Saturday, May 2

Blog

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!
Article

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!

अर्ध्या तिकिटाच्या मागे पूर्ण वेदना.!नेहमीप्रमाणे काल मी एस. टी.ने प्रवास करत होतो.धाराशिव ते छत्रपती संभाजी नगर या बसने मी निघालो होतो.गाडीत गर्दीही बरीच होती. कंडक्टर साहेब तिकीट काढत होते.त्यांचा चेहरा त्रासलेला होता.उन्हामुळे गडी घामाघूम झालेला होता.अधून मधून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने घाम पुसत पुसत तिकीट काढण्याचे काम सुरूच होते...       गेल्या चार महिन्यापूर्वी एस. टी ने तिकीट दरात वाढ केलेली आहे.पण ही वाढ करताना एक मूर्खपणा केला आहे.आधी तिकीट दर राऊंड फिगर मध्ये असायचा.म्हणजे की जसे पंचावन्न रुपये,साठ रुपये असे..पण आता वाढ झाल्यापासून सत्तावन रुपये त्रेसष्ट रुपये असा दर लागतो.यामुळे सुट्टे पैसे यावरून भरपूर वाद होतात.आणि असा वाद घालत घालत कंडक्टर तिकीट काढत होता. बऱ्याच लोकांकडे वरचा एक रुपया दोन रुपया अशी चिल्लर नसल्यामुळे कंडक्टर वाद घालून वरचा एक दोन...
साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
News

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

साहित्य सन्मानाचा मुकूट सजला – शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीरगौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) – पिंपळगाव जलाल (ता. येवला) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार २०२५ चे निकाल कामगार दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संजय वाघ यांनी ही माहिती दिली.या चौथ्या वर्षीच्या पुरस्कार स्पर्धेसाठी राज्यभरातून साहित्यिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १४३ साहित्य कलाकृती स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये कवितासंग्रह – ७८, कथासंग्रह – २२, कादंबरी – १६, ललित लेखसंग्रह – २२ तसेच इतर ५ प्रकारांचा समावेश होता. परीक्षकांच्या परीक्षणानंतर प्रत्येक प्रकारातील एक उत्कृष्ट कलाकृती निवडून प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!...
प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !
Article

प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !

प्राध्यापक नसलेला प्राध्यापक सुदर्शन जैन !लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटेल. पण ती वस्तुस्थिती आहे. हा माणूस आहे खरा आहे उद्योजक .पण प्राध्यापकाच्या ठिकाणी अपेक्षित सर्व गुण त्याच्या ठिकाणी आहेत आणि आणि म्हणूनच अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये या माणसाचे चांगले नाव आहे. खऱ्या अर्थाने भगवान महावीराचा संदेश केवळ अमरावतीतच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये पोहोचण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे.   सुदर्शन जैन हे नाव आता अमरावतीकरांना अपरिचित राहिलेले नाही. तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर त्यांची भव्य दिव्य अभ्यासिका व ग्रंथालय पाहून तुम्ही चकित व्हाल. स्वतंत्र मजल्यावर मोठ्या सभागृहामध्ये त्यांचे ग्रंथालय व अभ्यासिका आहे. मुद्दाम त्यांनी ती घराच्या वरच्या म...
‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’
Article

‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’

'कामगाराच्या श्रमाला तोड नाही'"श्रम हे भांडवलाच्या आधीचे आणि तसेच स्वतंत्र आहे. भांडवल हे केवळ श्रमाचे फळ आहे आणि जर श्रम आधी अस्तित्वात नसते तर ते कधीही अस्तित्वात आले नसते. श्रम हे भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते अधिक उच्च विचारास पात्र आहे. - अब्राहाम लिंकन"आज जिकडे तिकडे सहज नजर टाकली तर आपल्याला सर्वत्र मोठं मोठ्या इमारती, पुल, फ्लाय ओव्हर, मॉल व भव्यदिव्य इमारती दिसतात. विमानतळांची, रेल्वे स्थानकांची संख्या व विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचा आढळतो आहे. कुठल्याही शहरात प्रवेश करतांना आपल्याला बायपास तर मोठ्या शहरात एक्सप्रेस वे दिसतो. प्रवास करतांना मग रेल्वे, बस, कार, आणि विमानातून असो आपल्याला सर्व शेती अगदी हिरवीगार पिकांसह डोलतांना आढळते. हे सर्व चित्र बघितल्या नंतर असं वाटत की ह्या पृथ्वीतलावर नंदनवन थाटलेले आहे आणि ही पृथ्वी सुजलाम सुफलाम आहे. सर्व नागरिक अगदी आनंदाने ...
बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा
News

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 25 एप्रिल 2025 जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मलेरिया विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मलेरिया हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तसेच त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिबंधासाठी "गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा" तसेच "क्लोरोकिनची गोळी, करी हिवतापाची होळी" अशी आकर्षक घोषवाक्य फलकांवर लावण्यात आली.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!यावर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य होते — “चला हिवताप संपवूया - पुनर्विचार करा, योगदान द्या, पुन्हा सक्रिय व्हा.”कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅड...
कामगार दिन: कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान
Editorial

कामगार दिन: कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान

कामगार दिन : कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मानप्रत्येक वर्षी १ मे हा दिवस 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगारांसाठी विशेष मानला जातो, कारण याच दिवशी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला होता. ही केवळ सुट्टी नसून, ही आहे मेहनतीने जग चालवणाऱ्या श्रमिकांना सलाम करण्याची संधी.१८८६ साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी ८ तासांच्या कामकाजासाठी मोठा लढा दिला. त्यावेळी अनेक कामगारांना दररोज १२ ते १६ तास काम करावे लागत होते, पण त्याचे योग्य वेतन मिळत नव्हते. या अन्यायाविरुद्ध हजारो कामगार रस्त्यावर उतरले. काहींना आपला जीव गमवावा लागला, पण त्यांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला ८ तासांची कामाची वेळ आणि इतर सोयी मिळाल्या. याच संघर्षाची आठवण म्हणून १ मे हा 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून ओळखला जातो.● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-य...
ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती
Article

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंतीगावा गावासि जागवा | भेदभाव हा समूळ मिटवा || उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | तुकड्या म्हणे ||आज 30 एप्रिल म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती. माझी जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करा असा आग्रह धरणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म यावली मधील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर तर आईचे नाव मंजुळा देवी होते. वडील शिवणकाम करून तर आई दळणकांडन करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महाराजांचे जन्म नाव माणिक होते. बाल माणिक इतर मुलांप्रमाणे खेळ न खेळता एकतारी व खंजिरी भजने म्हणून ईश्वर दर्शनाची तळमळ त्यांच्या मनामध्ये दिसून येत होती. प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर महाराज शाळेऐवजी शिवमंदिरात, नदीत किंवा शेतात ध्यान पूजन करण्यासाठी वारंवार धाव घेत होते. आणि इथूनच राष्ट्र...
जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!
News

जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!

गौरव प्रकाशन खंडाळा (जि. यवतमाळ) : खंडाळा येथे झालेल्या एका सामाजिक जागृती कार्यक्रमात सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी जिल्हा परिषद शाळांचे संरक्षण, शिक्षणातील बाजारीकरण आणि गावगाड्याच्या शैक्षणिक शोषणाविरोधात परखड मत व्यक्त केले.गावातच शिक्षण देणं म्हणजे संस्कार टिकवणं - ढाले"शेठजी, भटजी, बनिया यांनी शिक्षणाचा बाजार मांडणं समजून घेता येईल, पण ज्या शिक्षकांची संपूर्ण कारकीर्द जिल्हा परिषद शाळांमुळे घडली, त्यांनीच निवृत्तीनंतर कॉन्व्हेंट शाळा सुरू करून शिक्षणावर व्यापार करणं, हे दुर्दैवी आहे," असे ढाले यांनी ठासून सांगितले.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशासकीय शाळा बंद करण्यामागे पद्धतशीर षड्यंत्रढाले यांनी आरोप केला की, शाळा दत्तक योजना, शाळा समायोजन धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या तथाकथित सुधारणा या गावातील शासकीय शिक्षण नष्ट करण्याचे...
शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर
Article

शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर

अमरावती जिल्ह्यातील नम्रता ठाकरेशेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टरएका शेतकऱ्याच्या मुलीने मनापासून सातत्याने अविरत प्रयत्न केले तर ती देखील कलेक्टर होऊ शकते हे नम्रता ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. अमरावती पासून जवळपास 115 किलोमीटरवर तिचे गाव आहे . म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर.अमरावती ते वरुड आणि वरुड ते हातुर्णा असा प्रवास करावा लागतो.नुकत्याच जाहीर झालेल्या आयएएस या परीक्षेमध्ये नम्रता ठाकरे यांनी सुयश संपादन केलेले आहे. तिच्या यशाची बातमी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना कळताच त्यांनी मुंबईवरून मला फोन केला आणि माझ्या वतीने तुम्ही हातुर्णा येथे जाऊन नम्रताचे अभिनंदन करा व तिला अमरावतीला दोन तारखेला सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभाचे निमंत्रण द्या असे सुचवले.मी आमचे वरुडचे पत्रकार मित्र श्री गिरीधर देशमुख यांना फोन के...
बिरदेवची चित्तरकथा.!
Article

बिरदेवची चित्तरकथा.!

बिरदेवची चित्तरकथानुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची.प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिन...