणि त्यानुसार येणारी कर्मकांड यात अडकलेला आहे त्यामुळे जातीधर्माच्या विळख्यात आरक्षणापासून ते जातीचा गर्व या सगळ्याच पापात दिवसेंदिवस गुंतत चाललाय.. मी अमुक एक जातीचा आहे यापेक्षा इथुन पुढे मी माणूस आहे हे सांगायला सुरुवात करायला हवी... आता महाराष्ट्रात चालु असलेलं राजकारण यात तरुण मुलानी लक्ष न घालता शास्त्र जाणुन घेण्यात त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करावा आणि पालकानी जर भगवद्गीता अध्याय ४ श्लोक १३ पान नं. १८१ . 182 वाचला किवा जाणुन घेतलं तर एका क्षणात जाणवेल कोणाच्या तरी सांगण्यावरुन आपण किती वाईट वागतोय किवा वाईट विचार करतोय.. भगवंताने  फक्त चार वर्णात संपूर्ण मानवजात वसवली असताना आपण कोण हे वाईट राजकारण खेळणारे ??.. तो उच्च तो नीच हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणी ??.. माझी सगळ्याना विनंती आहे की दिवाळीच्या ...
तर अशा धम्मचक्रप्रवर्तनाची गरज काय?
Article

तर अशा धम्मचक्रप्रवर्तनाची गरज काय?

तर अशा धम्मचक्रप्रवर्तनाची गरज काय?            दरवर्षी दसरा आला की नेमकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. त्यांनी केलेल्या महान कार्याची आठवण येते नव्हे तर असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते तर आम्ही ख-या अर्थानं स्वतंत्र झालो असतो का? आम्हाला स्वतंत्र्यता अनुभवता वा उपभोगता आली असती का?              या प्रश्नांचं उत्तर नाही असंच आहे. आम्हाला स्वतंत्रता नक्की मिळाली असती. पण मुठभर जर सोडले तर बाकीच्यांना स्वतंत्रता उपभोगता आली नसती.           मी हिंन्दू जरी जन्माला आलो असलो तरी हिंन्दू म्हणून मरणार नाही. हे बाबासाहेबांचं विधान. ते त्यांनी अंतिम समयी का होईना सार्थ करुन दाखवलं. कारण त्यांना माहीत होतं की जर माझा हा समाज याच धर्मात राहिला, तर या लोकांची प्रगती होणार नाही. तेच कर्मकांड तेच देवी देवता आणि त्याच रुढी परंपरा पाळत हा समाज जगेल, त्यांना प्रगती करता येणार नाह...
मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत : बुद्ध विहारे
Article

मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत : बुद्ध विहारे

* धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष   "मानवी कल्याणाचे ऊर्जा स्त्रोत: बुद्ध विहारे"           समग्र क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली पवित्र अशा नागपूरच्या पवित्र भूमीवर पिढ्यानं-पिढ्या निपचित पडलेल्या लाखो अनुयायासह  बौद्ध धम्माचा अंगीकार केला. जगाच्या इतिहासातील "न भूतो न भविष्यती " अशी ही घटना म्हणावी लागेल.अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेला अन शिक्षणापासून कोसो दुर असलेला हा परिवर्तित; शोषित, पिडीत,वंचित,अस्पृश्य समाज बौद्ध तत्त्वज्ञानाबाबत तितकाच अनभिज्ञ होता.या सकल समाज घटकाचा सर्वंकष उद्धाराचा ध्यास घेतलेल्या डॉ.बाबासाहेबावरच्या अगाध आस्थेपोटी तत्कालीन अस्पृश्य समाज बुद्धाच्या चरणी नतमस्तक झाला.धर्मांतरानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अल्पावधीतच महापरिनिर्वाण झाले. परिणामतः डॉ.आंबेडकराना बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार तसेच अपेक्षित असे तत्त्वज्ञान नवबौद्ध समा...
शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
Article

शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

शारीरिक शिक्षणाचे महत्त्वशिक्षणाचा अर्थ केवळ पुस्तकातून ज्ञान मिळवणे असा नसून, व्यक्तीच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासाकडेही लक्ष देणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. आपल्यासाठी जसे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे शिक्षणात खेळाचेही महत्त्व आहे, चांगल्या आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत, शिक्षणामुळे बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा विकास होतो आणि खेळामुळे आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते.मात्र आजकाल शाळांमध्ये खेळाला कमी प्राधान्य दिले जात असल्याने ज्यांना खेळाची विशेष आवड आहे तेच विद्यार्थी मैदानात जातात. प्रत्येक शाळेत अशा खेळांची व्यवस्था असावी ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभागी होऊन त्याचा शारीरिक व मानसिक विकास करू शकेल.शारीरिक शिक्षणाचा थेट अर्थ म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक श्रमाला महत्त्व देणे. शारीरिक शिक्षण हा शब्द शरीराला सुदृढ बनवण्यासाठी केलेल्या क्रियाकलापांसाठी वापरला...
स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!
Article

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते   स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....   हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..   जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.   जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घा...
शॉट असावा तर असा….
Article

शॉट असावा तर असा….

शॉट असावा तर असा....      कधी कधी सचिन ला आणि मला काहीतरी वेगळं करायची हुक्की येते.. नवरा बायको असलो म्हणुन काय झालं , थोडा रोमान्स टिकवायचा असेल तर बदल हवा काहीतरी हटके हवं मग माझ्या लेखिकेच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडीयाज येतात .. कधीतरी त्या बहरतात कधीतरी फेल जातात..   मुळात रसिकता ठासुन भरलेली असल्याने शब्दावर विनोद सुचतात आणि घरात हास्याचे फवारे उडतात.. इतर नवरा बायको सारखं रटाळवाणं लाइफ नक्कीच नाही.. पण कधीतरी करायला जातो गणपती आणि होतं माकड असही होतं..      काल संध्याकाळी असच काहीसं गमतीशीर घडलं.. सचिन मला म्हणाला , आज शॉट मारायचा का ??.. २५ वर्षानंतरही इश्य असा सहज शब्द तोंडुन आला.. सोनल तु आणि लाजतेस ??.. असा खडुस प्रश्न सचिनकडुन आला आणि मग मात्र मी जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं.. आमच्यात साधी धुसफुसही नसते त्यामुळे भांडण व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही.. लटक्या रागात बेडरुममधे गेल...
महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?
Article

महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?

महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल? आयफोन  किंवा मग सॅमसंग, 60  हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचाफोन विकत घेतल्याने नेमका कोणता जगावेगळा स्टेटस मध्ये फरक  येतो? काही महिन्यांपूर्वी एका  गावात एका पोराने घरचे IPhone घेऊन देत नाहीत, म्हणून आत्महत्या केली. विषेश म्हणजे मुलाचे आईवडील गवंडी काम करतात, पण पोराने आईबापाजवळ नुसता नाद लावला होता आय फोन पाहिजे. शेवटी आई बापाने  पोराच्या हट्टापुढे हात टेकले आणि वडिलांनी दुकानात जाऊन आय फोन घ्यायच ठरवल पण पोराला पाहिजे तो कलर तिथे नव्हता. आणि हट्ट मात्र काही केल्या  कमी करत नव्हता .म्हणून बापाने सरप्राइज द्यायच ठरवल होत, व ते जेव्हा दुपारी घरी आले तोपर्यंत मुलाने मोबाईल घेऊन देत नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  आणि विषेश म्हणजे पोरग पण काही लहान नव्हत  महाविद्यालयात शिकत होत.दुसर ही असच एक पोरग पाहिलं. कॉलेजच राहणीमान अस होत कि बा...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…
Article

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं....! गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत.* आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्ये...
आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!
Article

आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!

आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक...! देशात झपाट्याने बेरोजगारी वाढत आहे.शिक्षण महाग होऊन ते तकलादू 'स्वरूपाचे' दिल्या जात आहे. त्यातून बेरोजगाराची 'फौज' निर्माण होत आहे. यावर' ब्र' शब्दही न काढणारी तरुण युवक 'मंडळी' वेगळ्याच स्वाभिमानाच्या, रूढी परंपरेच्या नादी लागून त्यांचे भवितव्य आधीच 'बरबाद' होत असतांना माणसाला 'तिसरा डोळा' प्रदान करणारी जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच 'अ ब क ड' शिकवून पाया पक्का करणारी आपल्या भाषेतील आपली मराठी सरकारी शाळा देणगीदाराच्या देणगीने 'ठोक्याने' देण्यात येत आहे. यातच 'दारू' विक्रीसाठी गावा गावात परवाना देण्याचं सुनियोजित करण्यात आलं आहे. हे सर्व 'अचंबित' करण्यासारखं वाटत असलं तरीही त्यावर तरुणाई 'आवाज' उठवत नाही. मागचे 'इतिहास 'उकरून काढून तरुणांमध्ये वेगळाच जातीय अभिमान पेरला जात आहे. ही बाब सर्वसमावेशक समतेच्या विचाराचं 'खंडन' करीत एका विशिष्ट विचाराचं ...