Saturday, June 20

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात
Article

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मातअपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही माणसे फिनिक्स पक्षाप्रमाणे आयुष्यामध्ये उभी राहतात आणि आपल्या कर्तुत्वाने आपल्या मित्रमंडळीमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात.अशी बरीचशी माणसे आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या मित्रमंडळीमध्ये असाच एक माणूस आहे त्याचे नाव आहे नरेंद्र बोरकर. तो आमचा मित्र तर आहेच पण भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांचा वर्ग मित्र आहे . न्यायमूर्ती श्री भूषण गवई जेव्हा सुरुवातीला अमरावतीला ज्या फ्रेझरपुरा या भागामध्ये राहत होते त्याला लागून असलेल्या किशोरनगरमध्ये श्री नरेंद्र बोरकर यांचे राहणे होते. न्यायमूर्ती श्री भूषण गवई आणि नरेंद्र बोरकर यांनी अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयात डी बी एम हा कोर्स सोबतच केला. श्री गवईसाहेब यांच्याकडे तेव्हा फियाट कार होती. काही वेळा ते श्री बोरकर यांना घ्यायला यायचे व सोबत मिळून...
शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा
Article

शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा

शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढाआजच्या काळात शिक्षण हा समाजाच्या उभारणीसाठी सर्वात महत्त्वाचा पाया आहे. पण दुर्दैवाने, शिक्षणाच्या या पवित्र प्रक्रियेचं बाजारीकरण होतंय, आणि याच गोष्टीविरोधात खंडाळा येथे एक परखड, धारदार आवाज उठविला  सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी.*ज्या शाळेने पोसलं, वाढवलं – त्या शाळेचंच विस्मरण का?विजय ढाले यांनी आपल्या भाषणात ज्या मुद्द्यांना स्पर्श केला, ते प्रत्येक सुजाण नागरिकाने आत्मपरीक्षण करत समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या शाळांनी अनेक शिक्षकांचा संसार चालवला. पण तेच शिक्षक निवृत्तीनंतर "कॉन्व्हेंट शाळा" काढून शिक्षणाचा बाजार थाटत आहेत. हे शिक्षक कधीकाळी सरकारी शाळेत शिकवणारे होते. त्यांनी मिळवलेल्या वेतनातूनच आता खाजगी शिक्षणसंस्था उभारू...
शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन
News

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधनगौरव प्रकाशन मुर्तिजापूर (प्रतिनिधी): चिखली कादवी मुर्तिजापूर येथील येथील प्रतिष्ठित नागरिक शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रकलाबाई, मुलगा पवन, स्नुषा सौ.जयश्री, नातवंडं असा आप्त परिवार आहे.काल स्थानिक स्मशानभूमी येथे त्यांचेवर प्रा. नारायण राऊत, राजू तायडे, व मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....
आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले
Article

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे - महात्मा ज्योतिराव फुलेज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी कटगुण, सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे फुले पुरविण्याचे काम असल्यामुळे त्यांना लोकं फुले म्हणून ओळखू लागले. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. अँटोनिमा ग्राम्सी या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले याना "सेंद्रिय बुद्धिवंत" असे संबोधले होते. त्यांचा शाळेत शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. ज्योतिराव मुळात एक उद्योगपती होते. ते पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याच्या (बंड गार्डन) पूल बांधण्याचा १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेल...
महात्मा फुले – जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक 
Article

महात्मा फुले – जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक 

महात्मा फुले - जागतिक किर्तीचे समाज क्रांतिकारक महात्मा जोतीराव  फुले हे जागतिक कीर्तीचे समाजक्रांतिकारक,विचारवंत,दार्शनिक,लेखक आणि वयाच्या २१ व्या वर्षी १८४८ साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळेची सुरुवात करणारे शिक्षण महर्षि होते. कामगार नेते, स्री-अस्पृश्यता मुक्तीचे प्रणेते, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, उद्योगपती, अभियंता, आद्यमराठी नाटककार, कवी,शाहीर, साहित्यिक, शिवचरित्रकार,इतिहास संशोधक,प्रकाशक,सत्यशोधक समाज व सार्वजनिक सत्यधर्म संस्थापक,सामाजिक क्रांतीचे उद्गाते आणि रागडावर शिवरायांची समाधी शोधून प्रथम शिवजयंती साजरी करणारे शिवरायांचे वैचारिक वारसदार...इ. कितीतरी उपाद्या आणि वेगवेगळे विशेषण लावून ज्यांचे कार्य वर्णना करता येईल असे बहुआयामी, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच क्रांतिसूर्य महात्मा फुले.त्यांनी जेव्हा शैक्षणिक चळवळ सुरू केली तेव्हा भारतात साक्षरांची संख्या अवघे अडीच टक्के हो...
प्रशासनातील दीपस्तंभ : सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे
Article

प्रशासनातील दीपस्तंभ : सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे

प्रशासनातील दीपस्तंभ : सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढेमा. श्री तुकाराम मुंढेसाहेबांचा हे जेव्हा आयएएस झाले त्या वर्षी  म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी सत्कार केला होता आणि आणि आज  त्यांचे कार्य पाहून आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो .मिशन आयएएसचे उद्घाटन सध्याचे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य  सचिव मा.श्री विकास खारगेसाहेब यांनी 12 मे 2000 ला केले .तेव्हापासून तर 25 वर्षापर्यंत  आम्ही दरवर्षी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहोत . साधारणपणे  आतापर्यंत  373  आयएएस  आयपीएस  आयएएस  सनदी  व राजपत्रित अधिकारी आमच्या  या उपक्रमात सहभागी झाले आहेत.   श्री तुकाराम मुंढेसाहेब जेव्हा आयएएस झाले .तेव्हा मी सत्कारासाठी यांना फोन लावला .साहेब तेव्हा खूपच व्यस्त होते .पण ते तळमळीने म्हणाले काठोळेसर आज शब्द देत नाही .पण येण्याचा पूर्ण...
शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी
Article

शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटी

शेतकऱ्यांच्या बांधावरचा जीवघेणा संघर्ष: बंधाटीयुवा अकादमी फेसाटीकार 'नवनाथ गोरे' यांची 'बंधाटी' ही दुसरी कादंबरी. 'नवनाथ गोरे' यांची लेखणी समकालातील सामाजिक प्रश्न घेऊन उठाव करते. जे जगणे भोगले सामाजिक वास्तव अनुभवले, तेच त्यांच्या लेखणीचे विषय होऊन काळजाच्या काकऱ्यात दबलेले अंकुर शब्द रूपाने तरारून येताना दिसतात.  ग्रामीण जगणे हे समूहाचे जगणे असते. त्यामुळे 'बंधाटी' कादंबरीचा एकच नायक अथवा नायिका नसून यामध्ये अनेक पात्र वेगवेगळ्या भूमिका घेऊन येतात. शेताच्या बांधावरून पेटणारा संघर्ष जमिनीची मोजणी करूनही संपत नाही. हा बांधवरंब्याचा संघर्ष एकमेकांच्या रक्ताचा टिळा लावूनही न संपणारा व पिढ्यानपिढ्या चालणारा आहे. हे प्रखर सामाजिक वास्तव ही कादंबरी मांडते. या संघर्षा बरोबरच ग्रामीण जीवनाला घट्ट वेढून असणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टीचा वेध ही कादंबरी घेते.    गाव म्...
‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
News

‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

'कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितगौरव प्रकाशन नाशिक | प्रतिनिधी नाशिकचे उदयोन्मुख गीतकार व कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहास ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’ तर्फे दिला जाणारा प्रा. वामन सुदामा निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.कोरोना महामारीच्या भयावह काळातील वास्तवाचे भाष्य करणारा हा कवितासंग्रह एक साहित्यिक दस्तऐवज म्हणून ओळखला जात आहे. महामंडळाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा प्रदान करण्यात आला.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाया सोहळ्याला उद्घाटक म्हणून महामंडळाचे सरचिटणीस व त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्...
 शेतकऱ्याची बैलजोडी.! 
Story

 शेतकऱ्याची बैलजोडी.! 

 शेतकऱ्याची बैलजोडी.! चैत्राची गुढी उभारली होती‌.गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा झाला होता.आता कास्तकाराचा सण म्हणजे पिका, पाण्या अभावी साधासुधाच, म्हणजे काजयानं डोया साजरा करावा तशीच बुराट गोठ होती.पण शंकऱ्याचं मन कशातच लागत नव्हत. विषयही तसाच गंभीर होता. या बैलजोडीच्या पायी तर त्यानं लगन पाणी,मरणं,धरणं, सगेसोयरे,नातेवाईक सारंच सोडून देलं होतं.शेपाचशे रूपयाची गोठ असती तर वाली गोठ होती. पण इथे तर पन्नासक हजाराचा साजरा झटका होता. कोणता  सोयरा,धायरा ही त्याले मदत करण्या इतपत धनसेठ नव्हता. हे आलेलं अस्मानी संकट त्यालेच एकल्याले निस्तारा लागत होतं.ऐन दुष्काळात म्हणजे तेराव्या महिन्यात एवढा मोठ्ठा गड्डा भरणं मोठं जिकरीचंच होतं. बैलजोडी पाई पुरा पागल झालेल्या शंकऱ्यानं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सारी गावं खंगाळून काहाढली होती. रातची त्याची झोप मुश्किल झाली होती. त्याची जोडीही तशी...
थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’
Article

थरारक संघर्षाची दमदार कहाणी ‘जयभीम पँथर’

थरारक संघर्षाची दमदार कहाणी 'जयभीम पँथर''जयभीम पँथर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. माणूस हा संघटीत होऊन त्यातून एक समाज निर्माण करतो, कारण तो समाजशील प्राणी आहे, पण आजच्या बिघडलेल्या किंवा अस्थिर अश्या सामाजिक परिस्थितीत माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, किंवा त्यांच्या मनात एक प्रकारचा गोंधळ मुद्दाम काही ठराविक गटाकडून-समूहाकडून निर्माण करण्यात आलेला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे.आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवतो किंवा ते कार्य करायचा प्रयत्न करतो, तेंव्हा संघटना अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, जगातल्या कोणत्याही समाजात संघटना ही अनन्य साधारण कार्य करण्यासाठी निर्माण होते, केली जाते...