Saturday, May 2

Blog

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री
Article

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्रीआमच्या छोट्याशा गावात साऱ्या जातीधर्माची लोकं अगदी गुण्यागोविंदाने रहायची.गावात दहावी पर्यंत शाळा.पाच पन्नास कुणबी,पाटलांची,दहा बारा तेल्यांची ,पाच पंचवीस धनगर समाजाची वस्ती गावच्या नदीकाठावर बौद्धवाडा होता.बाकी गावगाडयाची जशीजशी लोकसंख्या वाढत गेली,तसतशी कुटूंबे मोठी झाली.काही नवीन प्लॉट पडलेल्या आखर पट्टीत शेणामातीची लिपून तर काही पक्की बांधून वस्ती करून रहायला गेली. दोनचार मुस्लिम समाजाची घरं होती. गफारभाई, व त्यांची भावडं पण गावाशी त्यांचा चांगला सलोखा होता. गफफारभाई हातात लोंखडी पाणा खांद्यावर घेऊन गावाला वॉटर सप्लाय म्हणजे नळ सोडायचे काम करायचे.दुसरा लहान भाऊ तालुक्याच्या बैलबाजारात गुरंढोर, बैलजोड्या विकण्याचा जोड धंदा करायचा. गावात अडल्या नडल्याले चांगली बैलजोडी विकत घेऊन द्यायचा.एक एसटी ड्रॉयव्हर असलेले त्यांच...
पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती
Article

पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती

पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृतीसेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक, कवी, लेखक रामदास पुजारी लिखित 'पर्यावरणविषयक घोषवाक्ये' ही पुस्तिका नुकतीच वाचण्यात आली. पर्यावरणाचा,भविष्याचा फारसा विचार न करता मानव आपल्या स्वार्थासाठी आज वृक्षतोड करताना दिसतो. रस्ते, औद्योगिकरण व इतर बाबींसाठी होत असलेली वृक्षतोड मानवाच्या, वन्यजीवांच्या, सृष्टीतील विविध घटकांच्या अस्तित्वासाठी व पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पर्यावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्काळ,अतीवृष्टी, महापूर यांचे आरोग्यावर, जीवनावर होणारे परिणाम सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहेत. अशा वेळी पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी रामदास पुजारी यांनी लिहिलेली पुस्तिका खूपच प्रभावी ठरते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशुद्ध हवा, स्वच्छ पाणी जीवना हवेवृक्षारोपण प्रत्येकान...
शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव
Article

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव

शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सवदरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला सुरुवात झाली. मात्र शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नाही; तो समाजाच्या प्रगतीचा, संस्कारांचा आणि भविष्यनिर्मितीचा द्योतक आहे. त्यामुळेच आपण त्याकडे भविष्यवेधी उत्सव म्हणून पाहिले पाहिजे.शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या विचारसरणीला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, चारित्र्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन रुजविण्याचे काम शिक्षक करतात. आजची विद्यार्थी पिढीच उद्याचा समाज आणि राष्ट्र घडवते, त्यामुळे शिक्षक दिन हा भविष्यातील पिढी घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस ठरतो.आजच्या...
चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख
Article

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख

चला शिक्षक होऊ या : शिक्षक दिन २०२५ विशेष लेख५ सप्टेंबर हा दिवस आपल्या भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. डॉ. राधाकृष्णन  हे उत्कृष्ट शिक्षकतज्ञ, तत्वज्ञानी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्वान होते.ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. जेव्हा त्यांच्या काही शिष्यानी व मित्रांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची परवानगी मागितली. त्यावर डॉ. राधाकृष्णन यांनी नम्रतेने सांगितले की, " माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी जर तुम्हाला माझा गौरव करायचाच असेल, तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा." त्या दिवसापासून म्हणजे ५ सप्टेंबर १९६२ पासून भारतात शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा सुरु झाली.   आजही ५ सप्टेंबर हा दिवस आपल्य...
हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणी
Article

हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणी

हिवराची झाडं, तरसाची गुफा आणि बालपणीच्या आठवणीशहानुर नदीच्या काठा,काठानं नदीथडीनं हिवराची ही दाट झाडं दृष्टीस पडायची.मधुकर डॉक्टर यांच्या थडीपासून तर रंगराव भदे पोलिस पाटील यांच्या वावरा पर्यंत नदीकिनारी आमचं खेळायचं साम्राज्य असायचं. बंगाली बाभुयांनी दाट झाकलेला भाग,थडीकाठानं जंगली श्वापदे व तरसाच्या मोठमोठ्या गुफा.ही तरसं रात्री शिकारीसाठी बाहेर पडायची.व दिवसा या दाट अडचणीच्या गुफेत दडून बसायची. बादशहा भाईच्या मईच्या वावरात मुंगाच्या शेंगा तोडल्यावर ताण काट्यावर मोजण्यासाठी डोक्शावर घराकडे पोतं आणतांना गोविंदराव साधुबुवांच्या मोठ्या पसरलेल्या नाल्या जवळ सगर रस्त्यावर वाढलेल्या गावरानी कडब्यातून वाट काढतांना कधीकधी ती समोरून पळून जायची.गाढवा सारखी उंची वाघासारखे पसरट पट्टेदार मोठ्ठं तोंड खुप भिती वाटायची.एक दोघं सोबतीला असले म्हणजे जाण्याची हिमंत यायची. एकदा तर सखाराम महाराजा...
चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Article

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवासबुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चिखला गावाचा गरिबाघरचा मुलगा आता जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठात शिकायला जाणार आहे. या तरुणाचं नाव आहे एकनाथ भगवान वाघ.एकनाथची कहाणी जिद्दीची आहे. स्वप्नांचा पाठलाग करणारी आहे. आई कासाबाई आणि वडील भगवानराव अडानी. घरी शिक्षणाचा कसलाच वारसा नाही. टिन पत्र्याचं घर. आजारी आई. पण एकनाथ शिकत राहिला. ग्रामीण भागातील एका साध्या कष्टकरी कुटुंबातून हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा त्याचा प्रवास साऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. हावर्ड विद्यापीठामध्ये पब्लिक पॉलिसी या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यास प्रवेश मिळाला आहे. विशेष हे की यासाठी त्याला महाराष्ट्र सरकारची परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. महाराष्ट्रातून मोजक्याच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच...
वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश
News

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराशकटरा (जम्मू काश्मीर): श्री माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा सलग सातव्या दिवशीही स्थगित राहिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे.जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भूस्खलन व पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेचा मार्ग धोकादायक झाल्याने प्रशासनाने तात्पुरती यात्रा थांबवली.● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!हजारो भक्त कटरा, त्रिकुटा डोंगर परिसरात अडकलेले आहेत. हॉटेल्स, धर्मशाळा येथे गर्दी वाढली आहे.रोपवे, हेलिकॉप्टर, बैटरी कार यांसह सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धालूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.हवामान सामान्य झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल....
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा
News

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवामुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटविण्यात यावे. तसेच मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई वेशीबाहेरच रोखून परत पाठवावे, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!न्या. रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की आंदोलकांनी दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. केवळ आझाद मैदानापुरती मर्यादित राहणारी परवानगी असूनही मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, हुतात्मा चौक परिसरात जम...
मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक
News

मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक

मुंबईत मराठा आंदोलनात अडथळा; जेवणाची वाहने पोलिसांनी रोखली, माजी आमदार विक्रम सावंत आक्रमकमुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला महाराष्ट्रभरातून भक्कम पाठिंबा मिळत आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातील दानशूरांनी उपोषणकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ मुंबईला पाठवले.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!मात्र, ही जेवण घेऊन जाणारी वाहने मुंबईतील अटल सेतूवर पोलिसांनी थांबवली. यावर माजी आमदार विक्रम सावंत आक्रमक पवित्र्यात आले व पोलिसांना थेट जाब विचारला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वादानंतर पोलिसांनी वाहने सोडली.यानंतर विक्रम सावंत आझाद मैदानावर दाखल झाले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला.• नम्र निवेदन"निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहका...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद
News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंदमुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता त्यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जाहीर केले की, “आजपर्यंत मी पाणी घेतले पण उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. म्हणजेच उपोषण आणखी कडक स्वरूप धारण करेल.”राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला 70 वर्षांपासून आरक्षण मिळालेले नाही. गोरगरीब मराठा समाजाची वेदना मोठी आहे. ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी गाड्या मैदानात लावा आणि रेल्वेने आझाद मैदानावर या, तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील.”सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्यापासून आमरण उपोषण आणखी तीव्र होणार असल...