Sunday, May 3

Blog

कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित
News

कु. अनुश्री गणेशराव देशकरी सुवर्ण पदकाने सन्मानित

गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : नुकताच दि. 24/2/2025 ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे विविध विषयात सम्पूर्ण महाराष्ट्रातून दहा (10) प्रथम क्रमांक मिळवलेल्या प्रावीन्य प्राप्त गुणवंत विध्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल C. P. राधाकृष्णन यांनी सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले. यामध्ये कु. अनुश्री सौ. संध्याताई व गणेशराव देशकरी चिखली यांची लेक तथा सौ. संध्याताई व गणेशराव कावळे भुलाई यांची होणारी लेक सुनबाई हिला M. Sc. ( Master of mathematics ) या विषयात विद्यापीठात महाराष्ट्रातून प्रवीण्यांसह प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल महामहिम राज्यपाल C. P. Radhakrishnan याचे हस्ते सुवर्णं पदक प्रदान करून सन्मान करण्यात आला.● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यकु. अनुश्री चे प्राथमिक शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील मुळगावी ...
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन
Article

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांचा २७ फेबुवारी जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला.मराठी राजभाषा दिन हा मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांचे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये अनमोल आहे.मराठी राजभाषा दिनी मराठी भाषेचा गौरव करावा आणि तिच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करावे.मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा प्रसार करावा. मराठी भाषेचे संवर्धन करावे त्यासाठी लोकांना मराठी भाषेच्या वापरासाठी लोकांनी आग्रही असणे आवश्यक आहे. कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या विविध साहित्यकृती आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान या विषयाला अनुसरून मराठी राजभाषा दिन...
मराठीची बोलू कौतुके…
Article

मराठीची बोलू कौतुके…

माझ्या मायमराठीची बोलू किती कौतुकेपरि अमृतातेही पैजा जिंकेकिती वर्णाव्या त्या गाथा माझ्या मायमराठीच्या ...अवघ्या महाराष्ट्रात२७ फेब्रुवारी हा दिवस* मराठी भाषा गौरवदिन* म्हणून साजरा केल्या जातो... नाशिकच्या जन्मभूमीत जन्मलेल्या विष्णू वामन शिरवाडकरांनी मराठीला मोलाचे सांस्कृतिक योगदान दिले.ते उत्कृष्ट,कवी,लेखक,नाटककार आणि उत्तम समीक्षक होते.मराठी साहित्याचा उचित गौरव व्हावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांचे योगदान फार मोलाचे होते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस * म्हणून साजरा होतो.     माझ्या मायमराठीचा इतिहास फार प्राचीन आहे... सोळाव्या शतकापासून ते आजतागायत मायमराठीचे गोडवे गाणाऱ्या कितीतरी समृद्ध गाथा याची ग्वाही देतात. श्री‌ चक्रधर,म्हाईंभट यांनीही मराठीला प्रोत्साहन दीले. 'लिळाचरित्र' हा मराठीतला आद्य ग्रंथ. श्रीकृष्णचरित्र,भगवतगीता, चर...
कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट
Article

कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट

गुरुवार दिनांक 27 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन संपन्न होत त्यानिमित्त मराठीतील एका संपन्न गझलकाराचा करून दिलेला हा परिचय.कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा इतका जवळचा संबंध येईल असे कधीच वाटले नाही .पण आमचे पितृतुल्य मित्र डॉ. श्री मोतीलालजी राठी प्रा.मधुकर केचे रामदास भाई श्राफ अरविंद ढवळे मीनाताई ढवळे दादा इंगळे वली सिद्धीकि डॉ.भाऊ मांडवकर या सर्वांमुळे मी सुरेश भटांच्या फार जवळ गेलो आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलो .मी तेव्हा अमरावतीच्या तपोवनमध्ये राहत होतो .दाजीसाहेब पटवर्धन व त्यांची कन्या श्रीमती अनुताई भागवत यांनी माझे सामाजिक कार्य लक्षात घेऊन मला माझ्या निवासस्थानी लागूनच असलेले एक पाच कक्ष असलेले पाच खोल्यांचे अतिथीगृह माझ्या हवाली केले होते. सुरेश भटांचे आमच्याकडे आगमन झाले म्हणजे ते त्या अतिथीगृहामध्ये थांबत होते .हे अतिथीगृह माझ्या घराला लागूनच असल्यामुळे सुरेश भट...
चौऱ्यागढ
Story

चौऱ्यागढ

दरवर्षीप्रमाणेच औंदाही पचमढी मध्यप्रदेशात असलेल्या चौऱ्यागडावर जाण्यासाठी शालक्या उत्सुक होता.तसं त्याच पिढीजात परंपरागत ठाणं चौऱ्यागडच होतं. त्याच्या बापजादयापासून ही मोठ्या महादेवाच्या पुजनाची पंरपरा घराण्यातच होती‌. सोयऱ्या धायऱ्याईलेही त्यांन फोनाफोनी करून कोणाले बजारहाटाच्या गावात भेटलेल्या पावन्या-रावन्याईजोळ निरोप धाडला होता.सिताराम बुढयाच्या खटल्यात सारा 'बचपणा' गेलेला शालक्या तसा इमानदार व काटक गडी होता. दररोजच्या सामानापासून तं सणावारापासून सामानाची सारी खरेदीची जबाबदारी सिताराम पाटील त्याच्या वरच सोडून देत होता. एका नव्या पैशाचाही घापला शालक्यानं हिसोबात आजपर्यंत केला नव्हता. सिताराम बुढयाचा तो विश्वासु घरगढी होता. गावाच्या मध्यभागी एकरभराचा मोठा सागवानी वाडा असलेला व सत्तर एककर जमीनजुमला पाठीमागं असलेला मोठा असामी पाटील पण शालक्या च्या घरी गेला म्हणजे साजरा बकरीच्या दुधाचा सिंग...
अमरावती विभागीय ACUSAT ची कार्यकारीणी घोषित
News

अमरावती विभागीय ACUSAT ची कार्यकारीणी घोषित

अमरावती/डॉ. नरेश इंगळेविद्यापीठ व महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापकांची रजिस्टर संघटना ACUSAT असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर ॲनिमेटेड टीचर्स महाराष्ट्र तर्फे अमरावती विभागाची २०२४ ते २०२९ पर्यंतची कार्यकारीणी केंद्रीय अध्यक्ष डॉ एम. ए. वाहुळ (माजी उपसंचालक उच्चशिक्षण) व केंद्रीय सचिव डॉ जे. एम. मंत्री यांनी नुकतीच जाहीर केली आहे.कार्यकारिणी मध्ये मार्गदर्शक म्हणून डॉ.व्ही.एम. जामोदे (माजी प्रकुलगुरू) अध्यक्षपदी डॉ.ए डब्ल्यू राऊत (माजी सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था), सचिव पदी डॉ.पी.डब्ल्यू. देवतारे,उपाध्यक्षपदी एस.आर. अमरावतीकर (अकोला) कोषाध्यक्षपदी डॉ. एच. एस लुंगे, सहसचिवपदी डॉ .ए. एम. अविनाशे व कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ व्हीं जी ठाकरे (माजी प्राचार्य व सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था) डॉ डब्ल्यू. एस. बरडे (अमरावती जिल्हा प्रभारी) डॉ.जी. टी. पाटील (यवतमाळ जिल्हा प्रभारी) डॉ. ए...
आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती
News

आंबेडकरी साहित्य ही समतेची चळवळ-डाॅ चंद्रशेखर भारती

गौरव प्रकाशन कल्याण (प्रतिनिधी) : "निसर्ग नियम हा आहे की अन्यायाची परिसीमा होते, तेव्हा विद्रोहाचा जन्म होतो. पिचलेला शोषित माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. तो प्रश्न विचारू लागला. याचा परिपाक असा झाला की आंबेडकरी साहित्य अविष्कारले. लेखक त्यातून माणसाची संवेदना मांडू लागला. समताधिष्ठित समाज रचना घडविणे आणि समतेची चळवळ चालविणे हेच आंबेडकरी साहित्य होय" असे प्रतिपादन चौथ्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ चंद्रशेखर भारती यांनी केले.प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, बुद्धभूमी फाउंडेशन, वालधुनी, कल्याणी येथे चौथे आंबेडकरी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने व प्रकाशन समितीचे सचिव डॉ. प्रदीप आगलावे होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक निरंजन पाटील होते. तर प्रमु...
गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !
Article

गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !

माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर     मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे,               'ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.' या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय.‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच... पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर ...
दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!
Article

दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!

दशरथ मांझी यांचा जन्म १९३४ साली बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलौर या छोट्याशा गावात मजूर कुटुंबात झाला.त्याचे कुटुंबिय पडीक जमिनीवर शेती करीत.मजुरीही करीत. त्यांचं जगणं हलाखीचं  होतं. त्यांना शाळेत जाण्याची संधी न मिळाल्याने ते निरक्षर राहिले.मात्र बालपणापासून ते संघर्षशील,जिद्दी होते.पुढे फाल्गुनी देवी या तरूणीसोबत त्यांचं लग्न झालं.त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं.तिच त्यांच्या जगण्याची प्रेरणा आणि शक्ती होती.त्यांना एक कन्यारत्नही झालं.जीवन कष्टमय असलं तरी आनंददायी होतं.अचानक पत्नी आजारी पडली.तिच्या उपचारासाठीचा दवाखाना ५५कि.मी.अंतरावर होता.त्यासाठीचा रस्ता अवघड पर्वतांवरून जात होता.पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी घेऊन ते निघाले.हा प्रवास जीवघेणा, खडतर असाच होता.प्रवासाची दगदग सहन न झाल्याने, वाटेतच पत्नी फाल्गुनी देवीचं निधन झालं.या दुखद घटनेचा मांझी यांच्या मनावर आघात झाला. केवळ योग्य...
असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड्र मिडिया न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या शेगाव येथील अधिवेशनाचे जय्यत तयारी सुरू
News

असोसिएशन ऑफ स्मॉल ॲण्ड्र मिडिया न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या शेगाव येथील अधिवेशनाचे जय्यत तयारी सुरू

गौरव प्रकाशन शेगाव (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव दिनांक 17 फेब्रुवारी 2025 आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान या एक दिवशीय अधिवेशनामधील कार्यक्रम पत्रिका अशी, सकाळी १०.०० वाजता. संघटनेच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच मुख्य अधिवेशनला १२.१५ वाजता प्रारंभ होईल दरम्यान कार्यक्रमाचे स्थळी आल्यानंतर सभासदांनी आपल्या आगमनाची नोंद स्वागत कक्षात करणे आवश्यक आहे.आचार्य बाळशास्त्री जांभेकर व सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.● हे वाचा – दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणीमान्यवरांचे स्वागत समारंभ समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्यसचिव सुभाष लहाने हे करतील. पहिल्या सत्राचे औपचारिक उद्घघाटन मा.मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव मा.श्री विद्याधर महालेजी यांचे शुभहस्ते होणार आ...