Friday, June 19

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा
News

आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा

आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदामुंबई : बँकिंग सिस्टिममध्ये आजपासून मोठा बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम लागू केली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असे. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे.नव्या प्रणालीत कॉन्टिन्युअस चेक क्लिअरिंग मोड सुरू करण्यात आला आहे. यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेत जमा झालेले सर्व चेक तात्काळ स्कॅन करून त्यांची इमेज आणि डेटा क्लिअरिंग हाउसकडे पाठवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित बँकेने त्या चेकची पुष्टी करणे आवश्यक असेल. मात्र वेळेत उत्तर दिले नाही तर तो चेक आपोआप क्लिअर झालेला मानला जाईल.या बदलामुळे ग्राहकांना चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होत...
मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!
News

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!मुंबई : मृत व्यक्तीला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे. "मृताच्या नावे आयकर नोटीस पाठवली तर ती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही" असा ठोस निर्वाळा बॉम्बे हायकोर्टाने देत ही नोटीस रद्द केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने आयकर विभागाच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवत विभागाला चपराक दिली.निनांच्या याचिकेतून उघडकीसया प्रकरणाची सुरुवात नीना शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेतून झाली. नीना शाह यांचे पती जतीन शाह यांचे 23 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी तत्काळ आयकर विभागाला अधिकृतपणे कळवून याची नोंद करून घेतली होती. मात्र, ही माहिती असूनही आयकर विभागाने 2013-14 या आर्थिक वर्षातील प्रकरणात 24 एप्रिल 2021 रोजी जतीन शाह यांच्या नावेच नोटीस पाठवली.त्या वेळीही नीना शाह यांनी मृ...
कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!
News

कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!

कागदी बॉंडचा काळ संपला; महाराष्ट्रात आजपासून ई-बॉंडची धडक सुरुवात!मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयात-निर्यात व्यवहारात क्रांती घडवून आणली आहे. आजपासून महाराष्ट्रात कागदी बॉंड बंद करून ई-बॉंडची सुरुवात झाली असून, या नव्या प्रणालीमुळे व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.ई-बॉंड प्रणाली महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग, National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांच्या तांत्रिक सहाय्याने सुरू करण्यात आली आहे. आता आयातदार व निर्यातदार वेगवेगळ्या कागदी बॉंडची गरज न करता, एकाच इलेक्ट्रॉनिक बॉंडद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकतील.या नव्या प्रणालीचे महत्वाचे फायदे:प्रोव्हिजनल असेसमेंट, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स, वेअरहाऊसिंग व मॅन्युफॅक्चरिंग इन बॉन्डेड वेअरहाऊसेससाठी ई-बॉंड वापरता येईल.सर...
ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Article

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...
रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट
News

रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देशात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावण दहन केला जातो. मात्र यावर्षी (२ ऑक्टोबर)च्या दसऱ्यादिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालने केलेल्या सोशल मीडिया पोस्टने चांगलाच वाद पेटवला आहे.नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी सिमी ग्रेवालने तिच्या ‘X’ (माजी ट्विटर) हँडलवर रावणाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की,“प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आपण चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याचा उत्सव साजरा करतो. पण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या वर्तनाला ‘वाईट’ न म्हणता ‘थोडं खोडकर’ म्हणायला हवे. तुम्ही सीतेचे अपहरण केले होते, पण तिला सन्मान, निवारा, चांगले अन्न आणि अगदी महिला रक्षकही दिले होते. इतका सन्मान आजच्या समाजातही स्त्रियांना मिळत नाही.”सिमीने पुढे रावणाचे बुद्धिमत्तेचे कौतुक करत लिहिले की, “रावण अर्ध्या सं...
एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार
News

एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार

मुंबई : युपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता पदवी अभ्यासक्रमासोबतच तयारीची संधी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे एफवायपासूनच विद्यार्थ्यांना युपीएससी अभ्यासक्रम शिकता येणार आहे.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित मिळत नसल्याने अपयश येते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने १९८७ मध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले असून आता या संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.या महत्त्वाच्या करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव य...
सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल
Poem

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊलहोय आम्ही सिमोल्लंघन केलंयकैक पिढ्याचं वेशीबाहेरचंजगत असलेलं जीणं…आज वेशीच्या आत आलंय ..ओंजळीला ओठ लावूनतहान ओठांची भागवली होतीभेदभावाच्या चढून भिंतीआमचा पुर्वज लढला होतात्याच भिंती भेदून आजहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.परंपरेचे फेकून जोखडगळ्यातलं टाकून मडकेकमरेचा फेकून झाडूहाती कासरा घेऊन आलोयसंविधानानं जग जवळ केलयहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.-प्रशांत वाघयेवलासंपर्क ७७७३९२५०००हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजhttps://youtu.be/pYW3sHdm0dY?si=6P0c8if1AiI95ivE...
‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?
Article, Story

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

'धम्मचक्र प्रवर्तन' चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?          मुळात 'बौद्ध' या संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ...
नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
News

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी पुन्हा एकदा लाखो अनुयायांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख अनुयायी दाखल होतात; मात्र यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे.विक्रमी गर्दीची शक्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून बौद्ध अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तगर्दी नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या, २ डीसीपी, ४ एसीपी आणि १०० अधिकारी या ठिकाणी...
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
Article

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या  घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम  नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि.  अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...