Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
यशोगाथा तिच्या संघर्षाची
Story

यशोगाथा तिच्या संघर्षाची

यशोगाथा तिच्या संघर्षाचीपाचवीला असल्यापासून ती कष्टाशी भिडत राहिलेली.तिच्या आजी आजोबांसोबत भाजीपाला विकता विकता एम. कॉम. पर्यंत शिक्षण तिने घेतलं.आयुष्याच्या त्याच वळणावर तिचं लग्न माझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत झालं.त्यावेळी मी वॉचमन होतो.आमचं लग्न झालं खरं परंतु एकमेकांच्या संघर्षाला सोबत घेऊनच आम्ही बोहल्यावर उभे राहिलो. आमच्या दोघांच्या मध्ये असणारा अंतरपाट आजही आठवतो मला.त्या पांढऱ्या वस्त्रावर त्याक्षणाला कदाचित आमच्या दोघांच्या आयुष्याचं ध्येय एकत्र येऊन नटलेलं असावं.लग्नानंतर तिचं शिक्षण पाहता मी तिला अगदी दुसऱ्या दिवशी म्हणालो सुध्दा, “ दिपाली एम. कॉम.झालेलं आहे. घरात बसून चालणार नाही.पुढं ही शिक आणि नोकरी ही कर.मी सोबत राहीन.” त्यावेळी तिने मला उत्तर दिलेलं. ती म्हणाली होती, “ आयुष्यात नोकरी करायला मला कधीच जमणार नाही.घर, संसार या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मला ते शक्य ही ह...
ताशा, वेश्या आणि कविता
Story

ताशा, वेश्या आणि कविता

ताशा, वेश्या आणि कविता(सत्य कथा.)शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला "क्या कालू झोपला नाहीस अजून". “अगं बच्चन अजून आला नाही”... असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन ब...
आमची लक्ष्मी.!
Article

आमची लक्ष्मी.!

आमची लक्ष्मी..!अंगणातल्या चिंचेखाली बांधलेली आमची लक्ष्मी दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की,मी पटकन दप्तर काढून पुस्तक हातात धरून बसायचो.माझ्यासोबत माझ्या चारही बहिणी बसायच्या.तेवढ्यात इतक्या घाईने आमची आई टीव्ही बंद करायची आणि बाहेरच्या छपरात चुलीजवळ जाऊन बसायची.एका क्षणात सुरू असलेला सगळा दंगा बंद व्हायचा आणि जणू काही या घरात सात पिढ्यापासून कसलाच आवाज नाही अशी शांतता व्हायची.ही अंगणात चिंचेखाली बांधलेली आमची लाडकी म्हैस.आणि ही दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की समजून जायचं आमचे वडील आले.वडिलांना आम्ही सगळेच घाबरायचो.त्यांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही.पण भिती तेव्हा होती ती आजही आहेच.वडील आले की,बाहेरच्या हौदातलं पाणी घेऊन हात पाय तोंड धु पर्यंत लक्ष्मी अक्षरशः हंबरडा फोडून ओरडत राहायची.मग एका बादलीत पाणी भरून ते लक्ष्मी जवळ जायचे.विशेष म्हणजे त्याच बादलीत पाणी दिलं तरच लक्ष्मी प...
आणि कविता जिवंत राहिली.!
Story

आणि कविता जिवंत राहिली.!

आणि कविता जिवंत राहिली.!आणि कविता जिवंत राहिली... ही माझी वास्तव वादी लिहिलेली कथा व्हॉट्स अप वर बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाली..अनेकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या.कौतुक केलं..ही कथा व्हॉट्स अप वर फिरत फिरत जळगाव जिल्ह्यातील एका डॉक्टर असलेल्या ताईंच्या व्हॉट्स अप वर गेली.. त्यांनी ती वेळ काढून शांतपणे वाचली.गंमत अशी झाली होती.गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे मिस्टर आणि त्या दोघेही वेगळे झाले होते.त्यांचे मिस्टर सुध्दा डॉक्टर आहेत.ते पुण्यात असतात.करिअर दोघांच्याही आड येतय आणि इतर काही अडचणी यामुळे त्यांच्यात वाद झाले आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. घटस्फोटासाठी दोघांनीही कोर्टात रीतसर अर्ज केला आहे.त्यांची तारीख सुरू आहे.लवकरात लवकर घटस्फोट घेवून दोघेही वेगळे होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.माझी कथा वाचल्यानंतर त्य...
पारावरची चालती बोलती पुस्तके.!
Article

पारावरची चालती बोलती पुस्तके.!

पारावरची चालती बोलती पुस्तके.!ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली ... डोळे विझत चाललेली गावाकडची ... ही म्हातारी माणसं म्हणजे .... आयुष्यावरली चालती-बोलती पुस्तकं असतात..!आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला.., सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली.., ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे.., गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे....कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध .... जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का.... नांगर हाकून कमरेला आलेला बाक.... नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा...कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ.... डोईवर पांढरी टोपी.... पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणाऱ्या अशाच. ....डोळ्यांवरचा चष्मा किमान ... दोन-तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला... गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती....हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जा...
गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!
Article

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!बाप गेला, आई गेली. तरीही कष्ट करत, असेल त्यात हार न मानता जगत राहिला. सरळमार्गी स्वप्न बघत राहिला.. कधी कुणाच्या शेतात ओझी उचलत राहिला तर कधी स्वतःच स्वतःची पाहिलेली स्वप्न कुचलत राहिला.. जगण्याच्या आरुडात तो शोधत राहिला मनाला विरंगुळा.. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी.. कधी निवद नारळ खाऊन तर कधी फाटकं तुटकं लेऊन.. आहे त्या परिस्थितीत काहीतरी बदल होईल या आशेवर एकेक दिवस येत होता, जात होता.. तरीही खचला नाही.. ना कुणाच्या वळचणीला गेला, ना कुणाला काही त्रास दिला.. तो चार भिंतीच्या शाळेत कमी अन् भाकरीच्या शोधात जास्त शिकत राहिला.. बरं.. आई बाप गेल्यानंतर त्याचा आधार होता तो त्याच्या पाच बहिणी व आत्याचा.. त्याही रोज जगण्याची लढाई लढत बिकट परिस्थितीतून वाट काढत चाललेल्या.. फाटक्याला तुटक्याचा आधार असेच म्हणता येईल.. पण त्याचे भाचा व भाची त्याला काहीबाही सांगत होती.. शिक...
नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!
Article

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!'बंजारा विरासत वस्तुसंग्रहालया'चे उद्घाटन झाले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर असलेल्या बड्या मंडळींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांचे राजकीय वजन आणि वलय पाहता गर्दी जमविणे आवश्यकच होते. त्यासाठी तांड्यांना लक्ष्य केले गेले. तांडे हे गर्दीचे एकमेव स्रोत होते. कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्याला गर्दीनेच उत्तर देता येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते गर्दीसाठी आसूसले होते. रात्रंदिवस एक करून तांडे पालथे घालत होते. एकतर सोयाबीन काढण्यासाठी तांड्यात धावधूप सुरू होती आणि त्याचवेळी नगाराभवनचाही धामधूम सुरू होता. तांड्यांकडे वेळ नव्हता. उन्हापावसात राबराब राबून काळेठिक्कर पडलेल्या त्या थकल्याभागल्या लोकांपुढे सुंदर सुंदर स्वप्ने अंथरली गेली. पोह...
फेक कॉलपासून सावधान.!
Article

फेक कॉलपासून सावधान.!

फेक कॉलपासून सावधान.!जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फेक कॉल येत असतील तर तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकते. कारण काही लोक तुम्हाला फेक कॉल करून फसवू शकतात आणि तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. सायबर दरोडेखोराचा एक कॉल तुमचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला फेक कॉल येतो तेव्हा तुम्ही सावध राहावे. याच्या मदतीने तुम्ही सायबर फसवणूक टाळू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमच्या फोनमध्ये 2G, 3G किंवा 4G सिम अपग्रेड करण्याचा कॉल येत असेल किंवा तुमची मुलगी,मुलगा सेक्स रॅकेट मद्ये फसला गेला आहे.. त्याला सोडायचे असेल तर लाखो रुपयांची मागणी करणारे कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. हा एक बनावट कॉल असू शकतो, ज्यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरीला जाऊ शकतात. किंवा एक कॉल च्य...
ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...
श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण
Article

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहणवयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली गझल लिहिणारे मराठी गझल साहित्यातील प्रख्यात श्रेष्ठ नामवंत गझलकार आदरणीय राऊत सरांची देवप्रिया / कालगंगा अक्षर गण वृत्तातली ही गझल मला खूप आवडल्याने मी ह्या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे.गझलओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझलत्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला बोलताना मोकळे ती हासली गाली गझलतू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझलहिंडतो का जागजागी तू अनाथासारखा भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझलजन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझलपोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल - श्रीकृष्ण राऊतआदरणीय राऊत सरांच्या ह्या गझलेचा मतलाच एवढा सुंदर नि नवयुवती समान आकर्षक आहे की ...