Friday, June 19

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा
News

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवामुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटविण्यात यावे. तसेच मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई वेशीबाहेरच रोखून परत पाठवावे, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!न्या. रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की आंदोलकांनी दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. केवळ आझाद मैदानापुरती मर्यादित राहणारी परवानगी असूनही मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, हुतात्मा चौक परिसरात जम...
मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक
News

मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक

मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमकमुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला महाराष्ट्रभरातून भक्कम पाठिंबा मिळत आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातील दानशूरांनी उपोषणकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!मात्र, ही जेवण घेऊन जाणारी वाहने मुंबईतील अटल सेतूवर पोलिसांनी थांबवली. यावर माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक पवित्र्यात आले व पोलिसांना थेट जाब विचारला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वादानंतर पोलिसांनी वाहने सोडली.यानंतर विक्रम सावंत आझाद मैदानावर दाखल झाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला.• नम्र निवेदन"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहका...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद
News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंदमुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता त्यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जाहीर केले की, “आजपर्यंत मी पाणी घेतले पण उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. म्हणजेच उपोषण आणखी कडक स्वरूप धारण करेल.”राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला 70 वर्षांपासून आरक्षण मिळालेले नाही. गोरगरीब मराठा समाजाची वेदना मोठी आहे. ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी गाड्या मैदानात लावा आणि रेल्वेने आझाद मैदानावर या, तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील.”सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्यापासून आमरण उपोषण आणखी तीव्र होणार असल...
‘कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा’
Article

‘कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा’

“कितीही प्रयत्न झाले तरी आंदोलनाची तीव्रता कमी होणार नाही – मनोज जरांगे; मराठा आरक्षणाच्या लढ्याचा जाज्वल्य इशारा”मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले तरी हे आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे.जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “मराठा समाजाच्या हक्काचा प्रश्न हा केवळ कायदेशीर लढाई नाही तर अस्तित्वाची लढाई आहे. शासन आमच्याशी चर्चा करतं, आश्वासनं देतं, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. कितीही प्रयत्न करून हे आंदोलन कमी करण्याचा प्रयत्न झाला, तरी समाजाच्या भावनांचा उद्रेक रोखता येणार नाही.”हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाशिवाय पर्याय...
‘पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली’
Article

‘पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली’

'पाटा : नव्वदच्या दशकातील ग्रामीण शेतीची आठवण आणि गावरान जीवनशैली'आमच्या लहानपणी म्हणजे जवळपास नव्वदचा काळ गृहीत धरू. मीरगाचा पाऊस साजरा पडला म्हणजे प्रत्येकाच्या शेतात तिफनीनं पेरण्या सुरू व्हायच्या. आजच्या सारखी ट्रॅक्टरची तेव्हा उपलब्ध नव्हती. मोठया वावरावाल्यांची तर आठ, दिवस पेरणी चालायची.बैलजोडया, गडी,माणसं कबंरीले बांधायच्या वटया,फशाट वाले असा सारा बारदाना सोबत असायचा. पऱ्याटयाईचा पेरा असो हायब्रीडच्या ज्वारीचा किंवा गावरान हुळळा खाण्यासाठी धुऱ्यावर गावरान ज्वारीची किंवा बाजरीची दहा,बारा तासं तरी हमखास पेरायची जेणेकरून बैलांना पोटभर खायला चारा भेटायचा.थंडीच्या दिवसात तापावर भाजायला घरच्या लोकांना,लेकराबाकरांना हुळळयाची दाणेदार दुधाच्या चिकानं भरलेली रसरशीत कणसं भेटायची.व तुळशीच्या लग्नाले खोपडीसाठी कोणी चार,पाच धांडे घेतो म्हटलं तरी घरधनी मुळीच नाही नाही म्हणायचा.किंवा मना न...
कानपूर रेल्वे स्टेशनवरील थरार : रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने चालत्या ट्रेनखाली पडलेल्या डॉक्टरच्या आईचे प्राण वाचवले !
Article

कानपूर रेल्वे स्टेशनवरील थरार : रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने चालत्या ट्रेनखाली पडलेल्या डॉक्टरच्या आईचे प्राण वाचवले !

कानपूर रेल्वे स्टेशनवरील थरार : रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने चालत्या ट्रेनखाली पडलेल्या डॉक्टरच्या आईचे प्राण वाचवले !कानपूर येथे घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेत आहे. हैलट रुग्णालयातील डॉक्टरची आई आपल्या इंजिनिअर मुलाला भेटण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होती. परंतु चढताना तोल जाऊन त्या चलती ट्रेनखाली कोसळल्या. क्षणाचाही विलंब झाला असता तर त्यांचे प्राण वाचणे अशक्य होते.यावेळी जवळच उपस्थित असलेल्या धाडसी रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाने तत्परता दाखवत, केवळ एका मिनिटात त्या महिलेला खेचून बाहेर काढले. गर्दीत उभ्या असलेल्या लोकांचे हृदय थरारले होते, पण रेल्वे संरक्षक दलाच्या जवानाच्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे स्थानकावर हा प्रकार पाहून उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आणि दरोगाचे कौतुक केले.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाही घटना केवळ एक...
अथर्व सुदामे यांना का ट्रोल व्हावे लागले? कारणं, चर्चा आणि वास्तव.!
Article

अथर्व सुदामे यांना का ट्रोल व्हावे लागले? कारणं, चर्चा आणि वास्तव.!

अथर्व सुदामे यांना का ट्रोल व्हावे लागले? कारणं, चर्चा आणि वास्तव.!अथर्व सुदामे हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले नाव आहे. मागील काही काळात त्यांना ट्रोलिंगचा मोठा सामना करावा लागला. प्रश्न असा आहे की, नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांच्यावर एवढा ट्रोलिंगचा भडिमार झाला?ठाम मतं आणि वादग्रस्त विधानंअथर्व सुदामे यांची बोलण्याची शैली थेट आणि धारदार आहे. त्यांनी समाजातील चालू घडामोडींवर दिलेली विधानं वादग्रस्त ठरली. काहींना ती सत्यवादी वाटली तर काहींनी ती अतिरेकी मानली. या थेटपणामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली.सोशल मीडियावरील अतिरेकफेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अथर्व यांचे पोस्ट्स आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. जितके फॉलोअर्स वाढले, तितकी विरोधकांची संख्याही वाढली. एक वर्ग त्यांना पाठिंबा देतो तर दुसरा वर्ग सतत ट्रोलिंग करतो.हे वाचा – महात्मा फुले ...
नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले- डॉ. प्रकाश खरात
News

नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले- डॉ. प्रकाश खरात

नाईक साहेबांनी सांविधानिक मूल्यांचे राजकारण केले - डॉ. प्रकाश खरातगौरव प्रकाशन नागपूर (प्रतिनिधी ) : "नाईक साहेब हे धोरणी राजकारणी होते. लोकशाही मूल्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांच्या राजकारणात सांविधानिक मूल्येच केंद्रस्थानी होती. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तब्बल एका तपाच्या कार्यकाळात महाराष्ट्रावर अनेक दुर्धर संकटे आली असतानाही त्यांनी महाराष्ट्राची नौका सुखरूपपणे पैलतिरी नेली" असे प्रतिपादन डॉ. प्रकाश खरात यांनी केले. ते अ. भा. तांडा सुधार समिती द्वारा आयोजित महानायक वसंतराव नाईक स्मृतिदिन आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या जयंतिप्रीत्यर्थ 'नाईक साहेबांच्या ध्येयातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे वर्तमान' या विषयावरील व्याख्यानात वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड यांनी "महानायक वसंतराव नाईक आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत हे पुरोगामी ...
गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ
Article

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभ

गावगाड्याचे सांगाती: अलुतेदार आणि बलुतेदार – भारतीय ग्रामीण जीवनातील आधारस्तंभगावगाडयाला महत्वाची सेवा पुरविणाऱ्या सोबत्यांपैकी अलुतेदार व बलुतेदार हा समाजाला वा गावरहाटीला सेवा पुरविणाऱ्या जातींचा एक समूह आहे.हा वर्ग गावरहाटीची कामे करून लोकांना सुविधा पुरविण्याचे पिढीजात काम करतो.यांचे महाराष्ट्रातील प्रमाण अत्यल्प म्हणजेच ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्गामध्ये मोडतो. या अलुतेदारांनाच ’नारू’ असे म्हणतात.कासार,कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी, या अठरा गाव कामगारांचा समावेश गावगाडयात अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत व गावरहाटीमधे महत्त्वाचा वाटा होता.अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे, ती अशी :कळवंत, खाटीक, गोंधळी,...
बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश
Article

बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश

बैलांना सजवा पण पळसवृक्ष वाचवा | बैलपोळा सण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेशयेत्या 22 ऑगस्ट ला बैलपोळ्याचा सण आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश मानला जातो आणि वर्ष भर आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगड या भागातील शेतकरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी बैलांना कामापासून आराम देतात. त्यांना नदीवर आंघोळ घालतात. रंगीबेरंगी झुली, मणी, गजरे, बाशिंग, घुंगराच्या माळांनी सजवतात. त्यांची मिरवणूक काढतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. इथपर्यंत ठीक आहे पण...या सणाला बहुतेक ठिकाणी मेढीसाठी मोठ्या प्रमाणात पळसाच्या फांद्या तोडल्या जातात, त्याची पूजा केली जाते. मी पंधरा-सोळा वर्षाचा असताना मित्र सोबत पळसाच्या मेढ्या आणायला जंगलात जायचो. दहा बारा मेढ्या घरी आणायचो. गावात प्रत्येक घरी अशा मेढ्या आणून त्या पुजल्या जायच्या. बाबा...