Saturday, January 17

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Article

सोशल मिडियावर व्यक्त होताना जरा जपूनच.!

सोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लोकांचा संदेश आपल्याला आणि आपल्याकडून त्यांना क्षणात पोचू शकतो.त्यामुळेच या दुधारी शस्त्राचा वापर करताना जरा जपूनच करा अशी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली आहे.   सध्याच्या काळात प्रत्येकजण स्मार्ट व हुशारीपणा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. त्यात इकडे-तिकडचे मेसेज फॉरवर्ड करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यात धार्मिक, राजकीय, जातिय, देशविरोधी विषयांवर तर सेकंदात हे वापरकर्ते व्यक्त होतात. मात्र या मीडियाचा वापर दक्षता बाळगुन न केल्यास, व कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड केल्यास चांगलेच अंगलट येऊन 'करिअर खराब...
Article

बेरोजगार युवकांच्या हरवलेल्या स्वप्नांचे द्वार खुलणार !

* ३४ विभागातील ९० हजार रिक्त पदांची मेगाभरती देशाचे उद्याचे भविष्य असणारे युवक नैराश्याच्या गर्ततेत ओढवले जात आहे. प्रत्येक युवकाचं एक स्वप्न असतं. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तो दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो. परंतु त्याच्या मेहनतीवर आपले उदासिन सरकार पाणी फेरतं. त्यामुळे तो बदललेल्या मानसिकतेमुळे नको ते कार्य करायला लागतो. याला जबाबदार सर्वस्वी आपली शासनप्रणालीच आहे. कारण मागील ६ वर्षापासून मोठ्या पदभरतीला पूर्णत: पूर्णविराम दिला आहे. यामुळे आपला प्रत्येक युवक बेरोजगारीच्या शृंखलेत जखडला आहे.    सद्यस्थितीत शासनाच्या ३४ प्रमुख विभागांमध्ये २ लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून पदभरतीवरील सर्व निर्बंधही वित्त विभागाने उठविले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी किंवा निवडणू...
Article

मसण्याउद आणि माणूस…

मसण्याऊद हा एक जंगली प्राणी आहे. तो रात्रीच्या वेळी स्मशानात जातो आणि गाडलेले मुर्दे उकरून काढून खातो, अशी दंतकथा आहे. पण देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहयोगी संस्थांच्या कारवाया पाहिल्या तर हा देश मसण्याउदांचा आहे की माणसांचा.. याबाबत संशय निर्माण व्हावा, एवढी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जिकडे तिकडे नुसती खोदाखोद सुरु आहे. हजारो वर्षांपूर्वीचे गाडलेले मूर्दे खोदून बाहेर काढणे, हाच महत्त्वपूर्ण अजेंडा सरकारच्या लिस्ट मधे दिसत आहे. सध्याच्या राजकारण्यांची त्यावरच भिस्त आहे.   आज आपण २१ व्या शतकात उभे आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, उद्योग, उच्च दर्जाचे शिक्षण, शुद्ध पाणी, चांगले आरोग्य, नवे संशोधन, शेतीच्या नव्या तंत्राचा शोध, वेळीच आणि स्वस्त दरात शेतीला कर्ज मिळण्याची व्यवस्था, शेतीवरील भार कमी करण्याचे उपाय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपायोजना, त्यांचे ज...
Article

लग्नासाठीच्या अनोख्या प्रपोजलची अनोखी लव्ह स्टोरी..!

हायवेवर 'उत्कर्षा मॅरी मी- सौरभ' असं होर्डिंग लावून लग्नाची मागणी संपूर्ण विश्वाची शक्ती संचारलेल्या अडीच अक्षरी शब्दामुळे प्रत्येकाचं अंग शहारलं जातं. एक हुरुप व नवचैतन्य निर्माण होतं. ती चाहूल न जाणता प्रत्येकाच्या मनाला हवीहवीशी वाटते. ती वेगळी दुनिया आपलीशी वाटायला लागते. त्यामुळे प्रेम या अडीच अक्षरी शब्दाच्या जाळ्यात कळत नकळत का होईना प्रत्येकजण कधी ना कधी गुंतत जातो. या जाळ्यातून सुटका करायची म्हटलं तर तारेवरची कसरतच असते. असंच काहीसं कोल्हापूरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील उत्कर्षा यांच्या बाबतीत घडलं.  कोल्हापूर येथे सगळेच विषय एकदम हार्ड असतात. मग, त्या शर्यती असो वा मारामारी. मग कोल्हापूरकर प्रेमात कसं मागं राहतील? लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पाहिल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणाने भल्या मोठ्या होर्डिंगद्वारे त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आ...
Article

झोळी आत्मकथन पर कादंबरीचे परीक्षण….. गणेश शेलार सरांच्या नजरेतून…

झोळी आत्मकथन.. मला स्वतः च्या मनाला चटका लावून गेले. साहित्य क्षेत्रात कार्यरत लेखक, साहित्यीक, कवी, समीक्षक, प्राध्यापक, वाचक ,विद्यार्थी यांची आकलन वेगवेगळे अर्थ काढून मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.सरांनी अत्यंत मार्मिक झोळी आत्मकथन पर कादंबरीला साजेशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. ती मला विशेष भावली आहे. ती आतून लिहलेली आहे त्यामुळे वास्तव दर्शन अधिक व्यापक अर्थाने विचार करून बघावा यासाठी मदत होते. सरांचे व्यापक आकलन वाचून दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना सरांनी लिहावी असे वाटते आहे.....झोळी आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारे लेखन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना तळागाळातल्या समाजाला कितपत न्याय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. पारंपारीक व्यवसायाप्रमाणे आपली उपजिविका भागविणारा नाथपंथी डवरी गोसावी समाज आजच्या काळात कुठल्या स्थितीत वावरतो आहे. याचं विदारक चित्र झोळी आत्मकथना...
Article

समाजातील विस्कटलेली नाती…

बदलती जीवनशैली, जगण्याचा अतिउच्च दर्जा, तसेच मनामध्ये असलेला एकमेकांविरुद्ध होणारा गैरसमज हा नुसता विचार बदलवत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला माणसा पासून दूर नेण्याचा प्रत्यक्ष वां अप्रत्यक्ष रीत्या प्रयत्न करीत असतो. खर तर आज समाजात सगळी कडे विभक्त कुटुंब पद्धती दिसून येते आहे. या पद्धतीचा अवलंब होऊन नात्या मध्ये नुकताच खंड पडत नाही तर त्यामध्ये असलेल्या प्रेमाचा शेवट होतांना दिसतो आहे. मित्रांनो ही खरच खूप दुःखाची बाब आहे खर तर आपला भारत देश हा संस्कृतीने सजलेला आणि एकता निर्माण करणारा देश आहे परंतु आता मात्र या नात्याला नावच खोट वेष्टन लावलेलं दिसतंय.  आज दोन दिवसाचा लग्न करून आलेला मुलगा आपल्या बायको साठी स्वतःच्या जन्मदात्या आई बाबाला वृद्धाश्रमात नेऊन टाकतो, धन संपत्ती साठी भावा भावाचे रक्ताचे नाते तुटताना दिसत आहे, तेवढंच नाही तर इस्टेट मिळवण्यासाठी एकमेका...
Article

जलनायक सुधाकरराव नाईक साहेब

आज 10 मे 2022 'जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब' यांचा स्मृतीदिन.बघता बघता सुधाकरभाऊनां जावुन 22 वर्ष झाले. सुधाकरराव नाईकसाहेब यांच्या दु:खद निधनानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. बंजारा समाजाला नेता आहे. परंतु समाजात नेता असणे हयात फरक आहे. मा.मनोहरभाऊ नाईक, मा.हरिभाऊ राठोड, मा.संजयभाऊ राठोड, मा.अँड.निलयभाऊ नाईक, मा.प्रदीप नाईक, मा.इंद्रनील नाईक, मा.राजेश राठोड, मा. डॉ. तुषार राठोड, आजही नेतेमंडळी आहेत. परंतु सुधाकरभाऊ सारखी दुरदुष्टी जोपासणारी व्यक्ती मिळणे दुरापास्त आहे.. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे शेवटचे नेते होते. नेत्याला आवश्यक असलेले दुरदुष्टीचे सगळे गुणधर्म सुधाकरभाऊच्या ठायी ठासुन भरलेले होते. राजकारणात सरंपच,सभापती, जिल्हा परीषद अध्यक्ष, ते मुख्य मंत्री,राज्यपाल व्हावे लागल्याने सुधाकरभाऊंच्या परिपक्वपणा,संस्कारातुन, अनुभवातून, आणि 'महानायक वसंतराव नाईकसाहेब' यांच...
Article

तथागत गौतम बुद्धाचा विज्ञानवादी धम्म

मानवी समाजाला नवे उन्नयपंख देण्याचे काम जगात फक्त आणि फक्त बुद्धाने केले आहे. जगातील सारे धर्म हे दैववादी या विचारसरणीचा भाव ठेवून माणसाला काल्पनिक जीवनाच्या अंधारगुहेत घेऊन जातात. पण तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म मानवाला जीवनातील सत्याचा शोध घेऊन मानवतावादाचे निखळ नंदनवन निर्माण करण्याचे काम करत आहे.   तथागत गौतम बुद्ध यांनी अत्यंत कठीण तपश्चर्या केली. विविध गुरूकडून जीवनाचे ध्येय काय,? माणूस दुःख मुक्त होण्याचे काय साधने आहेत ? यावर विचार मंथन केले. अनेक प्रश्न विचारले .पण कोणत्याही गुरुने त्यांच्या विवेकशील व तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरे दिली नाही. ही पृथ्वी एक दैवी शक्तीचा सानिध्यात आहे. त्यासाठी माणसाने दैवी शक्तीची उपासना करावी असे अनेक विचार त्या काळात थैमान घालत होते .भारतामध्ये सिंधू सभ्यता नंतर अंधकारमय वातावरण पसरले. आर्य लोकांच्या विकृत व्यवस्थेने येथील जेत्याला जिंकून दास केले...
Article

भारतमातेच्या हटवादी कुपुत्रांचा चेहरा उघड करणारा डॉ. युवराज सोनटक्के यांचा कवितासंग्रह: ‘ ‘प्रश्नांची मातृभाषा’..!

प्रश्नांची मातृभाषा'.. या कवितासंग्रहातील सगळ्याच कविता ताकतीच्या आहेत. ही ताकद पुरवणारे स्रोत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत आहेत. त्यांच्या विचारातून परिपक्व झालेला हा कवी या सर्व कवितेच्या माध्यमातून प्रश्नांची भूमी उभी करतो आहे. त्यावर उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून बाबासाहेबांना या कविता संग्रहामध्ये त्यांनी 'शिखर- पुरुष' म्हटलेले आहे. विज्ञानमातृक बुद्ध ही सांगितला आहे.   कवी इथल्या जहरी क्षितिजावर उभा असून वास्तवाच्या सागराला, त्याच्या प्रत्येक हालचालीला, प्रश्नवाचक संवादाने, उरातल्या पेटलेल्या आगीने, आपल्याला आलेल्या अनुभूती, जाणीवेतून, जागृत असलेल्या संवेदना घेऊन, दुष्काळग्रस्त प्रदेशातून, आपल्या सहचरी ला प्रमाण साक्षी सोबत घेऊन, जीवनाचे यथार्थ मूल्य जपण्यासाठी, इथल्या हटवादी, भारतमातेचे कुपुत्र, यांचा चेहरा आपल्या कवितेतून उघड करीत, आपल्या आतड्यातली भूक ज...
Article

दु:खीतांचे तिमीर जावो…

आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. येथील ७०% लोक खेड्यात राहतात. खेड्यातील बहुतांश लोक गरीबीचे, दारिद्र्याचे, हलाखीचे, कष्टमय, भटक्या स्वरूपाचे जीवन जगतात, जगत असतात. शहरांप्रमाणे खेड्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सार्वजनीक रस्ते, आरोग्यासाठी दवाखाने, वीज, शिक्षण घेण्यासाठी उच्च दर्जाच्या शाळा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सार्वजनीक गटारी, रोजगाराच्या सोयी-सुविधा अशा मूलभूत सुविधा नाहीत. यावरून असे लक्षात येते की, किंवा खरे पाहिले तर असे जाणवते की, गरीब, वंचित, दुर्लक्षित, शोषीत, पिडीत, अन्यायग्रस्त, दिन-दुबळे यांना आवाज निर्माण करणार्‍या म्हणजेच ध्वनी निर्माण करणार्‍या साधनांची अडचण, समस्या, अडथळे मुळीच नाही. खरी अडचण, समस्या, त्रास, अडथळे आहे ते म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठ, उच-निच, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्णभेद, व्यंग भेद, पोषाख भेद, भाषा भेद अ...