Thursday, June 4

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी
Article

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणीआमच्या भल्या मोठ्या अंगणात शेतीचं सामानसुमान, अडगळ,फाटा,वरवंटा,उखळ,जातं तुरीच्या कनोराची पोती काही धान्याच्या मातेराची पोती पडलेली असायची. त्यात विशेष भर म्हणजे या बाजांची असायची. ‌बाज हा प्रकार सर्रास अजूनही खेड्यात बघायला मिळतो. आमचं एकत्र मोठं कुटुंब असल्याने व सभासद संख्या जास्त असल्याने झोपायची चांगलीच पंचाईत होती. पावसाळयात आम्ही माडीवर सातऱ्या वाकया घेऊन निजायला जायचो. एकत्र कुटुंबात तीन आत्या,आबा,आजी दोन काका त्यांच्या बायका लेकरं,बाकरं, भरपूर ढोरंवासरं असं खंडीभर कुटुंब नक्कीच होतं. प्रत्येकाची कामं वाटून देलेली होती. त्यामुळे कुरबुरीला जागा नव्हती. कोणी भांडे घासायचं तर कोणी इंधनफाटा आणायचं तर कोणी जनावरांचा शेणपवटा,झाडझूड करायचं. कोणी बाजारहाट करून ढोरं चारायचं. तर कोणी खटल्यात हप्त्यावारी कामाला...
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीर 
News

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीर 

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2026 जाहीरOplus_131072येवला प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे निकाल दि. ०१ मे २०२६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून निकाल जाहीर झाले असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृतीदिनानिमित्त पाचव्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून कविता संग्रह- १०३, कथा संग्रह-४१, कादंबरी -२२ आणि ललित लेखसंग्रह- २० अशा एकूण १८६ साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील कलाकृतीला खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. ...
“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”
Article

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”

“सुखी जीवनाचा मार्ग: गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, चार आर्य सत्ये आणि पंचशील”संतुलित मानवी जीवनासाठी गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान अंगिकारुयागौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे दुःखमुक्ती, समता, करुणा आणि विज्ञाननिष्ठ विचारांवर आधारित आहे. मानवी जीवनातील दुःखाचेमुळ कारण तृष्णा असल्याचे सांगून बुद्धांनी चार आर्य सत्ये आणि अष्टांगिक मार्गा द्वारे निर्वाण (सर्वोच्च सुख / मुक्ती ) मिळवण्याचा मार्ग दाखविला आहे. हे तत्त्वज्ञान तर्कशुद्ध आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे आहे. चार आर्य सत्य-1) दुःख : जगात दुःख आहे (जन्म, मरण, आजार शोक )2) दुःख समुदाय : दुःखाचे कारण तृष्णा किंवा इच्छा आहे3) दुःख निरोध : तृष्णा नष्ट केल्यास दुःख दूर होऊ शकते (निर्वाण)4) दुःख निरोध गामिनी प्रतिपदा दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग अष्टांगिक मार्ग आहेअष्टांगिक मार्ग1) सम्यक दृष्टी : सत्य काय आहे ते समजणे2) सम्यक संकल्प : वा...
वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे.!
Article

वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे.!

वैचारिक स्वावलंबन असायलाच हवे! प्रत्येक गोष्टीसाठी इतरांच्या सल्ल्याची गरज असणे हे मानसिकदृष्ट्या स्वतःचे खच्चीकरण करण्याचाच एक भाग म्हणता येईल. स्वतःवर विश्वास असल्यावर ही केविलवाणी वेळ येत नाही. पण बऱ्याचदा आपणच स्वतःला तसे बनवत आलेलो असतो. एखादे काम करण्यापूर्वी इतरांच्या मेंदूने काम करणाऱ्या माणसाच्या स्वभावात नकळतपणे बांडगुळवृत्ती वाढीस लागते.https://youtube.com/shorts/kD3oMP9Gs8k?si=IjBnDZOVtbJwjld0स्वतःचे असणारे मोल आपण कमी करत करतो आणि स्वतः केलेल्या कोणत्याही कामाला इतर लोक काय म्हणतील? त्यांना आवडेल का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याच्या नादात आत्मविश्वास कमी करतो. बरं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच लोकांकडून मिळवायची असतात ज्यांना आपल्या कर्तृत्वाची कदर नसते. आपल्यातील उमेद कमी करण्यासाठी जे नेहमी सक्रिय असतात अशा माणसांकडूनच चांगुलपणाचे प्रमाणपत्र मिळविण्य...
‘गुरूदर्शन’
Poem

‘गुरूदर्शन’

गुरूदर्शनधन्य धन्य ते गुरुकुंजश्री गुरुदेवाचे कुंजवनजेथे विसावला राष्ट्रसंतअश्विनमासी।.मानवतेचे मंदीर येथेसर्वांकरिता असे खुलेविश्वस्नेहाचे नंदनवनगुरुकुंजी या।देवभक्ती अन देशभक्तीग्रामशक्ती अन ग्रामभक्तीअर्पिला ग्रामगीता बोधग्रामनाथाला।समुदाय प्रार्थनेचा मंत्रग्रामसुधारणेचे नवे तंत्रस्थापिले सेवामंडळग्रामाग्रामासी।अध्यात्म आणि विज्ञानह्याच्या सुंदर संयोगातूनप्रतिपादीला सुखाचा मार्गभजनातून।बंधूभाव नांदण्या भारतीसुखी ठेवण्या सकलांसीमागितला वर जगदीशासीतुकडोजीने।हिंदभूच्या लेकरां जागविलेदेशभक्तीचे दिले धडेजोशवीले गोऱ्यांविरुध्दस्वातंत्र्यासाठी।चिमूर-आष्टी स्वातंत्र्य संग्राममोहवीले खंजरीने तरुणांसस्वतः घेतली उडी रणसमराततुकडोजीने।https://youtube.com/shorts/kD3oMP9Gs8k?si=IjBnDZOVtbJwjld0झाडझडुले शस्त्र बनेंगेपत्धर सारे बाम्ब बनेंगेभजनातून त्वेषाने बरसला...
“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”
Article

“गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास”

"गावचा आठवडी बाजार आणि वहाबभाईचं भातकं | बालपणीच्या आठवणींचा हळवा प्रवास"गावच्या मारोतीच्या पाराजोळ पिंपळाच्या व वडाच्या झाडाच्या थंडगार सावलीत गावचा आठवडी बाजार भरायचा. पंचक्रोशीतील बाहेरगावची बेपारी मंडळी सायकलीवर कोणी मीनीडोर ऑटोवर कोणी गाढवावर तर कोणी घोड्यावर आपापलं दुकान,भाजीपाला, सामानसुमान लादून बाजाराला आवर्जून हजेरी लावायची. सोनखेड,भुईखेडचे भोई आपली पूर्णा नदीच्या पात्रातील पिकवलेले खरबूज टरबूज विकाले आणायची. चारदोन भाजीपाल्याचीआलू,कांद्याची व दोन तीन पान तंबाखू,गरम मसाल्याचे बेपारी,गावातला चपला शिवणाऱ्या जगदेव चांभार व घाण्याचं पिवर पिवळधम मद्रास तेलाचे पिपे घेऊन एक दोन तेल्यांची दुकाने, बाजुच्या खेड्यातला दाढी कटींगा करणारा शालीकराम म्हाली असायचा. त्याच्या दुकानात बंबाट गर्दी असायची.पैसे कमी म्हालपंचायतीच ज्यादा चालायच्या.बजाराच्या दिवशी आम्ही झोपेतून उठलेले वंग...
विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढली
Article

विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढली

विदर्भाचे वाढते तापमान चिंताजनक | अकोला 46.9°C उच्चांक, उष्णतेची लाट वाढलीप्रत्येक उन्हाळ्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला या शहराचे तापमान 45 डिग्रीच्या वर नोंदवले जाते. त्यामुळे विदर्भात राहणाऱ्या लोकांची 'मे' महिन्यातील प्रखर उन्हात काय अवस्था होत असेल याचा विचार करूनच अनेकजन विदर्भात येण्याची हिम्मत करत नाही.विदर्भातील तीव्र उष्णता आणि तापमानातील सततची वाढ (४४°C-४६°C च्या वर) ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. अकोला, वर्धा आणि नागपूरसारखी शहरे देशातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी आहेत, ज्यामुळे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने दुपारच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पारा ४३°C ते ४६.९°C पर्यंत पोहोचला आहे, जो सामान्य तापमानापेक्षा ४-८ अंशांनी जास्त आहे. हवामान विभागाने ऑरेंज अ...
गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर…!
Article

गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर…!

गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर...!धो धो पाऊस कोसळला कि आमच्या जांब नदीचा पूर पाहून डोळ्यांचं पारणं फिटायचं.खरं तर माझ्या गावची जांब नदी जेव्हा दुथडी भरून व्हायची तेव्हा तिचं रूप काही औरच असायचं.पुराचं पाणी खाली मऱ्हळकडे वाहत जायचं.पुराचं पाणी म्हणजे जणू चहाच्या किटल्याच नदीत आणून ओतल्या आहेत असं वाटायचं नि विस्तीर्ण अशी ती जलक्रीडा बघायला खूप आनंद मिळायचा.त्या आनंदाला पारावार राहायचा नाही.पूर बघयाला जाणं ही माझ्यासाठी नाही तर गावातल्या सर्वांनाच एक मोठी पर्वणी असायची.' पूर आलाय रे ….' अशी एकदा का आरोळी घुमली कि गावातले शौकीन अर्थात माझ्यासारखे ,सर्वच नदीचा पूर बघायला छत्र्या, घोंगड्या घेऊन जमायचे.किती पाणी आलंय, कोणत्या पट्ट्यात जादा पाऊस झालाय,आणखी हे पाणी खाली कुठपर्यंत जाणार याबद्दलचे अनेक अंदाज जमलेले लोक बांधत. तंबाखू मळता मळता लोकांच्या गप्पा पुराच्या पाण्याच्या आवाजात मिसळून जा...
आमची शक्ती-आमचा ग्रह
Article

आमची शक्ती-आमचा ग्रह

आमची शक्ती-आमचा ग्रह जागतिक वसुंधरा दिन: प्लास्टिक प्रदूषणाचा धोका आणि वृक्षारोपणाची गरज | Earth Day Specialआपण ज्या ग्रहावर जन्म घेतला तोच आपला ग्रह, आणि तो ग्रह म्हणजे पृथ्वी.म्हणजे पृथ्वी हा ग्रहच आपले निवासस्थान आहे असे आपण हक्काने म्हणू शकतो.आपण ज्या घरी राहतो ते घर आपण जर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे काय परिणाम होतात हे सूज्ञास सांगणे न लगे. तदवतच आपण ज्या जागेवर घर करुन राहतो त्यालगतचेही घर स्वच्छ टापटीप असावे नव्हे तर संपूर्ण परिसरच टापटीप म्हणजे स्वच्छ असावा,अगदी प्रदुषणमुक्त असावा असे प्रत्येकास वाटावयास पाहिजे. आपल्या घराभोवताल हिरवळ असावी जेणेकरुन स्वच्छ प्राणवायु आपल्या नासिकेत प्रवेश करु शकेल. झाडे किंवा वनस्पतीच्या प्रत्येक प्रजाती ह्या जैवसाखळीकरिता आवश्यक घटक आहेत.त्या तर आपण जपल्याच पाहिजेत. ते आपले प्रथम कर्तव्यच ठरते.पर्यावरणाचा समतोल साधण्यास वृक्षारोपनाशिवा...
सर्जनशील शब्दवेल साहित्य पुरस्कार 2026 | साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन | अंतिम तारीख 30 जून
News

सर्जनशील शब्दवेल साहित्य पुरस्कार 2026 | साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन | अंतिम तारीख 30 जून

साहित्यिकांसाठी सुवर्णसंधी : सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेलतर्फे वार्षिक पुरस्कार २०२६ जाहीरपनवेल : महाराष्ट्रातील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल यांच्यावतीने वार्षिक साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले असून विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.या पुरस्कारांत कथा, कविता (गझल, मुक्तछंद, अभंग), कादंबरी, वैचारिक लेखन, चारोळी, बालसाहित्य आणि ललित लेखन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतीच पुरस्कारासाठी ग्राह्य धरल्या जाणार असून साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींच्या दोन प्रती पाठविणे आवश्यक आहे.🏆 प्रमुख पुरस्कारांची यादीया वर्षी एकूण ९ प्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामध्ये—स्व. जगन्नाथजी बोपुलकर उ...