Saturday, May 2

Blog

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?
Article

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?पुण्यातील वैष्णवी हगवने आत्महत्या की हत्या ? प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून प्रत्येकाला आपल्या घरातील मुलीबद्दल चिंता वाटायला लागली आहे.या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे.या दुःखद घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात यावर केवळ सरकारच नाही तर समाजाकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येतात यावर या प्रकरणाचे गांभीर्य ठरणार आहे. प्रत्येक प्रकरणात सरकारला दोषी धरून चालणार नाही.जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती सरकार करणारच आहे.परंतु समाज म्हणून ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे.ज्या गोष्टी आपल्या हातात आह...
कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!
Editorial

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!आज गावात निळं रॉकेलसुद्धा येत नाही, आणि रॉकेलवर चालणारी कमांडर गाडी तर फार लांबच गेली आहे. एकेकाळी गावातल्या प्रत्येक रस्त्यावर, पायवाटांवर, घाटातून, नदीच्या पात्रातून गर्जना करत जाणारी महिंद्राची कमांडर आता जणू आठवणींच्या धुरळ्यात हरवून गेली आहे. ए.सी.च्या गाड्या, चकचकीत एस.यू.व्ही., आणि आधुनिक मोटारगाड्यांच्या गर्दीत कमांडर हा एक इतिहास होऊन बसली. पण हा इतिहास फक्त एका गाडीचा नाही, तो आहे ग्रामिण भारताच्या जीवनशैलीचा, स्वाभिमानाचा आणि जिद्दीचा.कमांडर ही गाडी म्हणजे फक्त एक वाहन नव्हतं, ती होती एक माणूस. गावातल्या प्रत्येक घराला या गाडीशी काहीतरी वैयक्तिक नातं होतं. कोणाचं लग्न, कोणाचा आजारी माणूस, कोणाचा बाजार कमांडरचं योगदान ठळकपणे दिसायचं. ती केवळ प्रवासासाठी नव्हती; ती होती गावाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक व्यवहार जुळवणारी एक अ...
पाऊलवाटा
Article

पाऊलवाटा

पाऊलवाटातेव्हा २००० साली नुकतच एम.ए.मराठी सिताबाई कला महाविद्यालय अकोल्यातून झालो होतो. तेव्हा एम.ए ला फार कमी विद्यार्थ्यांना बी प्लस भेटायचं. तेव्हा एम.ए होऊन एकतर स्पर्धा परीक्षा नाही तर प्राध्यापक होण्यासाठी नेट+सेट पात्रता परिक्षा यु.जी.सी.नं ठेवली होती.परिक्षा काही साधी नव्हती.खुप कमी प्रमाणात निकाल लागायचा. मीही त्या इराद्याने अकोल्याच्या चिवचिव बाजारातून नेट+सेटच्या तयारीसाठी अर्ध्या किमतीत एक जाडजूड पुस्तक विकत घेतलं.जेमतेम २००३ ला काहीतरी करण्याच्या उर्मीनं  आम्ही गाव सोडलं. घरची परिस्थिती बेताचीच कोरडवाहू शेती कधी पिकणारी तर कधी न पिकणारी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली. शहरात आल्यानंतर सुरूवातीला भाड्याची खोली घेतली.भाडं फक्त दोनशे रुपये होतं पण तेही तेव्हा देण्यासाठी खुप कसरत व्हायची.सोबत तलवारे व खांडेकर नावाचा नालवाडयाचा मित्र होता. तो आपल्या पोट प्रपंच भागवण्यासाठी...
लग्नाची गाठ, पण खर्चाचा  फाट.!
Editorial

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!लग्न  हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. दोन मनं, दोन कुटुंबं आणि दोन जीवनं एका गाठीत अडकतात. हे नातं विश्वासाचं, प्रेमाचं आणि समजुतीचं असावं अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आजच्या घडीला लग्न म्हणजे प्रेमापेक्षा अधिक खर्चाचं प्रतीक बनत चाललं आहे.लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं, आयुष्यभरासाठीचं नातं. पण आजकाल लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचं नव्हे, तर एक मोठा खर्चाचा सोहळा बनलेला आहे. भपकेबाज मंडप, डोळे दिपवणारी रोषणाई, पाचपद्री जेवणं, डिझायनर कपडे, कर्णकर्कश आवाजातील डी जे, हळदी समारंभ आणि वधू वराची सेलिब्रिटीसारखी एंट्री या साऱ्यामागे लाखो रुपये खर्च केले जातात. हे सर्व खरंच आवश्यक आहे का?पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी वऱ्हाडं जमवून, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरं होणारं एक आनंदाचं कार्य होतं. आज मात्र लग्न म्हणजे शेक...
आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा
Story

आशेचा कुबडा: माणुसकीचा खरा चेहरा

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड ....सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे... बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत.... ! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती....थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते... अरे ! माझा अंदाज चुकला तर....उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो !उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील....पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तीथंही अंदाज चुकला माझा....मीच म्हणालो, बाबा काही त्रास ? कुबडी घेत हळु...
नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!
Article

नाटकासाठी मातीशी जपलेलं नातं.!

हा माझा विदर्भातला जिगरी दोस्त. वर्ध्याचा. हरीश इथापे ! लै भारी माणूस. आम्हा दोघांच्या दोस्तीचा एकच धागा - 'नाटक' ! हरीशला शेती, घरच्या जबाबदार्‍या सोडून लांब पुन्यामुंबैला जाऊन 'नाटक' करणं शक्य नव्हतं आनि गांवाकडं शेती करता-करता नाटकाचा 'किडा' स्वस्थ बसू देईना ! काय करायचं?... मग त्यानं शेतातच शेतकरी मित्रांना सोबत घेऊन जगावेगळं 'ॲग्रो-थिएटर' सुरू केलं ! ...हरीशचं टॅलेंट एवढं जबरदस्त की नादखुळ्या, भन्नाट 'ॲग्रो थिएटर'ची ख्याती हळूहळू दूरवर पसरत गेली. आता महाराष्ट्रासहित आसपासच्या सहा-सात राज्यातून इथे नाटकाचे ग्रुप त्याच्या शेतात येतात. शेतात एक हाॅल बांधलाय. रहाण्या-जेवण्याची, रिहर्सलची सोय तिथंच आहे. पोरंपोरी महिना-महिना रहातात. नाटकाची वर्कशाॅप्स, लेखन, रिहर्सल्स करतात. बांधावर-विहीरीवर-तळ्याकाठी 'मोनोलाॅग्ज' पाठ करत बसतात... झाडांशी-पक्षांशी बोलायला शिकतात.. मग कलाकार बहर...
तरुणाईचे लग्न जुळे ना.!
Editorial

तरुणाईचे लग्न जुळे ना.!

तरुणाईचे लग्न जुळे ना.!तरुणाईचे लग्न जुळणे हा एक सामाजिक आणि मानसिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा विषय आहे. भारतीय समाजामध्ये लग्न हा एक पवित्र आणि महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. पूर्वीच्या काळी, विवाह हा कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे पालनपोषण करणारा एक आधारस्तंभ होता. तरुण वयात एकमेकांशी जुळणारे विवाह हे समाजाच्या नैतिकतेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे पालन करत होते. त्याचबरोबर प्रेमविवाह, जो आजच्या काळात स्वीकारला जातो, पूर्वी फारसा सामान्य नव्हता. प्रेम, मैत्री आणि भावना इत्यादी गोष्टी विवाहाच्या पारंपरिक संकल्पनांमध्ये येत नव्हत्या.आजच्या तरुणाईची जीवनशैली आणि विचारधारा पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत खूप वेगळी आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून साऱ्या जगाशी कनेक्ट होणे हे एका बाजूला सुविधा असले तरी दुसऱ्या बाजूला जीवनशैलीला प्रगल्भतेसाठी पुरेसा वेळ देणे आणि कुटुंबाशी...
कदम मामा श्रद्धांजली.!
Article

कदम मामा श्रद्धांजली.!

परभणीच्या सकाळी एक खास ठिकाण असायचं संजीवनी पोहा सेंटर. कामावर धावणाऱ्या माणसांपासून ते शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी इथले पोहे म्हणजे सकाळची ऊर्जा होती. या सेंटरचा आत्मा म्हणजे परमेश्वर कदम, सर्वांच्याच आपुलकीने 'कदम मामा' म्हणून ओळखले जाणारे.दोन किलो पोह्यांनी सुरू झालेला त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. कामगार, विद्यार्थी, छोटे दुकानदार, मोठे व्यापारी, डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी सर्व थरांतले लोक संजीवनी सेंटरला भेट द्यायचे. केवळ पोहेच नाही, तर खिचडी, मुगवडा, भजी, मिरची भजी आणि त्यांच्या हातच्या चहाची चव लोकांच्या जिभेवर चढली होती.कदम मामांचं वैशिष्ट्य वेगळं होतं. गरजूंना पोहे देताना त्यांनी कधी पैसे मागितले नाहीत. कोण उपाशी आला तर मामा स्वतःहून त्याच्या प्लेटमध्ये भरभरून वाढायचे. त्यांच्या स्वभावात असलेली माया आणि आपुलकी माणसांना जास्त भावायची.व्यवसाय...
११ मे रोजी झाले ज्योतिराव फुले ‘महात्मा’ पदवीने सन्मानित
Article

११ मे रोजी झाले ज्योतिराव फुले ‘महात्मा’ पदवीने सन्मानित

प्रत्येक दिवस हा काही ना काही नवीन घेऊन येत असतो व आपली छाप पाडून इतिहासामध्ये अजरामर होत असतो. म्हणून तर प्रत्येक दिवसाची दिन विशेष म्हणून एक नाविन्यपूर्ण नोंद केलेली असते. आपण सहज दिन विशेष कडे नजर टाकली तर काही ना काही नावीन्य व वेगळेपण दिसत असते. केवळ ह्या दिवसाच्या नावीन्यपुर्णाने आपण तो दिवस साजरा करत असतो. हा दिवस साजरा केल्यामुळे आपल्याला प्रेरणा, ऊर्जा, उत्साह व काही तरी नवीन शिकायला मिळून आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपली ज्ञानात अधिक भर पडत असते.असाच एक ऐतिहासिक दिवस आहे तो म्हणजे ११ मे १८८८ ह्या दिवशी शिक्षण महर्षी ज्योतिराव फुलेंना मुंबईतील मांडावी कोळीवाडा येथे "महात्मा" पदवी देऊन त्यांच्या चाळीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला होता. महात्मा ही पदवी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिराव फुले यांना दिली. बडोद्याचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड खुद्द क...
कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम
News

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रम

कामगार दिनानिमित्त सिमेन्स वर्कर्स युनियनकडून प्रेरणादायी उपक्रमगौरव प्रकाशन ठाणे, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिमेन्स वर्कर्स युनियनतर्फे एक विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सिमेन्स वर्कर्स संघटनेचे अध्यक्ष मनोज बोडके, उपाध्यक्ष जयंतीलाल गुप्ता, सहचिटणीस भास्कर कोतवाल, सेक्रेटरी महादेव गेजगे, सांस्कृतिक विंगचे अध्यक्ष राकेश मांजरेकर, युनिट सेक्रेटरी शिनोज नायर, विश्वनाथ शिर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ठाणे विभागाचे प्रमुख नितीन पाटील, उल्हासनगर केंद्र प्रमुख वीणा तरेकर, शहाड केंद्र संचालक गजेंद्र आहेर, वर्तक नगर (ठाणे) केंद्र प्रमुख प्रवीण सकट, पनवेल केंद्र प्रमुख दयानंद कदम आणि गुणवंत कामगार अरविंद मोरे हेही उपस्थित होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...