Sunday, May 3

Blog

फक्त कवितेवर जगणारा कवी महाराष्ट्राचा हास्यसम्राट डॉ.मिर्झा रफी अहमद बेग
Article

फक्त कवितेवर जगणारा कवी महाराष्ट्राचा हास्यसम्राट डॉ.मिर्झा रफी अहमद बेग

मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील धनज माणिकवाडा या लहानशा खेड्यात राहणारा डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आज महाराष्ट्र मधील लोकप्रिय कवींच्या पदवीला आणि झी टीव्हीच्या हास्य सम्राट पदवीला पात्र झाला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड मानधन घेणारे जे कवी आहेत त्या कवीमध्ये आज मिर्झा रफी अहमद बेग याची गणना होते. हा कवी फक्त कवितेवर जगत होता.जगत आहे आणि जगत राहणार आहे. अगदी आड वळणाच्या माणिकवाडा नावाच्या गावात राहणारा व आता अमरावतीला स्थायिक झालेला हा कवी सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय झाला असून कोट्यावधी रसिकांच्या हृदयात त्याने स्थान मिळविले आहे.हा कवी कुणी प्राध्यापक नाही. अध्यापक नाही .व्यावसायिक नाही. पण आज कवितेच्या बळावर अमरावतीच्या वलगाव रोडवर त्याचा दोन मजली बंगला आहे .याशिवाय खालच्या मजल्यावर मुलाचे स्टील सेंटर आणि हार्डवेअरचे प्रशस्त मोठे दुकान आहे. नुकताच मिर्झा रफी अहमद ...
लढा नामांतरांचा
Poem

लढा नामांतरांचा

नामांतर लढ्यांनआम्हां काय दिलंहक्क आणि अधिकारभीम क्रांतीलढण्याचं बळ दिलं .....अस्मिता स्वाभिमानसंघर्षअन्याय अत्याचारलाथाडूनएकीच बळ दिलं ....नामांतर लढ्यांनआम्हाला काय दिलंआंबेडकर नावाचंवादळजीवंत असल्याचंगाव दिलं....नामांतर लढ्यांनआम्हां काय दिलंगुलाम होतो व्यवस्थेचेगुलामीला ठोकरण्याएकीच बळ दिलं...नामांतर लढ्यांन आम्हा काय दिलंमाजलेल्याजातिभेदालागडण्याची बळ दिलं. नामांतर लढ्यांन  आम्हा काय दिलंसमस्त बहुजनांनापाहिजे तस्सत्तेच  ताट दिलं ....नामांतर लढ्यांन आम्हाकाय दिलंशिका संघटित होण्याचफळ दिलं ...नामांतर म्हणजेक्रांतीचा नाराजागृतीचा नगारामाणूस म्हणूनमाणुसकीचंधड दिलं .....- राजेंद्र क.भटकर       बडनेरा*********************हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
म्या पाहयलेलं माह्य मरन
Story

म्या पाहयलेलं माह्य मरन

नुकताच फेब्रुवारी सुरू झाला होता. उन्हाच्या झ्यावा चांगल्याच आंगाले झोंबत  होत्या. झाडांची पानगळ होऊन सारा फफुळळा वावटयी संग झिंगझिंग झिंगाट करत होता. गरम सुटणारा वारा चांगलाच रन्नावला होता.बायामाणसांनी मोठ्या कष्टाने सोंगलेले गहु, हरभरयाचे कवटे आपल्या संग घेऊन जात होता. मोठमोठ्या वावटया सुटून पालापाचोळा दुरवर आकाशाले गवसनी घालत होता.मजूरांना भिववीत होता.जो तो आपापल्या कामात गर्क होता.समोर मार्च महिन्यात धूयमाती असल्यानं सणासुदीच्या दिवसांत चार पैसे गाठीले रायले पायजे तेवढीच आपल्या संसाराले मदत होईल.या आशेने आपल्या  हरभरा सोंगूनसोंगून हरभरयाच्या खारानं हातापायांच्या फुटलेल्या जखमांवर बिबे  भरत होता.  काहींनी हाताले पालू गुंडाळले होते. सारया हातापायाची खारट खारानं  आगाआग होत होती.हरभरयानं पिवळेधम झालेले वावरं  मजूरांच्या ईव्यच्या दणक्याने भराभर खाली होत होते.जागोजागी बैलबंडीनं कवठे जमा ...
स्व. प. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वरगोविंद’ शास्त्रीय संगीत मैफिल संपन्न
News

स्व. प. गोविंदराव पटवर्धन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वरगोविंद’ शास्त्रीय संगीत मैफिल संपन्न

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी): सुर सप्तक म्युझिक ट्रस्ट आणि बाबाज थिएटर्स नाशिक आयोजित स्वर गोविंद या शास्त्रीय संगीताच्या मैफलीत प्रथम पुष्प डॉ जस्मीत कौर यांनी गुंफले. त्यांनी राग पुरिया सादर केला. यानंतर राग जनसंमोहीनी सादर केला. शेवटी देवाचिया द्वारी हा अभंग सादर केला.यानंतर पंडित विश्वनाथ कान्हेरे यांनी एकल संवादिनी वादन केले. आपल्या जादूई वादनाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प श्री विनायक हेगडे यांनी गुंफले. त्यांनी राग जोगकौंस मध्ये विलंबित एकतालात पारंपरिक सुघर बरपा हा खयाल सादर केला त्याची जोड म्हणून तीन तालामध्ये पीर पराई ही बंदिश सादर केली.कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ कलाकार पंडित जयंत नाईक आणि पंडित शंकरराव वैरागकर यांचा सत्कार करण्यात आला.मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबाज थिएटर्स चे प्रशांत जुन्नरे तसेच सुर ...
महादेवराव ताटके : ग्रामविकासाचे पथदर्शक
Article

महादेवराव ताटके : ग्रामविकासाचे पथदर्शक

महादेवराव ताटके हे एक मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व समाजसुधारक, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. ते वाशीम जिल्ह्यातील आमगव्हण, येथील रहिवासी होते. त्यांनी मुंबईत आपली कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वताच्या प्रचंड मेहनतीने आपल्या बांधकाम व्यवसायात चांगला जम बसविला त्यानंतर त्यांना समाजसेवेची ओढ लागली.महादेवराव ताटके यांचा जन्म वाशीम जिल्यातील आमगव्हण गावात झाला. त्यांचे प्रारंभिक जीवन एक साधे होते, पण त्यांच्या मनात नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यांनी आपल्या जीवनाची दिशा समाजसेवा क्षेत्राकडे वळवली. जसे की चिकनगुनिया साठी फिरता दवाखाना, सामुहिक  विवाह मेळावे, विद्यार्थी प्रशिक्षण, धम्म शिबिरे, भंतेजींना आणि बुद्ध विहारांना मोठ्या प्रमाणात दान, सामाजिक प्रबोधनात्मक मोठमोठे गायनाचे कार्यक्रम, गावातील मंडळींना अडचणीच्या वेळी दिलासा, राजकीय आणि सामा...
19 व्या शतकातील अमेरिकेत फॅट पुरुषांचे क्लब.!
Quiz, Article

19 व्या शतकातील अमेरिकेत फॅट पुरुषांचे क्लब.!

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरूवातीला, शारीरिक आकार आणि वजन या बाबींना समाजात वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जात होतं. त्या काळात, जास्त वजन असलेले पुरुष हे समृद्धी, आरोग्य आणि यशाचे प्रतीक मानले जात होते. त्यावेळी मोठ्या शरीराचे माणसं मॅनेजमेंट, व्यापार, किंवा नेतृत्त्व यशाचे चांगले उदाहरण मानली जात होती.त्यावेळी जाड माणसं म्हणजे जास्त खाल्लं आणि समृद्ध जीवन जगतात असं मानलं जात होतं. जसे, "अधिक खाल्ला म्हणजे अधिक सुसंस्कृत" असं एक प्रकारचं गृहीत धरलं जात होतं. त्यामुळे त्या काळात वजन वाढवणं आणि जाड होणं हे एक समाजात प्रतिष्ठा मिळवण्याचं साधन मानलं जात होतं.19 व्या शतकात, अमेरिकेत विविध सामाजिक क्लब्स खूप लोकप्रिय होते. लोक आपल्यातील समान वय, व्यवसाय, आवडी-निवडी किंवा शारीरिक आकाराच्या आधारावर गट तयार करत असत. "फॅट पुरुषांचे क्लब" देखील अशाच एका प्रकारचा गट होत...
जांभई देणे संसर्गजन्य का असते?
Article

जांभई देणे संसर्गजन्य का असते?

आपण अनेकदा पाहतो की, जर आपल्या शेजारील कोणी जांभई दिली तर आपल्यालाही जांभई यायला लागते. कधी-कधी फक्त जांभईबद्दल ऐकले किंवा वाचले तरी आपण जांभई देतो. ही गोष्ट खूप सामान्य असली तरी ती आपल्याला गमतीशीर वाटते. पण यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जांभई देण्याचे मुख्य काम म्हणजे आपला मेंदू ताजा ठेवणे. जेव्हा आपला मेंदू थकल्यासारखा किंवा जड वाटतो, तेव्हा आपण मोठा श्वास घेतो, म्हणजेच जांभई देतो. यामुळे जास्त ऑक्सिजन शरीरात जातो आणि मेंदूला थंडावा मिळतो.जांभई देणे संसर्गजन्य का असते? हे समजून घेण्यासाठी मानसशास्त्र आणि मेंदूच्या कार्यप्रणालीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आपल्या मेंदूमध्ये "मिरर न्यूरॉन्स" नावाचे विशेष पेशी असतात. या पेशी इतर लोकांचे वर्तन आपल्यामध्ये नकल करण्यास मदत करतात. जसे आपण एखाद्याला हसताना पाहतो आणि आपल्यालाही हसू येते, तसेच एखाद्याला जांभई देताना पाहिले की आपल्यालाही जांभई येत...
शॉशॅंक रिडेम्प्शन (Shawshank Redemption): सर्वाधिक आवडता चित्रपट का ठरला ?
Article

शॉशॅंक रिडेम्प्शन (Shawshank Redemption): सर्वाधिक आवडता चित्रपट का ठरला ?

शॉशॅंक रिडेम्प्शन (1994) हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या काही निवडक चित्रपटांपैकी एक आहे. फ्रँक डॅराबोंट दिग्दर्शित व स्टीफन किंग यांच्या Rita Hayworth and Shawshank Redemption या लघुकथेतून प्रेरित हा चित्रपट मानवी स्वातंत्र्य, मैत्री आणि आशावादाचे एक अविस्मरणीय उदाहरण ठरतो. चित्रपटाच्या यशामागील अनेक घटक आहेत जे त्याला एक सर्वाधिकआवडता चित्रपट बनवतात.१. हृदयस्पर्शी कथाशॉशॅंक रिडेम्प्शनची कथा अँडी डुफ्रेन (टिम रॉबिन्स) आणि रेड (मॉर्गन फ्रीमॅन) या दोन तुरुंगातील कैद्यांच्या जीवनाभोवती फिरते. अँडी डुफ्रेन, जो एका गुन्ह्यासाठी गुन्हेगार ठरतो, त्याला आयुष्यभर तुरुंगवासाची शिक्षा होते. तुरुंगातील आयुष्यातील संघर्ष, नवीन नाती, आणि स्वातंत्र्य मिळवण्याची त्याची धडपड ही कथा प्रेक्षकांना प्रेरित करते.कथेच्या केंद्रस्थानी मानवी आशावाद आहे. अँडीच्या संघर्षातू...
पक्षी झोपताना फांदीवरून का पडत नाहीत?
Article

पक्षी झोपताना फांदीवरून का पडत नाहीत?

आपल्या निसर्गात पक्षी हे एक अनोखे आणि सुंदर प्राणी आहेत. झाडांच्या फांद्यांवर ते किती सहजपणे झोपतात, हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, "हे पक्षी फांद्यावरून झोपेत का पडत नाहीत?" यामागे एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक कारण आहे. पक्ष्यांच्या शरीराची विशेष रचना केलेली असते. झाडाच्या फांदीवरून खाली का पडत नाहीत, यामागे कशाप्रकारचं विज्ञान दडलेलं आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.पक्ष्यांच्या पायांची खास रचना ही पक्ष्यांच्या पायांमध्ये "लॉकिंग मेकॅनिझम" नावाची एक अद्वितीय प्रणाली असते. पक्ष्यांच्या पायांच्या आत एक प्रकारचे तंतू असतात, जे पाय घट्ट पकडण्यासाठी मदत करतात. जेव्हा पक्षी फांदीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनामुळे पाय आपोआप ताणले जातात आणि तंतू घट्ट होतात. त्यामुळे पक्षी झोपला तरी त्याचे पाय फांदीला सुरक्षित पकडून ठेवतात. पक्ष्यांच्या पायांच्या स्नायूंमध्ये विशेष रचना असते, ज्यामुळे झ...
नंदीबैल आणि भटक्या संस्कृतीचा वारसा
Article

नंदीबैल आणि भटक्या संस्कृतीचा वारसा

लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत. भटके फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगाव फिरस्ती करतात.गोल गोल चामड्याला,दांडकं हे घासतंय,बघ बघ सखे कसं,गुबूगुबू वाजतंय....या लोकगीताची आठवण होईल, असे बोल वाजवित हे फिरस्ते गावोगाव हजेरी लावतात. पूर्वीच्या काळात करमणूक साधने खूप कमी होती. त्यावेळी लोकांचे मनोरंजन करणारे हे फिरस्ते हवे हवेशे वाटत. काळ बदलला,  बदलत्या काळाबरोबर करमणुकीची साधने बदलली. रेडिओ, टीव्ही आली, टेपरेकॉर्डर वाजू लागले, पडद्यावर चित्रपट आले,  आणि मोबाईल आला आणि लोकसंस्कृतीचा हा मुख्य घटक हद्दपार होतोय, अशी स्थिती आहे. बैल म्हणजे महादेवाचे वाहन,  बैल हा शेतकऱ्यांचा सोबती. मात्र औद्योगिकीकरणाने हा बैलांची संख्या कमी होतेय. आणखी काही वर्षानी हा नंदी पूर्वी औत ओढायचा हे पुढल्या पिढीला सांगावे लागेल. काळ ...