Monday, March 9

Article

Osteoarthritis : संधिवात 
Article

Osteoarthritis : संधिवात 

Osteoarthritis : संधिवात बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात. सांधेदुखी कशामुळे होते, त्याची लक्षणे आणि संधिवात वरील उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात सांगितली आहे.दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा joints बनत असते. सांध्यांची हालचाल होताना तेथे असलेली दोन हाडे एकमेकांना घासू नयेत यासाठी तेथे कार्टीलेज नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे हाडे एकमेकांना न घासता सहजरीत्या सांध्याची हालचाल होत असते. मात्र जेंव्हा काही कारणांनी सांध्यातील कार्टीलेजची झीज होते तेंव्हा दोन्ही हाडे एकमेकांना घासू लागतात. अशावेळी तेथे सूज येणे, वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्यरीत्या न होणे असे त्रास होऊ लागतात. या त्रासाला संधिवात असे म्हणतात.तसे पाहिले तर, संधिवा...
जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 
Article

जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे 

जाणून घ्या लाल रंगाची फळं आणि भाज्या खाण्याचे फायदे ◆ टॉमेटो मध्ये लायकोपिन मुबलक प्रमाणात असतं. लायकोपिन प्रोटेस्ट कॅन्सर, ओसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असतं.◆ स्ट्रॉबेरीतील पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन-सी इम्यून सिस्टीमसाठी फायदेशीर असतं.◆ चेरी मध्ये आढळून येणारं एंथोसियानिन शरीराला फ्री रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.◆ लाल राजमा शरीरासाठी लाभदायक असतो. यामध्ये फायबर आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतं. जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर असतात.◆ बीट मध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन-सी, नायट्रेट आणि फोलेट मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते.◆ डाळिंब मध्ये असणारे अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव करण्यास मदत करतात.◆ सफरचंद मध्ये असणारी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट कॅन्सर, डायबेटीज, हायपर टेन्शन आणि हृ...
Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’
Article

Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – ‘ध्येयवेडा डॉक्टर’

Dr. Sujay Patil : डॉ सुजय पाटील – 'ध्येयवेडा डॉक्टर'मानसशास्त्र  Psychology सायकॉलॉजी – मानवी मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्र म्हणजे मानसशास्र. जर्मन तत्वज्ञानी  रुडॉल्फ गॉकेल १६व्या शतकात हा इंग्रजी शब्द आणला. Psyche साईक' (मन)' आणि Logus लोगस (शास्त्र) यापासून हा शब्द तयार झाला. थोडक्यात या शब्दाचा ग्रीक  भाषेत अर्थ आत्म्याचे शास्त्र.मानवी वर्तनाचा केलेला अभ्यास तसा सोपा नाही. व्यक्तिगणिक त्यात वैविध्यता दिसून येते. पिंड पिंड मतिर्भिन्ना या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आयक्यू वेगवेगळा असतो त्यानुसार त्याचे वर्तन बदलत असते. या वर्तनाचा अभ्यास करतांना विविध प्राण्यांवर आधी प्रयोग करावे लागतात त्यानुसार त्यांनी कारणमीमांसा कळत असते. इतरांच्या मनाचा अभ्यास करून त्याच्या मनातले काढून त्याला आपल्या मनाच्या प्रवाहात आणणे हे एक कौशल्य असते. असे कौशल्य कुणालाही जमत नाही. त्यासाठ...
पारावरच्या गप्पा….!
Article

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा....!खालच्या आळी चा दादा" देवळा समोर बसलेल्या पोरांना काय तरी सांगत व्हता. लांबून ऐकू येईना म्हणून , जवळ जाऊन ऐकाव म्हणून आप्पा "देवळा जवळ आला.आप्पा काही झालं तरी इरोधी पार्टीचा. त्यामुळं त्याला दादा नेमकं काय बोलतोय हे जाणून घ्यायला  आप्पाला मोकर उत्सुकता.आता दादा म्हंजी मोठी आसामी त्यात गावातल सरपंच पद राखीव असल्यामुळे  उपसरपंच पद दादा कड व्हत. पांढरी फॅक कापड . उंची बी चांगली शरीर पण धडधाकट , म्हणतात ना टक्कलम कवचितच दारिद्रम...अगदी तसच डोक्यार टक्कल , पण हुशार आणि लै अक्कल असल्या मुळे  दादा  गावगड्यात नेहमी पुढंअसणार .शिवाय दादा चा चुलता,म्हंजी नुसतं गावात नाय तर तालुक्यात गाजलेला  कोणाच्या ही हातात न आलेला पैलवान. पण दादा नि त्या चुलत्याला सुद्धा चित करून ,असा डाव टाकला की ईचारु नका...!दादा पोरांना म्हणत व्हता शिकून कोणाच भल झालं हाय तव्हा ! माह्या कड बघा मी किती...
शेतकऱ्यांचे  गाडगेबाबा…
Article

शेतकऱ्यांचे  गाडगेबाबा…

शेतकऱ्यांचे  गाडगेबाबा...संत गाडगेबाबानी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत प्रचंड योगदान दिले आहे.त्यांची सामाजिक क्रांती अनुयायांनी खराट्यात बंदिस्त केली. त्यामुळे त्यांनी दिलेली सामाजिक क्रांतीची हाक ऐकण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला.त्यांच्या आंदोलनास वेगवेगळे  क्रांतिकारी पदर आहेत. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील महाभयानक अन् तितक्याच क्रूर टोळ्यांना त्यांनी आपल्या प्रखर वाणी अन् कृतीतून उध्वस्त केले. संत गाडगेबाबांनी ज्या वर्गासाठी लढाई उभी केली तो वर्ग इथला कृषक अर्थात शेतकरी वर्गच होता. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगात शेतकऱ्यांविषयी जो कळवळा होता तोच कळवळा संत गाडगेबाबांच्या मांडणीत दिसून येतो. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या शोषण मुक्तीचे आंदोलन होते.शेतकरी शहाणा व्हावा, तो धार्मिक अन् आर्थिक शोषकांच्या तावडीत सापडू नये यासाठीच संत गाडगेबाबांनी ...
संत गाडगेबाबा : एक चालते बोलते संस्कार पीठ
Article

संत गाडगेबाबा : एक चालते बोलते संस्कार पीठ

Sant Gadgebaba : संत गाडगेबाबा :- एक चालते बोलते संस्कार पीठ ---------------------------------------- अशिक्षितपणामुळे समाजाची काय हानी होते. हे अगदी जवळून पाहिल्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहचावी यासाठी एका अडाणी असलेल्या अवलियाने अफाट प्रयत्न करून शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे समाजाला पटवून दिले. आणि ते विद्वान म्हणजे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा होय. गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजजी जानोरकर होते. गाडगे बाबाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील व्यसनाने ग्रासलेले होते. व्यसनामुळे आपल्या परिवारावर सुद्धा त्यांचे दुर्लक्ष होते ,त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था होती. आणि बालवयात गाडगे बाबा आपल्या घरची ही सर्व परिस्थिती पहात होते. आपले वडील अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना व्यसन...
कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी  व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’
Article

कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा ‘बिब्बा’

कष्टक-यांच्या जखमेवर गुणकारी व व्यवस्थेला उबजणारा विजय ढालेचा 'बिब्बा'------------------------------------"किती बांधू मी पडाय खांडकाले काळ्या बिब्ब्याचं रोग निदान ज्यानं केलं तो वैद आजारी होता ! " 'बिबा' हे औषधी गुणयुक्त व त्याचे फुल आणि गोळंबी खाण्यासाठी उपयोगात पडणारे जंगली फळ आहे. हा एक प्रकारचा रानमेवा आहे. पण या फळाचा काळ्या रंगाचा भाग (बिबा) हा गावाकडील कष्टकरी, शेतकरी लोक तळपायाला जर काटा रुतला, काडी रुतली, कापलं तर त्या जखमेवर जाळावर गरम करून त्याच्या तेलाचा चरका (चटका किंवा डागणी) देतात. बिब्याचं पडयही बांधतात. त्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते व वेदनाही कमी होते. कवी विजय ढाले हा शेतकरी, कष्टकरी आहे. त्याला याचा वापर कसा व कुठे करायचा ? याचे ज्ञान आहे. आणि म्हणूनच त्याने कवितासंग्रहाचे शिर्षक बिब्बा असे वापरले असावे. तो त्याकडे प्रतीक म्हणून बघत असावा. पुर्वीपासून ये...
पाहुया पेडगावचे शहाणे..!
Article

पाहुया पेडगावचे शहाणे..!

पाहुया पेडगावचे शहाणेबऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठलले गाव का नाही ? पाहुया तर मग :६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण : अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की ...
पारावरच्या गप्पा….!
Article

पारावरच्या गप्पा….!

पारावरच्या गप्पा....!अय.....चेरमन आर कुड चालला ! तू तर मोकार बाता मारीत व्हता. आपला लै वट, खासदार ,मंत्री आन आमदार साह्यबा जवळ. ! मस  सारी दुन्या येऊन गेली की गावात कुड गेली मदत .ती पन तात्काळ की फात्काळ  येणार व्हती नव्ह . आता त ,थेट नागपुरात हाय हिवाळी अधिवेशनात  समद मंत्री संत्री, आन आमदार ! तिथं काय ठरलं का ? तुला फोन केला असलं की  तुह्या  ..साह्यबानि.. रामभाऊ थोडा हसला आणि म्हणाला अस पण तुमची इज्जत काय त्य माहीत हाय.जवळून जाणाऱ्या कुत्र्याला जोरदार हाड, आर हाड....! अस म्हणत त्याने विषय बदला आणि पुन्हा बोलू लागला. नाय तरी तिथं जाऊन तरी काय करत्यात म्हणा .सरकारी खर्च उगाच यर्थ अशी गत हाय भो नागपूर अधिवेशनात नाय का चेरमन!चेरमन हसला,आणि बोलू लागला. गारपीट झाली त्या येळी तुह्या थोबाडाव" गार  का नाय पडली भली मोठी. .? गप्प.. तरी राहिला असता. सारखी वलवाल लावली गावभर . इरोधी पार्टी नि खर्च...
फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!
Article

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!

फ्रिजमध्ये लिंबू कसे टिकवून ठेवाल.!   लिंबाचा वापर सर्वांच्याच घरी केला जातो. (Kitchen Hacks) वेगवेगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबू एसिडीक असतो म्हणूनच लिंबू योग्य तापमानात स्टोअर करावे लागतात. अन्यथा लिंबू लवकर खराब होण्याची शक्यता असते.   लिंबांची शेल्फ लाईफ खूपच कमी असते म्हणूनच ते लवकर सुकतात. (Food Hacks) लिंबू स्टोअर करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फ्रिजमध्ये लिंबू ठेवल्यानंतर ते काही दिवसांनी सुकतात किंवा काळे पडतात. लिंबू महिनोंमहिने ताजे रहावेत यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता.   * लिंबू पाण्यात घालून ठेवा : लिंबू जास्त दिवस चांगले ठेवण्यासाठी पाण्याने भरलेल्या काचेच्या भांड्यात ठेवा. सगळे लिंबू पाण्याने भरलेल्या जारमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून अनेक दिवस लिंबू ताजे आणि रसाळ राहतील.   * लिंबू कलिंगड आणि सफरचंदाबरेबर ठेव...