दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी
दारिद्र्याच्या घामाने शिजून 'वचपा' काढणारी कादंबरीबर्याच दिवसापासून आदरणीय मोतीरामजी राठोड सर, मला (डाॅ.वसंत भा.राठोड,किनवट) नांदेडला घरी बोलावत होते. तो योग आला १९ मार्च २०२५ रोजी कला महोत्सवाच्या निमित्ताने. संपूर्ण लेंगी मंडळच त्यांच्या घरी उतरविले. सोबत प्रा. डाॅ. राजीव राठोड होते. राठोड घराणे आणि चाळीतील सर्वांनीच गोबंजारा लेंगीनृत्याचा स्वानंद घेतला. सरांच्या अख्ख्या परिवारानेच आमचे सहर्षवदन स्वागत केले. याप्रसंगी मला त्यांचे आत्मचरित्र, आठवणीचं गाठोडं आणि वचपा ही कादंबरी भेट दिली. मी संपूर्ण कादंबरी वाचली आहे. अतिशय वाचनीय व तेवढीच संवेदनशील आहे. अतिशय जबाबदारीने राठोड सरांनी शब्दछटा वापरल्या आहेत. वाङ्मयाच्या क्षेत्रात ग्रामीण, नागरी, आदिवासी, दलित, कामगार, महिला, बाल इत्यादी वाङ्मयीन साहित्य पूर्वीपासूनच नावारूपास आलेले आहेत. नव्वद...









