Thursday, May 7

Article

आठवणीतले पुणे : प्रभाकर कंदील
Article

आठवणीतले पुणे : प्रभाकर कंदील

    वीज जाणे ही परंपरा गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. विजेची मागणी इतकी वाढली की मुंबई, पुण्यासारखी शहरे देखील घायकुतीला येतात आणि काही काळ अंधारात जातात. पण जेव्हा विजेची निर्मिती ही बाल्यावस्थेत होती, तेव्हा पुण्यासारख्या शहरातही एक मोठा आधार होता तो म्हणजे 'प्रभाकर कंदील'. अनेक जणांच्या परीक्षा या कंदिलानी यशस्वीपणे पार पाडल्या. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये वाड्यांमध्ये पेटलेल्या कंदिलानी घरातले, दुकानातले व्यवहार उजळून काढले, त्या प्रभाकर कंदिलाचे निर्माते हे गुरुनाथ प्रभाकर ओगले होते.   महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अनेक माणके दडलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक अडचणी, मार्गदर्शकांची वानवा असूनही, ही माणसे जिद्दीने उभी राहतात आणि अनवट वाटेवरून चालत जगाला प्रकाशाचा मार्ग दाखवतात. या तरुणाने नेमके हेच केले. कोल्हापूर बावडा इथं जन्माला आलेला हा तरुण कोल्ह...
आता तरी ब्रेक घ्या…!
Article

आता तरी ब्रेक घ्या…!

*आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण.....   आजच्या काळात मोबाइल फोन वापरणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला मोबाइल दिसतो मग भले तो सुशिक्षित असो की अशिक्षित.आपण नेहमी पाहतो की आपल्या आसपास कित्येक लोक तासनतास मोबाइल फोनवर बोलत असतात पण त्यामुळे दीर्घकाळानंतर त्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. मोबाइलच्या अतिवापरामुळे बऱ्याचदा असे म्हटले जाते की, ”मोबाइल ही गरज राहिलेली नसून व्यसन झाले आहे.” याचाच प्रत्यय देणारी माहिती सध्या एका संशोधनातून समोर आली आहे.   *जास्त वेळ मोबाइल फोन वापरण्यामुळे वाढू शकतो उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका... मोबाइलचा वापर करणे गरजेचे आहे पण त्याच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या निरोगी जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होत आहे. न...
सेवानिवृत्ती शाप की वरदान !
Article

सेवानिवृत्ती शाप की वरदान !

*ह्रदय पिळवटून टाकणारी कथा ! *जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस.!           ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे 58 व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं. नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा. भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.*   एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरां...
मन शांतीसाठी भगवान बुद्धाची शिकवण अंगिकारण्याची गरज
Article

मन शांतीसाठी भगवान बुद्धाची शिकवण अंगिकारण्याची गरज

सध्याचे युग हे तंत्रज्ञाचे व धावपळीचे आहे. सध्याचे युग हे आधुनिकसुद्धा आहे. प्रत्येकाचे राहणीमान पण उंचावले आहे. त्यामुळे प्रत्येकाचा खर्च पण वाढला आहे. हा खर्च करण्यासाठी चांगल्या रोजगाराची सुद्धा गरज आहे. आज सहज रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे परंतु रोजगार मोठ्या प्रमाणात कमी होऊन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही अशी परिस्थिती आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वात आहे. महागाई वाढत आहे, राहणीमान अधिक खर्चिक झाले आहे ह्यामुळे प्रत्येकजण हा तणावात आहे.चांगल्या राहणीमानासाठी अधिक पैशाची गरज आहे. रोजगार नसल्यामुळे लोक अन्य गैरमार्गाने पैसे मिळवायला लागले आहेत. गैरकृत्यामुळे लोकांची मनशांती भंगलेली आहे. जो तो तणावात आहे.प्रत्येकाला शांती ( peace ) आणि एकांतवास (space) हवा आहे. एकत्र कुटुंब पद्धती जवळपास लयालाच चालली आहे. जो तो शांती (peace) आणि एकांतवास (space) शोधण्याच्या विचारत आहे...
बुद्ध धम्म व बुद्ध  धम्माची शिकवण
Article

बुद्ध धम्म व बुद्ध धम्माची शिकवण

 भारतीय तत्त्वज्ञ,शांततेचे महासागर,मानवतावादी - विज्ञानवादी बौद्ध धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना जयंती निमित्त विनम्र वंदन ! बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !          बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे.बुद्ध या शब्दाचा अर्थ  'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा आहे .ही उपाधी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळविली आहे . संबुद्ध म्हणजे बुद्धत्व - संबोधी ( ज्ञान ) प्राप्त - स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतः उत्कर्ष  करू शकणारा महाज्ञानी बुद्ध आणि संमासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी (ज्ञान ) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष - उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.बौद्ध अनुयायी तथागत गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतमबुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.     आशिया ख...
मैफल म्हाताऱ्यांची..!
Article

मैफल म्हाताऱ्यांची..!

एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते. "आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना.म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा. आपल्याला कारभाराच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे हळूहळू सगळे अधिकार सोडून, शांतपणे जगायला पाहिजे. पण लहान पोरांत आणि म्हाताऱ्या माणसांत तसा काही फरक नसतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. सगळं कळतं, पण वळत नाही. तर मुलगा म्हणाला, 'बाबा, तुम्हाला कमी दिसतं म्हणून, मोठा टीव्ही आणला.'मी म्हणालो, 'बापाची काळजी असणारी अशी मुलं आजकाल दुर्मिळ झाली आहेत.' तेव्हा तो छानपैकी हसला. त्याला वाटलं की आपण म्हाताऱ्याला फसवलं. मात्र, त्याची बायको महिन्यापासून मोठ्या टीव्हीसाठी मागं लागली होती, हे मला माहित...
या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.!
Article

या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.!

या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.!    सिमोलीया, फ्रान्स, अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर या पाच देशात विविध खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. तर जाणून घेऊया, असे कोणते खाद्यपदार्थ आहेत.   * सामोसा : सिमोलिया या देशात समोसा या पदार्थांवर बंदी घातली आहे. यादेशातील अल-शबाब या पक्षाच्या नेत्यांना समोसे हे आक्षेपार्ह वाटतात. त्यांच मत असे आहे की, समोसाचा आकार हा त्रिकोणी आहे. हा आकार ख्रिश्चन धर्माच्या ट्रिनिटीसारखा आहे. म्हणून येथे या पदार्थाला बंदी आहे.   * केचअप : फ्रान्स देशात केचअप या पदार्थावर बंदी आहे. पकोडे, कटलेट असे अनेक पदार्थ आपण खाताना केचअप घेत असतो. त्याशिवाय असे पदार्थ स्वादिष्ट लागत नाहित. मात्र फ्रान्स देशात या पदार्थाला बंदी आहे. या देशाचे असे म्हणणे आहे की, फ्रान्सच्या पारंपरिक पाकशैलीला या पदार्थाचा धोका आहे. या पदार्थामुळे फ्रेंच स्वादाचीलोकप्रियता कमी होईल.  ...
मक्तेदारी…..!
Article

मक्तेदारी…..!

मक्तेदारी.....!क्षेत्र कुठलं ही असू द्या ! अगोदर पासून ठाण मांडुन बसलेले मातब्बर आणि त्या क्षेत्रातील गब्बर व्यक्ती असतात. काही ही झालं तरी लगाम आपल्याच हातात हवा ही त्यांची मानसिकता असते. बाहेर बोलताना फक्त बोलायचं  ह्या क्षेत्रामध्ये नवीन होतकरू तरुणांच स्वागत आहे. अगदी कुठली ही मदत करायला आम्ही तयार आहोत परंतु  मुह में राम और बगल में....अशी त्यांची मानसिकता असते....           मग याला चित्रपट क्षेत्र तरी कसं अपवाद असेल उलट इथं आणि राजकारणात सर्वात जास्त घराणेशाही दिसून येते हे सांगण्याची गरज नाही.  शोधली तर किती तरी  उदा. आपल्याला सापडतील. त्यामुळे ह्या लोकांची मानसिकता कमालीची कोती झाली असून जर दुसरा कुणी ह्या क्षेत्रात येतोय , आणि यशस्वी होतोय  हे ह्यांच्या पचनी पडण  खूप अवघड आहे. नागराज मंजुळे यांचं कधी तोंडभरून कौतुक केलेलं तुम्ही पाहिल का ?कारण त्याने यांची सगळी रेकॉर्ड तर उध्वस...
हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे..!
Article

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे..!

*हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे ~~~~~~~~~~~~~~~~~जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे. साहित्य : अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)कृती :एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...*शरीराची सूज कमी करते - शरीरावर कित...
जिव्हाळा..!  (पूर्वीचे लग्न)
Article

जिव्हाळा..! (पूर्वीचे लग्न)

" बालपणीचा काळ सुखाचा "       [ भाग १ ]"जिव्हाळा" (पूर्वीचे लग्न)आमच्या बालपणी लग्न म्हणजे एक आनंद सोहळा असायचा . लग्न एक महिना लांबच आहे तर जवळच्या पाहुण्यांची जमवाजमव सुरू झालेली असायची . आताच्या काळाएवढी  दळणवळण आणि संदेशवहनाची मुबलकता नसल्याने किमान वीस ते पंचवीस दिवस अगोदर पत्रिका पोहचवणे आणि मु-हाळी जाणे या प्रक्रिया सुरू व्हायच्या. जवळचे नातेवाईक जसे आत्या, मावशी, मावस भाऊ, मावस बहिणी ,आते भाऊ,  आत्या बहिणी, चुलत बहिणी, या किमान आठ ते दहा दिवस अगोदर पोहोचलेल्या असायच्या .घर अगदी भरलेले "गोकुळ " होऊन जायचं .सर्व एकत्र आले म्हणजे चालणाऱ्या गमतीजमती आणि हास्यविनोदात सर्व न्हाऊन निघायचे.त्याकाळात एवढी सधनता ,संपन्नता नसली तरी मनाची श्रीमंती मात्र ओसंडून वाहत होती . बारामाही वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे. घरामध्ये जरी जागा कमी असायची परंतू मनात प्रेमाची उणीव नसायची.मातीची घरं जाऊन सिमे...