Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!
News

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!

‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!पुणे, १४ जून: निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी भेट ठरलेले पुस्तक — ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ — नुकतेच पुण्यातील वनभवन येथे प्रकाशित करण्यात आले. सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचा उद्देश स्पष्ट आहे – वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती आणि प्रेरणा!"रामदास स्वामींनी जसे ‘मनाचे श्लोक’ दिले, तसेच हे ‘वनांचे श्लोक’ वाचकांना पर्यावरण जपण्याची साद घालतात,” असे स्पष्ट उद्गार डॉ. शेषराव पाटील (सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक) यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर. प्रविण होते. त्यांनी या पुस्तकातील घोषवाक्यांची सादर केलेली शैली, त्यांची परिणामकारकता आणि समाजात पोहोचण्याच...
मी बालमजूर बोलतोय
Poem

मी बालमजूर बोलतोय

मी बालमजूर बोलतोय बालपण आमचं हरवलंय घरकामात, शेतीत, गुरं वळण्यात!हॉटेलात, भीक मागण्यात, चिखल मळण्यात!! आमचे चिमुकले हात राबतात--- पेपर वाटपात, कोळसा खाणीत, बूट पॉलिशसाठी! तुमच्या महागड्या गाड्या पुसण्यासाठी! भंगार कचरा वेचण्यासाठी!!कामाला जुंपलं जातं घाण्याच्या बैलागत!व्यक्तिमत्व आमचं गोठलं ध्रुवीय बर्फागत!!पण-----व्यथा आमच्या जीवाच्याकुणा कळणार कशा?*आगपेटी कारखान्यात जळतो आम्ही!काच बनविताना तडकतो आम्ही !!तयार करता करता फटाके! आयुष्याची झाली स्फोटके!!वीट भट्टीवर बालपण करपलं!भंगार वेचतच आयुष्याचं भंगार झालं!!आम्ही घडवितो शाळेच्या पाट्यापण अक्षर नाही कळत!पुरते पशु बनलोय ढोरा मागे पळत!!कुस्करल्या जातात कोवळ्या कळ्याधुनी भांडी करताना!अपंगत्व लादलं जातं भिक्षेसाठी फिरताना!!ह...
मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!
Article

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!

मेहनतीची फॉरच्युनर: मागून नव्हे, कमावलेली!सध्या ही गाडी पहिली होती त्या पेक्षा कितीतरी अधिक ट्रेंडिंग मध्ये आहे.नेमकं ट्रेंडिंगमध्ये असण्याचं कारण काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, असं मी म्हणार नाही.त्याच कारण म्हणजे, मराठी मीडियाला ज्याची हगवण सध्या लागली ते.! हगवने प्रकरण हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे हॉटेल भाग्यश्री वाल्याने कष्टाने घेतलेली हीच ती गाडी. शिवाय नाद करती काय अस म्हणत  बनवलेली प्रचंड व्हायरल झालेली ती रील पाहून कष्ट केलं की, पाहिलेलं स्वप्न सत्यात  उतरू शकत. हे दाखवून जणू स्वप्नांचं प्रतीक ठरलेली गाडी.एकाला फुकट मिळाली, परंतु त्याला ती सांभाळता आली नाही. सगळं काही असून देखील, हुंड्यात ही गाडी मागून घेऊन. खर तर स्वतःची तर इज्जत कमी केलीच परंतु त्या गाडीची ही सोशल मीडियावर पहिली कधीच झाली नव्हती इतकी बेइज्जती केली गेलेली.! आपण पाहिलं. हगवणे कुटुंबाच्या बातम्यारुप...
वृक्षमहिमा
Poem

वृक्षमहिमा

वृक्षमहिमावृक्षवल्लीदेती,सुवासिक फुले!पक्षांना आसरा,सुमधुर फळे!!उन्हाळ्यात गर्द छाया शेकोटी थंडीची!पावसाचे पाणी मिळेधुप थांबे जमिनीची!!आजारात वनौषधी,अन्न मिळे साऱ्यासाठी!शेतीसाठी  औतभांडी,दारे खिडक्या घरासाठी!!प्राणवायू निर्मितीचाअसे कारखाना!आजन्म मानवाच्या लाभ त्याचे नाना!!मोल जाणूनी वृक्षांचेबोल ध्यानी धरू!मिळुनिया सारेवनरक्षण करु!!वृक्षतोड थांबवूयानवी झाडे लावूया!पर्यावरण रक्षिण्या सारे सज्ज होऊया!!-प्रा. रमेश वरघटआदर्श पर्यावरण शिक्षककरजगाव...
शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा
News

शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळा

शहादू शिवाजी वाघ स्मृती साहित्य पुरस्कार 2025 | महाराष्ट्रातील साहित्यिकांचा भव्य सन्मान सोहळागौरव प्रकाशन पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक (प्रतिनिधी) | 4 जून 2025महाराष्ट्रातील साहित्य संस्कृतीचा ठसा उमठवणारा एक भव्य आणि प्रतिष्ठित सोहळा नुकताच नाशिक जिल्ह्यात संपन्न झाला. शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल यांच्या वतीने आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा 2025 हे राज्यातील साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.📚 राज्यभरातून १४६ साहित्यकृतींचा गौरवया पुरस्कारासाठी कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन या प्रकारांतून साहित्यिकांकडून १४६ कलाकृती प्राप्त झाल्या. नामवंत परीक्षकांच्या परीक्षणानंतर निवड करण्यात आलेल्या साहित्यिकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटक कैलास दौंड व इत्...
येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड
News

येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड

"येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड"गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, तर उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी पत्रकाद्वारे दिली.४ जून २०२५ रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रभरातील निवडक साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार १ मे रोजी जाहीर करण्यात आले होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या डॉ. माहेश्वरी गावित या सध्या अहिल्यानगर येथील पेमर...
आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?
Article

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?

आणखी किती वैष्णवींचे बळी जाणार ?पुण्यातील वैष्णवी हगवने आत्महत्या की हत्या ? प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून प्रत्येकाला आपल्या घरातील मुलीबद्दल चिंता वाटायला लागली आहे.या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे.या दुःखद घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात यावर केवळ सरकारच नाही तर समाजाकडून सुद्धा काय प्रतिक्रिया येतात यावर या प्रकरणाचे गांभीर्य ठरणार आहे. प्रत्येक प्रकरणात सरकारला दोषी धरून चालणार नाही.जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती सरकार करणारच आहे.परंतु समाज म्हणून ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे.ज्या गोष्टी आपल्या हातात आह...
कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!
Editorial

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!

कमांडर : एक काळजीवाहू साथीदाराची संथ एक्झिट.!आज गावात निळं रॉकेलसुद्धा येत नाही, आणि रॉकेलवर चालणारी कमांडर गाडी तर फार लांबच गेली आहे. एकेकाळी गावातल्या प्रत्येक रस्त्यावर, पायवाटांवर, घाटातून, नदीच्या पात्रातून गर्जना करत जाणारी महिंद्राची कमांडर आता जणू आठवणींच्या धुरळ्यात हरवून गेली आहे. ए.सी.च्या गाड्या, चकचकीत एस.यू.व्ही., आणि आधुनिक मोटारगाड्यांच्या गर्दीत कमांडर हा एक इतिहास होऊन बसली. पण हा इतिहास फक्त एका गाडीचा नाही, तो आहे ग्रामिण भारताच्या जीवनशैलीचा, स्वाभिमानाचा आणि जिद्दीचा.कमांडर ही गाडी म्हणजे फक्त एक वाहन नव्हतं, ती होती एक माणूस. गावातल्या प्रत्येक घराला या गाडीशी काहीतरी वैयक्तिक नातं होतं. कोणाचं लग्न, कोणाचा आजारी माणूस, कोणाचा बाजार कमांडरचं योगदान ठळकपणे दिसायचं. ती केवळ प्रवासासाठी नव्हती; ती होती गावाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक व्यवहार जुळवणारी एक अ...
पाऊलवाटा
Article

पाऊलवाटा

पाऊलवाटातेव्हा २००० साली नुकतच एम.ए.मराठी सिताबाई कला महाविद्यालय अकोल्यातून झालो होतो. तेव्हा एम.ए ला फार कमी विद्यार्थ्यांना बी प्लस भेटायचं. तेव्हा एम.ए होऊन एकतर स्पर्धा परीक्षा नाही तर प्राध्यापक होण्यासाठी नेट+सेट पात्रता परिक्षा यु.जी.सी.नं ठेवली होती.परिक्षा काही साधी नव्हती.खुप कमी प्रमाणात निकाल लागायचा. मीही त्या इराद्याने अकोल्याच्या चिवचिव बाजारातून नेट+सेटच्या तयारीसाठी अर्ध्या किमतीत एक जाडजूड पुस्तक विकत घेतलं.जेमतेम २००३ ला काहीतरी करण्याच्या उर्मीनं  आम्ही गाव सोडलं. घरची परिस्थिती बेताचीच कोरडवाहू शेती कधी पिकणारी तर कधी न पिकणारी निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली. शहरात आल्यानंतर सुरूवातीला भाड्याची खोली घेतली.भाडं फक्त दोनशे रुपये होतं पण तेही तेव्हा देण्यासाठी खुप कसरत व्हायची.सोबत तलवारे व खांडेकर नावाचा नालवाडयाचा मित्र होता. तो आपल्या पोट प्रपंच भागवण्यासाठी...
लग्नाची गाठ, पण खर्चाचा  फाट.!
Editorial

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!

लग्नाची गाठ, पण खर्चाचा फाट.!लग्न  हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. दोन मनं, दोन कुटुंबं आणि दोन जीवनं एका गाठीत अडकतात. हे नातं विश्वासाचं, प्रेमाचं आणि समजुतीचं असावं अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. पण आजच्या घडीला लग्न म्हणजे प्रेमापेक्षा अधिक खर्चाचं प्रतीक बनत चाललं आहे.लग्न म्हणजे दोन जीवांचं एकत्र येणं, आयुष्यभरासाठीचं नातं. पण आजकाल लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचं नव्हे, तर एक मोठा खर्चाचा सोहळा बनलेला आहे. भपकेबाज मंडप, डोळे दिपवणारी रोषणाई, पाचपद्री जेवणं, डिझायनर कपडे, कर्णकर्कश आवाजातील डी जे, हळदी समारंभ आणि वधू वराची सेलिब्रिटीसारखी एंट्री या साऱ्यामागे लाखो रुपये खर्च केले जातात. हे सर्व खरंच आवश्यक आहे का?पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी वऱ्हाडं जमवून, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरं होणारं एक आनंदाचं कार्य होतं. आज मात्र लग्न म्हणजे शेक...