Thursday, May 7

Article

खरेदी सोन्याची..!
Article

खरेदी सोन्याची..!

हिवाळ्याचे दिवस होते. डोंगराचं पोट चिरुन सूर्य हळूहळू वर येत होतं. हिरानगर जाग झालेलं होतं . सोनेरी सूर्य किरणे आकाशाला झाकत होती. गुलाबी लालसर रंग पांघरुन आकाश पशुपक्षांना खुणवत होतं. चिमण्यांचा चिवचिवाट सुरु होता. बरेच पक्षी थंडीमध्ये गुपचूप बसलेले होते. वातावरण शांत होतं;पण मध्येच टिटवी टीव टिव टिटी टिवचा सुर धरलेली होती.हिरानगर गावात बाईगड्याचा वावर सुरू झालेला होता. थंडी अंगाला झोबत होती.हातपाय गार पडत होते. म्हातारीकोत्तारी, लहान शेंबडी मुलं शेंबूड ओढत, खोकलत शेकोटया जवळ बसली होती.गावातील तरुणमंडळी शेताकडे निघाली होती. कोणाच्या हातात कोयता होता. तर कोणाच्या हातात कत्ती होती. कंठीरामदादाही शेताकडे निघाला होता. हातात विळा, अंगाला गोधडी लपेटलेली. थंडीने दातांचा कुडकुड आवाज येत होता. शेत गावाच्या वरलाकडे होतं.कंठीरामदादा शेतात पोहचलं. शेताच्या जवळच...
आई : सृष्टीनिर्माती?
Article

आई : सृष्टीनिर्माती?

 हा निसर्ग. हा निसर्ग रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक व्यक्ती वा सर्व प्रकारचे निसर्गातील जीवजंतू जन्म घेत असतात. तसा सर्वांना जन्म घेण्याचा अधिकार आहेच. जर या निसर्गात अशा जीवजंतूचा जन्म झाला नसता तर या निसर्गात दुस-या भाषेत सांगायचं झाल्यास जीवसृष्टी राहिली नसती.          निसर्ग हा रमणीय आहे.  या निसर्गात प्रत्येक सजीव जसा जन्म घेतो, तसाच तो मरतोदेखील आणि जेव्हा तो जन्म घेतो, तेव्हा अविरत आनंद असतो आणि जेव्हा मरतो, तेव्हा साहजीकच दुःख होतं. या दुःख प्रसंगी काही जीवजंतू शोक व्यक्त करतात तर काही तसा शोक व्यक्त करीत नाही. तसंच ज्यावेळेस प्रत्येक जीवजंतूचा जन्म होतो, त्याचवेळेस त्याचं मरणही ठरलेलं असतं. मग कितीही औषधोपचार केला तरी.          जन्म........प्रत्येक जीवाच्या जन्माचा कालावधी हा ठरलेला आहे. काही काही प्राणी आपल्या आईच्या गर्भात एका सेकंदापेक्षा कमी काय राहतात तर काही प्राणी अने...
डॉक्टर साहेब, जेनेरिक (स्वस्त) औषधी लिहा !
Article

डॉक्टर साहेब, जेनेरिक (स्वस्त) औषधी लिहा !

वो दर्द भी देते है, वो दवा भी बेचते हैं, सुना हैं हमने वो तो डॉक्टरी के पेशे मे हैं।              भारतात महागड्या औषधींचा बाजार खूप मोठा असून सतत वाढत आहे. प्रत्येक घरात कमी-जास्त प्रमाणात कोणती न कोणती औषधी लागतेच. तर औषधींच्या किंमती अनेक वेळा सर्वसामान्यांना परवडणार्‍या नसतात, त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडते. तेव्हा जेनेरिक (स्वस्त) औषधी हाच एकमेव मार्ग असतांना, ह्या स्वस्त औषधी डॉक्टर लिहून देत नाही, म्हणून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जेनेरिक (स्वस्त) औषधी न लिहिणार्‍या डॉक्टरांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जारी केल्याचे वृत्त गुरुवारी एका वृत्तवाहिनीने दिले आहे. तर रुग्णांनीच डॉक्टर साहेबांना जेनेरिक (स्वस्त औषधी) लिहून मागाव्यात आणि डॉक्टर लिहून देत नसल्यास ‘मोदीजी ने बोला है, जेनेरिक दवाई लिखीए’ असे सांगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.          केंद्र सरकारच्या रिपोर्टनुसार भारता...
Article

सार्वजनिक स्वच्छतागृह आणि आपली जबाबदारी.!

अनेक ठिकाणी स्वच्छतागृह आणि स्वच्छता यांचा  प्रश्न ऐरणीवर  असताना या विषयावर लिहिण्याचा विचार  काही ठिकाणी गेल्यावर लक्षात  आला...अनेक सार्वजनिक ठिकाणे  पाहता  स्वच्छता, साफसफाई  बाबतीत बदनाम  आहे.की कर्मचारी  साफसफाई  करत  नाहीत. परंतु  किती प्रमाणात आपण त्यांना दोषी  ठरविणार... परवाच  एका सार्वजनिक ठिकाणी  वॉशरूममध्ये किळसवाना  प्रकार, घाण, कचरा पाहवयास मिळाले. सुशिक्षित आपणास समजून  ही तरुण  पिढी  कसे  वागतात.खेड्याचे  येडे म्हणणे  सोपे पण  ही शहरातील  डिजिटल पिढी पाहता कोणाला शिक्षित  म्हणावे... टॉयलेट आणि बाथरूममध्ये पडलेले घाणेरडे  सॅनिटरी  नॅपकिन बापरे काय सांगावे? घरी  असे करतो  का आपण? आपले पॅड्स   घरात कुठेही  फेकतो का खरं तर  ही गोष्ट महिला असो की मुली त्यांना सांगायची गरज नाहीच तरी आज  या विषयावर  लिहावेसे वाटले..प्रत्येक अर्थात बस स्टॅन्ड, बागबगीचे, शॉपिंग मॉल्स,दवाखाने चि...
म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत..!
Article

म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत..!

तुम्हालाहा हा प्रश्न पडला असेल कि रेल्वेचे इंजिन का बंद करत नाहीत, कारण त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. तरीही रेल्वे इंजिन बंद करण्यात का येत नसेल? तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकावर जा तिथे कितीही वेळ रेल्वे थांबली तरी त्या रेल्वेचे इंजिन कधीच बंद करण्यात येत नाही. जर काही तांत्रिक बिघाड झाला तरच रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येते, तर यामागे डिझेलचे इंजिन ही खरी समस्या आहे.डिझेल इंजिन बंद केल्यास लोको पायलट आणि प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो. डिझेल इंजिनची तांत्रिक बाजू किचकट असते. यामुळे लोको पायलट ते बंद करण्याऐवजी ते सुरुच ठेवतात. त्यामुळे पुन्हा डिझेल इंजिन सुरु करण्याच्या कटकटीतून वाचता येते. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर थांबते, त्यावेळी रेल्वेचा इंजिन ब्रेक दबाव सहन करु शकत नाही, दबाव तयार करण्यासाठी रेल्वेला मोठा वेळ लागतो. ट्रेन थांबल्यानंतर शिटीसारखा एक आवाज येतो. हा रेल्वेवरील...
आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!
Article

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार, पण ती सुरूवातीची दोनेक वर्षे मला तिचं कमालीचं आकर्षण होतं. म्हणजे पहिल्यांदा तिला पाहिलं ना, तेव्हा मनात काय काय फिलिंग्स आल्या होत्या, हे सांगायला शब्द पण नाहीत. म्हणजे अगदी ती भेटायच्या अगोदर किती तरी वेळा तिचा माझ्या मोबाईल मध्ये असलेला फोटो मी पुन्हा पुन्हा बघायचो. भेट झाल्यावर तेव्हा आमचा सहवासही खूप होता.   तिच्याबरोबर कुठे आणि काय काय धमाल केली हे लिहायचं ठरवलं तर, एखादी दीर्घकथाच तयार होईल. ती सोबत असली की मला अगदी परिपूर्ण असल्याचं फिलिंग येत असे. कारण ती होतीच तशी.                   मला ती कायमच हवीहवीशी वाटायची. तिची सोबत खूप आनंद द्यायची. ती सोबत असली की, चारचौघांत रूबाबदारपणा यायचा. पण पुढे तिने स्वतःहून संबंध कमी केले. तिनं का असं केलं, समजलं नाही. माझ्यावर ती का नाराज झाली, कळले नाही. दर दिवसाआड होणारी आमची भेट महिना-दोन महिन्यात...
अपस्मार किंवा फिट येणे – Epilepsy
Article

अपस्मार किंवा फिट येणे – Epilepsy

आपण अनेकदा रस्त्यावर किंवा आजूबाजूला पाहतो की एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते आणि ती व्यक्ती स्वतःचे हात आणि पाय अगदी घट्ट आवळून ठेवते, शरीराच्या विचित्र हालचाली करते आणि त्याच्या तोंडातून फेस किंवा लाळ येऊ लागतो. या विकारास फिट येणे, फेफरे येणे, मिर्गी किंवा एपिलेप्सी (Epilepsy) असेही म्हणतात.   अपस्मार हा चेतासंस्थेचा (मेंदूसंबंधी) आजार आहे. रुग्णास वरचेवर असे अपस्माराचे झटके येत असतात. जन्मतःच मेंदूत असणारा एखादा दोष किंवा डोक्याला अपघातामुळे झालेली इजा यांमुळे अशा प्रकारचे फेफरे किंवा झटके येतात. अपस्मार हा कोणत्याही वयातील लोकांमध्ये आढळतो, अनेकदा लहान मुलांमध्ये असणारा अपस्माराचा त्रास हा वयानुसार वाढत जातो. या आजारात येणाऱ्या फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते.   *अपस्मार आजाराची लक्षणे - Epilepsy symptoms : ◆रुग्णाचा अचानकपणे शरीराचा सं...
उपेक्षित मराठवाडा
Article

उपेक्षित मराठवाडा

 भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले. कोणत्याही देशाचं इतिहास पहाता देशाच्या जीवनात हा काळ फार मोठा नाही. पण दिडशे वर्ष गुलामीत जगलेल्या, गुलामी सहन केलेल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे देशाच्या जीवनात सोनेरी क्षणच आहे. स्वातंत्र्याच क्षण हे आनंदाचं क्षण आहे. प्रत्येक भारतीय आज आनंदाने आपल्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहे.केंद्र व राज्यस्तरावर विधिव कार्यक्रम घेवून हे वर्ष साजरे करत आहेत .            भारत स्वतंत्र झाला. आपण गुलामीतून , गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालो. संपूर्णजग झोपले होते तेव्हा भारत जागा होता. स्वातंत्र्याचा अनमोल क्षण साजरा करत होता ;पण भारतातील त्याकाळातील काही असंतुष्ट आत्मे भारतात सामिल होण्यास नकार देत होते. त्यांना त्यांचा स्वतंत्र कारभार थाटायचा होता. स्वातंत्र्यापूर्वी भारतात ५६५ संस्थान होते. त्यापैकी ५६२ संस्थान भारतात विलीन झाले ....
Article

हे जग तुमचं आहे.!

  प्रिय मुलानो, आज मला तुमच्याशी मनसोक्त बोलायचं आहे, कधी कधी वाटतं, तुमचं वय आणि तुमचा अनुभव आणि समजून घेण्याची कुवत लक्षात न घेता प्रौढ गुंतागुंतीच्या अडचणीच्या विषयावर माझ्या मनाला कठोर शिस्तीत बांधून जास्त मोकळेपणाने बोलणार आहे.                  मला माहित नाही तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत आहात पण जेही विचार कराल तेच मी माझ्या व्यक्तिमत्त्वाचं बक्षीस समजतो, मुलांनो मोठेपणाची एक जबाबदारी असते जेव्हा तुमच्यावर अडचणीची वेळ येईल तेव्हा तुम्ही अभिमानाने कर्तव्य निभावण्यात तुम्ही तसंही कमी पडणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे.   समोरील जीवन कोणत्या धारेला लागतील त्यात किती खाचखळगे असतील हे मी आता तुम्हा पोरांना कसं सांगू शकतो बरं! म्हणून डोळे मोठे करून,नाकाचे शेंडे लाल करून माझ्याकडे रागाने बघू नका, तुम्ही कितीही उसासे, सुस्कारे टाकलेत तरी तुम्हाला न  आवडणाऱ्या विषयावर मी बोलणार आहे.   ...
कपाळावर कुंकू का लावतात?
Article

कपाळावर कुंकू का लावतात?

विवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल, पण यामागील कारण काय? हे विचारल्यावर केवळ यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणंदेखील आहेत.   कुंकाने ताण दूर होतो. कुंकात मक्युरी अर्थात पारा असतो. कुंकूमध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतो, आणि डोकं शांत राहतं. लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की, याने रक्त संचार सुधारण्यासह यौन क्षमतादेखील वाढते.   * सौंदर्य वाढतं : कुंकू लावल्याने महिलांचा सौंदर्यामध्ये अजून भर पडते. अर्थातच महिलांचे सौंदर्य खुलून उठते. कुंकू लावण्याने चेहर्‍यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाहीत. तसेच कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो. कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्रावर दाब दिला जातो. त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.   *एकाग्रता वाढते : ...