Saturday, May 2

Blog

20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा
News

20 वर्षे जुनी गाडी चालवण्यासाठी नवे नियम : दुप्पट शुल्क, फिटनेस टेस्ट आणि ग्रामीण भागाला दिलासा

नवी दिल्ली : वीस वर्षे जुनी गाडी रस्त्यावर ठेवण्यासाठी आता वाहनमालकांना काही महत्त्वाच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने ठरवलेल्या नव्या नियमांनुसार 20 वर्षे पूर्ण केलेल्या वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरण आणि फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे.यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार असून स्वतंत्र फिटनेस तपासणीही होणार आहे. इंजिन, ब्रेक, टायर, लाईट यासह वाहनाच्या प्रत्येक भागाची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रदूषण उत्सर्जन (PUC) निर्धारित निकषांनुसार आहे का हे तपासले जाणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर धावू शकेल.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!खासगी वाहनांसाठी नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क जास्त असणार आहे, तर व्यावसायिक वाहनांसाठी आणखी कडक अटी लागू होणार आहेत. शहरी भागात वाढत्या प्रदूषणामुळे हे नियम कडकपणे राबवल...
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका
Article

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिका

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश : तरुण आणि नेत्यांची महत्वाची भूमिकाबंजारा समाजाचे मूळ खूप प्राचीन काळात आहे.काही संशोधकांच्या मतानुसार बंजारा लोक मूळ राजस्थानातून स्थलांतरित झाले.बंजारा समाज "लदेणीकार" म्हणून ओळखला जात होता.त्यांनी मीठ,धान्य,धातू,वस्त्रे इत्यादी वस्तू गावोगावी,राज्यात परराज्यात पोहोचवल्या.भारतातील अनेक राजाच्या युद्धकाळात बंजारा समाजाने सैन्याला रसद पुरवली.कालांतराने ब्रिटिश काळात रेल्वे आल्यामुळे गोरमाटी समाजाचे पारंपरिक व्यवसाय बंद पडले.त्यामुळे समाज आर्थिकदृष्ट्या खालावला.कमकुवत बणत गेला.इंग्रजानी बंजारा समाजावर "गुन्हेगारी जमात" अशी शिक्कामोर्तब करणारे कायदे केले.त्यामुळे समाज आणखी मागे पडल.स्वातंत्र्यानंतरही स्थिरता,शिक्षण,शासनाच्या योजना यापर्यंत समाज पूर्णपणे पोहोचू शकला नाही.स्वातंत्र्याची फळे यांना चाखता आली नाही.म्हणूनच बंजारा समाज आजही वंचित आ...
अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय
News

अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजय

अखेर शकुंतला रेल ब्रॉडगेजला डीपीआर मंजूरी – शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा ऐतिहासिक विजयअखेर शकुंतला रेल ब्रॉडगेज प्रकल्प मार्गी | अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वे प्रवासाची नवी दिशागौरव प्रकाशनAmravati News अमरावती (प्रतिनिधी) : गेल्या सात वर्षांपासून आंदोलनाच्या ज्वाळांवर उभी असलेली शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अखेर यशाच्या मार्गावर पोहोचली आहे. शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे डीपीआर (Detailed Project Report) मंजूर झाला असून अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेच्या भवितव्याला आता नवी दिशा मिळाली आहे.सात वर्षांचा सत्याग्रह अखेर फळाला2018 साली सुरु झालेल्या या लढ्याने आज ऐतिहासिक यश मिळवले. सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर समितीने सरकारचे लक्ष वेधून घेतले. या काळात रेल्वे विभागाला सातत्याने पत्रव्यवहार, मोर्चे, उपवास व विविध अहिंसक मार्गांनी आं...
बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा
Article

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथाचांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो.बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो.एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी ति...
अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध
Article

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोध

अल्मोन स्ट्रॉजरची कथा: एका अंत्यसंस्कार करणाऱ्याने जग बदललेला फोन शोधअल्मोन स्ट्रॉजरची प्रेरणादायी कहाणी1889 मध्ये अमेरिकेतील Kansas City येथे घडलेली एक घटना आज जगाच्या टेलिफोन उद्योगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. साधा Undertaker असलेल्या अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) याने व्यावसायिक स्पर्धेतून प्रेरणा घेऊन Automatic Telephone Exchange आणि Rotary Dial Phone चा शोध लावला.स्पर्धकाची पत्नी बनली अडथळात्या काळी Kansas City मध्ये फक्त दोन Undertaker होते. तरीदेखील सर्व ग्राहक दुसऱ्याकडेच जात होते.एका दिवशी स्ट्रॉजरच्या मित्राने त्याला सांगितलं –“मी तुला कॉल केला होता, पण टेलिफोन एक्सचेंजवरच्या महिलेने सांगितलं की तुझा फोन व्यस्त आहे. मग तिने मला थेट दुसऱ्या Undertaker कडे जोडून दिलं.”हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाचौकशी केली अस...
अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब
Article

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उबअंगण सांगे घराची कळापूर्वी कितीही छोटी घरे असली तरी त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण अंगण असायचं.आता काळाच्या ओघात अंगण नावाचं घर नामशेष होत चाललं आहे.जी काही थोडीफार अंगणे उरली आहेत त्यांनी ही आपापली सीमा कुंपणात बंदिस्त करून घेतली आहे.म्हणजे त्यात मोकळेपणा असा उरलेला नाही.पूर्वी अंगणं सजायची माणसांनी आणि बहरायची प्राजक्ताच्या सड्यांनी.उन्हाळा सुरू झाला कि वाळवणं करायची लगबग असायची अंगणात.भल्या पहाटे चुलांगण पेटून त्यावर आधन ठेवलं जायचं आणि मग तो चिक हटणं असो नाही तर मग सोऱ्याने कुरडया करायच्या असो. सगळं अंगण आया बायांनी भरून जायचं,कुणाला वेगळं आमंत्रण द्यायची कधीच आवश्यकता वाटत नसायची. अंगणासाठी सीमा ठरलेली नसायची.तशीच ती सीमारेषा माणुसकीसाठी ही नसायची.रात्रीच्या उकाड्यात तर अंगण हीच हवेशीर ...
लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!
News

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!

लातूर जिल्हा आरक्षण विवादाने पेटला; चार दिवसांत दोन आत्महत्या, समाजात तणाव!लातूर : लातूर जिल्ह्यातील आरक्षणाच्या संघर्षाने जिल्हा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाच्या ‘कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा’ या मागणीवर ओबीसी समाजाने तीव्र विरोध व्यक्त केल्याने दोन्ही समाजात तणावाची परिसीमा गाठली आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत कराड या युवकाने ‘ओबीसी आरक्षण संपणार’ या भीतीतून आत्महत्या केली. गावात ओबीसी समाजातील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल्याने वातावरण हादरले आहे.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदासुरुवातीला भरत कराड यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये ‘मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण हिरावले जाण्याची भीती’ व्यक्त केली. तणाव शमत नाही तोच निलंगा तालुक्याच्या दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळ्ळे...
शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी
Article

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वीशकुंतला रेल्वेचा ऐतिहासिक प्रवासब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेली शकुंतला नॅरो गेज रेल्वे हे विदर्भाचे वैशिष्ट्य मानले जात असे. मूर्तिजापूर–दर्यापूर–अचलपूर या मार्गावर धावणारी ही रेल्वे अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. प्रवाशांची जुन्या काळापासून असलेली एकच मागणी म्हणजे हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलावा. आता अखेर या मागणीला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.सात वर्षांचा अखंड संघर्ष2018 पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने हक्काची लढाई लढत होती. उपोषण, रस्ता रोको, आंदोलन अशा विविध मार्गांनी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 2022 मध्ये एफएलएस (फायनान्स लोकेशन सर्वे) मंजूर झाला होता, मात्र डीपीआरच्या अभावामुळे प्रकल्प रखडला. या सग...
भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा
Article

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसा

भोज्याभाई: आमच्या गावातील पानाचा पेटारा आणि पारंपरिक नागवेली पानांचा वारसाआमच्या गावात डोक्शावर पानाचा पेटारा घेऊन कधी पायदळ तर कधी मिळेल त्या वाहनानं दहिहांडयाचा भोज्याभाई यायचा. वयाची साठी ओलांडलेला व डोक्शावरचे केस विरळ झालेला.मळलेला सदरा,आखुड पायजामा मध्यम किडकिडीत शरीरयष्टी.दाढीचे खुंट वाढलेले,गयाभोवती लपेटलेली लाला शापी, म्हणजे आताच्या भाषेत दुप्पटं,पायात टायवरी चप्पल घातलेला असा भोज्याभाईचा अवतार होता.धर्माने मुसलमान असूनही अस्खलित पिवर मऱ्हाटी बोलायचा. तसं त्याचंच गावचं एवढं मोठं होतं की त्याले पानाचा पेटारा डोक्शावर घेऊन ईकडे तिकडे फिरायचं कामंही नव्हतं. त्याच्याच गावात त्याचा पानाचा धंदा व्हायचा. पंरतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी व आपल्यालाही दोन पैसे भेटावे या लालसेपोटी बिच्यारा दोन दिवसाआड नित्यनेमाने यायचा. बाकी दिवस आजुबाजूच्या खेड्यापाड्यात तो डोक्यावर व एक काखेत प...
विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर
Article

विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफर

विदर्भाचे सौंदर्य : नागपूर ते चिखलदरा, ताडोबा, पेंच व आनंदवनची सफरनागपूरच्या आसपास विदर्भात बरेच रमणीय, प्रेक्षणीय स्थळे आहेत उदाहरणार्थ टेकडी गणपती मंदिर हे तीर्थक्षेत्र असून पर्यटन सुद्धा आहे 12 व्या शतकात हेमाद्री पंडितांनी बांधले आहेत गणेश मूर्ती 250 ते 300 वर्ष जुने आहे. 1866 स* रेल्वे स्थानकाच्या कामासाठी टेकडीचा पूर्व भाग सुरंग लावून खोदकाम सुरू असताना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती निघाली त्यावेळी हा भाग रेंजीमेंटल असल्यामुळे अधिक खोद काम करता आले नाही.1926 झाली या मंदिराला टिनाचे शेड बांधण्यात आले 1955 स* नवीन मंदिर बांधण्यात आले. या देवस्थानाची मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर असून परदेशातून सुद्धा भाविक दर्शनासाठी येत असतात विदर्भातील अष्टविनायकामध्ये या गणपतीची गणना होते. जानेवारीत तीळकुंद चतुर्थीच्या दिवशी भव्य यात्रा भरते व कमीत कमी दोन लाख भाविक दर्शनास येतात.त्याच...