पुणे प्रतिनिधी I
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” पुन्हा चर्चेत आली आहे. आज ५ जुलैपासून अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा होती. मात्र नवीन तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही बँकांचे कागदपत्र पडताळणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच उत्पन्न कर आणि पात्रता निकषांबाबत नव्याने तपासणी सुरू असल्याने अनेक अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून लवकरच याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.







