Monday, March 9

Article

नागपूरच्या कर्तव्यदक्ष  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी  बिदरी 
Article

नागपूरच्या कर्तव्यदक्ष  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी  बिदरी 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त तिसरा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा तिसरा लेख.- संपादकनागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांचा पहिला माझा परिचय आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कोरोना काळातील ऑनलाइन मिटिंगमध्ये झाला. कोरोना काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जवळपास 1100 ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कोरोना काळामध्ये मिशन आयएएस अमरावती व ज्ञानदीप महाविद्यालय खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमात तेव्हा श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी ह्या  सिंधुदुर्ग...
कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर 
Article

कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त दुसरा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा दुसरा लेख.- संपादकनागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी. या उपराजधानी मध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून अतिशय कर्तबगार धाडसी महिला पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती श्वेता खेडकर हे त्यांचे नाव. श्रीमती श्वेता खेडकर ह्या मूळच्या अमरावतीच्या. त्यांचं शिक्षण अमरावतीमध्ये झालं. त्यांच्या घरात कोणीही पोलीस खात्यात कार्यरत नव्हते. परंतु त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि या उपायुक्त पदापर्यंत मजल मारली. खरं म्हणजे त्यांचा स्पर्धा परीक्षा तयारीचा मार्ग आपण पाहिला तर तो खूपच खडतर आहे .पण जितने वाले कोई...
मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव  मेट्रो वुमन अश्विनी भिडे आय ए एस 
Article

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव  मेट्रो वुमन अश्विनी भिडे आय ए एस 

8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त पहिला लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील लेख आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा पहिला लेख.- संपादकमहाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जे अधिकारी कार्यरत आहेत त्यामध्ये अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे सचिव डॉ. श्रीकर परदेशी व प्रधान सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांचा समावेश आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी त्या मुख्यमंत्री कार्यालयात रुजू झाल्या. श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांना संपूर्ण देश मेट्रो वुमन म्हणून ओळखतो. कला शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी असताना त्यांनी मुंबई मेट्रो मध्ये जे अतुलनीय काम केलेले आहे त्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना मेट्रो वुमन ही सार्थक पदवी दिलेली...
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन
Article

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रजांचा २७ फेबुवारी जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला.मराठी राजभाषा दिन हा मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे. मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन हा महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांचे योगदान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये अनमोल आहे.मराठी राजभाषा दिनी मराठी भाषेचा गौरव करावा आणि तिच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करावे.मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा प्रसार करावा. मराठी भाषेचे संवर्धन करावे त्यासाठी लोकांना मराठी भाषेच्या वापरासाठी लोकांनी आग्रही असणे आवश्यक आहे. कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या विविध साहित्यकृती आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान या विषयाला अनुसरून मराठी राजभाषा दिन...
मराठीची बोलू कौतुके…
Article

मराठीची बोलू कौतुके…

माझ्या मायमराठीची बोलू किती कौतुकेपरि अमृतातेही पैजा जिंकेकिती वर्णाव्या त्या गाथा माझ्या मायमराठीच्या ...अवघ्या महाराष्ट्रात२७ फेब्रुवारी हा दिवस* मराठी भाषा गौरवदिन* म्हणून साजरा केल्या जातो... नाशिकच्या जन्मभूमीत जन्मलेल्या विष्णू वामन शिरवाडकरांनी मराठीला मोलाचे सांस्कृतिक योगदान दिले.ते उत्कृष्ट,कवी,लेखक,नाटककार आणि उत्तम समीक्षक होते.मराठी साहित्याचा उचित गौरव व्हावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांचे योगदान फार मोलाचे होते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस * म्हणून साजरा होतो.     माझ्या मायमराठीचा इतिहास फार प्राचीन आहे... सोळाव्या शतकापासून ते आजतागायत मायमराठीचे गोडवे गाणाऱ्या कितीतरी समृद्ध गाथा याची ग्वाही देतात. श्री‌ चक्रधर,म्हाईंभट यांनीही मराठीला प्रोत्साहन दीले. 'लिळाचरित्र' हा मराठीतला आद्य ग्रंथ. श्रीकृष्णचरित्र,भगवतगीता, चर...
कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट
Article

कवी श्रेष्ठ स्व. सुरेश भट

गुरुवार दिनांक 27 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन संपन्न होत त्यानिमित्त मराठीतील एका संपन्न गझलकाराचा करून दिलेला हा परिचय.कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा इतका जवळचा संबंध येईल असे कधीच वाटले नाही .पण आमचे पितृतुल्य मित्र डॉ. श्री मोतीलालजी राठी प्रा.मधुकर केचे रामदास भाई श्राफ अरविंद ढवळे मीनाताई ढवळे दादा इंगळे वली सिद्धीकि डॉ.भाऊ मांडवकर या सर्वांमुळे मी सुरेश भटांच्या फार जवळ गेलो आणि शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिलो .मी तेव्हा अमरावतीच्या तपोवनमध्ये राहत होतो .दाजीसाहेब पटवर्धन व त्यांची कन्या श्रीमती अनुताई भागवत यांनी माझे सामाजिक कार्य लक्षात घेऊन मला माझ्या निवासस्थानी लागूनच असलेले एक पाच कक्ष असलेले पाच खोल्यांचे अतिथीगृह माझ्या हवाली केले होते. सुरेश भटांचे आमच्याकडे आगमन झाले म्हणजे ते त्या अतिथीगृहामध्ये थांबत होते .हे अतिथीगृह माझ्या घराला लागूनच असल्यामुळे सुरेश भट...
गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !
Article

गावाकडच्या गोष्टी – अनुभवसमृद्ध आठवणी !

माझ्या परिचयातील एका जवळच्या व्यक्तीने शहरात स्थिरस्थावर झाल्यानंतर     मध्यंतरी आपल्या गावाला गेल्यावर तेथील शेतातील पिकाचे, परिसराचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. ते फोटो पाहून मी, ‘माणूस गावापासून दूर गेला की जास्त प्रमाणात आपलं गाव काळजात जपत असतो’ अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याचं कारण म्हणजे,               'ओढ लावते या जीवाला गावाकडची माती, वाट पहात असतात आपुलकीची नाती.' या माझ्यासारख्या अनेक व्यक्तींच्या मनातील बोलक्या भावना होय.‘आपण खूप खूप शिकून मोठ्ठं व्हावं’ असं लहानपणी प्रत्येकालाच वाटत असलं तरी शिकून मोठ्ठं झाल्यावर आपण आपल्या गावाला पारखं होणार, परकं होणार याची किंचितसुद्धा कुणाला कल्पना नसते आणि होतंही तसंच... पोटापाण्यासाठी गावाला मुकावं लागल्यावर शहरात किंवा दूर ...
दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!
Article

दशरथ मांझींची प्रेरणादायी भेट!

दशरथ मांझी यांचा जन्म १९३४ साली बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलौर या छोट्याशा गावात मजूर कुटुंबात झाला.त्याचे कुटुंबिय पडीक जमिनीवर शेती करीत.मजुरीही करीत. त्यांचं जगणं हलाखीचं  होतं. त्यांना शाळेत जाण्याची संधी न मिळाल्याने ते निरक्षर राहिले.मात्र बालपणापासून ते संघर्षशील,जिद्दी होते.पुढे फाल्गुनी देवी या तरूणीसोबत त्यांचं लग्न झालं.त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं.तिच त्यांच्या जगण्याची प्रेरणा आणि शक्ती होती.त्यांना एक कन्यारत्नही झालं.जीवन कष्टमय असलं तरी आनंददायी होतं.अचानक पत्नी आजारी पडली.तिच्या उपचारासाठीचा दवाखाना ५५कि.मी.अंतरावर होता.त्यासाठीचा रस्ता अवघड पर्वतांवरून जात होता.पत्नीला रूग्णालयात उपचारासाठी घेऊन ते निघाले.हा प्रवास जीवघेणा, खडतर असाच होता.प्रवासाची दगदग सहन न झाल्याने, वाटेतच पत्नी फाल्गुनी देवीचं निधन झालं.या दुखद घटनेचा मांझी यांच्या मनावर आघात झाला. केवळ योग्य...
हरभर्याचा हुया
Article

हरभर्याचा हुया

पौष महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे आमच्या ग्रामीण बोली भाषेत या महिन्याला पूस म्हणत. मकरसंक्रांती (तीसकरात हे तीळसंक्रांतीचा झालेला अपभ्रंश) सरली म्हणजे महिलांना वाणात वाटायला हिरवाकच हरभरा लागायचा. बस काही हप्त्यात बऱ्याच लोकांची हरभऱ्याची शेतं सोगांयला तयार असायची. एरव्ही दिवाळी पासून दोन महिने सलग शिदोरी सोबत घेतली म्हणजे वावराची सोकारी करायला लागायची.तसा फक्त गवत कापणाराईचा व कापूस वेचणाऱ्या बायाईचा बराच काव असायचा. आता खायची गोष्ट तर खाणाचं तुम्ही सोकारी करा की आणखी काही करा.पंरतु मायेच्या भारे नेणाऱ्यांची संख्याही काही कमी नसायची.बरं हरभरा घेतांना दिसलाच व आपण हटकलंच तर"बस मुठभरच घेतो भाकरसंग खायले" असं बोलून मोकळं व्हायची एवढं बोलल्यावर आपण काय डोक्सं आपटणार. असा तो मजेशीर किस्सा असायचा. आमच्या धुऱ्यावरच कुऱ्हाडे बुडण्याच्या मेरीवर बाभुळचं गर्द हिरवगार झाड अजूनही शाबूत आहे. त्या...
कौटुंबिक सामंजस्य: एक आकलन
Article

कौटुंबिक सामंजस्य: एक आकलन

कुटुंबामध्ये आपुलकी, जिव्हाळा, भावना, प्रेम, राग, लोभ अशा अनेक बाबींचा अंतर्भाव असतो. माता, पिता व अपत्य आणि अन्य आप्तसंबंधी व्यक्तींनी मिळून कुटुंब तयार होत असते. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कुले कुटुंबास ‘प्राथमिक समूह’ असे म्हणतात. कुटुंबाचे संयुक्त, विभक्त, भग्न असे प्रकार पडतात. पूर्वी संयुक्त कुटुंबाचे प्रचलन मोठ्या प्रमाणात होते.‘एकमेकास साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे कुटुंब कार्यप्रवण राहत असे. मानवी जीवनाला शिस्त, सुकरता आणि सुलभता यावी म्हणून कुटुंबाची निर्मिती झाली. लैंगिक गरजांची पूर्ती, प्रजोत्पादन, संगोपन,योग्य सामाजिकरण अशा अनेक महत्त्वपूर्ण समाजमान्यभूमिकांची व्यवस्था कुटुंबाद्वारे केली जाते. त्यामुळेच विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यांचा जवळचा सहसंबंध असतो. मानवाचे जतन, बाल संगोपन, सुयोग्य सामाजीकरण, मानवी जैविक घटकांचे समाजशील मानवी प्राणी बनवण्याची प्रक्रि...