आईपणाला बहाल केलेला आत्मा ! म्हणजे आई म्हणते….
"आई म्हणते ....." आई म्हणजे ईश्वर आणि या ईश्वराचं म्हणणे ज्येष्ठ साहित्यिका डॉ .नयनचंद्र सरस्वते यांनी आपल्या 'आई म्हणते ... 'या काव्यसंग्रहात आपल्या लेखणीने प्रत्यक्षात उतरवले आहे. आईची महती जगतज्ञात आहे . तिच्या भोवतीचं लेकराचं सारं विश्व फिरत असते . प्रत्येकाची आई सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काही ना काही सारखं म्हणत असते. प्रेम, राग, सूचना, समज, कौतुक, लाड अशा कितीतरी भावना व्यक्त करत राहते. लेकरू ते ऐकत राहते. कधीकधी आई सारखं बोलत राहते म्हणून नेहमी दुर्लक्ष करणारी काही लेकरं असतात ,परंतु आईपासून थोडा वेळ जरी लांब गेली तरी त्यांच्या मनात , डोक्यात सारखं येत राहते आई म्हणते ... ! ही भावना कवयित्रींनी आपल्या कविता कवितासंग्रहात अतिशय सुंदररित्या कवितेतून मांडली आहे.
ओंजळीतले कुंकू तांबडे
आई लावते भाळावरती
आणि म्हणते माझी अंबिका
मांड ठोकते काळावरती
काव्यसंग्रहाच्या पहिल्या रचनेत आ...