Wednesday, March 11

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
Article

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली "संडास" शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हण...
करजगावची गुजरी अन् गावकरी
Article

करजगावची गुजरी अन् गावकरी

करजगावची गुजरी अन् गावकरी चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील पाटील, बौद्ध, बंजारा व इतर समाज येथे गुण्यागोविंदाने नांदतात. आजपर्यंत कोणत्याही दोन गटात वाद पेटल्याचे ऐकिवात नाही. किरकोळ वाद असतातच ! तसा इथला वर्ग शेती, शेतमजुरी करून आपली गुजरान करतो. गावात पूर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची आधुनिक सोय नसल्याने बोदेगांव पर्यंतचा प्रवास हा बैलगाडी, अथवा पायदळ किंवा वरुडखेड येथून शकुंतला रेल्वेने असायचा. आता तर शकुंतला पण बंद पडली आहे. सुमारे 1990 च्या दशकात  दारव्हा-तेलगव्हाण ही बससेवा सुरु झाली. सुरुवातीपासूनच गावकर्‍यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन तीन किलोमिटरचा पाणी प्रवास हा जीवघेणा वाटतो...!हे वाचा - करजगावचे  संघर्षशील  व्यक्तिमत्व  : सतीश दवणेगावातील मुली लग्...
माझा भाऊ…राया
Article

माझा भाऊ…राया

माझा भाऊ…रायामला आठवतयं तो कोरोनाचा भयंकर काळ होता.त्या दिवसात घराच्या बाहेर कुणी पडत नव्हतं.गावात जाता येत नव्हतं. म्हणून मी गळ घेऊन तळ्यावर मासे धरायला एकटाच जात होतो.मासा काही गळाला लागला नाही कधीच.पण नाद बेक्कार लागलेला होता.एक दिवस असाच दुपारी भर उन्हात मी गळ घेऊन बाहेर पडलो.अखंड दिवस तिथं घालवत असल्यामुळे सोबत जेवण आणि पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या होत्या. जसं जसं मी तळ्याच्या दिशेने जवळ जाऊ लागलो तसं कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला.कुत्र्यांची काळवंड लागलेली असेल म्हणून फारसे लक्ष दिले नाही.मी बांध चढला.आणि बांधावर आलो तेव्हा पाहतो तर, एका माकडाला सात आठ कुत्र्यांनी गराडा घातला होता.ते माकड तसच बसून सगळ्या कुत्र्यांच्या अंगावर धाव घेऊ पाहत होतं.दात इचुकन अंगावर जाऊ पाहत होतं.पण त्याला जागेवरून हालता येत नव्हतं.मी हातात दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला.कुत्री पळाली....
गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?
Article

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा..? सांगणारी एक अप्रतिम कादंबरी ...वचपा.!प्रतिभावंत ज्येष्ठ साहित्यिक एम.आर.राठोड (से. नि. गटशिक्षणाधिकारी ) लिखित वचपा कादंबरी दमाळ प्रकाशन संस्थेमार्फत विकत घेऊन वाचून काढलो.सदर कादंबरी वीस भागात विभालेली असून एकूण 213 पृष्ठात सामावलेली आहे.सात दिवसांत कादंबरी वाचून काढली. कादंबरी संदर्भात दोन शब्द लिहावं अशी माझी इच्छा झाली. एम.आर.राठोड साहेबांना सुध्दा माझ्याकडून हीच अपेक्षा होती.खर तर साहित्य समृद्धीच्या अनुषंगाने साहित्याची समीक्षा होत राहण गरजेचे असते.साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांकडून समिक्षा झाली पाहिजे अशी बहुतांश लेखकाची इच्छा असते.माझं तर साहित्य क्षेत्रात आता कुठ पदार्पण आहे; तरी देखिल एम.आर.राठोड सरांनी मला कादंबरीविषयी दोन शब्द लिहशिल असं सांगणं खरोखरच माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासातला हा एक प्रेरक तसेच आव्हानात्मक अनुभव आहे.आता...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं.  परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं दे...
आणि…कविता जिवंत राहिली
Article

आणि…कविता जिवंत राहिली

आणि…कविता जिवंत राहिली तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थि...
शेवट गोड व्हावा…
Article

शेवट गोड व्हावा…

शेवट गोड व्हावा...सान्तावर भादरनार्‍यायन या कलेला किती जगवल ? खरतर अशाच बाजार बुनग्यांनीच ही कला बंद पाडली आणि अखेर संस्कृतीचा नाश केला करत आहेत. वर्षाच्या शेवटी सान्ता ही भेटतो आणि हा भारतीय कलेचा अदभुत कलाविष्कार ही आज भेटला आणि वर्षा अखेरचा दिवस ही गोड झाला.यांना आम्ही जगवायला पाहिजे होतं भरभरून द्यायला पाहिजे होतं...पन दिल नाही. हे इतिहासातली पाने आहे. ही नष्ट करण्यात धन्यता मानणारे नाकाने संस्कृती टिकविण्याच्या बाता झाडतात. ज्या काळात घड्याळाची काटे न्हवती त्या काळात घड्याळाच्या काट्याची कामे ही जीवंत माणसे अत्यंत चोख करायची, सकाळी चार पासून गावं जागवायची, जेने करून गावाचा प्रपंच गाडा व्यवस्थित चालावा.हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यछत्रपतींच्या शिवरायांच्या काळात ह्या जीवंत कला डबरूवाले, पांगूळ, डोंबारी, वासुदेव या आणि अशा अनंत कला अत्यं...
प्रायव्हसी 
Article

प्रायव्हसी 

प्रायव्हसी  मुळात आपल्या इकडे मुल व्हायची किती घाई . दोन वर्ष तरी वेळ द्यावा एकमेकांना  आणि मुलगी 18 /19  वर्षाची असेल तर पाच वर्ष .जुनी खोडं तशीच ओरडू द्यावी .त्यांना नातवंडांचे तोंड बघायची खूप घाई . मुलं व्हायच्या आधीची प्रायव्हसी मुलं झाल्यावर रहात नाही मग काय करावे ? माझी बहिण कॉलेजला शिकत असताना तिने मला एक किस्सा सांगितला होता .तिच्या मैत्रिणीचे आईवडील त्यांच्या प्रत्येक मॅरेज ऍनिव्हार्सरीला सकाळी सहा वाजता घरातून निघून जातात आणि थेट रात्री 10 /11 ला घरी येतात . त्यांच्या दोन मुली घरीच असतात आणि आई बाबा कुठे गेले हे त्यांना माहीत नसते .त्या दिवशी त्या बहिणी घर सांभाळतात. ही सवय त्यांना लहापणापासूनच लावली गेली. माझ्या एका नात्यातील मावशीकडे मी लहान असताना गेले होते .शहरात घर लहान आणि घरात माणसं भरपूर. स्वतः ची मुलं ,नणंद आणि जावेची मुलं शिकायला घरी आणि सासू. संध्याकाळी सगळे मिळू...
सोशल नेटवर्किंगच्या युगात
Article

सोशल नेटवर्किंगच्या युगात

सोशल नेटवर्किंगच्या युगातसोशल नेटवर्किंगच्या युगातफॅमेली नेटवर्कींग संपत चाललय...नात्याचा अख्खा नेटपॅक संपत्तीच्या हव्यासा पाई महाग होत आहे. भिंतीला भिंत लागून असून सुद्धा संबधाच नेटवर्क हँग मारतय... सर्वच्या सर्व नाते जवळ जवळ असतांना सुद्धा आपण सारे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहो. आठवनींचा डाटा नुसताच साठवून ठेवतोय... आपण पुसटशी नजरही टाकत नाही त्या इमेजवर, कित्तेकदा तर डिलीट मारून मोकळे होतो, एकमेका बद्दलच्या तिरस्काराचा डाटा मोबाईल मध्ये फुल्ल झाला म्हणून... कधी कधी नकोसा वाटतो हा फोरजी फाईवजी आणि एकशे अठ्ठाविस जीबी चा डाटा... अस वाटत मामाच पत्रच बर होत, हारवल तरी ते कुणाला ना कुणाला तरी ते सापडत होतं...!हे वाचा – नाट्यप्रेमी करजगाव- विजय ढाले #बिब्बा सोशल नेटवर्किंग...
घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 
Article

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा 

घराच्या उंबरठ्यावर सुखाची जत्रा गोष्ट मे महिन्यातील आहे.रविवारचा दिवस होता.सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो. आणि हिने मागून बडबड सुरु केली. “ जरा जीवाला चैन नाही माझ्या.जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात.नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.” मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी.का चिडली आहेस.?” तर हीचे डोळे भरलेले.मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला..?”  भेळ पाणीपुरी तिला आवडतं.म्हणलं खायची का भेळ..?तर म्हणाली “हितं खाऊन काय करू..?” मी म्हणलं मग कुठ खायची आता..? तर म्हणली, “पुण्याच्या सारस बागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात.” “पण तुम्ही सतत कार्यक्रमात.सतत चळवळीत.आता पोरं पण मोठी व्हायला लागली.सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला.चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”    मी किक मारली.गाडी सुरू केली.ती माग...