‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!
‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!पुणे, १४ जून: निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी भेट ठरलेले पुस्तक — ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ — नुकतेच पुण्यातील वनभवन येथे प्रकाशित करण्यात आले. सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचा उद्देश स्पष्ट आहे – वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती आणि प्रेरणा!"रामदास स्वामींनी जसे ‘मनाचे श्लोक’ दिले, तसेच हे ‘वनांचे श्लोक’ वाचकांना पर्यावरण जपण्याची साद घालतात,” असे स्पष्ट उद्गार डॉ. शेषराव पाटील (सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक) यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर. प्रविण होते. त्यांनी या पुस्तकातील घोषवाक्यांची सादर केलेली शैली, त्यांची परिणामकारकता आणि समाजात पोहोचण्याच...









