एमपीएससी व यूपीएससीमध्ये वारंवार अपयशाच्या वलयात अडकलेल्यांचं भाकीत
* यूपीएससीत बिहारची चढण व महाराष्ट्राची घसरण का? दरवर्षी यूपीएससी अथवा एमपीएससीची तयारी करणा-यांची संख्या काही लाखांत असते. मात्र, यातून केवळ ५०० ते १००० च्या आसपास पदभरती होते. परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्या व प्रत्यक्ष यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्रचंड मोठी दरी पाहायला मिळते. मग जे विद्यार्थी यशस्वी होत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे ठाकतात. वारंवार अपयश येत असलेल्या विद्यार्थ्यांनी वास्तव्याचे भान ठेवून करिअरच्या आयुष्याची घडी सुरळीत बसवण्यासाठी दुसरा पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे आहे. एमपीएससी परीक्षेला बसलेली विद्यार्थिसंख्या किती असते? राज्यभरातून १० ते १२ लाख विद्यार्थी विविध एमपीएससीच्या परीक्षा देत असतात. तांत्रिक तसेच अतांत्रिक पदांचा यामध्ये समावेश असतो. खासगीपेक्षा सरकारी नोकरी कधीही चांगली असते. तसेच समाजात मानसन्मान असणारी ...