हरभर्याचा हुया
पौष महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे आमच्या ग्रामीण बोली भाषेत या महिन्याला पूस म्हणत. मकरसंक्रांती (तीसकरात हे तीळसंक्रांतीचा झालेला अपभ्रंश) सरली म्हणजे महिलांना वाणात वाटायला हिरवाकच हरभरा लागायचा. बस काही हप्त्यात बऱ्याच लोकांची हरभऱ्याची शेतं सोगांयला तयार असायची. एरव्ही दिवाळी पासून दोन महिने सलग शिदोरी सोबत घेतली म्हणजे वावराची सोकारी करायला लागायची.तसा फक्त गवत कापणाराईचा व कापूस वेचणाऱ्या बायाईचा बराच काव असायचा. आता खायची गोष्ट तर खाणाचं तुम्ही सोकारी करा की आणखी काही करा.पंरतु मायेच्या भारे नेणाऱ्यांची संख्याही काही कमी नसायची.बरं हरभरा घेतांना दिसलाच व आपण हटकलंच तर"बस मुठभरच घेतो भाकरसंग खायले" असं बोलून मोकळं व्हायची एवढं बोलल्यावर आपण काय डोक्सं आपटणार. असा तो मजेशीर किस्सा असायचा. आमच्या धुऱ्यावरच कुऱ्हाडे बुडण्याच्या मेरीवर बाभुळचं गर्द हिरवगार झाड अजूनही शाबूत आहे. त्या...









