Thursday, June 18

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारलं ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!
News

‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारलं ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!

‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारली ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!नागपूर : सिनेमात ‘झुंड’चा खेळ खेळणारा अभिनेता, पण वास्तवात मात्र आयुष्याच्या खेळात पराभूत झाला. ‘झुंड’ फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा निर्घृण खून करण्यात आल्याने नागपूर हादरलं आहे. ७ ऑक्टोबरच्या रात्री जरीपटका परिसरात ही थरारक घटना घडली.पोलिसांना प्रियांशू अर्धनग्न अवस्थेत तारेनं बांधलेला आणि गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित लालबहादुर साहू याला अटक केली आहे. तपास सुरू आहे. प्रियांशू क्षत्रिय हा नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटात छोट्या पण ठसठशीत भूमिकेत झळकला होता. ‘बाबू छत्री’ या नावाने तो चर्चेत आला. पण प्रसिद्धीच्या प्...
अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!
News

अभिनेता व्हायचं होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!

अभिनेता व्हायचा होत, पण झाला ‘लोकलचा रणबीर’! अपंग बनून मुंबई लोकलमध्ये केला सुपरहिट परफॉर्मन्स!मुंबई म्हणजे स्वप्ननगरी — पण इथं स्वप्नं पूर्ण व्हायच्या आधीच अनेक जण ‘नाटकात’ अडकतात! अशाच एका तरुणाने अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट लोकल ट्रेनलाच आपलं फिल्म सेट बनवलं.हा तरुण लोकलमध्ये पाय निकामी असल्याचं नाटक करत भीक मागत होता. मोठं शर्ट घालून, पाय दडवून तो सरपटत प्रवाशांकडे मदत मागत होता. सगळ्यांना त्याची दया आली… पण काही क्षणांनीच सगळ्यांचा धक्का बसला! डब्यातून बाहेर पडताच तो ‘अपंग’ तरुण चक्क आपल्या दोन पायांवर ठणठणीत चालू लागला. आणि लगेच दुसऱ्या डब्यात घुसून पुन्हा ‘अभिनय सुरू’ केला.हा व्हिडीओ “goga_ga” या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झाल्यानंतर इंटरनेटवर तुफान गदारोळ माजलाय. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटिझन्सच्या प्रतिक्रिया म्हणजे एकदम...
विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!
News

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भव्य उद्घाटन आज पार पडलं. या ऐतिहासिक क्षणी मोदींनी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जननेते दि. बा. पाटील यांचं नाव घेत त्यांना अभिवादन केलं. “दि. बा. पाटील यांनी सेवाभावाने समाजकार्य केलं, त्यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देणारं आहे,” असे भावनिक शब्द मोदींनी उच्चारले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी मराठीतून शुभेच्छा देत म्हणाले, “विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली आणि आता दहा दिवसांनी दिवाळी — तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!” त्यानंतर त्यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव करत म्हटलं, “आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली आहे. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट आशियात...
लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप
Article

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संताप

लोकशाही व संविधानावर हल्ला : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूटफेक प्रकरणाने देशभर संतापभारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान भूतो न भविष्यती अशी घटना घडली. जी अतिशय निंदनीय असून या घटनेचा संपूर्ण देशातून निषेध केला जात आहे.सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान राकेश किशोर या वकिलांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी ६/१०/२५ रोजी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली .न्यायालयातील सुरक्षकारक्षकानी प्रसंगावधान राखत या वकिलास सरन्यायाधीशांवर हल्ला करण्यापासून रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही घटना अतिशय निंदनीय असून न्यायालयाच्या सुरक्षितता धोक्यात आणणारी आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न हा न्यायालयाच्या इमारतीचे संरक्षण, न्यायाधीशांची वैयक्तिक सुरक्षा आणि न्यायालयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आवश्...
शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद
News

शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवाद

शिवसेना पक्ष चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली; १२ नोव्हेंबरला होणार अंतिम युक्तिवादनवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह “धनुष्यबाण” यावरील मालकी हक्काच्या वादावर आज, मंगळवार (८ ऑक्टोबर २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद सुरू केला. मात्र, काही कारणांमुळे आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि अखेर न्यायालयाने ही सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल असे जाहीर केले.सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागणे आवश्यक आहे.” त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ देण्याची विनंती केली. तथापि, दुसऱ्या बाजूच्या वकिलांच्या वारंवार हस...
लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
Article

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जगप्रिये,"जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील." चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. "मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?" तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, "मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकत...
मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश
News

मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेश

मोबाईलने फोटो घेतल्यास थेट निलंबन! वाहतूक पोलिसांसाठी मोठा आदेशTraffic Police News मुंबई : वाहतूक पोलिसांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ई-चलान कारवाई करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आता स्वतःचा खाजगी मोबाईल वापरून फोटो किंवा व्हिडिओ काढणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, खाजगी मोबाईलने गाड्यांचे फोटो काढताना आढळल्यास थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.वाहतूक संघटनांच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही पोलिसांच्या या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अनेक अधिकारी खाजगी मोबाईलने फोटो काढून नंतर “सोयीनुसार” ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात आणि निष्पाप नागरिकांवर चुकीचे चलान लावतात, अशी तक्रार संघटनांनी केली होती.या पार्...
११ हजार वोल्ट पडला,  पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण
News

११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राण

११ हजार वोल्ट पडला, पण प्रेमाचा ‘करंट’ भारी निघाला! ३ वर्षांच्या चिमुकल्याने वाचवले आईचे प्राणहिरो बनण्यासाठी ना सिक्सपॅक लागतं, ना चित्रपटात अॅक्शन सीन! बिहारच्या किशनगंजमध्ये केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या आईसाठी असं धाडस दाखवलं की, देशभरातील नेटकरी थक्क झाले आहेत. एका महिलेला रस्त्याच्या कडेला उभं असताना तब्बल ११ हजार वोल्टेज विजेची तार अंगावर पडली. क्षणभरातच तिचं आयुष्य संपणार असताना तिचा छोटा मुलगा देवदूतासारखा धावला आणि आईला विजेपासून दूर खेचलं. त्या एका क्षणात आईचे प्राण वाचले आणि सगळे अवाक् झाले!हा हृदयस्पर्शी व्हिडिओ @Mahamud313 या एक्स (X.com) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, कॅप्शननुसार ही घटना किशनगंज, बिहार येथे घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला रस्त्याच्या कडेला उभी असते आणि अचानक विजेची तार तिच्यावर कोसळते. ती तार ११ हजार वोल्टेजची असल्याचं सांगितलं ज...
‘मार्शल’
Poem

‘मार्शल’

मार्शल.!एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षाआपण आपले काम पूढे रेटत राहूबुध्दगयेच्या बोधिवृक्षाखालीसारेच एकत्र भेटत राहू ……….मार्शल ……गल्लीबोळातून धोक्याचे सायरनसर्रास आदळत आहेत कर्णपटलावरआता आपण अलर्ट झालो पाहीजेआपल्या छावण्यांमध्येहीरेड अलर्ट घोषित केला पाहीजेशत्रु हल्ल्याची तयारी करत आहेआपल्या छावण्या उध्वस्त करण्यासाठीरणगाड्यात धर्माची बारूद भरत आहे ……….मार्शल ……कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाहीरात्र वै-याची नसूनदिवसही वै-याचा आहे आपल्यासाठीआरपारचे युध्द लढणे गरजेचे आहेसंविधानाच्या संवर्धनासाठीआता आपण आपल्याच दिशेनेबंदुकीच्या फैरी झाडण्यात अर्थ नाहीशत्रुसैनिक सिमापार करत असतांनाआपण एकमेकांचे कपडे फाडण्यात अर्थ नाही ………मार्शल …….वेळ अजूनही गेली नाहीसुर्य अस्तास जायचा आहे अजूननिरंजनेच्या निर्मळ पाण्यानेसारेच जाऊ भिजूनतुम्ही तिकडून या….आम्ही इकडून येऊश्रावस्तीच्या जेतवनातएकमेकांची गळ...
ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!
News

ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!

ई-केवायसीचं संकट! लाडक्या बहिणींचा हप्ता थांबणार? दिवाळीऐवजी चिंता आली ओवाळायला!मुंबई :‘लाडकी बहिण योजना’च्या लाभार्थींना पुन्हा एकदा थोडीशी चिंता लागली आहे. कारण योजनेत मोठं अपडेट आलंय — आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. पण यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे * सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसेल तर थांबणार का?यावरून राज्यभरात चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र त्याआधीच ई-केवायसीचं ‘भूत’ लाडक्या बहिणींच्या डोक्यावर आलं आहे.अधिकृतरीत्या सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी पुढील महिन्यांपासून विशेषतः नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी पूर्ण न झाल...