Saturday, May 2

Blog

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर
Article

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टरमंगरूळपीर तालुक्यातील अश्विनीची यशोगाथा खरं म्हणजे आजकाल अत्रतत्र सर्वत्र स्पर्धा परीक्षा जे डबल इ नीट या परीक्षांचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत आहे. मुलांची धाव कोचिंग क्लासकडे आहे. पण विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कोणताही क्लास न लावता कलेक्टर झालेली आहे. त्या मुलीचे नाव आहे अश्विनी धामणकर.अश्विनीने आपल्या आजोबाचे स्वप्न आय ए एस होऊन पूर्ण केले आहे. आपल्या नातीने आयएएस व्हावे असे आजोबांना वाटत होते. आणि त्यांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीने जीवाचे रान केले. तिचे शिक्षण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथेच नाथ विद्यालयात झाले. पुढे बारावी करण्यासाठी ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा महात्मा गांधी विद्यालय मध्ये गेली .तिथे तिने बारावी केली. पदवी परीक्षा पास केल्यानंतर ...
पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी 
Article

पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी 

पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयामध्ये त्यांचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ.श्रीकर परदेशी हे संपूर्ण सनदी अधिकाऱ्यांमध्ये एक पारदर्शक सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेत. मुंबईच्या मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातच आपण मुख्य सचिव श्री विकास खारगे प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांनी ते उपमुख्यमंत्री असतानाच दिल्लीच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पी एम ओ कार्यालयात कार्यरत असणारे डॉ. श्रीकर परदेशी यांना मुंबईला मंत्रालयात आपल्या कार्यालयात सचिव म्हणून बोलावून घेतले.        डॉ. श्रीकर परदेशी यांचा माझा पहिला परिचय ते जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा पास झाले तेव्हा झाला. आम्ही2000 या वर्षापासून दरवर्षी आय ए एस झालेल्या अधिकाऱ्...
तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील 
Article

तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील 

तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील श्री विश्वास नांगरे पाटील आयपीएस  यांच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या गावात माझी गाडी शिरल्याबरोबर आम्ही समोर दिसणाऱ्या व्यक्तीला विचारले .विश्वास नांगरे पाटलांचे घर कोणते आहे ?  त्यांनी आम्हाला योग्य ती दिशा दाखवली. आमची गाडी त्यांच्या कुंपणाजवळ जाऊन थांबली. श्री विश्वास नांगरे पाटलांचे बंधू आमचे स्वागत करायला आले. तेव्हा त्यांचे  वडील घरीच होते .आम्ही त्यांचा चरण स्पर्श घेतला. ज्या चर्चा रंगल्या. या गोष्टी झाल्या. जेवण झाले. आमचे  M H 27 ही गाडी पाहून काही आजूबाजूचे लोक पण साहेबांच्या वाड्यावर आले. मला भेटले.      श्री विश्वास नागरे पाटलांनी जा ग्रंथालयात अभ्यास केला ते ग्रंथालय पाहण्याची आमची इच्छा होती. ती त्यांचे बंधू त्यांनी पूर्ण केली. आमदार श्री शिवाजीराव देशमुख यांनी विश्वास ...
आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!
Article

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवर खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या वर गेली लग्न कार्याच्या निमित्ताने सग्यासोयऱ्यांच्या गाठीभेटी होतात, सुख-दुःखाचे वार्तालाप होतात, शेतमालाचे भाव, नवीन जाती, राजकारण, समाजकारण असे दहा- पाच वर्षापूर्वी होत असे. अलीकडे लग्न अडीच- तीन तास उशिरा लागतात, मग शुभमुहूर्त व लग्नतिथी आपण का काढतो हेच कळत नाही. ऑर्केस्ट्रा व डी जे (Orchestra and DJ)  च्या प्रभावामुळे कान बहिरे होतात व हृदयाचे ठोके वाढतात, ना कुणासोबत बोलणे ना ख्यालीखुशाली विचारता येत, ना कुठले फोन घेता येत. अलीकडे सर्व समाजात (मारवाडी, ब्राह्मण, गुजराती व सिंधी समाज याला अपवाद आहे.) चोरपावलांनी नकळत काही विकृत्या घुसल्यात. लग्नकार्यादी प्रसंगातील मांगल्य आणि पावित्र्य पार हरवले आहे. हौसेच्या नावाखाली केवळ उधळपट्टी व फक्त प्रदर्शनाने जागा घेतली.एका स...
जय भीम – जळजळीत सत्य
Poem

जय भीम – जळजळीत सत्य

जय भीम – जळजळीत सत्यजय भीम! ही कसली हाक? कसला हुंकार?  ही कोण्या जातपातीत अडकलेल्यांची मिरासदारी नाही,  ही बाबासाहेबांच्या विचारांनी पेटलेली मशाल आहे!  ही मशाल पेटली तेव्हा—  झोपड्यांतल्या अंधारातल्या चुली पेटल्या,  हाडं खिळखिळी झालेल्या मजुरांच्या हातात  नवे रक्त उकळू लागले,  आणि नागड्या अंगावरही स्वाभिमानाची चिलखत चढली.  शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!  बाबासाहेब म्हणाले होते,  आणि तो मंत्र आजही रक्तात धगधगतो,  ढोंगी व्यवस्था लचके तोडते,  म्हणूनच ज्ञानाच्या तलवारीला धार देतो!  जय भीम!हा मंत्र आहे, हा गर्जना आहे—  ही खुराड्यात अडकलेल्या लेकरांची ललकारी आहे,  मोकाट सु...
साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे
News

साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रे

साहित्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – डॉ. रविंद्र मुन्द्रेगौरव प्रकाशन हिवरा बु. (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सहाव्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रविंद्र मुन्द्रे यांनी साहित्याचे समाजघडणीतले महत्त्व अधोरेखित केले.ते म्हणाले, "साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि साहित्यिक हे विकसनशील समाजाचे आधारस्तंभ असतात. साहित्याचे जतन आणि सृजन केल्याशिवाय कोणताही समाज विकसित होऊ शकत नाही." त्यांनी साहित्याची प्रगल्भता काळानुसार वाढण्याची गरजही व्यक्त केली.क्रांती आणि साहित्याचा संबंधइतिहासातील विविध क्रांतींमध्ये साहित्याचा मोलाचा वाटा राहिल्याचे सांगत त्यांनी व्हॉल्टेअर, रुसो, मार्क्स, गॉर्की यांसारख्या लेखकांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी बौद्ध साहित्य, ...
नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात
Article

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात

नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मातअपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही माणसे फिनिक्स पक्षाप्रमाणे आयुष्यामध्ये उभी राहतात आणि आपल्या कर्तुत्वाने आपल्या मित्रमंडळीमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात.अशी बरीचशी माणसे आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या मित्रमंडळीमध्ये असाच एक माणूस आहे त्याचे नाव आहे नरेंद्र बोरकर. तो आमचा मित्र तर आहेच पण भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांचा वर्ग मित्र आहे . न्यायमूर्ती श्री भूषण गवई जेव्हा सुरुवातीला अमरावतीला ज्या फ्रेझरपुरा या भागामध्ये राहत होते त्याला लागून असलेल्या किशोरनगरमध्ये श्री नरेंद्र बोरकर यांचे राहणे होते. न्यायमूर्ती श्री भूषण गवई आणि नरेंद्र बोरकर यांनी अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयात डी बी एम हा कोर्स सोबतच केला. श्री गवईसाहेब यांच्याकडे तेव्हा फियाट कार होती. काही वेळा ते श्री बोरकर यांना घ्यायला यायचे व सोबत मिळून...
शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा
Article

शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढा

शाळा ही मंदिर आहे, बाजार नाही – जिल्हा परिषद शाळांसाठी विजय ढाले यांचा लढाआजच्या काळात शिक्षण हा समाजाच्या उभारणीसाठी सर्वात महत्त्वाचा पाया आहे. पण दुर्दैवाने, शिक्षणाच्या या पवित्र प्रक्रियेचं बाजारीकरण होतंय, आणि याच गोष्टीविरोधात खंडाळा येथे एक परखड, धारदार आवाज उठविला  सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी.*ज्या शाळेने पोसलं, वाढवलं – त्या शाळेचंच विस्मरण का?विजय ढाले यांनी आपल्या भाषणात ज्या मुद्द्यांना स्पर्श केला, ते प्रत्येक सुजाण नागरिकाने आत्मपरीक्षण करत समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांच्या शाळांनी अनेक शिक्षकांचा संसार चालवला. पण तेच शिक्षक निवृत्तीनंतर "कॉन्व्हेंट शाळा" काढून शिक्षणाचा बाजार थाटत आहेत. हे शिक्षक कधीकाळी सरकारी शाळेत शिकवणारे होते. त्यांनी मिळवलेल्या वेतनातूनच आता खाजगी शिक्षणसंस्था उभारू...
शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन
News

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधन

शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे दुखद निधनगौरव प्रकाशन मुर्तिजापूर (प्रतिनिधी): चिखली कादवी मुर्तिजापूर येथील येथील प्रतिष्ठित नागरिक शालिग्राम भोजराजजी राऊत यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रकलाबाई, मुलगा पवन, स्नुषा सौ.जयश्री, नातवंडं असा आप्त परिवार आहे.काल स्थानिक स्मशानभूमी येथे त्यांचेवर प्रा. नारायण राऊत, राजू तायडे, व मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आला.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....
आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले
Article

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे – महात्मा ज्योतिराव फुले

आपला जन्म हा मानव कल्याणासाठीच हा विचार रुजविणारे - महात्मा ज्योतिराव फुलेज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल, १८२७ रोजी कटगुण, सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते. त्यांचे फुले पुरविण्याचे काम असल्यामुळे त्यांना लोकं फुले म्हणून ओळखू लागले. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. अँटोनिमा ग्राम्सी या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले याना "सेंद्रिय बुद्धिवंत" असे संबोधले होते. त्यांचा शाळेत शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. ज्योतिराव मुळात एक उद्योगपती होते. ते पुणे कमर्शियल आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याच्या (बंड गार्डन) पूल बांधण्याचा १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेल...