वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे.!
वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे! प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या सल्ल्याची गरज असणे हे मानसिकदृष्ट्या स्वतःचे खच्चीकरण करण्याचाच एक भाग म्हणता येईल. स्वतःवर विश्वास असल्यावर ही केविलवाणी वेळ येत नाही. पण बऱ्याचदा आपणच स्वतःला तसे बनवत आलेलो असतो. एखादे काम करण्यापूर्वी इतरांच्या मेंदूने काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावात नकळतपणे बांडगुळवृत्ती वाढीस लागते.https://youtube.com/shorts/kD3oMP9Gs8k?si=IjBnDZOVtbJwjld0स्वतःचे असणारे मोल आपण कमी करत करतो आणि स्वतः केलेल्या कोणत्याही कामाला इतर लोक काय म्हणतील? त्यांना आवडेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याच्या नादात आत्मविश्वास कमी करतो. बरं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच लोकांकडून मिळवायची असतात ज्यांना आपल्या कर्तृत्वाची कदर नसते. आपल्यातील उमेद कमी करण्यासाठी जे नेहमी सक्रिय असतात अशा माणसांकडूनच चांगुलपणाचे प्रमाणपत्र मिळविण्य...









