Saturday, March 7

Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर   आपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.   भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला.    रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड  असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते.  त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना  वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांचे खरे ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी अमृत ठेवा
Article

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी अमृत ठेवा

 भिमजयंती निमित्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी " अमृत ठेवा - यशस्वी व उज्जवल मार्गासाठी "   महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच सोबतच समग्र भारतीयांच्या जीवनात महान क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केले.    महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे  शोषितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत शिक्षणाच्या बळावर एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केले असून एक प्रकारे भारताची पायाभरणी केली आहे.अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य ...
वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान.!
Article

वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान.!

वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान     क्रांतिघोष करून आंदोलनाचा चालून जा रे आंबेडकर वीरांनो मृत्यूतत्त्ववादी बंडलबाजाचा फसवा चेहरा उजागर करा वीरांनो ...   प्रस्तावना : आंबेडकरवाद हा एक मुलतः परिवर्तनीय महाऊजेचा मुख्य स्त्रोत आहे. भारतीय समाजाला व जगातील सर्व मानवाला नव्या मूल्यमंथनाचा नवा अविष्कार देणारा महाप्रकल्प आहे. आंबेडकरांच्या क्रांतीत्त्वाने भारतीय समाजाचा ,शिक्षणाचा, राजकारणाचा, धर्माचा व विज्ञानाचा चेहरामोहराच बदललेला आहे. आंबेडकरवादी आंदोलनाने देशाला नवी मूल्यसंहिता दिली आहे .धगधगत जळणाऱ्या मानवाला धम्माची शांतता देण्याचे काम आंबेडकरवादी आंदोलनाने केलेले आहे. आंबेडकरवादी आंदोलन हे समता मुलक मानवतावादी विचारांचा मूल्यजागर आहे.     भारतीय समाजातील विषमतामय मुळांना आग लावून समतेचे मानवीय सरोवर निर्माण करणारा संवेदनशील आविष्कार म्हणजेच आंबेडकरवाद होय .आंबेडक...
Article

युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ

युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख  एक संग्राह्य ग्रंथ आज दि.10 एप्रिल 2023 ला असलेल्या डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त " युगद्रष्टा सत्यशोधक डॉ.पंजाबराव देशमुख एक संग्राह्य ग्रंथ " हा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -------------------------------------आज दि.10 एप्रिल 2023 रोजी असलेल्या शिक्षण महर्षी -कृषी महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. भाऊसाहेब देशमुख यांना लहानपणापासूनच शेतकऱ्यांविषयीची जाण होती, कळवळा होता कारण ते जन्माने आणि कर्माने भूमिपुत्र होते . शेतकऱ्यांच्या सहवासात त्यांचे बालपण गेले म्हणून त्यांना भारतीय शेती जगाच्या तुलनेत मागे असल्याची जाणीव होती . भारताचा विकास शेतीच्या विकासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.हा त्यांचा विचार आजही तेवढाच मोलाचा आहे,त्यांनी तत्कालीन काळात  शेतकऱ्यांसाठी र...
गुड फ्रायडे…
Article

गुड फ्रायडे…

गुड फ्रायडे...   गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिश्चन धर्मातील समजूतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉस वर चढवण्यात आले होते. याची आठवण ठेवून ख्रिस्ती धर्मात हा दिवस शोक दिवस मानला जातो. या दिवसाला गुड फ्रायडेला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी काही ख्रिश्चन बांधव उपवास ठेवतात, ख्रिश्चनांचा चाळीस दिवसांचा उपवास काळ म्हणजे लेंट सिझन दरवर्षीं मार्च-एप्रिल याच काळात येतो. नाताळाची आणि इतर ख्रिस्ती सणांची तारीख ठरलेली असते, लेन्ट सिझन आणि यामध्ये येणाऱ्या झावळ्यांचा रविवार (पाम संडे), गुड फ्रायडे आणि इस्टर संडे मात्र याला अपवाद असतो.   या काळात मांस खाल्ले जात नाही, परंतु फळे, भाज्या, मासे, दूध, अंडी आणि गहू यांचे सेवन केले जाते.  जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार, प्रचार करत होते. ख्रि...
Article

शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर

  शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर    शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी या दुधापासून पनीर तयार केले आहे. शेळीच्या दुधामध्ये असलेल्या औषधी, पोषणमूल्य, जैविक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पूरक गुणधर्मामुळे लोकांमध्ये मागणी वाढत आहे, अनेक दुर्धर आजारावरही शेळीचे दूध फायदेशीर ठरते. मात्र शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात. वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक आणि डॉ. प्रवीण सावळे यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. डॉ. प्रशांत वासनिक आणि प्रवीण सावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ...
पत्त्यांची गंम्मत..! 
Article

पत्त्यांची गंम्मत..! 

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ. पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. *बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.*1) 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे *2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. * प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे. *3) या सर्व पत्त्याची बेरीज 364 *4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष. *5)*2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष. *6)*52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने *7) लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ *1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश *2) तिर्री म्हणजे ब...
Article

जगातील पहिला मोबाईल कॉल…!

३ एप्रिल १९७३ रोजी जगातील पहिला मोबाईल फोनवरून कॉल केला गेला. पोर्टेबल फोन या संकल्पनेची सुरूवात १९४६ मध्ये अमेरिकेत झाली होती. बेल सिस्टीम्सच्या मोबाईल टेलिफोन सर्विसने मिसुरी मधल्या सेंट लुईस या शहरात कार टेलिफोन सेवा देण्यास १७ जुन १९४६ रोजी सुरूवात केली. त्या पाठोपाठ इलिनॉईस बेल टेलिफोन कंपनीने हीच सेवा शिकागो शहरात २ ऑक्टोबर १९४६ पासून सुरू केली.   तत्कालीन मोबाईल फोन्स आताच्या फोन्सच्या तुलनेत अजस्त्र म्हणता येतील इतके मोठे आणि वजनाला अंदाजे ८० पाऊंड (३६ किलो) होते. सुरूवातीला या फोन्सवर फक्त ३ चॅनल्सच्या माध्यमातून संवाद साधता येत असे. ही सेवा १९७०-७२ पर्यंत केवळ कार्ससाठीच मर्यादित होती. पण १९७३ मध्ये मोटोरोला च्या पोर्टेबल कम्युनिकेशन प्रॉडक्टस चे चीफ जॉन एफ. मिशेल यांनी छोटेखानी मोबाईल डेव्हलप करण्यात मोलाची भुमिका बजावली.   ३ एप्रिल १९७३ रोजी जॉन एफ. मिशेल यांचे साथीदार मार्टिन ...
जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!
Article

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

* आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते. * सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. * लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात. * ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. * शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते. * लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते. * ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी ...
उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?
Article

उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?

उन्हाळा सुरु झाला की, शरीराची लाहीलाही होते. शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण थंड पदार्थ किंवा थंड पेयाचे सेवन करतो. आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ यासह पाण्याच्या बाटल्या ठेवतो. गर्मी वाढली की, आपण फ्रिजमधील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतो. पण फ्रिजमधील थंड पाणी पिणं आरोग्यासाठी हितावाह नाही. त्याऐवजी आपण मडक्यातील पाणी पिऊ शकता.आयुर्वेदानुसार, मडक्यातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड असते, त्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच असे अनेक घटक मातीत असतात, ज्यात रोगांशी लढण्याची क्षमता असते. उन्हाळ्यात मडक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात(Clay Pot Vs Refrigerator, Which Water Is Healthy? ).* उष्णतेपासून संरक्षण... उन्हाळ्यात मडक्यातील थंड पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. वास्तविक, मडक्यातील पाणी शरीरातील खनिजे आणि ग्लुकोजच...