Thursday, November 13

Article

Article

शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर

  शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर    शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी या दुधापासून पनीर तयार केले आहे. शेळीच्या दुधामध्ये असलेल्या औषधी, पोषणमूल्य, जैविक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पूरक गुणधर्मामुळे लोकांमध्ये मागणी वाढत आहे, अनेक दुर्धर आजारावरही शेळीचे दूध फायदेशीर ठरते. मात्र शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात. वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक आणि डॉ. प्रवीण सावळे यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. डॉ. प्रशांत वासनिक आणि प्रवीण सावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ...
पत्त्यांची गंम्मत..! 
Article

पत्त्यांची गंम्मत..! 

पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ. पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे  किंवा प्लॅस्टिक चे बनविलेले असतात. *बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट.* या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो.  पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशी पर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात.*1) 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे *2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतु. * प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे. *3) या सर्व पत्त्याची बेरीज 364 *4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष. *5)*2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष. *6)*52 पत्यातील 12 चित्र पत्ते म्हणजे 12 महिने *7) लाल आणि काळा रंग म्हणजे *दिवस आणि रात्र.*पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ *1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश *2) तिर्री म्हणजे ब...
Article

जगातील पहिला मोबाईल कॉल…!

३ एप्रिल १९७३ रोजी जगातील पहिला मोबाईल फोनवरून कॉल केला गेला. पोर्टेबल फोन या संकल्पनेची सुरूवात १९४६ मध्ये अमेरिकेत झाली होती. बेल सिस्टीम्सच्या मोबाईल टेलिफोन सर्विसने मिसुरी मधल्या सेंट लुईस या शहरात कार टेलिफोन सेवा देण्यास १७ जुन १९४६ रोजी सुरूवात केली. त्या पाठोपाठ इलिनॉईस बेल टेलिफोन कंपनीने हीच सेवा शिकागो शहरात २ ऑक्टोबर १९४६ पासून सुरू केली.   तत्कालीन मोबाईल फोन्स आताच्या फोन्सच्या तुलनेत अजस्त्र म्हणता येतील इतके मोठे आणि वजनाला अंदाजे ८० पाऊंड (३६ किलो) होते. सुरूवातीला या फोन्सवर फक्त ३ चॅनल्सच्या माध्यमातून संवाद साधता येत असे. ही सेवा १९७०-७२ पर्यंत केवळ कार्ससाठीच मर्यादित होती. पण १९७३ मध्ये मोटोरोला च्या पोर्टेबल कम्युनिकेशन प्रॉडक्टस चे चीफ जॉन एफ. मिशेल यांनी छोटेखानी मोबाईल डेव्हलप करण्यात मोलाची भुमिका बजावली.   ३ एप्रिल १९७३ रोजी जॉन एफ. मिशेल यांचे साथीदार मार्टिन ...
जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!
Article

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

* आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते. * सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. * लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात. * ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. * शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते. * लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते. * ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी ...
उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?
Article

उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?

उन्हाळा सुरु झाला की, शरीराची लाहीलाही होते. शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण थंड पदार्थ किंवा थंड पेयाचे सेवन करतो. आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ यासह पाण्याच्या बाटल्या ठेवतो. गर्मी वाढली की, आपण फ्रिजमधील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतो. पण फ्रिजमधील थंड पाणी पिणं आरोग्यासाठी हितावाह नाही. त्याऐवजी आपण मडक्यातील पाणी पिऊ शकता.आयुर्वेदानुसार, मडक्यातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड असते, त्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच असे अनेक घटक मातीत असतात, ज्यात रोगांशी लढण्याची क्षमता असते. उन्हाळ्यात मडक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात(Clay Pot Vs Refrigerator, Which Water Is Healthy? ).* उष्णतेपासून संरक्षण... उन्हाळ्यात मडक्यातील थंड पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. वास्तविक, मडक्यातील पाणी शरीरातील खनिजे आणि ग्लुकोजच...
Article

हमारी अधुरी कहाणी !

ज्या गोष्टींना कुणीही नाकारू शकत नाही, त्या गोष्टींना युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे शाश्वत सत्य असे म्हणतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पहाटेचं स्वप्न...असं म्हटलं जातं की, पहाटेला बघितलेलं स्वप्न खरं ठरत असतं. तर असेल बहुतेक...एकदा अशाच एका पहाटेला गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला टेक अप करून मी स्वप्नांच्या आटपाट नगरीत जावून लँड झालो. आणि... पुढे बघतो तर काय?   तिच्या प्रशस्त घराच्या उंबरठ्यावर ती उभी असताना माझी नजर तिच्यावर पडताच क्षणी तिचा तो निरागस चेहरा, तिचं स्मितहास्य, तिचा शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे माझ्या ह्रदयरुपी कॅमे-याने तिची प्रतिमा टिपून माझ्या मनपटलावर चित्रित केली. तेव्हापासून माझं तिच्यावर प्रेम बसलं आणि स्वप्न माझं फुलणार, असं वाटायला लागलं. माझ्या आयुष्यातील तो एक अनमोल ठेवा आहे. पण हे स्वप्न सत्यात उतरणार काय? याची अनामिक भीती मनात साचलेली. आपलं पहिलं प्रेम कसं...
Article

समतेची क्रांती – महाड सत्याग्रह

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला.त्यानंतर अनेक वर्षे हा दिवस ' समता दिन ' म्हणून साजरा केला जातो.आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली.परंतु समतेसाठी ' जलक्रांती ' आंदोलन करणारे होते समतेचे खंदे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर.इ.सन.१९२६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले.इ.स.१९२७ च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.महाड येथील चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.देशातील दलितांना उच्चवर्णीयांकडुन खुप अपमानास्पद वागणूक मिळत होती. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास किंवा पिण्यास साधा अधिकार देखील नव्हता. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी.के.बोले यांनी मुंबई प्रांतांच्या विधिमंडळा...
Article

गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ?

* स्त्री चेआरोग्य सांभाळतो गजरा.गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?...गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत.'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ?आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला...
‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?
Article

‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?

'विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का? जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशी सज्जन आणि सभ्य लोकांची अस्वस्थता वाढतांना दिसते आहे. तिकडे मंबाजीच्या हालचालीही वाढत आहेत. मंबाजीची पिलावळ सर्वशक्तीनिशी कामाला लागली आहे. त्यांची भिस्त त्यांच्या स्वतःच्या कुटीलपणावर आहे. देशाच्या लुटीतून गोळा केलेल्या पैशावर आहे. द्वेष हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. चन्द्रभागेच्या पाण्यात विष मिसळण्याची धडपड ते जिवाच्या आकांताने करताना दिसत आहेत. पंढरीचे पावित्र्य अबाधित राखण्याची जशी शेवटची संधी वारकऱ्यांसाठी आहे, तशीच मंबाजीच्या पिलांसाठी देखील, पंढरपूर आणि संपूर्ण चंद्रभागा ताब्यात घेण्याची ती शेवटची संधी आहे. दोन्ही बाजुंनी ’करा अथवा मरा’ अशीच २०२४ची लढाई आहे. विमान विकलं, रेल्वे विकली, एलआयसी विकली, जंगलं विकली, समुद्र विकला, तसे पंढरपूर आणि चंद्रभागा अडाणी-अंबानीच्या नावाने करण्याच्या हालचाली स...
Article

प्रत्येकाची आई महान, तेवढीच महत्वाची.!

आई म्हटलं तर आई या शब्दातच महान अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आधार देणारी व ई म्हणजे ईमानदारी शिकविणारी. आ चा अर्थ आधार देणे असा लावल्यास खरंच आई आधार देते का? असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होय असंच आहे. आई ही आपल्या बाळाला बापापेक्षा जास्त प्रमाणात आधार देत असते. ती सर्वप्रथम आपल्या बाळाला स्वगर्भात नऊ महिने ठेवते. अन्न पाणी पुरवते. त्याचं नवही महिने संरक्षण करते. त्याला त्रास होवू देत नाही. चांगलं संगोपन करते. त्यानंतर ते बाळ जेव्हा गर्भातून बाहेर पडतं. तेव्हा मात्र तिच आई उन्हातून सावलीत नेल्यागत त्याचं गर्भाबाहेरही संगोपन करते. अगदी त्याचा विवाह होईपर्यंत. एवढंच नाही तर विवाह झाल्यानंतरही ती जेव्हापर्यंत आपले डोळे मिटत नाही. तेव्हापर्यंत आपली आई आपल्याला सांभाळून घेत असते. मग आपल्या कितीही मोठ्या चुका असल्या तरी आपली आई त्या पदरात घेवून आपल्याला माफ करते. हा झाला आधाराचा विषय. आता ई चा वि...