Thursday, April 30

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत
Article

भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत

भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत.!भारतामध्ये पहिली मोटार बस सेवा मुंबईत (त्यावेळच्या बॉम्बेमध्ये) १५ जुलै १९२६ रोजी सुरू झाली. ही ऐतिहासिक बस सेवा कोलाब्याच्या अफगाण चर्च येथून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत चालत होती, ज्याचे अंतर अंदाजे १० किलोमीटर होते. यासोबतच भारतातील सार्वजनिक बस परिवहनाची सुरूवात झाली. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) या संस्थेने ही सेवा सुरू केली होती. सुरुवातीला काही सिंगल-डेकर बसेसच होत्या, पण या सेवेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हळूहळू तिचा विस्तार झाला.हे वाचा – धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिरतुम्हाला बेस्ट किंवा भारतातील सार्वजनिक परिवहनाच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती हवी आहे का?...
भाड्याची सायकल..!
Article

भाड्याची सायकल..!

भाड्याची सायकल...!१९८०-९० चा काळ होता तो...त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो... बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...भाड्याचे नियम कडक असायचे जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी...मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो.आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.हे वाचा – अनाथांची नाथ बोहणी.!भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची...तेव्हा भाड्याने...
माणुसकीचा ओलावा कमी झाला.!
Article

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!

माणुसकीचा ओलावा कमी झाला.!बदल, आपण बरेचदा बोलुन जातो की अमका फार बदलला, तमका फार बदलला, अमका लग्नानंतर फार बदलला, माणसा माणसा मधे काळानुसार, त्या त्या वेळेनुसार बदल घडुन येतात, ऋतु बदलतात तशी काही माणसं पण बदलतात, त्यांचे स्वभाव बदलतात, गाव बदलतात, शहर बदलतात, जग बदलत चाललंय, मी बदललो असेन, तुम्ही बदलला असाल. काळानुसार लाईफ स्टाईल बदलत चाललीय. संडास ते शौचालय ते टॉयलेट ते वॉशरूम असा हा शब्दरूपी बदल अन् मोरी ते बाथरूम हा शब्दरूपी बदल नकळत घडून आला. पूर्वी मोरी वेगळी असायची अन् संडास वेगळे असायचे, आता दोघांना एकत्रित करून ते washroom झाले, केवढा हा बदल. हल्ली "संडास" शब्द उच्चारायला माणसं कचरतात, तो रांगडा शब्द वाटतो, त्या ऐवजी टॉयलेट / वॉशरूम हे सभ्य शब्द वाटतात म्हणुन त्यांची चलती जास्त आहे.शहरीकरण झाल्यानंतरचे एकंदरीत बदल आधुनिक सुख सोयी तर देतात पण एकंदरीत वाट पण लावून जातात असच म्हण...
करजगावची गुजरी अन् गावकरी
Article

करजगावची गुजरी अन् गावकरी

करजगावची गुजरी अन् गावकरी चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील पाटील, बौद्ध, बंजारा व इतर समाज येथे गुण्यागोविंदाने नांदतात. आजपर्यंत कोणत्याही दोन गटात वाद पेटल्याचे ऐकिवात नाही. किरकोळ वाद असतातच ! तसा इथला वर्ग शेती, शेतमजुरी करून आपली गुजरान करतो. गावात पूर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची आधुनिक सोय नसल्याने बोदेगांव पर्यंतचा प्रवास हा बैलगाडी, अथवा पायदळ किंवा वरुडखेड येथून शकुंतला रेल्वेने असायचा. आता तर शकुंतला पण बंद पडली आहे. सुमारे 1990 च्या दशकात  दारव्हा-तेलगव्हाण ही बससेवा सुरु झाली. सुरुवातीपासूनच गावकर्‍यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन तीन किलोमिटरचा पाणी प्रवास हा जीवघेणा वाटतो...!हे वाचा - करजगावचे  संघर्षशील  व्यक्तिमत्व  : सतीश दवणेगावातील मुली लग्...
माझा भाऊ…राया
Article

माझा भाऊ…राया

माझा भाऊ…रायामला आठवतयं तो कोरोनाचा भयंकर काळ होता.त्या दिवसात घराच्या बाहेर कुणी पडत नव्हतं.गावात जाता येत नव्हतं. म्हणून मी गळ घेऊन तळ्यावर मासे धरायला एकटाच जात होतो.मासा काही गळाला लागला नाही कधीच.पण नाद बेक्कार लागलेला होता.एक दिवस असाच दुपारी भर उन्हात मी गळ घेऊन बाहेर पडलो.अखंड दिवस तिथं घालवत असल्यामुळे सोबत जेवण आणि पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या होत्या. जसं जसं मी तळ्याच्या दिशेने जवळ जाऊ लागलो तसं कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला.कुत्र्यांची काळवंड लागलेली असेल म्हणून फारसे लक्ष दिले नाही.मी बांध चढला.आणि बांधावर आलो तेव्हा पाहतो तर, एका माकडाला सात आठ कुत्र्यांनी गराडा घातला होता.ते माकड तसच बसून सगळ्या कुत्र्यांच्या अंगावर धाव घेऊ पाहत होतं.दात इचुकन अंगावर जाऊ पाहत होतं.पण त्याला जागेवरून हालता येत नव्हतं.मी हातात दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला.कुत्री पळाली....
गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?
Article

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा.?

गतिमान असणारा तांडा उध्वस्त झाला कसा..? सांगणारी एक अप्रतिम कादंबरी ...वचपा.!प्रतिभावंत ज्येष्ठ साहित्यिक एम.आर.राठोड (से. नि. गटशिक्षणाधिकारी ) लिखित वचपा कादंबरी दमाळ प्रकाशन संस्थेमार्फत विकत घेऊन वाचून काढलो.सदर कादंबरी वीस भागात विभालेली असून एकूण 213 पृष्ठात सामावलेली आहे.सात दिवसांत कादंबरी वाचून काढली. कादंबरी संदर्भात दोन शब्द लिहावं अशी माझी इच्छा झाली. एम.आर.राठोड साहेबांना सुध्दा माझ्याकडून हीच अपेक्षा होती.खर तर साहित्य समृद्धीच्या अनुषंगाने साहित्याची समीक्षा होत राहण गरजेचे असते.साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांकडून समिक्षा झाली पाहिजे अशी बहुतांश लेखकाची इच्छा असते.माझं तर साहित्य क्षेत्रात आता कुठ पदार्पण आहे; तरी देखिल एम.आर.राठोड सरांनी मला कादंबरीविषयी दोन शब्द लिहशिल असं सांगणं खरोखरच माझ्या छोट्याशा साहित्य प्रवासातला हा एक प्रेरक तसेच आव्हानात्मक अनुभव आहे.आता...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं.  परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं दे...
आणि…कविता जिवंत राहिली
Article

आणि…कविता जिवंत राहिली

आणि…कविता जिवंत राहिली तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थि...
शेवट गोड व्हावा…
Article

शेवट गोड व्हावा…

शेवट गोड व्हावा...सान्तावर भादरनार्‍यायन या कलेला किती जगवल ? खरतर अशाच बाजार बुनग्यांनीच ही कला बंद पाडली आणि अखेर संस्कृतीचा नाश केला करत आहेत. वर्षाच्या शेवटी सान्ता ही भेटतो आणि हा भारतीय कलेचा अदभुत कलाविष्कार ही आज भेटला आणि वर्षा अखेरचा दिवस ही गोड झाला.यांना आम्ही जगवायला पाहिजे होतं भरभरून द्यायला पाहिजे होतं...पन दिल नाही. हे इतिहासातली पाने आहे. ही नष्ट करण्यात धन्यता मानणारे नाकाने संस्कृती टिकविण्याच्या बाता झाडतात. ज्या काळात घड्याळाची काटे न्हवती त्या काळात घड्याळाच्या काट्याची कामे ही जीवंत माणसे अत्यंत चोख करायची, सकाळी चार पासून गावं जागवायची, जेने करून गावाचा प्रपंच गाडा व्यवस्थित चालावा.हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्यछत्रपतींच्या शिवरायांच्या काळात ह्या जीवंत कला डबरूवाले, पांगूळ, डोंबारी, वासुदेव या आणि अशा अनंत कला अत्यं...
प्रायव्हसी 
Article

प्रायव्हसी 

प्रायव्हसी  मुळात आपल्या इकडे मुल व्हायची किती घाई . दोन वर्ष तरी वेळ द्यावा एकमेकांना  आणि मुलगी 18 /19  वर्षाची असेल तर पाच वर्ष .जुनी खोडं तशीच ओरडू द्यावी .त्यांना नातवंडांचे तोंड बघायची खूप घाई . मुलं व्हायच्या आधीची प्रायव्हसी मुलं झाल्यावर रहात नाही मग काय करावे ? माझी बहिण कॉलेजला शिकत असताना तिने मला एक किस्सा सांगितला होता .तिच्या मैत्रिणीचे आईवडील त्यांच्या प्रत्येक मॅरेज ऍनिव्हार्सरीला सकाळी सहा वाजता घरातून निघून जातात आणि थेट रात्री 10 /11 ला घरी येतात . त्यांच्या दोन मुली घरीच असतात आणि आई बाबा कुठे गेले हे त्यांना माहीत नसते .त्या दिवशी त्या बहिणी घर सांभाळतात. ही सवय त्यांना लहापणापासूनच लावली गेली. माझ्या एका नात्यातील मावशीकडे मी लहान असताना गेले होते .शहरात घर लहान आणि घरात माणसं भरपूर. स्वतः ची मुलं ,नणंद आणि जावेची मुलं शिकायला घरी आणि सासू. संध्याकाळी सगळे मिळू...