Tuesday, April 14

Blog

स्त्री मुक्तीदाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

स्त्री मुक्तीदाते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय समाजरचनेत स्त्रियांची स्थिती अनेक शतकांपासून दुय्यम राहिली आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये स्त्रियांना समान अधिकार मिळण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. या महान समाजसुधारकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अत्यंत अग्रगण्य आहे. त्यांनी केवळ अस्पृश्यता निर्मूलनासाठीच नव्हे तर स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठीही क्रांतिकारी कार्य केले. त्यांच्या विचारांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचा दृढ आग्रह दिसून येतो. डॉ. आंबेडकरांचे मत होते की, “समाजाच्या प्रगतीचे मोजमाप स्त्रियांच्या प्रगतीवरून करता येते.” या विचारातूनच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी फारच कमी होती. समाजात स्त्रियांना घरापुरते मर्यादित ठेवले जात होते. अशा परिस्थितीत डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांना शिक्षणाचे ...
श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर
Article

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकर

श्रमविभागणी-जातीप्रथा आणि डॉ.आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेकविध पैलू आहेत.विषमतावादी भारतीय समाजरचनेत डॉ.आंबेडकर सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने लढलेत.भारतीय समाज त्यांच्या राजकीय,सामाजिक आणि धार्मिक विचाराबाबतीत जितका अवगत आहे तितका आर्थिक विचाराबाबत अवगत नाही. डॉ.आंबेडकरांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण अनं अतुलनीय आहे. डॉ.आंबेडकरांनी कृषी विकास,औद्योगीकरण, रोजगार निर्धारण, मजूर संघ, लोकसंख्या समस्या, आंतरराष्ट्रीय व्यापार, बँकिंग, विमाक्षेत्र, वित्तीय आणि मौद्रिक धोरण, केंद्र-राज्य वित्तीय संबंध इत्यादी बाबतीत सखोल असा अभ्यास व त्या अनुषंगाने वेळोवेळी अभ्यासपूर्ण केलेली मांडणी त्यांना जागतिक अर्थशास्त्रज्ञाच्या यादीत समाविष्ट करणारे आहेत.विकसनशील भारतीय अर्थव्यवस्था आणि विषमतावादी समाजरचनेत ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…
Article

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या…

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार: काल आज, आणि उद्या...बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज,काल ,आणि ऊद्या कसे तारणारे आहेत..या विषयी सांगायचे झाल्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका विशिष्ट काळापुरते मर्यादित नसून आणि त्यांचे कार्य एका विशिष्ट समुदायापुरते किंवा वर्गापुरते नसून वैश्विक पातळीवर वाखाणण्यासारखे आहेत आहेत. अखिल विश्वाला तारणारे आहेत ..काल विषमतेच्या अंधारातून बाहेर काढणारा प्रकाश भूतकाळात, जेव्हा भारतीय समाज जातिव्यवस्थेच्या आणि विषमतेच्या बेड्यांत अडकला होता, तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे मुक्तीचे साधन ठरले.चवदार तळ्याचा सत्याग्रह असो वा काळाराम मंदिर प्रवेश, त्यांनी माणसाला त्याच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली. त्यांनी दलित आणि बहुजन समाजाला हे पटवून दिले की, शिक्षण हे वाघिणीचे 'दूध' आहे आणि ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार ...
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले: समाजसुधारक आणि शिक्षणाचे जनक 
Article

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले: समाजसुधारक आणि शिक्षणाचे जनक 

क्रांतिसूर्य-महात्मा ज्योतिबा फुलेभारतात इंग्रजांची सत्ता दृढ झाली आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर नवे विचार, नवीन कल्पना ,नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला. पाश्चिमात्य विचार, आचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली‌. बुध्दिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा,मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली.भारताबाहेरील जगाची जाणीव सुशिक्षित तरुणांना झाली होती. फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य ,समता, बंधुता या मूल्यांचे महत्त्व त्यांना पटले होते. त्यामुळे भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात बदल होत होते.भारतीय समाजातील मागासलेपण वैचारिक दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीभेद, उच्चनीचतेच्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी शिक्षण घेतलेले सुशिक्षित तरूणांनी आपल्या लेखनातून, प्रत्यक्ष कृतीतून ,संघटनांच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय समाजात जनजागृती करण्यास सुरुवात केली. या अ...
जोतीराव फुले यांना काव्यमय अभिवादन | क्रांती, शिक्षण आणि समानतेचा संदेश | जयंती विशेष कविता
Poem

जोतीराव फुले यांना काव्यमय अभिवादन | क्रांती, शिक्षण आणि समानतेचा संदेश | जयंती विशेष कविता

जोतीराव !जोतीराव ,तुम्ही झुगारलेत गुलामगीरीचे बंधतोडलेत जातिभेदांचे साखळदंडआणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा रूढी, परंपरांना तोडूनतुम्ही वंचितांचे, उपेक्षितांचे, शोषितांचे , अस्पृश्यांचे क्रांतिबा आणि क्रांतिमा होऊन ओढलात आसूड तत्कालीन व्यवस्थेवरतुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रांत गगनचुंबी भरारीतुमचा वारसा चालवित बाबासाहेबांनीही त्याला कायद्याने बळकटी दिलीआज तुमची दूरदृष्टी दिसते सर्वांगीण विकासातूनम्हणून होतोय तुमचा जयजयकार सर्वच स्तरांतूनमात्र आम्ही कृतघ्न होऊ नयेत कधिहीतुमच्या परिवर्तनाशी -एवढंच वाटतय !अरुण विघ्ने(जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन )● हे वाचा –आमची लक्ष्मी.!https://youtu.be/ad2ZxSpDdTw...
हरु येथे विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचा जल्लोष; २१ मंडळांचा सहभाग, विजेत्यांचा गौरव 
News

हरु येथे विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचा जल्लोष; २१ मंडळांचा सहभाग, विजेत्यांचा गौरव 

हरु येथे विदर्भ स्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचा जल्लोष; २१ मंडळांचा सहभाग, विजेत्यांचा गौरव हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज
नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज
News

नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्ज

नांदेडमध्ये ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा | ८–१० लाख भाविकांसाठी प्रशासन सज्जनांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा !८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहितीलातूर, : शीख धर्माचे नववे गुरु 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरी एका ऐतिहासिक पर्वाची साक्षीदार होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ५२ एकरांच्या विशाल परिसरात गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिली. ​५२ एकरांवर अध्यात्मिक नगरी या सोहळ्यासाठी प्रशासनाने ५२ एकर जागेवर भव्य मंडप उभारला आहे. भाविकांच्या सोयीसाठी ८ मह...
‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन
News

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशन

‘लॉंगमार्चची युगयात्रा’ ग्रंथाचे 24 जानेवारीला बडनेऱ्यात प्रकाशनअमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या ऐतिहासिक संघर्षाचे सखोल दस्तऐवजीकरण करणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंदोलन : एक क्रांतीपर्व” हा ग्रंथ प्रा. प्रकाश विश्वनाथ बोरकर यांनी लिहिला असून, गौरव प्रकाशन अमरावती यांनी तो प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता बडनेरा येथील सार्वजनिक कपिल मंडळ सभागृह, अशोक नगर, नवी वस्ती येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान इ. मो. नारनवरे (सुप्रसिद्ध साहित्यिक, नागपूर) राहणार असून, ग्रंथाचे प्रकाशन आयुष्यमान ताराचंद्र खांडेकर (फुले–आंबेडकर चळवळीचे भाष्यकार) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे....
 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम
Article

 ‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम

‘हिंद की चादर’ – धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रमधर्म, सत्य आणि मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह जी यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. “हिंद की चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख समाज, सिंधी समाज, बंजारा समाज आणि लुबाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे भव्य “हिंद की चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दि. 23 नोव्हेंबर रोजी अमरावतीतील राजकमल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्लोक मेहला नववाच्या पठणाने झाली. त्यानंतर भावपूर्ण श...