फक्त कवितेवर जगणारा कवी महाराष्ट्राचा हास्यसम्राट डॉ.मिर्झा रफी अहमद बेग
मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील धनज माणिकवाडा या लहानशा खेड्यात राहणारा डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आज महाराष्ट्र मधील लोकप्रिय कवींच्या पदवीला आणि झी टीव्हीच्या हास्य सम्राट पदवीला पात्र झाला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड मानधन घेणारे जे कवी आहेत त्या कवीमध्ये आज मिर्झा रफी अहमद बेग याची गणना होते. हा कवी फक्त कवितेवर जगत होता.जगत आहे आणि जगत राहणार आहे. अगदी आड वळणाच्या माणिकवाडा नावाच्या गावात राहणारा व आता अमरावतीला स्थायिक झालेला हा कवी सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय झाला असून कोट्यावधी रसिकांच्या हृदयात त्याने स्थान मिळविले आहे.हा कवी कुणी प्राध्यापक नाही. अध्यापक नाही .व्यावसायिक नाही. पण आज कवितेच्या बळावर अमरावतीच्या वलगाव रोडवर त्याचा दोन मजली बंगला आहे .याशिवाय खालच्या मजल्यावर मुलाचे स्टील सेंटर आणि हार्डवेअरचे प्रशस्त मोठे दुकान आहे. नुकताच मिर्झा रफी अहमद ...









